Categories
उमरी नांदेड

निवडणूकीसाठी लागणाऱ्या कागदपत्राची जुळवाजुळवी

उमरी तालुका प्रतिनिधी;उद्धव मामडे रावधानोरकर

उमरी:तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूकीसाठीचा अर्ज भरण्याची कालवधी कमी असल्याने उमेदवार निवडणुकीसाठी अर्जासोबत लागणाऱ्या कागदपत्र काढण्यासाठी धावपळ करीत असल्यांचे चित्र तहसील कार्यालयाच्या परिसरात दिसून येत आहे.
तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणूकाचे रंगधुमाळी सुरु झाले असुन या ग्रामपंचायतील सरपंच पदाचे आरक्षण ही जिल्हाधिकारी यांच्या सुचणेनुसार सोडण्यात आले होते.पण शासनाने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत घोडे बाजार होऊ नये म्हणून सोडलेले आरक्षण रद्द करण्याचे आदेश देऊन सदरील आरक्षण हे निवडणुकीच्या नंतर सोडणार असल्याने इच्छुक उमेदवारांचे हिरमोड झाले असल्याने निवडणूकीत इच्छुक उमेदवारांचा खर्च व निवडणुकीसाठी लागणारे कागदपत्रे यांची जुळवाजुळवी करणार कोण? असा प्रश्न उपस्थित झाल्याने उमेदवारांना लागणारे कागदपत्रे काढण्यासाठी विलंब झाला असून आत्ता निवडणूकीसाठीचा अर्ज स्वीकारण्याची तारीख जवळ येताच उमेदवारांची पळापळी करून कागदपत्राची जुळवाजुळवी करीत आहेत.
ग्रामपंचायत निवडणूकीसाठी दि. २३ डिसेंबर ते 30 डिसेंबर पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत यात प्रत्येक गावातील इच्छुक उमेदवार आपले भवितव्य शोधण्यासाठी धावपळ धावपळ करून निवडणुकीसाठी लागणारे कागदपत्रे काढण्यासाठी जिवाचा आटापिटा करतांना दिसून येत आहे.

Categories
इंदापूर

समाजकारणाला राजकारणाची जोड शिवधर्म फाऊंडेशन पहिल्यांदाच लढवणार ग्रामपंचायत निवडणूक..दिपकअण्णा काटे

इम्तिहाज मुलाणी :
इंदापूर (प्रतिनिधी):

राज्यात तसेच इंदापुर तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या आहेत. ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण निवडणुक निकालानंतर घोषीत करण्यात येणार आहे.
ग्रामपंचायत निवडणूकांच्या रणधुमाळीला सुरूवात झाली असून ग्रामपंचायत निवडणुकीत ऐन थंडीच्या दिवसात ग्रामीण भागात चांगलेच वातावरण तापलेले पाहायला मिळतेय.इंदापुर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विधानसभेनंतर पुन्हा एकदा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व भाजपचे नेते माजीमंञी हर्षवर्धन पाटील हे आपले आस्तित्व सिध्द करण्यासाठी पुन्हा एकदा ऐकमेंकाच्या विरोधात आमनेसामने असणार आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीत निवडणूक फाँर्म भरण्यासाठी लागणारे कागदपत्रे काढण्यासाठी शासकीय कार्यलयामध्ये कार्यकर्ते पदाधिकारी यांची मोठी धावपळ चाललेली पाहायला मिळतेय. गावपातळीवर देखील ग्रामपंचायत निवडणुकीत पँनल उभा करण्यासाठी विविध पक्षाच्या वतीने घोंगडी बैठका, मतदार गाठीभेटीचे कार्यक्रम जोमाने सुरू आहेत. विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे अहोरात्र ग्रामपंचायत निवडणूक पँनल मोर्चे बांधणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मेहनत घेत आहेत. राज्यात तसेच इंदापुर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीसाठी पहिल्यांदाच शिवधर्म फाऊंडेशन ने ग्रामपंचायत निवडणुकीत समाजकारणाला राजकारणाची जोड म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय कार्यकर्तांच्या व विश्वासू सहकार्‍यांच्या अग्रहाखातर घेतला आहे, अशी माहिती शिवधर्म फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पै. दिपक काटे यांनी दिली आहे. शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दिपकअण्णा काटे यांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात उमेदवार उभे करण्याची जोरदार चाचपणी सध्या सुरू केली आहे. शिवधर्म फाऊंडेशनचे संपूर्ण महाराष्ट्रात नवयुवकांचे मोठ्या प्रमाण जाळे आहे. शिवधर्म फाऊंडेशन संघटनेने अनेक मोठ मोठे सामाजिक उपक्रम राबिवले असून संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात मोठे नेटवर्क तयार करण्यात आले आहे.संभाजी विडीवरील संभाजी महाराज यांचे नाव बदलण्यात यावे यासाठी शिवधर्म फाऊंडेशनच्या वतीने व्यापक असा लढा उभा केला गेला. त्यानंतर शेवटी संभाजी विडीवरील नांव साबळे -वाघिरे कंपनीला बदलण्यास भाग पाडले. इंदापुर सेतू मधील भोंगळ कारभारा विरोधात शिवधर्म फांऊंडेशनच्या वतीने मोठे आंदोलन करुन सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवुन दिला. व जादा व बोगस पैसे घेणे बंद केले.

शिवधर्म फाऊंडेशने इंदापुर तालुक्यात दोनच दिवसात ५१ शाखाचे ओपनिंग केल्या आहेत .प्रत्येक गावागावात शिवधर्म फाऊंडेशनचे कार्यकर्ते पदाधिकारी बुथ बांधणी मजबूत करीत आहेत. परंतु समाजकारणाला राजकारणाची जोड म्हणून शिवधर्म फाऊंडेशनच्या वतीने ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे भविष्यात येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवधर्म फाऊंडेशनची सरपंच निवडीसाठी भुमिका मोठी निर्णायक ठरणार आहे.

Categories
गुन्हेगारी नांदेड

पळवलेला बालक स्थानिक गुन्हा शाखेने 60 मिनिटात सुरक्षीत केला

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:27 डिसेंबर रोजी गायब झालेला एक बालक स्थानिक गुन्हा शाखेने 60 मनिटाच्या आत आपल्या ताब्यात घेवून त्याची सुरक्षा केली.याबद्दल स्थानिक गुन्हा शाखेचे कौतुक करायलाच हवे.

मौजे सरेगाव ता.मुदखेड येथून रुपेश कामाजी गिरे (19) या बालकाला कोणी तरी 27 डिसेंबर रोजी दुपारी अज्ञात कारणासाठी अज्ञात माणसांनी पळवून नेल्याचा प्रकार घडला.माहिती प्राप्त होताच स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी आपल्या पथकातील सहाय्यक पोलीस निरिक्षक सुनिल नाईक, राजेश आलेवार,पोलीस कर्मचारी शंकर मैसनवाड, मातोराम पवार,गजानन बैनवाड, शंकर केंद्रे आणि सखाराम नवघरे यांना या बालकास शोधण्याची जबाबदारी दिली.या पोलीस पथकाने 60 मिनिटातच या बालकाला नांदेडच्या रेल्वे स्थानकावरून आपल्या ताब्यात घेतले.पुढील कार्यवाहीसाठी या बालकाला बारड पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पोलीस अधिक्षक प्रमोदकुमर शेवाळे,अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांनी अत्यंत जलदगतीने कार्यवाही करणाऱ्या पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.

Categories
मुंबई शैक्षणिक

शाळा सुरू करण्याबाबत संभ्रम… गणेश हिरवे

( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी:लक्ष्मण राजे )

मुंबई,ठाणे,नाशिक,पालघर व अन्य काही जिल्हे वगळता राज्यातील इयता नववी ते बारावीच्या शाळा-कॉलेज सुरू झाले आहेत व आता मुंबईसह सर्वच ठिकाणी शाळा सुरू होण्याबाबत पालक,शिक्षक, संस्थचालक व विधार्थीही आग्रही आहेत,कारण दहावी-बारावीचे महत्वाचे वर्ष असून गेल्या कित्येक महिन्यांपासून हे विधार्थी प्रत्यक्ष शाळेतील शिक्षणापासून वंचित राहिले आहेत.सध्या मुंबईतील कोरोना संख्या कमी होत आहे,पण ब्रिटन व इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आल्यामुळे राज्यात पुन्हा एकदा सर्व प्रशासकीय यंत्रणा सावध झाल्या असून मुंबई व इतर काही ठिकाणी रात्रीची संचारबंदी सुरू करण्यात आली आहे.तेव्हा १ जानेवारी २०२१ पासून मुंबईसह इतर ठिकाणच्या शाळा सुरू करायच्या की नाहीत याबाबत शिक्षण विभागाकडून अजूनपर्यंत कोणतीही स्पष्टता किंवा दिशानिर्देश देण्यात आलेले नसल्याने प्रशासनाने याबाबत लवकरात लवकर स्पष्टता आणून याबाबतचा संभ्रम दूर करावा अशी मागणी मुख्याध्यापक व पालकांकडून होत आहे.

Categories
अहमदनगर ब्रेकिंग न्युज सातारा

माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे जानेवारीत सातारा येथे राज्यस्तरीय अधिवेशन


अहमदनगर- कमलेश शेवाळे


महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांच्या ऑनलाइन गूगल मिटद्वारे बैठकीत निर्णय–दिपक कांबळे.

मनुष्य हा समाजशील प्राणी असून समाजात वावरतांना त्याला अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो. समाजाच्या तळागाळातील लोकांवर होणारा आत्याचार अधिकारी वर्गाची दडपशाही विविध संस्थांमध्ये होत असलेला भ्रष्टाचार आधी सर्वच गोष्टींवर जाणीवपूर्वक लक्ष ठेवून त्यांना न्याय कसा मिळवून देता येईल व संघटनेच्या मजबूत बांधणीसाठी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती चे राज्यस्तरीय अधिवेशन लवकरच सातारा येथे घेण्यात येणार असून पत्रकारांवर होत असलेले हल्ले रोखण्यासाठी व त्यांना शासनाच्या मार्फत संरक्षण मिळावे हे एकमेव उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून राज्यस्तरीय माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती आणि पोलिसमित्र समितीच्या महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी यांची ऑनलाईन गुगल मिट द्वारे बैठक घेण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष दीपक कांबळे यांनी दिली आहे.
यावेळी २४ जानेवारी रोजी सातारा येथील राज्य स्तरावर होणाऱ्या मेळाव्याचे नियोजना संदर्भात महत्वाची व साधक बाधक चर्चा करण्यात आली असून या बैठकीत राष्ट्रीय महासचिव कमलेश शेवाळे यांनी संघटनेचे उद्दिष्ट सांगितले व कामकाज कशाप्रकारे करावे ? याबद्दलचे मार्गदर्शन केले तसेच महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महेश सारणीकर, राष्ट्रीय अध्यक्ष दिपक कांबळे यांनी संघटनेच्या कामात पुढील काळात कोणते बदल केले जातील व आपली संघटना कशाप्रकारे वाढवावी लागेल ? संघटनेची ध्येय धोरणे कशा पद्धतीने अमलात आणता येतील? याबद्दलची सविस्तर माहिती दिली.तसेच महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अमर बेंद्रे व आपल्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक कांबळे यांनी भविष्यात राज्यस्तरीय अधिवेशन घेण्यासंदर्भात माहिती दिली.
या बैठकीत माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती मार्फत महाराष्ट्रामध्ये भव्यदिव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे, तसेच मेळाव्यास अधिकाधिक पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवावी, विभागीय, जिल्हा व तालुका कार्यकारिणी नियुक्त्या.व्हॉटस अप ग्रुप अनावश्यक मेसेज ग्रुप वर टाकण्यास मनाई,मेळाव्याच्या नियोजनासंदर्भात सर्व पदाधिकारी यांच्यामध्ये चर्चा, संघटनेच्या कामकाजा संदर्भात ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणून संघटनेचे मोबाईल ॲप बनवणार आहेत या ॲपचे मेळाव्या दरम्यान ओपनिंग करण्याचे आयोजन तसेच मेळावा संदर्भात अधिक माहिती येत्या दिनांक ६ किंवा ७ जानेवारी दरम्यान “पूर्व नियोजन बैठक” घेऊन संपूर्ण माहिती प्रसारित करण्यात येणार आहे.,हा संघटनेचा मेळावा होत असल्याने संघटनेतील सर्व पदाधिकारी विभागीय अधिकारी जिल्हाधिकारी यांनी मेळाव्यास संदर्भात आपल्या विभागातून किती पदाधिकारी उपस्थित राहणार आहे यासंदर्भात पूर्वसूचना द्यावयाच्या आहेत,या मिटिंग मध्ये संघटनेचे फेसबुक अकाउंट मध्ये जॉईन होण्यास विनंती केली आहे हे अधिकाधिक पदाधिकारी व सर्वसामान्य लोकांपर्यंत या फेसबुक अकाउंट पोचवण्याची जबाबदारी सर्वांनी घ्यावी.
मेळाव्यादरम्यान सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची नियुक्ती पत्र मान्यवरांच्या हस्ते देण्याचे योजले आहे आदी विषयांवर साधक-बाधक चर्चा करण्यात आली.

यावेळी या गुगल मिटद्वारे घेण्यात आलेल्या बैठकीत माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे
दिपक कांबळे(राष्ट्रीय अध्यक्ष), कमलेश शेवाळे(राष्ट्रीय महासचिव),महेश सारणीकर(महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष),
वजीर शेख (पोलीस मित्र समिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष )
अमर बेंद्रे (महाराष्ट्र उपाध्यक्ष),पुष्कर सराफ (महाराष्ट्र उपाध्यक्ष),तुळशीराम जांभूळकर (महाराष्ट्र उपाध्यक्ष),
उमेश काशीकर (महाराष्ट्र उपाध्यक्ष),दिनेश शिंदे (महाराष्ट्र संघटक),सुभाष भोसले (महाराष्ट्र सचिव), चांदभैय्या शेख (महाराष्ट्र समन्वयक ),रामभाऊ आवारे (उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख), सुरेश संकपाळ्, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष,प्रशांत भोसले (पश्चिम महाराष्ट्र कार्याअध्यक्ष),नितीन गुरव (पुणे जिल्हाध्यक्ष),
शेखर बडगे(अमरावती जिल्हाध्यक्ष),सौ श्वेता व्हनमाने
(पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा ),सौ सोनाली पोतदार
(पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा),सौ शिल्पा बनपुरकर
(चंद्रपूर महिला जिल्हाध्यक्षा),महेंद्रकुमार देशमुख
(पोलीस मित्र सोलापूर जिल्हाध्यक्ष),पोपटराव कोळेकर
(पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष),दिलिप जाधव(पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष), विवेक कुंभे जकर पश्चिम महाराष्ट्र सचिव राजु कुलकर्णी(पुणे जिल्हा उपाध्यक्ष) आदींनी बैठकीत सहभाग नोंदवुन अडी अडचणी सोडविण्यासाठी अतिशय खेळीमेळीच्या व आनंदी वातावरणात ही बैठक पार पडली. तर पोलीस मित्र समितीचे प्रदेशाध्यक्ष वजीर शेख यांनी सांगितले की लवकरच पोलीस मित्र समिती ची महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल. सर्व मान्यवरांनी आपली मते, विचार मांडले त्यामुळे संघटनेची माहिती मिळाली अशाप्रकारे महिन्यातून एकदा बैठक बोलावली म्हणजे संघटनेचे कार्य कसे चालले आहे व पुढील कार्य कसे करायचे आहे यांचे मार्गदर्शन होईल .

Categories
शिरसगाव

विद्यार्थ्यांना पुस्तके भेट अन्  बौध्दीक मेजवानी , अग्नीपंख फौंडेशनचा उपक्रम


श्रीगोंदा ( हिंदुसमाट शिरसगाव बोडखा प्रतिनिधी आदेश उबाळे यांच्याकडून )

श्रीगोंदा ; स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून यशाचे शिखर सर करण्यासाठी अग्नीपंख फौंडेशनने विद्यार्थ्यांना पुस्तकांची भेट दिली आणि अप्पर तहसीलदार चारुशीला पवार व सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर यांच्या व्याख्यानाच्या बौद्धीक मेजवानीने कार्यक्रम रंगला अध्यक्षस्थानी पांडुरंग खेतमाळीस होते.

 अप्पर तहसीलदार चारुशीला पवार यांनी आपल्या जीवनातील यशाचे पैलू उलगडताना स्पर्धा परीक्षा देताना  अभ्यासक्रम कोणता आहे! त्यासाठी चांगल्या लेखकांच्या पुस्तकांची निवड करावी आणि आपले ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रम यावे नक्कीच यश मिळेल. 

दिलीप तेजनकर म्हणाले की मी  तुम्हाला काय व्हायचे एकदा ठरवून त्या दिशेने मार्गक्रमण सुरू करा चुका सुधारत चला जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत हिम्मत सोडू नका. 

यावेळी  पांडुरंग खेतमाळीस प्रशांत गोरे विजया घावटे प्रा.  प्रांजल कुलकर्णी प्रतिभा रसाळ विशाल चव्हाण यांची भाषणे झाली  प्रास्ताविक प्रा. संजय लाकुडझोडे यांनी केले. 

यावेळी विठोबा निंबाळकर संगीता तनपुरे मच्छिंद्र सुपेकर  संतोष धुमाळ  उद्धव खामकर  किरण ढवळे  अरविंद कापसे प्रशांत भोसले पोपट जाधव  बापुराव ढवळे शरद मचाले बजरंग नेटके पांडुरंग शेलार  डॉ अरुण रोडे सुरेखा शेंद्रे शुभांगी लगड बबन गोरे अंकुश घाडगे मधुकर काळाणे किसन वऱ्हाडे उपस्थित होते. 

Categories
कोल्हापूर हातकणंगले

हातकणंगले काँग्रेस कमिटी मध्ये काँग्रेस स्थापना दिवस साजरा

प्रशांत भोसले
हातकणंगले : देशाच्या स्वतंत्र लढ्यामध्ये व त्या नंतर देशाच्या विकासासाठी काँग्रेस पक्षाने दिलेले योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे या करिता कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे वतीने 28 डिसेंबर रोजी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार हातकणंगले काॅग़ेस कमिटी मध्ये स्थापना दिवस साजरा करण्यात आला . अध्यक्ष भगवानराव जाधव याच्या हस्ते ध्वजाचे पुजन करण्यात आले

यावेळी आणासो पाटील,बाजीराव सातपुते, तानाजी घोडेस्वार,शकील आतार,अरूण पाटील, विजय गोरड, पिंटू किणींगे,सरदार मुजावर, एस.एम.पाटील,भगवान कांबळे,कृष्ण त कापसे व कायकत॓ उपस्थित होते

Categories
कोल्हापूर

सुनील खोत यांना शिक्षकरत्न पुरस्कार प्रदान

बिद्री ( प्रतिनिधी ) : येथील दूधसाखर विद्यानिकेतन व कनिष्ठ महाविद्यालयचे कलाशिक्षक सुनिल भाऊसो खोत यांना दौंड (जि. पुणे) येथील ज्ञान संकल्प सामाजिक संस्थेच्यावतीने राज्यस्तरीय गुणवंत गुरुगौरव शिक्षणरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.पुणे जिल्हा बँकेचे चेअरमन व माजी आमदार रमेशआप्पा थोरात यांच्या हस्ते आणि तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष आप्पासाहेब पवार, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष सोहेल शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गेली वीस वर्षे कलाशिक्षक म्हणून सेवेत असलेले सुनील खोत यांनी शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. त्यांनी कला विषयावरील शासकीय ( एलेमेंटरी व इंटरमिजीएट) ग्रेड परीक्षेस उपयुक्त पुस्तकाची निर्मिती केली आहे.कलाक्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेत श्री. खोत यांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.
पुरस्कार वितरण सोहळ्यास शिवसेना जिल्हाध्यक्ष राजेंद्र काळे, ज्ञानसंकल्प संस्थेचे अध्यक्ष सदाशिव रणदिवे, उपाध्यक्ष सुभाष भोसले, प्रदेश उपाध्यक्ष रोहिणी पवार , कोजिमाशिचे संचालक प्रा.हिंदूराव पाटील, मनसे तालुकाध्यक्ष सचिन कुलथे, मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनायक दोरगे उत्तम कागले आदी मान्यवर उपस्थित होते.

Categories
कोल्हापूर हातकणंगले

कै.संभाजीराव माने स्मृती राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन भव्य वक्तृत्व स्पर्धा

प्रशांत भोसले

रुकडी ( दि.२५-१२-२०२० ) येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय आणि रोटरी क्लब आॕफ इचलकरंजी सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने कै.संभाजीराव माने स्मृती राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा गुरुवार दिनांक ७ जानेवारी २०२१ रोजी सकाळी नऊ वा. रुकडी येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयात आयोजित केली आहे.या स्पर्धेतील विषय पुढील प्रमाणे १. आण्णाभाऊ साठेः साहित्य आणि समाजकार्य 2.कोव्हीड १९ आणि भारतीय अर्थव्यवस्था ३. कुस्तीतील ध्रुवताराः हिंदकेसरी श्रीपतराव खंचनाळे ४.नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ५. गुगल-एक वैश्विक महागुरू असे स्पर्धेसाठी विषय असून प्रथम क्रमांकासाठी रोख रुपये ५०००/-, प्रमाणपत्र व कै.संभाजीराव माने स्मरणार्थ कायमस्वरूपी ट्राॕफी द्वितीय क्रमांक रोख रुपये ३००० व प्रमाणपत्र तृतीय क्रमांक रोख रुपये २०००/- व प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ रोख रुपये १००० व प्रमाणपत्र अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत, तरी ज्युनियर सिनियर व पदव्युत्तर विभागातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन राजगे व स्पर्धा समन्वयक प्रशांत कांबळे यांनी केले आहे

अधिक माहितीसाठी 77 75 98 96 77 भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा

Categories
अजब गजब कोल्हापूर

२६/११ चे “हिरो” राष्ट्रपती शौर्यचक्र विजेते मरीन कमांडो वीर योद्धा प्रवीण तेवतिया यांनी दोन लाख रूपये करोना लढ्यासाठी दान केले


* कोल्हापूर- सुभाष भोसले
आम्ही परमवीरचक्र विजेते वीर योद्धा अब्दुल हमीद यांना पाहिले नाही, पण अतिरेक्यांच्या चार गोळ्या बुलेट फ्रुफवर झेलणाऱ्या व एक गोळी कानाला चाटून गेल्याने कायमचा कान निकामी झालेले, एका अतिरेक्यास यमसदनी पाठविलेले व १५० पेक्षा जास्त लोकांचे प्राण वाचविणारे प्रवीण तेवतिया यांना पाहतोय

२६/११ च्या ताज हॉटेलवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचे वेळी अतिरेक्यांना सामोरे जाणारे आघाडीचे पूर्व मरीन कमांडो प्रवीण अतिरेक्यांना पहिल्यांदा सामोरे गेले. अतिरेक्याने एके-40 तून झाडलेल्या चार गोळ्या बुलेटप्रुफ जॅकेटवर लागल्या, तर एक गोळी कानाला चाटून गेल्याने कान कायमचा निकामी झाला. याही स्थितीत त्यांनी एका अतिरेक्याला लोळविले. पाच महिने हॉस्पिटलमध्ये राहावे लागले. पाच सर्जरी झाल्या. ते सामोरे गेल्याने अतिरेकी माघारी फिरले. ते मागे फिरल्यामुळे १५० पेक्षा जास्त लोकांचे प्राण वाचले.
प्रवीण तेवतिया बुलंद शहराच्या गुलावठी क्षेत्रातील भटौना गावात राहणारे. २६/११/२००८ च्या ताज हल्ल्यानंतर दाखल झालेल्या ऑपरेशन टीमचे आघाडीचे कमांडो.
प्रवीण यांच्या अतूल शौर्यामुळे त्यांना महामहीम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी राष्ट्रपती शौर्यचक्र पदकाने सन्माणित केले होते. प्रवीण यांनी साऊथ आफ्रिका, मलेशिया, अमेेरिका आयर्न मॅन पुरस्कार जिंकला आहे.
कौन बनेगा करोडपती मध्ये या योद्ध्याला मा अमिताभ बच्चन यांनी बोलावून सॅलूट केला होता. त्यांची हेलावून टाकणारी शौर्यगाथा ऐकली. या खेळात प्रवीण यांना १२,५०,००० रूपये जिंकता आले होते.हे पैसेही त्यानी समाजासाठी खर्च केले होते
रिटायर प्रवीण हे मुंबई कमौडो ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रक्टिकल ट्रेनिंग, एअर रायफल शूटिंग, योगा आणि धावण्याचे प्रशिक्षण देतात. मेरेथाॅनचे प्रशिक्षण Online देतात.
भटौना गावास या योद्ध्याचा अभिमान वाटतो. गावच्या मुलांनी देशसेवेसाठी सैन्यदलात यावे असे प्रवीण यांना वाटते.
प्रवीण यांना आतापर्यंत मिळालेली तीन डझन सुमारे ३६ पेक्षा जास्त मेडल Online विकून गरीबांसाठी मदत करणार आहेत. कहर म्हणजे दोन मेडल दोन लाख रूपयांना विकून सर्व पैसे करोना विरोधातील लढ्यासाठी पीएम करोना फंडास दान केले आहेत.
प्रवीण तेवतिया आपण अस्सल देशप्रेमी आहात. आपली पेन्शन समाजासाठी खर्च करताच, पण मेडलही विकून देशाला संकटमुक्त करण्यासाठी रक्कम दान करत आहात.
२६ जानेवारी, १५ ऑगष्ट व क्रांतीदिनाच्या दिवशी बेगडी प्रेम दाखवून नंतर वर्षभर शहीद वा माजी सैनिकांच्या समस्या जाणून घेत नसल्याबद्दल व्यवस्थेविरूद्घ प्रवीण यांना प्रचंड राग आहे. सैन्यासाठी विमा असावा यासाठी ते आग्रह धरतात.
प्रवीण तेवतिया २६/११ च्या हिरोला साष्टांग दंडवत. तुम्हाला परमेश्वर आरोग्यदायी दीर्घायुष्य देऊ दे. तुमच्या सर्व आशा, इच्छा व अपेक्षा भविष्यात पूर्ण होऊ देत.
संपक गायकवाड
(माजी सहाय्यक शिक्षण संचालक)

Categories
राहुरी

राहुरी तालुक्यातील ग्रामपंचायत उमेदवारांची धावपळ

निवडणूकीसाठी लागणाऱ्या कागदपत्राची जुळवाजुळवी

राहुरी तालुका प्रतिनिधी
( जावेद शेख ) 28 डिसे

राहुरी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूकीसाठीचा अर्ज भरण्याची कालवधी कमी असल्याने उमेदवार निवडणुकीसाठी अर्जासोबत लागणाऱ्या कागदपत्र काढण्यासाठी धावपळ करीत असल्यांचे चित्र तहसील कार्यालयाच्या परिसरात दिसून येत आहे.
तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणूकाचे रंगधुमाळी सुरु झाले असुन या ग्रामपंचायतील सरपंच पदाचे आरक्षण ही जिल्हाधिकारी यांच्या सुचणेनुसार सोडण्यात आले होते. पण शासनाने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत घोडे बाजार होऊ नये म्हणून सोडलेले आरक्षण रद्द करण्याचे आदेश देऊन सदरील आरक्षण हे निवडणुकीच्या नंतर सोडणार असल्याने इच्छुक उमेदवारांचे हिरमोड झाले असल्याने निवडणूकीत इच्छुक उमेदवारांचा खर्च व निवडणुकीसाठी लागणारे कागदपत्रे यांची जुळवाजुळवी करणार कोण? असा प्रश्न उपस्थित झाल्याने उमेदवारांना लागणारे कागदपत्रे काढण्यासाठी विलंब झाला असून आत्ता निवडणूकीसाठीचा अर्ज स्वीकारण्याची तारीख जवळ येताच उमेदवारांची पळापळी करून कागदपत्राची जुळवाजुळवी करीत आहेत.
ग्रामपंचायत निवडणूकीसाठी दि. २३ डिसेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत यात प्रत्येक गावातील इच्छुक उमेदवार आपले भवितव्य शोधण्यासाठी धावपळ धावपळ करून निवडणुकीसाठी लागणारे कागदपत्रे काढण्यासाठी जिवाचा आटापिटा करतांना दिसून येत आहे.

Categories
नांदेड

40 वर्ष सत्ता राखणारा नेता हरपला

नांदेडमधील ग्रामपंचायतीत आता भाजप vs भाजप

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:दि.28.मधील मरळक गावात बापूराव शिंदे यांच्या निधनामुळे मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे.

नांदेड तालुक्यातील मरळक ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरु झाली आहे. जागृत महादेवाचे मंदिर असल्याने मरळक गावाला तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे. महादेव मंदिरामुळे सबंध जिल्ह्यात मरळक गावाची ओळख आहे. 40 वर्ष सत्ता राखणाऱ्या नेत्याच्या निधनानंतर या गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे दोन गट आमनेसामने आल्याने चर्चा रंगली आहे.

मरळक ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सध्या अनेकांचे उमेदवारी अर्ज भरणे सुरु आहे . या गावाची लोकसंख्या 6000 असून गावात 2500 मतदार आहेत.गावातील ग्रामपंचायतीची सदस्य संख्या 11 आहे.मरळक ग्रामपंचायत पूर्वी भाजपच्या ताब्यात होती.

बापूराव शिंदेंच्या निधनानंतर राजकीय पोकळी

गावातील बापूराव शिंदे यांच्या गटाकडे ग्रामपंचायतीची सत्ता आहे.गेल्या चाळीस वर्षांपासून शिंदे यांचा शब्द हा गावासाठी प्रमाण होता. मात्र गेल्या वर्षी बापूराव शिंदे यांचं निधन झालं. त्यामुळे गावात मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे.

बापूराव शिंदेंच्या निधनामुळे मरळक गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप विरुद्ध भाजप अशी लढत होणार आहे. एक जुना भाजप गट आणि एक नवखा भाजप गट अशा दोन्ही गटांनी आपापली कंबर कसली आहे.गावात ताकदवान असलेल्या स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड संघटनेचे कार्यकर्ते भाजपच्या जुन्या गटासोबत आहेत.

भाजपच्या नव्या गटासोबत शिवसेना-काँग्रेस

दुसरीकडे,शिवसेना आणि काँग्रेस भाजपच्या दुसऱ्या गटासोबत असल्याने भाजप विरुद्ध भाजप अशीच लढत या गावात राहणार आहे. त्यामुळे भाजपच्या नव्या-जुन्या पुढाऱ्यात या गावात सामना रंगणार आहे. त्यामुळे मरळक ग्रामपंचायतच्या निवडणुकीकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.

सायाळ ग्रामपंचायत : भाजप-काँग्रेसमध्ये चढाओढ

नांदेड तालुक्यातील सायाळ ग्रामपंचायतीवर काँग्रेसची दीर्घकाळ सत्ता राहिली आहे. मात्र आता सायाळमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यात मोठी वाढ झाली आहे.त्यामुळे नऊ सदस्य संख्या असलेल्या सायाळमध्ये सत्तेसाठी भाजप-काँग्रेसमध्ये चढाओढ लागली आहे. अवघे अठराशे मतदार असलेल्या या गावाच्या निवडणुकीत मतदारांची आतापासून बडदास्त ठेवण्यात येत आहे.

दर्यापूरची बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम

नांदेड तालुक्यातील दर्यापूर इथल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोधपणे काढण्याचे जाहीर केलं आहे. दर्यापूर या गावाने गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा जोपासली आहे.गावात बहुसंख्य असणाऱ्या मराठा समाजाने वादविवाद टाळण्यासाठी ही प्रथा जोपासली आहे.या गावाची लोकसंख्या 740 असून गावकऱ्यांनी एकोपा आणि बंधुभाव कायमस्वरुपी जपला आहे.त्यातून जिल्ह्यात एक चांगले गाव म्हणून दर्यापूर गावाने आपली ओळख निर्माण केली आहे.

Categories
राहुरी

दात हा आरोगयाचा नव्हे तर निरोगी जिवनाचा आरसा -दंततज्ञ डाॅ.सुदश॔न गोरे

संघामार्फत दंत शिबिर संपन्न

राहुरी तालुका प्रतिनिधी
( जावेद शेख 28 डिसें वांबोरी येथे ज्येष्ठ नागरिक संघ व श्री संत सावता माळी युवक संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने वर्मा हॉल बाजारपेठ येथे डॉ गोरे डेन्टल हॉस्पिटल अहमदनगर यांचे मोफत दंतरोग तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी कोरोनाच्या काळात घ्यावयाची काळजी म्हणून मास्क वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. व्ही एम झंवर, ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष साहेबराव ठाणगे, उपाध्यक्ष जनार्दन ढोकणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी श्री संत सावता माळी युवक संघ अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अशोकराव तुपे, संघाचे प्रदेश सोशल मीडिया प्रमुख दीपक साखरे, ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव शंकरराव शेवाळे, सहसचिव प्रकाश गोसावी, खजिनदार आसाराम रहाणे, माणिकराव तिडके, शारदाताई साळुंके, हरिभाऊ सासणे, रामकिसनजी वर्मा, राधेश्याम झंवर, विजय शिंदे, रामकिसन कुऱ्हे, सुनील शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी साहेबराव ठाणगे यांनी ज्येष्ठ नागरिक संघाचे व संत सावतामाळी संघाचे कार्यक्रमाची माहिती दिली सामाजिक भावनेतून होत असलेली सेवा आदर्शवत व असे उपक्रम कायमस्वरूपी राबत राहण्यासाठी संघामार्फत प्रयत्न करीत राहील असे प्रतिपादन केले. डॉ. सुदर्शन गोरे यांनी दाता विषयी घ्यावयाची काळजी योग्य आहार सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळी दात साफ करणे तसेच उपचार पद्धती याविषयी माहिती दिली दंत हा आरोग्याचा नव्हे तर निरोगी जीवनाचा आरसा आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला त्यावेळी त्यांना मास्क वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकरराव शेवाळे यांनी केले तर आभार आसाराम राहणे यांनी मानले.

Categories
नांदेड

धर्माबाद शहर व तालुका काँग्रेस कमिटी तर्फे कॉग्रेस स्थापना दिवस साजरा

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:जिल्यातील धर्माबाद येथे सोमवार दि.28 डिसेंबर 2020 रोजी सकाळी11ः 00 वा.काँग्रेस स्थापना दिनानिमित्त तालुका पक्ष कार्यालय धर्माबाद येथे देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी कॉग्रेस पक्षाच्या शंभर वर्षांपूर्वी च्या व स्वातंत्र्याच्या काळातील कॉग्रेसच्या योगदानाबद्दल व पक्षातील मागील काळात जेष्ठ नेत्यांच्या पक्षनिष्ठेचे उदाहरण देऊन कार्यकर्त्यांनी व पदाधिकार्यानी त्यांचे आदर्श समोर ठेऊन काम करावे असे गोविंदराव पाटील रोषणगावकर यांनी मनोगत व्यक्त केले.कॉग्रेसच्या महान नेत्यांचे देशावरचे बलिदान व्यर्थ जाणार नाही येणाऱ्या काळात कॉग्रेस ला चांगले बळ मिळेल असे मत नगरसेवक सायारेड्डी यांनी मांडले.
महाराष्ट्रातील व नादेंड जिल्ह्यातील युवक काँग्रेस भक्कम असून युवक व जेष्ठ नेत्यांची मोठ बांधून काम केल्यास नांदेड जिल्हयासह धर्माबाद तालुका व शहर कॉग्रेस मय झाल्याशिवाय राहणार नाही.असे प्रखट मत नगरसेवक निलेश पाटील बाळापुरकर यांनी व्यक्त केले.तरी या कार्यक्रमांच्या अध्यक्ष स्थानी तालुका अध्यक्ष दत्ताहरी पाटील चोळाखेकर हे होते तर प्रास्ताविक शहराध्यक्ष ताहेर पठाण यांनी केले तर आभार मारोती माकणे यांनी मानले. यावेळी महाराष्ट्र सामाजिक सुरक्षा समितीचे नांदेड जिल्हाध्यक्ष तथा मागासवर्गीय विभागाचे तालुका अध्यक्ष संजीवकुमार गायकवाड माजी नगराध्यक्ष दिगंबर लखमावाड,विठ्ठल कोंडलवाडे, प्रतिष्ठीत व्यापारी संजय कोडगिरे, पाटोदा येथील जारीकोटे पाटील,राम पाटील नायगाव, सय्यद बाबर,मिनाजी लखमावाड,व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते

Categories
नांदेड

बाभळी बंधाऱ्याची सुरक्षा वाऱ्यावर

गेट क्रमांक आठच्या बेसमेंट मधून पाण्याचा प्रवाह चालू सुरक्षा बांधलाही भयंकर भेगा
भविष्यात दुर्घटना होण्याचे संकेत

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड:दि.28.धर्माबाद आंध्र प्रदेश व महाराष्ट्राच्या वादाने ढवळून निघालेल्या व सर्वोच्च न्यायालयाच्या अटी नियमाच्या अधीन राहून पूर्णत्वास गेलेल्या बाभळी बंधाऱ्याची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे चित्र दिसत असून, गेट क्रमांक आठच्या पायालाच मोठे भगदाड पडल्यामुळे तेथून गेट बंद असतानाही खालच्या बाजूने पाण्याचा मोठा प्रवाह चालू असल्याचे चित्र असून, सुरक्षा बांधलाही फार मोठ्या भेगा पडल्यामुळे भविष्यात फार मोठी दुर्घटना घडली घडण्याचे संकेत मिळत असून या बाबीकडे प्रशासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष देण्याची गरज जाणकार बोलून दाखवत आहेत. बाभळी बंधारा हा महाराष्ट्र व तत्कालीन आंध्र प्रदेश व सद्यस्थितीत तेलंगाना सीमेपासून अवघ्या सात किलो मीटर आत महाराष्ट्राच्या सीमेत धर्माबाद तालुक्यातील बाबळी येथे बांधण्यात आला. बाभळी बंधाऱ्याच्या पाण्याची क्षमता केवळ दोन पॉईंट 74 अब्ज घनफूट आहे.यावर्षी पावसाळ्यात मुबलक पाऊस पडल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 28 ऑक्टोबर पासून बाभळी बंधाऱ्याचे गेट लावण्यात आल्यामुळे मुबलक पाणीसाठा निर्माण झाला आहे.बाभळी बंधाऱ्याचे सभोवताली अगदी नयनरम्य चित्र दिसत असले तरी गेट क्रमांक आठच्या पायथ्याशी मोठे भगदाड पडले असून तेथून पाण्याचा प्रवाहात चालू आहे. हे भगदाड भविष्यात उग्र रूप धारण केले तर बाभळी बंधारा दुर्घटनेच्या स्वरूपात समोर येण्याची शक्यता असून बाबळी बंधाऱ्याच्या सुरक्षा बांधालाच भयंकर भेगा पडल्या असून त्या भागांची खोली जवळपास तीन फुटापर्यंत पोहोचल्याचे चित्र सद्यस्थितीत दिसत आहे. भविष्यात ही खोली जर वाढली तर हा बांध तुटून सत्यम शिवम सुंदरम या चित्रपटातील दुर्घटने प्रमाणे बंधाऱ्या खालील गावांना धोका पोहोचण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत बाबळी बंधाऱ्यावर कोणताही सक्षम अधिकारी दररोज उपस्थित नसल्याचे चित्र असून, फक्त एक डे-नाईट वाचमेन बाभळी बंधाऱ्याची अल्प मानधनावर सुरक्षा करीत असल्याचेही चित्र आहे. चौकट बाभळी बंधाऱ्याच्या डागडुजीसाठी प्रतिवर्षी किमान दहा लक्ष रुपये खर्च राखीव असून तो खर्च होतो किंवा नाही या गोष्टीकडे ही लक्ष देणे गरजेचे आहे बंधाऱ्याच्या सुरक्षा बांधाच्या बाजूने काटेरी कुंपण झाडे-झुडपे प्रचंड प्रमाणात वाढली आहे त्या झाडांच्या मुळ्या बांधात घुसून नुकसान पोहोचत आहेत उपरोक्त पृष्ठभूमीवर भविष्यातील दुर्घटना टाळावयाची असल्यास संबंधित प्रशासनाने बाभळी बंधाऱ्याची सद्यस्थिती काय आहे यासंदर्भात उच्चस्तरीय समिती नेमून बाभळी बंधाऱ्याच्या सुरक्षेविषयी अभ्यासपूर्ण अंदाज घेणे गरजेचे आहे.
यासंदर्भात बाभळी बंधारा प्रकल्पचे उपविभागीय अभियंता अनिल पडवळ यांना भ्रम्नधव्नीवरून विचार पुस केल्यास म्हणाले की,बंधाऱ्यात असलेल्या पाण्याची गळती होऊनये,यासाठी प्लाटमध्ये रबर सील बसविलेले असते,सदरील रबर सील मधून पाणी प्लाट मध्ये पडत आहे.पाण्याची पातळी त्या बाजूला जास्त असल्यामुळे सदरील ठिकाणी पाण्याची गळती रबर सील मधून होत असले. परंतु बंधाऱ्याला कुठलेच भेगा पडलेले नाहीत.व बंधाऱ्यांच्या देखरेख ठेवण्यासाठी कुलीच निधी वर्षाकाठी आलेली नाही.उलट बंधाऱ्यावरील संबंधित अभियंताची पोस्टींग दुसरीकडे करण्यात आली आहे.सध्या बंधाऱ्याच्या देखभालीसाठी दोन कर्मचारी आहेत.परंतू ते दोन्ही कर्मचारी सध्या पाणीपट्टी वसुली करण्यासाठी फिरत असल्याचे अनिल पडवळ यांनी बोलताना सांगितले आहे.

Categories
मुंबई

ज्येष्ठ कॅमेरामन ईश्वर बिद्री यांचे दुःखद निधन

( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी: लक्ष्मण राजे )

हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ कॅमेरामन ईश्वर बद्री यांचे दुःखद निधन झाले. बाॅर्डर , घातक , अंगार , एल ओ सी , अंदाज अपना अपना , गुनाह , फर्ज , हम कौन है , दामिनी , आपके बरस , बटवारा , गुलामी अशा अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांचे छायाचित्रण ईश्वर बद्री यांनी केले होते. तसेच तुझं थोडं माझं थोडं या मराठी चित्रपटाचे छायाचित्रण ईश्वर बद्री यांनी केले होते. त्यांच्या निधनाने चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. निर्माता दिग्दर्शक कलाकार तंत्रज्ञांनी ईश्वर बद्री यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले आणि संचालक , पदाधिकाऱ्यांनी , सर्व कर्मचाऱ्यांनी ईश्वर बद्री यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Categories
मिरज सांगली

सावित्री-फातिमा कॅशलेस योजना- शुभारभ शिक्षक आमदार कपिल पाटील याच्या हस्ते सपन्न .


मिरज:- संजय पवार दिनांक २७ डिसेंबर रोजी शिक्षक आमदार व शिक्षक भारतीचे संस्थापक कपिल पाटील यांच्या हस्ते सावित्री – फाती मा कॉशलेश योजनेच शुंभार भ कडेगाव येथेशिक्षक भारतीच्या कार्यकर्त्यांची कार्यकत्याचा मेळाव्यात करण्यात आला . यावेळी शिक्षक भारतीचे सांगली जिल्हाध्यक्ष सुधाकर माने यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
यावेळी शिक्षक भारतीच्या वतीने संघटनेच्या सभासद असणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी च्या सावित्री-फातिमा कॅशलेस योजनेचे उदघाटन आमदार कपिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
.कार्यक्रमा प्रसंगी बोलताना आमदार कपिल पाटील म्हणाले की ही कॅशलेस योजना ही शिक्षकाच्या कुटुबाची काळजी घेणारी मेडीकल क्लेम योजना आहे .असे मत नोंदवत चांगला भारतीय नागरिक घडवण्याची जबाबदारी ही आपल्या शिक्षकांची आहे. शिपाई भरती बाबतीत काढलेला शासन निर्णय मागे घेण्यास भाग पाडू व पूर्वी प्रमाणे भरती करून मूळ वेतन अदा करण्यासाठी प्रयत्नशील राहूअसे ही ते म्हणाले. यापुढील काळात शिक्षण क्षेत्रात अन्याय कारक बदल घडवण्याच घाट केंद्र शासनाने घातला आहे .त्यासाठी एकत्र येवून लढा देण्याचे आव्हान आमदार कपिल पाटील यांनी केले.
यावेळी शिक्षक भारती प्राथमिक राज्याध्यक्ष नवनाथ गेंड, राज्याचे माध्यमिकचे कार्यध्यक्ष सुभाष मोरे यांनी सावित्री _ फातिमा कॉशलेश योजने बाबत मार्गदर्शन केले. तर शिक्षक भारती प्राथमिकचे जिल्हाध्यक्ष महेश शरनाथे व महानगर अध्यक्ष आरीफ गोलंदाज यांनी शिक्षकांच्या विविध समस्या मांडले.
याप्रसंगी शिक्षक भारती कडेगाव तालुका अध्यक्ष म्हणून प्रवीण पवार व शरद शिदे यांच्या कार्य चे कौतुक करूण त्याचा गैरव करण्यात आला
पलूस येथील सहाय्यक शिक्षक सलीम सय्यद यांचे गेल्या महिन्यात आकस्मित मृत्यू झाले.सलीम सय्यद सर हे 20 टक्के अनुदान प्राप्त शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते.त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने सांगली जिल्हा उर्दू शिक्षक भारती मार्फत त्यांच्या कुटुंबाला मदत म्हणून दोन लाख सात हजार रुपये आमदार कपिल पाटील यांच्या हस्ते व राज्याध्या उर्दु मुस्ताफ पटेल याच्या वतीनेप्रदान करण्यात आला .
यावेळी शिक्षक भारती प्राथमिक राज्याध्यक्ष नवनाथ गेंड सर, राज्याचे कार्यध्यक्ष सुभाष मोरे,उर्दू शिक्षक भारती राज्याध्यक्ष मुश्ताक पटेल सर, सांगली जिल्हा माध्यमिक जिल्हाध्यक्ष सुधाकर माने,प्राथमिक चे जिल्हाध्यक्ष महेश शरनाथे,महानगरअध्यक्ष आरीफ गोलंदाज,जिल्हाउपाध्यक्ष मोहन पुजारी,जिल्हाकार्याध्यक्ष संजय पवार,जिल्हासचिव आशिष यमगर,प्राथमिक सचिव कृष्णा पोळ,वाळवा तालुका अध्यक्ष देवेंद्र पाटील,शिराळा तालुका अध्यक्ष बाजीराव जाधव,मिरज तालुका उपाध्यक्ष महेश कोळी, संघटक कोरे,उर्दू जिल्हाध्यक्ष अशरफ अशरफ प्रविण पवार अध्यक्ष कडेगाव शरद शिंदे सचिव महादेव खोत मिरज तालुका सधटक नितीन पाटील कुमटे ( तासगाव ) कोरे सर आरग हाय . सुरेश कदम आटपाडी दिगंबर सांवत . जत अध्यक्ष धडस सर पालुस चौगले जिल्हातील सर्व शिक्षक भारतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
याकार्यक्रमाचे सूत्र संचालन आशिष यमगर यांनी केले तर आभार फारूक मोमीन यांनी मांडले.

Categories
गुन्हेगारी सातारा

नवऱ्याला लागते सासू, बायकोला पाहिजे दीर. लेकीकडून आईच्या हत्येची, घटनाच गंभीर..!


पाटण हिंदू सम्राट प्रतिनिधी उमेश सुतार यांजकडून

वासनेची विकृती वाढू लागली, की नातेसंबंधाची राख व्हायला वेळ लागत नाही. व्यभिचाराचा वणवा नात्यातच धुमसू लागतो, तेंव्हा माणुसकीला काळीमा फासणार्‍याच घटना घडतात. सोलापूरातील एका विधवेने प्रियकर शोधला. त्यानंतर जावयालाही मिठीत घेतले. हे मुलीला समजले तेंव्हा आई किंवा नवर्‍याला समजावण्यापेक्षा तिने दीराला जवळ घेणे पसंत केले. मुलगी दीराबरोबर अनैतिक संबंध ठेवते हे समजल्यावर आईला राग आला. ती त्या संबंधांना विरोध करू लागली. ‘तुला प्रियकर, जावई लागतो, मग मी दिराबरोबर का संबंध ठेवायचे नाहीत?’ असा सवाल करत मुलीने आईचा जीव घेतला. केवळ व्यभिचारामुळे आईच्या जीवावर मुलगी उठली, हे अत्यंत धक्कादायक, मन सुन्न करणारेच आहे. मुलांना वळण लावण्याची जबाबदारी आई नाही पार पाडणार तर कोण? आईच चुकीचे वागू लागली तर ती मुलीला सदाचार काय शिकवणार?
सोलालापूरातील कुमठा परिसरात असलेल्या लक्ष्मीनगर परिसरात लक्ष्मीबाई शिवाजी माने ही महिला रहात होती. तिला दोन मुली आणि एक मुलगा अशी तीन अपत्ये होती. प्रज्ञा आणि अनिता या दोन्ही मुलींचे विवाह झाले आहेत, तर मुलगा योगेश अजून शिक्षण घेत आहे. लक्ष्मीबाईच्या पतीचे पाच वर्षापूर्वी निधन झाले. ती एकाकी पडली. मुलींची जबाबदारी नसली, तरी मुलाची जबाबदारी होती. पण अनिताने भावाला आपल्याकडे नेले, त्यामुळे तिची जबाबदारी थोडी कमी झाली. त्यातच प्रज्ञाचे निधन झाले. मुलीच्या निधनाचे दु:ख आईला होणे स्वाभाविकच होते. एकामागोमाग येणारी संकटे, हलाखीची आर्थिक परिस्थिती, त्यामुळे उदरनिर्वाह करतांना होणारी ओढाताण, जीवनात आलेले एकाकीपण अशा अनेक समस्यांनी लक्ष्मीबाई घेरली होती. तिला कोणाचाच आधार उरला नव्हता. आपण कोणावर बोजा होऊ नये, या विचाराने ती काम करून स्वत:चा उदरनिर्वाह करत होती. मुलाच्या भविष्यासाठी काळजी करत होती.

पण एकट्या बाईकडे पहाणार्‍याची, समाजाची नजर अद्याप दुषितच आहे. लक्ष्मीबाई चाळीशीची होती. स्थूल शरीराची, काळी-सावळी पण नेटनेटकी रहाणारी होती. तिच्या मांसल स्थूल शरीराची टणकता उठून दिसत होती. त्या मांसल देहावर काही जणांची वासना जात होती. ती एकटी आहे, विधवा आहे, ती सहजपणे मिळू शकेल अशी भावना अनेकांच्या मनात येत असे. पण तिचे कोणाकडे लक्ष नव्हते. ती आपल्या आयुष्याचा गाडा ओढत होती.

ती काही घरांमध्ये धुण्या-भांड्याची कामे करत असे. कामाला जातांना ती शेअर रिक्षाने जात-येत असे. चाळीशी महिला, कष्टकरी त्यामुळे तिचे वागणे बिनधास्त होते. सर्वांशीच ती चांगले वागत होती, बोलत होती. त्यातूनच तिची रिक्षाचालक विजय परशूराम भोजे याच्याशी ओळख झाली. विजय रिक्षाचालक होता, एकटाच होता. दररोज रिक्षातून येणार्‍या लक्ष्मीबाईकडे तो आकर्षित झाला होता. तिच्यासाठी तो रिक्षा थांबवून ठेवत होता. तिच्या जाण्या-येण्याच्या वेळा त्याला माहित झाल्या होत्या. त्यावेळेत तो नेमका हजर होत असे. तिला रिक्षात घेऊन सेवा देत असे. रोजच्या संपर्काने त्यांच्यात ओळख वाढली. बोलता-बोलता त्याने तिच्याबद्दल सगळी माहिती काढून घेतली. स्वत:बद्दलही तिला सांगितले. दोघात वाढलेली ओळख कोणत्या थरावर जाईल याचा तिला पत्ता नव्हता, तो मात्र बरोबर पावले टाकत होता.

ती शरीराने स्थूल, जाड होती. त्यामुळे तिच्या ङ्खुगलेल्या शरीरात एक वेगळेच आकर्षण होते. मजबूत खांदे, भरलेली पाठ, उरोजांचे मोठे गोळे, फुगलेल्या पोटावर पडणार्‍या मांसल घड्या, जाडजुड मांड्या, मागे मोठे नितंबाचे गोळे पहाणार्‍याला मोहात पाडत होते. रिक्षात बसली की तिच्या छातीवरचा पदर बाजूला सरकायचा. तेंव्हा ब्लाऊजमधून बाहेर आलेले स्तनांचे गोळे पहाणार्‍याला घायाळ करत असत. विजयला तर हा नजारा रोजच पहायला मिळत होता, त्यामुळे तो तिच्यावर टपूनच बसला होता. त्याची नजर तिला कळली, तशी ती सावध झाली. हा रिक्षावाला काही चांगला विचार करत नाही असे म्हणत तिने त्याला टाळण्याचा प्रयत्न केला, पण तो काही तिचा पिच्छा सोडत नव्हता. त्याचे हे वागणे तिच्या मनात उत्तेजना वाढवू लागले. चाळीशीची एकटी बाई हळूहळू शरीरसुखासाठी उतावीळ होऊ लागली. अजून जवानी ओसरली नव्हती, पण पती निधनाने शरीरसुखापासून वंचित रहावे लागत होते.शरीर कोणाकडून तरी रगडून घ्यावे असे वाटत होते, पण तसा विश्‍वासाचा पुरूष नव्हता. आता तो पुरूष विजयमध्ये तिला दिसू लागला, त्यामुळे तिच्याकडून त्याला प्रतिसादाचे संकेत मिळू लागले. तो सुखावला. आता त्याने जास्तच जोर लावण्यास सुरूवात केली. तीही खुशीत आली होती. आग दोन्ही बाजूला लागल्याने आता कशाचाच अडसर नव्हता. तिच्या घरात ती एकटीच असल्याने तिने त्याला घरी बोलवले. तो आला.
तिने हसतमुखाने त्याला घरात घेतले. तो घरात येऊन बसला. त्याच्यासमोर बसून ती गप्पा मारत होती. पदर बाजूला गेला होता. गच्च ब्लाऊजमधून दोन मांसल गोळे अर्ध्याहून अधिक बाहेर आले होते. त्याची नजर त्यावरून हटत नव्हती. ती त्याच्याकडे बघून हसत होती. तिच्या हसण्यातला रोख त्याला कळला. तसा तो तिच्याजवळ सरकला. त्याने तिचा हात धरला. ती म्हणाली, ‘काय?’ ‘तू मला खुप आवडतेस.’ ‘मग काय?’ ‘मग काही नाही. मला तुझ्याबरोबर रहायच आहे.’ ‘फक्त रहायचच आहे की..?’ तिच्या लाडीक प्रश्‍नाने त्याला चेव चढला. त्याने पटकन तिच्या गालावर ओठ टेकले. तिने त्याला जवळ घेऊन ओठावर ओठ लावले. मग पुढच्या खेळाला वेळ लागला नाही. एकाकी लक्ष्मीच्या आयुष्यात सोबती मिळाला. शरीराची भूक भागवू लागला. आता ते घर जणू विजयचेच झाले. तो रात्रभर तिच्याजवळ रहात होता. दोघांतील अनैतिक संबंध सगळ्यांनाच समजले होते, पण कोणी त्यावर आक्षेप घेतला नाही. या वयात तिला कोणाचा आधार मिळाला तर बरेच, असे समजून सगळ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे विजय आणि लक्ष्मी एकमेकाबरोबर वारंवार दिसू लागले होते.

लक्ष्मीची मुलगी अनिताचा विवाह दोन वर्षापूर्वी कर्नाटक राज्यातील तोरवी या गावातील महादेव जाधव या तरूणाशी झाला होता. ती नांदायला गेली, जातांना भावाला घेऊन गेली होती. तिचा नवरा महादेव हा इलेक्ट्रीशियन म्हणून काम करत असे. तो इलेक्ट्रिक फिटींगची कामे घेत असे. ही कामे परगावातील असल्याने तो बहुतेकदा परगावात त्याला जावे लागे, काम संपेपर्यंत त्याला तिकडेच रहावे लागत होते. नवे लग्न झालेले, पण कामासाठी तो घराबाहेर रहात होता. तो कामासाठी सोलापूरातही यायचा. तेंव्हा तो सासू लक्ष्मीबाईकडे येत असे. लक्ष्ङ्कीबाई परपुरूषाबरोबर संबंध ठेवते हे त्याला समजले होते, त्यामुळे आता त्याची नजरही सासूवर पडली होती. खरंतर सासू म्हणजे आईसारखीच असते, पण वासनांधांना कुठे नाती कळतात? परपुरूषाला जवळ करणारी सासू आपल्यालाही चान्स देणार असा नीच विचार करून महादेव सासूभोवती पिंगा घालू लागला. लक्ष्मीबाई शरीरसुखाला चटावली होती. तिलाही जावईच्या मनातला हेतू कळला. तिलाही नात्याचे भान राहिले नाही.

दोघांच्या नात्यातील आदर संपला आणि चेष्टा-मस्करी सुरू झाली. ती त्याला रहाण्याचा, जेवण्याचा आग्रह करू लागली. काम संपवून तो गावी परतत असतांनाही तिने त्याला, ‘रहा आजची रात्र’ असा आग्रह केला. ‘नको आता, काम संपले की’ असे उत्तर त्याने दिले. ‘आता रात्र होईल गावी जाईपर्यंत, रात्री जाऊन काय करणार आहात?’ असे तिने विचारले, तसा तो गालातल्या गालात हसत म्हणाला, ‘रात्रीच काम आहेच की, नाही गेलो तरी तुमची मुलगी रागावेल मला.’ ‘काही नाही रागवत, तुम्हालाच करमत नसेल’ असे म्हणत तिने मुरका मारला. ‘ते आहेच म्हणा, आणि इथं राहिलो तर तुम्हाला त्रासच की.’ भुवई उडवत तिने विचारले, ‘मला कसला त्रास?’ ‘त्रास म्हणजे हेच जेवण-खाण..हेच’ तो सावरत म्हणाला. ती हसली, ‘काही त्रास नाही, जावयाला खुष ठेवायला लागतयच की.’ ‘आता तुम्ही म्हणताय तर थांबतो’ असे म्हणत तो थांबला. तिने झटापट जेवण केले. दोघे जेवणखाण उरकून अंथरूणावर पडले. जावई खाटेवर होता, तर ती खाली अंथरूण टाकून झोपली होती. दोघे बोलत पडले होते. जावई खाटेवरून उठला आणि तिच्याशेजारी येऊन झोपला. तिच्या अंगावर हात टाकून त्याने तिला जवळ घेतले. ‘हे काय करताय, जावईबापू’ असे म्हणत असली तरी तिने विरोध केला नाही. त्याचे हात तिच्या स्तनांना कुस्करू लागले होते. पहाता-पहाता तो तिच्यावर स्वार झाला. तरणाबांड जावई आता लक्ष्मीला सुख देण्यासाठी झटू लागला. ती रात्र सुखात गेली, त्यानंतर इच्छा होईल तेंव्हा तो येत होता, सासूकडून सुख मिळवत होता. लक्ष्मी खुशीत होती.

महादेव सासूबरोबर ऐश करत होता, तर तिकडे त्याची बायको अनिता त्याच्यासाठी झुरत होती. तरूण बायकोपेक्षा वयस्कर सासूवरच महादेव जास्त फिदा झाला होता. त्याचे बायकोकडे जास्त लक्षच नव्हते. अनिता तरूण होती, नवविवाहिता होती. तिलाही शरीरसुखाची लालसा असणे स्वाभाविक होते, पण तिचा पती तिला फार वेळ देत नव्हता. तर दुसरीकडे तिचा दीर शिवानंद मात्र नेहमीच ‘वहिनी, वहिनी’ करत तिच्या मागे-पुढे घोटाळत असे. शिवानंद तरणा होता, अविवाहित होता. त्यालाही स्त्रीसुख हवे होते. तो तरूण वहिनी अनिताकडे आकर्षित झाला होता. तो ती सांगेल ते काम करत होता. तिच्या प्रत्येक हाकेला तोच प्रतिसाद देत असल्याने दोघातील जवळीक वाढली होती. या जवळकीतही शरीरसुखाचा वास येऊ लागला. दोघे तरूण होते, अतृप्त होते, शरीराची भूक दोघांनाही होती. महादेव घरातच नसल्यामुळे त्यांना अडवायला कोणी नव्हते. साहजिकच अनिताने शिवानंदबरोबर संबंध ठेवण्यास मंजूरी दिली. आता शिवानंद दीर नाही तर तिचा नवराच झाला होता. ती त्याच्याबरोबर बाजारात, फिरायला, पै-पाहुण्यांकडे जात होती. रात्रीही दोघे एका एकाच बेडवर मनसोक्त संभोग करत होते. ती कधी-कधी आईकडे सोलापूरला येत असे, तेंव्हाही आई कामावर बाहेर गेली की दीराबरोबर संभोग करत असे. तेंव्हाच शेजारी-पाजारी, नातेवाईकांकडून तिला तिचा नवरा तिच्या आईकडे रात्री थांबतो याची कुणकुण लागली होती. आपल्या आईचे आपल्या नवर्‍याशी संबंध आहेत, हे ऐकून तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती, पण तिला नवर्‍यापेक्षा शिवानंदच जास्त प्रिय असल्याने तिने राग गिळला. नवरा कोठेही जाऊ दे, दीर आपला आहे अशी तिने मनाची सङ्कजूत घातली. तसेच कधी तिच्या नवर्‍याने दीराबरोबर असणार्‍या तिच्या अनैतिक संबंधाला आक्षेप घेतला, तर ती त्याला ‘सासूबरोबर झोपतांना लाज नाही का वाटली?’ असे बोलून गप्प करू शकत होती. त्यामुळे नवर्‍याचे सासूबरोबर तर बायकोचे दीराबरोबरचे संबंध निवांतपणे सुरू होते, पण कोणतेही पाप फार काळ टिकत नाही म्हणतात, तसेच या प्रकरणातही झाले.

नवरा घरी असल्याने अनिताला आणि शिवानंदला शरीरसुख घेता आले नव्हते. त्यातच अनिता माहेरी आईकडे येणार होती, तेंव्हा महादेवने सासूकडे जाणे टाळले. अनिताला सांगितले की तू माझ्या भावाला घेऊन जा. तिला तेच हवे होते. ते दोघे सोलापूरला आले, नेहमीप्रमाणे तिची आई कामावर गेली की मनसोक्त संभोग करायचा हा विचार करतच ते सोलापूरात आले. कधी एकदा लक्ष्मी कामावर जाते असे त्यांना झाले होते. मुलगी आली म्हटल्यावर लक्ष्मी घरातील कामे तिच्यावर सोपवून कामासाठी निघून गेली. ती गेल्यानंतर अनिताने घरातील कामांची आवराआवर सुरू केली. ती कामात असतांनाच शिवानंद तिला चिकटला.‘आता नको नंतर’ त्याला बाजूला सारत ती म्हणाली. ‘नंतर पण करू, आता पण करू’ असे म्हणत त्याने तिला पाठीमागूनच आवळून धरले. तो आता थांबणार नाही हे तिला माहित होते. ‘दार बंद करून या’ असे सांगून ती बेडवर गेली. तो पटकन गेला आणि दार बंद करून आला. दोघे निवांतपणे एकमेकाच्या मिठीत संभोगसुख घेऊ लागले. लक्ष्मी परत येण्यास दुपार होणार हे माहित असल्याने त्या दोघांचा खेळ निवांत सुरू होता, पण वेळ फिरली होती, लक्ष्मी काम कमी असल्याने लवकर घरी आली तर दार बंद. तिने दार ठोठावले, अनिताला हाक मारली. अनिताने ओ दिली, पण दार उघडले नाही. थोड्या वेळाने तिने दार उघडले. आत अनिता आणि शिवानंद दोघे होते, त्यामुळे दार बंद करून ते काय करत असतील हे लक्ष्मीने ओळखले. तिने लेकीला फैलावर घेतले. नवर्‍याचा विश्‍वासघात करून दीराबरोबर घाण संबंध ठेवतेस, लाज वाटत नाही का तुला? असे म्हणत ती अनिताला चांगलेच झापू लागली.

आईने अनैतिक संबंध पकडल्यानंतर कोणतीही मुलगी घाबरली असती, पण अनिता मात्र आईचे बोलणे ऐकून संतापली. ‘तू रिक्षावाला विजयबरोबर संबंध ठेवतेस, माझ्या नवर्‍याबरोबर झोपतेस आणि मला शहाणपणा कशाला शिकवतेस?’ असे तिने आईला उलट उत्तर दिले, पण लक्ष्मी तिचे म्हणणे मानायला तयार नव्हती. ‘मी केले ते वेगळे, माझे आता काय उरले आहे, तुझा संसार आहे, उभं आयुष्य तुझ्यासमोर आहे, तू वाईट वागू नकोस’ असे ती काकुळतीने मुलीला समजावत होती. अनिताला मात्र हे पटत नव्हते. मुळातच सांगणारा कसा आहे, त्यावर ऐकणार्‍यांचे मत बनत असते. स्वत:च व्यभिचार करणारी आई मुलीला सदाचार शिकवत असेल तर ती ऐकेल कशी? ज्या नवर्‍याने विश्‍वासघात केला, त्याचा विश्‍वासघात करण्यात शरम काय? असे विचार अनिताच्या मनात आले. ती आईला जुमानत नव्हती. नवर्‍याची तिला फिकीर नव्हती. ती दीराबरोबरच आनंदात जगू पहात होती. हे तिच्या आईला मान्य नव्हते. या दोन विचारातून माय-लेकीत वादाची ठिणगी पडली होती.
दोघीतील वाद दिवसेंदिवस भडकत चालला होता. लक्ष्मी अनैतिक संबंधात अडसर होत असल्याने अनिता आणि शिवानंद तिच्यावर चिडून होते. तिचा आवाज कायमचा बंद करायचा असा विचार ते करत होते. दिवाळी सण तोंडावर होता. लॉकडाऊन उठल्याने वाहतूक सुरू झाली होती, त्यामुळे अनिता आणि शिवानंद 7 नोव्हेंबर 2020 रोजी सोलापूरला आले. ते दोघे रहाणार असल्याने विजयला लक्ष्मीजवळ थांबता आले नाही. तो त्याच्या घरी निघून गेला. रात्रीचा काळोख वाढला. तसे अनिता आणि शिवानंद एकमेकाबरोबर कामक्रिडा करू लागले. त्यांच्यातील या खेळास लक्ष्मीने विरोध केला, त्यामुळे ते चिडले. त्यांच्यातील वादाला तोंड फुटले. प्रकरण हातघाईवर आले. चिडलेले अनिता आणि शिवानंद लक्ष्मीच्या अंगावर धावून गेले. दोघे अंगावर आल्याने तिनेही त्यांना प्रतिकार केला. तसे त्या दोघांनी तिला ‘आज तुला सोडतच नाही,’ असे म्हणत जमिनीवर आडवे पाडले. अनिता आईच्या उरावर बसली, तर शिवानंदने तिचा गळा आवळण्यास सुरूवात केली. दोघांच्या ताकतीपुढे लक्ष्मीची ताकत कमी पडली. काही वेळातच लक्ष्मी थंडगार पडली. ती ठार झाल्याची खात्री होताच अनिता आणि शिवानंद यांनी तिथून पळ काढला. ते दुचाकीवरून गावी निघून गेले.

दुसर्‍या दिवशी म्हणजे दि. 8 रोजी सकाळी विजय लक्ष्मीकडे आला. दरवाजा फक्त पुढे असल्याने त्याने हाक मारली, कोणीच प्रतिसाद दिला नसल्याने त्याने दार ढकलले. दार लगेचच उघडले म्हणून तो आत गेला. समोरचे दृश्य पाहून त्याची पाचावर धारण बसली. लक्ष्मीबाई उताणी पडली होती, ती मेली होती हे स्पष्टच दिसत होते. तो तसाच घरातून बाहेर पडला आणि धावतच लक्ष्मीबाईच्या नातेवाईकांकडे गेला. त्यांना त्याने लक्ष्मीबाई मृतावस्थेत पडल्याचे सांगितले आणि तो पळून गेला. नातेवाईकांनी घरी जाऊन पाहिले तर लक्ष्मीबाईचा मृतदेह पडला होता. त्यांनी या घटनेची माहिती देण्ङ्मासाठी तातडीने विजापूर नाका पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. एका महिलेचा खून झाल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा वगैरे सोपस्कार पार पाडण्यात आले. लक्ष्मीबाईच्या गळ्यावर असणारे व्रण पहाता तिचा गळा दाबून खून झाल्याचा पोलिसांचा प्रथम कयास होता. त्यानुसार पोलीस तपास करू लागले. या तपासात तिचे रिक्षाचालक विजयबरोबर अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली. त्यानेच तिचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांना सांगितले होते. रात्री तो तिच्याजवळ झोपत असे हेही माहितीत उघड झाले, त्यामुळे पोलिसांचा त्याच्यावर पहिला संशय आला. पोलिसांनी त्याचा शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेतले.

विजयचे लक्ष्मीबाईबरोबर असलेले अनैतिक संबंध कबुल केले, पण खून केला नसल्याचे सांगितले. तिची मुलगी अनिता आणि अनिताचा दीर शिवानंद हे दोघे तिच्याकडे आले होते. ते रात्री रहाण्यास असल्यामुळे मी थांबलो नाही, मी माझ्या घरी गेलो होतो असे विजयने सांगितले. रात्री राहिलेली लेक आणि तिचा दीर सकाळी उजाडण्याआधीच गायब का झाले? रात्री ते कोठे होते? ते येथून कोठे गेले? याची माहिती मिळणे आवश्यक होते, कारण ते दोघेच लक्ष्मीबाईबरोबर अखेरच्या रात्री होतेे. पोलिसांनी तातडीने सुत्रे हलवली आणि कर्नाटकातून अनिता आणि शिवानंद यांना ताब्यात घेतले. सुरूवातीला त्यांनी कानावर हात ठेवले पण ते काही सराईत गुन्हेगार नाहीत. त्यांनी पोलिसांसमोर लगेचच शरणागती पत्करली आणि सगळा घटनाक्रम सांगितला. हे प्रकरण ऐकून पोलीसही चक्रावून गेले. आईचे जावयाबरोबर, लेकीचे दीराबरोबर अनैतिक संबंध आहेत. तर लेकीच्या अनैतिक संबंधाला आई विरोध करते आणि म्हणून लेक आईचा खून करते, हे सगळे मन सुन्न करणारेच होते. समाजाचे अध:पतन दर्शवणार्‍या या घटनेने खळबळ माजवली आहे.

अनैतिक संबंधास विरोध केल्याच्या कारणातून लक्ष्मीबाई शिवाजी माने (वय 40) हिचा खून केल्याप्रकरणी तिची मुलगी अनिता महादेव जाधव आणि अनिताचा दीर शिवानंद भिमाप्पा जाधव या दोघांविरोधात जुना विजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. त्या दोघांनाही अटक करण्यात आली असून अधिक तपास पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त वैशाली कडूकर, सहाय्ङ्मक पोलीस आयुक्त प्रिती टिपरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील, सहाय्ङ्मक पोलीस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ, हेडकॉन्स्टेबल सचिन सुरवसे, रमेश सोनटक्के, तोलनूरे आदी करत आहेत.

Categories
मुंबई

शरद पवारांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी ओ.बी.सी सेलच्या वतीने रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिराचे आयोजन

विरेंद्र म्हात्रे नवी मुंबई प्रतिनिधी : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व देशाचे माजी संरक्षणमंत्री, माजी गृहमंत्री तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेसओ.बी.सी सेलच्या वतीने प्रभाग ८५ च्या वतीने २७ डिसेंबर रोजी आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेरूळ ओ.बी.सी सेलच्या वार्ड क्रमांक ८५च्याअध्यक्षां शालीनीताई म्हात्रे यांनी दिली.
२७ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी ५ या वेळेत नेरूळ सेक्टर ६ मधील लोकमान्य समाज मंदीर येथे हे शिबिर आयोजित  केले होते. कोरोना महामारीमुळे राज्यात रक्तसाठा घटत चालला असून रक्त मिळविण्यासाठी रूग्णाच्या नातलगांना धावपळ करावी लागत आहे. त्यामुळे या शिबिराचे आयोजन केले असून नेरूळ नोडमधील रक्तदात्यांनी शिबिरात सहभागी होवून रक्तदान केले असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेरूळ ओ.बी.सी सेलच्या वार्ड क्रमांक ८५च्याअध्यक्षां शालीनीताई म्हात्रे यांनी सांगितले.
तसेच या कार्यक्रमा प्रसंगी नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील ,नवी मुंबई प्रभारी तेजस शिंदे , नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष अशोक गावडे,नवी मुंबई कार्याध्यक्ष जी.एस. पाटील,राष्ट्रवादी कॉंग्रेस ओ.बी.सी सेल जिल्हा अध्यक्ष रुपेश ठाकूर,समाजसेवक अंकुश म्हात्रे, महादेव पवार, निशांताई सोनावणे, सुनिता देशमुख, प्रजक्ता मोडकर व ईतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Categories
नांदेड भोकर

भाजपा युवा मोर्चाच्या भोकर तालुकाध्यक्षपदी श्रीकांत किन्हाळकर

भोकर प्रतिनिधी दत्ता बोईनवाड
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या भोकर तालुकाध्यक्षपदी बापूसाहेब गोरठेकर समर्थक श्रीकांत व्यंकटराव किन्हाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भोकर येथील भाजपा पदाधिकाऱ्यांची निवड करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नांदेड येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत युवा मोर्चाच्या भोकर तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी श्रीकांत किन्हाळकर यांच्यावर टाकण्यात आली. यावेळी खा. प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगांवकर , युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष किशोर देशमुख , जि प.सदस्या.सौ.प्रणिताताई देवरे , कुशाल पाटील उमरदरीकर यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आले.या निवडीबद्दल जिल्हा उपाध्यक्ष दिलीप सोनटक्के, तालुकाध्यक्ष किशोर पाटील लगळुदकर, बाजार समितीचे संचालक गणेश पाटील कापसे, राजू अंगरवार, विशाल माने यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.
या निवडीनंतर किन्हाळकर म्हणाले की, खा. प्रताप पाटील आणि बापूसाहेब गोरठेकर यांनी माझ्यावर टाकलेल्या जबाबदारीला तडा जाऊ न देता मिळालेल्या पदाचा उपयोग युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी करीन. पक्षाची ध्येयधोरणे गावागावात पोहचविण्यासाठी काम करणार आहे.

Categories
पन्हाळा वारणा

राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते माजी मुख्यमंत्री मा नाम देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी कोरे कुटुंबियांचे केले सांत्वन…

वारणा साखर कारखान्याच्या व महिला उद्योग समूहाच्या अध्यक्षा श्रीमती शोभाताई विलासराव कोरे यांना आज विविध क्षेत्रातून मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली.

राज्याचे विधानसभा विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री मा नाम देवेंद्रजी फडणवीस, भाजप चे प्रदेशाध्यक्ष मा आमदार चंद्रकांत दादा पाटील, माजी खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक,माजी आमदार सुरेशराव हाळवणकर, हिंदुराव शेळके ,पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी मा.निपुण कोरे (दादा), आमदार डाॅ.विनय कोरे (सावकर) व कोरे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.समित कदम (दादा),हातकणंगले तालुक्याचे भाजप-जनसुराज्य चे नेते व जिल्हा परिषद सदस्य दलीतमित्र डॉ अशोकराव माने ,जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे आदी उपस्थित होते…

Categories
अजब गजब कोल्हापूर

देवकी देवी तुम्हाला सांष्टाग दंडवतच

  • कोल्हापूर- सुभाष भोसले
    श्रीम देवकीदेवी हुकूमसिंह भंडारी (वय ६०) अजूनही भाड्याच्या घरात राहतात, तरीही फडी व पेन्शन मधून जमा झालेले दहा लाख रूपये पीएम केअर्स फंडास दिले. वडील स्वातंत्र्य सेनानी होते. देवकी देवी तुम्हाला सांष्टांग दंडवतच
    उत्तराखंड देवभूमी ऐवजी ” देवीभूमी” म्हटले पाहिजे. उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्याच्या गौचर गावात देवकी देवी राहतात. पती रेशम विभागात कार्यरत होते. स्वर्गवासी आहेत.
    गौचर गाव महिलांच्या दातृत्वासाठी भविष्य काळात प्रसिद्ध होईल. कारण याच गावातील शांतीदेवी गुसांई यांनी वयाच्या ८५ व्या वर्षी एक लाख तर, कमला देवी यांनी वयाच्या सत्तावण्णाव्या वर्षी पती आणि मुलाचा मृत्यूचे दु:ख बाजूला ठेऊन दीड लाख रूपये करोना लढ्यासाठी दान केले आहेत.
    देवकीदेवी एकट्या राहात असूनही त्यांनी भारत वर्षास परिवार मानला. कर्ण व बळीराज्याचे दातृत्व आपण पुस्तकात वाचतो, पण साक्षात दहा लाख जमा पुंजी दान करून दाखवून दिले आहे. देवकीदेवी यांनी काही मुलांना दत्तक घेऊन त्यांचा उच्च शिक्षणापर्यंतचा सर्व शिक्षण खर्चही केला आहे.
    उत्तराखंडचे मान. मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी गौचरच्या तिन्ही महिलांनी पंतप्रधान केअर्स फंडास करोना विरोधातील लढ्यासाठी दिलेल्या मदतीमुळे भारावून जाऊन पुढील गौरव उद्गार काढले, “देवभूमी करोनापासून मुक्त व्हावी म्हणून डोंगरातील महिलांनी वैश्विक संकटामुळे देश आर्थिकदृष्ट्या संकटात असताना निस्वार्थी भावनेने केलेल्या मदतीमुळे त्याग आणि दान ही भारतीय संस्कृती मूल्ये पुनर्जिवीत झाली आहेत. देशासाठी ही घटना प्रेरणास्रोत्र ठरणारी आहे.
    देवकीदेवी यांचे दिवंगत वडील स्वातंत्र्य संग्राम सेनानी होते. देशप्रेम, देशाभिमान त्यांच्या नसानसात ठासून भरला आहे.
    नवऱ्याची मिळणारी पेन्शन म्हातारपणासाठी साठवली होती. करोनाच्या संकटामुळे लोकांची उपासमार होऊ नये म्हणून त्यांनी मदतीचा निर्णय घेतला व गौचर भारतीय स्टेट बँकेत दहा लाखाचा धनादेश दिला.
    देशाचे महामहिम राष्ट्रपती व देशाचे प्रधानमंत्री यांचेसह अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे.
    माझ्या सारखे लोक मी, माझे कुटुंब, माझी मुले-मुली, माझा what’s app ग्रुप यामध्ये आनंद घेत असताना, चर्चा करत असताना, वितंडवाद करत असताना या महिला समाजाचा विचार करून भरभरून मदत करत आहेत. या देशाच्या देवभूमीतील “देवींना” सांष्टांग दंडवतच

देवकी देवी यांनी दहा लाख रूपये करोना विरोधातील लढ्यासाठी दिल्यानंतर काही दिवसांनी मोबाईलवर फोन करून तुमचे ATM कार्ड बिघडले असून तुम्ही कार्डचा नंबर सांगा. सुरू करतो म्हणून नंबर सांगितल्यावर ATM मधील ४७,७०० रूपये काढून घेतले हे देशाचे दुर्देव्य आहे. देवकी देवींना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन अज्ञाता विरूद्घ गुन्हा नोंद करावा लागला
दहा लाख दान केल्यावर उर्वरित सर्व ४७,७०० रूपये रक्कम या देशातीलच हरामखोराने लांबविली याला काय म्हणावे???
देवकी देवी तुमची क्षमा मागतो. तुमचे पैसे लांबविणारे भामटे लवकर सापडू देत. तुम्हाला परमेश्वर आरोग्यदायी दीर्घायुष्य देऊ दे ही महालक्ष्मीचे चरणी प्रार्थना करतो अशी प्रतिक्रिया संपत गायकवाड (माजी सहाय्यक शिक्षण संचालक) यांनी व्यक्त केली

Categories
मुंबई

सामाजिक कार्यकर्त्या त्रिवेणी माने यांना समाजभूषण २०२० पुरस्कार जाहीर !

( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी: लक्ष्मण राजे )

सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून आरोग्य सेवा, शिक्षण सेवा , तसेच वस्ती पातळीवरील पोलीस ठाण्याच्या संबंधित केसेस मध्ये अन्यायग्रस्त नागरिकांना अधिकार आणि कायदा या बाबत मार्गदर्शन करुन न्याय मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या आणि निर्भय परिवर्तन संस्थेच्या संस्थापिका त्रिवेणी माने यांना दैनिक मुंबई मित्र चे संपादक आणि धडक कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष यांच्या अभिजीत राणे युथ फाऊंडेशचा समाज भूषण २०२० हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. दिनांक २ जानेवारी २०२१ रोजी गोरेगाव येथील केशव गोरे स्मारक ट्रस्टच्या सभागृहात आयोजित केलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे.

Categories
सातारा

जगद्गुरू जनार्दन स्वामी यांच्या ३१ व्या पुण्यतिथीनिमित्त १०८ कुंडात्मक विश्वशांती यज्ञ सोहळ्याचे आयोजन

पाटण हिंदू सम्राट प्रतिनिधी उमेश सुतार यांजकडून

ओझर येथे कोरोना महामारी निवारणार्थ १०८ कुंडात्मक विश्वशांती यज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने बाबाजी परिवाराकडून सनातन विद्या फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजयजी रत्नाकर तसेच सरचिटणीस भूषणजी रत्नाकर यांचे विशेष सत्कार करण्यात आला याप्रसंगी विश्वशांती सोहळ्याचे प्रधान आचार्य विलासजी कुलकर्णी उपस्थित होते. विशेष म्हणजे याप्रसंगी जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी स्वामी १००८ महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांचे प्रत्यक्ष भेट व आशिर्वाद घेण्याचा योग आला. बाबाजी परिवाराचे मनःपूर्वक आभार.

Categories
कला व मनोरंजन पुणे

पुण्याच्या अभिनेत्री पुष्पा चौधरी यांनी पटकावले मुंबई ग्लोबल इंडिया स्पर्धेत मिसेस कॉन्फिडेंट अवार्ड

प्रतिनिधी. पौर्णिमा प्रकाश बुचके

ती आली ,तिने पाहिले,ती बोलली आणि ती जिंकली…खरं तरुण तरुणींचा हा मुंबई ग्लोबल इंडिया स्पर्धा कार्यक्रम… पण आपले वय बाजूला ठेऊन तरुणींना लाजवेल असा दृढ आत्मविश्वास व जिद्द या जोरावर मिसेस कॉन्फिडेंट हा किताब पटकावत देवमाणूस या झी वाहिनीवरून वंदू आत्या ही भूमिका साकारत घराघरात पोचलेल्या पुण्याच्या वारजे येथील अभिनेत्री पुष्पा चौधरी यांनी स्पर्धेत पुण्याचे नाव रोषण केले.16 डिसेंबर ला नुकतीच मुंबईत ही स्पर्धा संपन्न झाली.स्पर्धेत सर्वजण इंग्रजी झाडत असताना पुष्पा चौधरी यांनी मी विद्येचे माहेरघर पुणे येथील अभिनेत्री पुष्पा चौधरी प्रेक्षकांना अभिवादन करते.असं म्हणत मराठीची शान वाढवली.एकंदरीत सर्व स्पर्धेत त्यांचा उत्साह व आत्मविश्वास परीक्षक व प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होता.त्यांचा प्रचंड आत्मविश्वास व कामाची जिद्द या जोरावर त्यांनी हा किताब पटकावला.

या कार्यक्रमाला बाॕलीवुड मधील बऱ्याच सेलेब्रेटींनी आपली उपस्थिती दर्शविली होती. जसे की पृथ्वी, अली खान, आरती नागपाल, राजपाल यादव,सुनील पाल. शो चे अॕकरींग बाॕलीवुड अभिनेता आणि अमन वर्मा यांनी केले.संपूर्ण देशातून 30 तरुणींनी या स्पर्धेत भाग घेतला होता.

Categories
मिरज सांगली

जवाहर हायस्कूलचा एक सामाजिक व शैक्षणिक उपक्रमशिक्षक आपल्या दारी

मिरज–अशोक मासाळ
लोकांच्या ध्यानीमनी नसताना शिक्षण क्षेत्रापुढे कोरोनामुळे अनेक आव्हाने उभी राहिली, शाळा बंद झाल्या, मुले व शिक्षकांची एकमेकांपासून ताटातूट झाली. अर्धे आयुष्य शिक्षकांनी मुलांच्या संगतीत घालविली आहेत .निर्माण झालेला मुलांचा विरह शिक्षकांना पेलवेना झाला .बाळाचा विरह आई पेलवू शकत नाही तशी अवस्था शिक्षकांची झाली .मुले लॉकडाउनच्या काळात फोनवरून अभ्यासाची , कौटुंबिक, आर्थिक परिस्थितीची, आरोग्याची चर्चा करायची त्यावेळी अनेक धक्कादायक व मन हेलावणाऱ्या गोष्टी ऐकायला मिळाल्या ,काही मुलांचे नातेवाईक, आप्तस्वकीय हे जग सोडून गेले. मुले भेदरली अशा अवस्थेत त्यांना एकच आधार वाटू लागला तो म्हणजे माझा शिक्षक. अनेक अडचणी आल्या, प्रश्न निर्माण झाले परंतु संवाद साधून,एकमेकांशी चर्चा करून, विचारविनिमय करून त्यातून मार्ग काढायचा व भेदरलेल्या आणि खचलेल्या मुलांना पुन्हा पाठीवरती हात ठेवूनी लढ म्हणायचे हा विश्वास विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण करण्यासाठी जवाहर हायस्कूल चे शिक्षक आता विद्यार्थ्यांच्या घरी निघालेत. तोच विद्यार्थी पुन्हा नव्या उमेदीने घडवण्यासाठी शिक्षक आपल्या दारी!!!
मुख्याध्यापिका
जवाहर हायस्कुल अँड ज्युनिअर कॉलेज मिरज.

Categories
कोल्हापूर

सौ कल्पना शिवाजी भाईगडे यांना ज्ञानसंकल्प सामाजिक संस्थेचा राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला नारीरत्न गौरव पुरस्कार प्रदान


  • कोल्हापूर- सुभाष भोसले
    सौ कल्पना भाईगडे यांना ज्ञानसंकल्प सामाजिक संस्था, दौंड, जि. पुणे यांच्यावतीने या वर्षीचा प्रतिष्ठेचा ‘ राज्यस्तरीय कतृत्ववान महिला नारीरत्न पुरस्कार देणेत आला. पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष,माजी आमदार रमेशअप्पा थोरात, विद्यमान आमदार राहूल कुल, राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष सोहेल शेख यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
    सौ कल्पना भाईगडे यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन ज्ञानसंकल्प सामाजिक संस्थेच्यावतीने पुरस्कार देण्यात आला.
    याप्रसंगी शिवसेना जिल्हाध्यक्ष डॉ. राजेंद्र काळे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, मनसे तालुकाध्यक्ष सचिन कुलथे, कोजिमाशिचे माजी अध्यक्ष हिंदुराव पाटील, मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनायक दोरगे, ज्ञानसंकल्प संस्थेचे अध्यक्ष सदाशिव रणदिवे, प्रदेश उपाध्यक्षा रोहिणी पवार, सुभाष भोसले, दिपक जाधव, प्रा दिनेश पोवार आदी मान्यवर उपस्थित होते. श्री जितेंद्र सावंत यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान करताना माजी आमदार रमेशअप्पा थोरात, राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष सोहेल शेख,शिवसेना जिल्हाध्यक्ष डॉ. राजेंद्र काळे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, आदी.
Categories
इंदापूर

सत्यजित तांबे यांनी लहान तोंडी मोठा घास घेऊ नये – अंकिता पाटील

इम्तिहाज मुलाणी :
इंदापूर:(प्रतिनिधी):

दि.27/12/20
सत्यजित तांबे यांनी स्वतःची कुवत लक्षात घेऊन लहान तोंडी मोठा घास घेऊ नये. तुमचे संधीसाधू राजकारण हे तर संपूर्ण राज्याला माहित आहे. त्यामुळे आपण ज्येष्ठ नेत्याबद्दल दिशाभूल करणारी वक्तव्ये करू नयेत, असे मत पुणे जिल्हा परिषदेचे सदस्या अंकिता पाटील यांनी रविवारी व्यक्त केले.
युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी इंदापूर येथील कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील यांच्या बद्दल टीकाटिप्पणी केली होती. त्यासंदर्भात बोलताना अंकिता पाटील यांनी सांगितले की, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करणेसाठी कोणी मोठे सहकार्य केले, याची जाणीव सत्यजित तांबे यांनी ठेवणे आवश्यक होते, मात्र हर्षवर्धन पाटील यांनी केलेले सहकार्य ते विसरले आहेत.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचेवर टीकाटिप्पणी करण्यापूर्वी त्यांच्या राजकीय कार्यकीर्दीएवढे आपले वय देखील नाही याची जाणीव सत्यजित तांबे यांनी ठेवायला हवी होती. राज्यातील ज्येष्ठ नेते असलेल्या हर्षवर्धन पाटील यांचेसंदर्भात बोलताना सत्यजित तांबे यांनी राजकीय संकेत बाळगणे आवश्यक होते, असे मतही अंकिता पाटील यांनी व्यक्त केले.


Categories
लोहा

बचत गटांच्या, SBIग्राहक सेवा केंद्राच्या माध्यमातून, महिला चळवळीला गती देणाऱ्या : सविता सातेगावे

लोहा, प्रतिनिधी(शिवराज पवार)
भाजपा महिला मोर्चाच्या विद्यमान लोहा तालुका अध्यक्षा तथा बचत गटाच्या चळवळीला गती देणाऱ्या सविता सातेगावे या कर्तुत्ववान महिलेने धाडसी कामगीरी करून सर्व सामान्य माणसाला जणू आधारच दिला.
लोहा स्थित स्वतः चालवत असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहक सेवा केंद्राच्या माध्यमातून बचत खाते,प्रधानमंत्री जनधन योजनेचे खाते,प्रधान मंत्री बिमा योजना,अटल पेन्शन योजना,बचत गटांचे सक्षमीकरण करणे,तसेच कोरोना काळातही राबणाऱ्या सक्षमपणे आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस, पत्रकारांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सुद्धा गौरव करुन जणू त्यांच्या पाठीवर थाप दिली.
तळागाळापर्यंत पोहोचून कोरोना कालावधीत मास्क,सैनीटायजर वाटप, करण्याचे कार्य करून भल्याभल्यांना लाजवले. कोरोना कालावधीमध्ये एकीकडे बँकेत गर्दी होऊ नये म्हणून ग्राहकांना आत येण्यास परवानगी दिली नव्हती. बँकेचे व्यवहार हे खिडकीतून होताना दिसून आले. तशाही परिस्थितीमध्ये समाजाचे काही देणे लागते या भावनेतून ग्राहकांना आपल्या ग्राहक सेवा केंद्रातून कोरोनाच्या नियमांचे,अटींचे पालन करून, स्वतः चालवत असलेल्या SBI च्या ग्राहक सेवा केंद्रातून भाजपा महिला मोर्चाच्या सक्षम लोहा तालुका अध्यक्षा सविता सातेगावे यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून खंबीरपणे कोणतीही कामात कसूर न करता लोकांची सेवा केली.
नाबार्ड पुरस्कृत योजना, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून बचत गटांना कर्ज काढून देवून महिला सक्षमीकरणाचे पाऊल उचलले. बचत गटांच्या माध्यमातून महिलांना छोटे मोठे उद्योग उभारून देवून तालुक्यातील महिलांना स्वतःच्याच पायावर उभे राहण्यासाठी त्यांना प्रेरणा देऊन स्वयंस्फूर्तीने बचत गट चळवळीत आणण्याचे महान कार्य करतांना सुद्धा स्वतः सविता नागलगावे ४२ व्या वर्षात पदार्पण करतांना सुद्धा त्या डगमगल्या नाहीत. जणू सर्वसामान्यांच्या कुटुंबांना आधार देण्याचे पुण्य कर्म करण्याचे भाग्य त्यांना लाभले. त्यांना लोहा तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांसहित शहरातील महिलांनी सुद्धा वेळोवेळी त्यांच्या हाकेला ओ दिला. या नेतृत्वान, कर्तृत्ववान महिलेचा अनेक वेळा गौरवही केला गेला.

Categories
Uncategorized

पंचरत्न मित्र मंडळ दिनदर्शिका 2021 प्रकाशन सोहळा संपन्न!

                                       (प्रतिनिधी /दत्ता श्रावण खंदारे )महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षापासून शैक्षणिक, पर्यावरण, आरोग्य , व सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे पंचरत्न मित्र मंडळाचा वार्षिक दिनदर्शिका २०२१ चे उद्घाटन माननीय कॅबिनेट मंत्री  श्री नवाब मलिक ( कोशल्य विकास ‘ अल्पसंखांक ) यांच्या शुभहस्ते मुंबईत पार पडला .  मंडळाचे कार्य तत्पर अध्यक्ष श्री अशोक भोईर ,सचिव प्रदीप  गावंड , सहसचिव स्नेहा नानिवडेकर ,खजिनदार सचिन साळुंके ,वैभव  घरत ,निलम  गावंड ,डॉ.विनित गायकवाड,रहिम शेख,जालिंदर इंगोले,रमाकांत गवळी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते .आरसीएफ मधील नोकरीधंदा सांभाळून सामाजिक बांधिलकी जपत  स्वःखर्चातू गोरगरीब जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी झटत आहे विषेशतः मूक-बधिर ,अंध विद्यार्थी ,वृद्धाश्रम ,व अतिदुर्गम भागातील आदिवासी पाड्यातील निराधारांना सतत १५ वर्षे अन्नधान्य ,कपडे व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करीत आले आहेत. रोजगार मेळावे ,आरोग्य शिबिरे, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जाते. त्यांच्या समाजकार्याची दखल माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील श्री अण्णा हजारे, सिंधुताई संकपाळ, इत्यादी मान्यवरांसाहित अनेक दैनिक वृत्तपत्रे व प्रसारमाध्यमांनी घेतली आहे.
दत्ता श्रावण खंदारे धारावी

Categories
कला व मनोरंजन मुंबई

आक्रीत फिल्ममधील “धिंगाणा” सुपरहिट गीत यु ट्यूब वर प्रदर्शित

( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी: लक्ष्मण राजे )

प्रसिद्ध कवी, लेखक, गीतकार, संपादक, साहित्यिक, समाजसेवक, निर्माता व दिग्दर्शक डॉ. शांताराम कारंडे निर्मित व दिग्दर्शित डॉ. शांताराम कारंडे फॅन्स फाउंडेशन प्रोडक्शन हाऊस प्रस्तुत सिद्धांत पिक्चर्सचा नवीन मोठ्या पडद्यावर प्रदर्शित चित्रपट “आक्रीत” मधील “धिंगाणा” गीत यु ट्यूबवर प्रदर्शित करण्यात आले. सदर चित्रपटात प्रमुख भूमिकेत प्रो. विवेक शिंदे सर व अभिनेत्री संजीवनी जाधव आहेत. सोबत प्रसिद्ध अभिनेत्री नूतन जयंत, दिपाली मोरे, भाऊ कदम व डॉ. शांताराम कारंडे देखील आहेत.
सामाजिक कार्यकर्ते व राजकीय नेते असलेले डॉ. कारंडे व्यवसायाने आर्किटेक्ट व बिल्डर असून त्यांना मराठी नाटक व चित्रपट निर्माण करण्याची आवड आहे. त्याच अनुषंगाने त्यांनी आत्तापर्यंत १३ मराठी नाटक व १५ मराठी, हिंदी व तामिळ शॉर्टफिल्मची निर्मिती केली आहे. लवकरच त्यांचा आक्रीत हा मोठ्या पडद्यावरील सिनेमा येत आहे.
डॉ. कारंडे यांचं साहित्यिक क्षेत्रातदेखील मोठं योगदान आहे. त्यांचे आत्तापर्यंत १० कथासंग्रह, ११ कवितासंग्रह व शेकडो विविध विषयांवरील लेख प्रकाशित आहेत. काळजाचा वेध घेणारा संवेदनशील मराठी चित्रपट आक्रीत मधील गाणे पाहण्यासाठी
https://youtu.be/Q8MdzLPoai4
या लिंकवर प्रेस करा…
कृपया dr. Shantaram Karande हे चॅनेल SUBSCRIBE करायला विसरू नका. तसेच कृपया आपली महत्वपूर्ण प्रतिक्रिया
चॅनेलच्या कॉमेंट बॉक्समध्ये द्या !

Categories
कला व मनोरंजन मुंबई

‘रात्रीस खेळ चाले’ फेम सुप्रसिध्द अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरला नाट्य चित्रपट क्षेत्रातील कलाकारांनी दिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी: लक्ष्मण राजे )

“रात्रीस खेळ चाले” मधली शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर. सुप्रसिद्ध अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरचा जन्म २७ डिसेंबर १९८८ रोजी मुंबईतील दादर येथे झाला. अपूर्वा दादर भागातच लहानाची मोठी झाली. किंग जॉर्ज विद्यालयातून ती दहावीपर्यंत शिकली व त्यानंतर तिने रुपारेल कॉलेजमधून महत्वपूर्ण Managament मधील BMS डिग्री घेतली. अपूर्वा नेमळेकर BMS शाखेतील पदवीधर आहे. अपूर्वा नेमळेकरनं आपल्या करिअरची सुरुवात एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीतून केली. ती इव्हेंट प्रमोटर म्हणून काम पाहात असे. इतकेच काय तर तिच्या पहिल्या पगाराचा चेक केवळ १००० रुपयांचा होता.अपूर्वाला अभिनय क्षेत्रात कधीच यातिला नव्हतं. शिक्षण घेताना तिला ग्रॅज्युएशननंतर एमबीए करायचं होतं. परंतु , आपली मुलगी टीव्हीवर दिसावी अशी तिच्या आई-वडिलांची खूप इच्छा होती. ‘अभिनय क्षेत्रात काम करणे हे माझ्या नशिबातच लिहिले होते’ असं अपूर्वा सांगते.अपूर्वा स्वत: ज्वेलरी डिजाइनर आहे. तिच्या नावाचा इमिटेशन ज्वेलरीचा ब्रँडदेखील आहे.
सर्वात आधी ती आभास हा, या झी मराठीवरील मालिकेमधून सर्वांसमोर आली. तू जीवाला गुंतवावे मधील सौम्या तर आराधना मधील पूजा बनून ती आपल्यासमोर आली. रात्रीस खेळ चाले मधल्या शेवंताने तिला यशाच्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. दुसऱ्याच्या घरात घुसणारी बाई अस बोल्ड रोल तिने लीलया साकारलेला आहे‌.अण्णा नाईक आणि तीच जमलेलं सुत सगळीकडे चर्चेचा विषय झालेलं आहे. इश्क वाला लव, भाकरखाडी, अन यावर्षी आलेला accidental Prime minister मध्ये सुद्धा तिने काम केलय. अत्यंत मनाचा असा २०१६ चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा नाट्य परिषद पुरस्कारही तिने प्राप्त केला आहे. २०१४ मध्ये अपुर्वाचे रोहन देशपांडेसोबत लग्न झाले. २७ डिसेंबर रोजी तिला नाट्य चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवरांनी , निर्माते , कलाकार , तंत्रज्ञांनी , आणि असंख्य चाहत्यांनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

Categories
कोपरगाव

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी खांबेकर कुटुंबीयांचे केले सांत्वन


प्रतिनिधी बिपिन गायकवाड कोपरगाव-
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी संध्याकाळी खांबेकर कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले यावेळी खांबेकर यांच्या पत्नी जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीस मीनल खांबेकर यांच्यासह दोन मुलं व दोन मुली यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थितांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की
स्व. अशोक खांबेकर यांच्या जीवनातील अनेक पैलू उलगडले खांबेकर यांनी श्री साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त व अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व ज्येष्ठ पत्रकार म्हणून जिल्ह्यासह त्यांचा परिचय होता तसेच पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी नावलौकिक मिळविला होता समाजासह अनेक क्षेत्रात पूर्ण यश मिळवले होते त्यांच्या जाण्याने कोपरगाव तालुक्या सह संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात उत्तम पत्रकार तसेच राजकीय अभ्यासक हरपला अशोक खांबेकर यांचे अहमदनगर जिल्ह्यातील पत्रकारितेत मोठे योगदान आहे पीटीआय चे पत्रकार म्हणून देखील अनेक वर्षे त्यांनी काम केले आहे ते श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त पदी असताना त्यांनी अनेक गोरगरिबांना मदत केली काही ना मोफत उपचार देऊन तर काहींना नोकरी लावून दिल्या राज्यासह देशभरातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील मोठ्या व्यक्ती सोबत त्यांचे रोजचे भ्रमणध्वनीवर बोलणे असायचे शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते म्हणून जीवन जगले.
यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले की अशोक खांबेकर आमचे काँग्रेसचे निष्ठावंत व कोपरगाव तालुक्याचे नेते होते सातत्याने त्यांनी आयुष्यभर काँग्रेसच्या विचारांची सेवा केली आहे एक उत्साही आनंदी व सर्वांना बरोबर घेऊन जाणारे विकासाचा नेहमीच विचार करणारे व संघटनात्मक विचार करणारे अशा प्रकारचे त्यांचे नेतृत्व होतं त्यांच्या जाण्याने कोपरगाव तालुक्यात काँग्रेसमध्ये व समाजामध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे असे थोरात शेवटी म्हणाले या प्रसंगी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तुषार पोटे तालुका काँग्रेसचे विष्णुपंत पाडेकर महिला काँग्रेस उपाध्यक्ष अॕड.शितल देशमुख महिला शहराध्यक्ष रेखाताई जगताप तालुका शहर चिटणीस ज्ञानेश्वर भगत उपशहर अध्यक्ष काँग्रेसचे अक्षय अंग्रे तालुका कार्याध्यक्ष सागर बारहाते राजूभाई पठाण निरंजन कुडेकर जय कदम अश्फाक सैय्यद दादा आवारे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Categories
इंदापूर

पुणे जिल्हा एसटी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या चेअरमन पदी नितीन देवकर -पाटील यांची बिनविरोध निवड

इंदापूर एसटी आगाराला पहिल्यांदाच मान

इम्तिहाज मुलाणी :
इंदापूर( प्रतिनीधी) :

इंदापूर : पुणे जिल्हा एसटी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या चेअरमन पदी नितीन देवकर -पाटील बिनविरोध निवड झाल्याबद्दल इंदापूर आगारातील कर्मचारी यांच्याकडून पाटील यांचा सत्कार करण्यात आला . या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून इंदापूर नगरीचे माजी नगराध्यक्ष प्रा. कृष्णाजी ताटे सर उपस्थित होते तर आगार प्रमुख मेहबूब मनेर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी प्रा. कृष्णाजी ताटे सर व मेहबुब मनेर यांच्या हस्ते नितिन देवकर – पाटील यांचा हार ,शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला . तसेच इंदापूर आगरामार्फत महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे इंदापूर आगाराचे सचिव बाळासाहेब फाळके व विभागीय अध्यक्ष राजाभाऊ कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रा . कृष्णाजी ताटे सर यांनी नितीन देवकर यांना सोसायटी मार्फत कामगारांच्या अडचणीच्या काळात वेळेत मदत देण्याची मागणी केली व सोसायटीचा नावलौकिक वाढवावा अशी अपेक्षा केली. यावेळी आगार प्रमुख मेहबूब मनेर , वाहतूक नियंत्रक दशरथ तोरसकर , विक्रम चंदनशिवे, मिट्टू खाडे , विजकुमार गवळी ,अनिल शिंदे यांनी नितीन देवकर- पाटील यांना शुभेच्छा दिल्या .
याप्रसंगी नूतन चेअरमन नितीन देवकर – पाटील म्हणाले महाराष्ट्र एस. टी.कामगार संघटनेचे जनरल सेक्रिटरी हनुमंत ताटे ,अध्यक्ष संदीप शिंदे , विभागीय सचिव दिलीपजी परब , विभागीय अध्यक्ष मोहन जेधे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनानुसार व आपल्या आगारातील सर्व एसटी कर्मचारी वर्ग यांचे वेळोवेळी मिळालेले प्रेम व आशिर्वाद यामुळेच आज आपल्या इंदापूर आगाराला एसटी सोसायटीचे चेअरमन पदाचा मान मिळाला.
इंदापूर आगाराच्या सहकार्यामुळे ही सुवर्णसंधी मिळाली असून सभासदाच्या अडीअडचणी संबंधित सर्वोच्च प्राधान्य जाईल असे त्यांनी सांगितले. सोसायटी बद्दल बोलताना पुढे म्हणाले, ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पुणे विभाग या संस्थेची स्थापना १९६० रोजी झाली असून सोसायटी ला ६० वर्षे पूर्ण झाली असून ६० वर्षात मध्ये ही संस्था सेवेचा वसा घेऊन यशस्वीरित्या वाटचाल करत आहे .या संस्थेची पारदर्शी व सुस्तिम सेवा रा. प.कामगारांच्या नेहमीच पसंतीस उतरलेले आहे. संस्थेचे पहिले चेअरमन १९६० ते १९६२ पर्यंत एम. एन .संगम होते.तेव्हापासून आजपर्यंत संस्थेची वाटचाल प्रगतिपथावर आहे . त्याप्रमाणे संस्थेचे सतत अँडिट ‘अ’ वर्ग मिळत असून संस्थेच्या स्वारगेट, बारामती, राजगुरूनगर शाखेद्वारे सेवा दिली जाते.
संस्थेचे सभासद २२६२ असून वसूल भागभांडवल रु.८ कोटी ५० लाख आहे व गंगाजळी ४ कोटी ७२ लाख असून इमारत निधी ५६ लाख आहे. गुंतवणूक रु.९ कोटी ५० लाख असून सभासद ठेवी ५ कोटी ७७ लाख आहे. अशीही माहिती यावेळी इंदापूर एसटी आगाराचे नूतन चेअरमन नितीन देवकर – पाटील यांनी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत खरात व महेश जाधव यांनी केले व आभार प्रदर्शन शांताराम जगताप यांनी केले


Categories
नांदेड

इंग्लंडहुन कोरोना नांदेडात दाखल

नांदेड:दि.27.कोरोनाचा प्रभाव काही प्रमाणात कमी होत असतानाच इंग्लंडमध्ये कोरोना विषाणूचे नवे रुप समोर आले आहे.हा नवा विषाणू सुपरस्प्रेडर म्हणजे अतिशय वेगाने पसरणारा असल्याचे त्या देशातील बातम्यांमधून पुढे आले आहे.त्यामुळे या नव्या विषाणूची साऱ्या जगाने धास्ती घेतली आहे.

१२ डिसेंबरला आलेले दोन प्रवासी पॉझिटिव्ह

संपर्कातील दहाजण रुग्णालयात क्वारंटाईन

इंग्लंडहून नांदेडला परतलेल्या दोन प्रवाशांना गेल्या १२ डिसेंबरला कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे तपासणीदरम्यान समोर आले आहे.गृह विलगीकरणानंतर हे दोघेही कोरोनातून बाहेर पडले असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून या दोघांसह त्यांच्या संपर्कात आलेल्या एकूण दहा जणांना जिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीतील विलगीकरण कक्षात देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.

कोरोनाचा प्रभाव काही प्रमाणात कमी होत असतानाच इंग्लंडमध्ये कोरोना विषाणूचे नवे रुप समोर आले आहे. हा नवा विषाणू सुपरस्प्रेडर म्हणजे अतिशय वेगाने पसरणारा असल्याचे त्या देशातील बातम्यांमधून पुढे आले आहे. त्यामुळे या नव्या विषाणूची साऱ्या जगाने धास्ती घेतली आहे.

जगभरात अजूनही यावर संशोधन सुरू आहे.भारतात 22 डिसेंबरपासून इंग्लंडहून येणार्‍या व जाणार्‍या सर्व विमानसेवा बंद करण्यात आल्या आहेत. तत्पूर्वी खबरदारीचा उपाय म्हणून संबधित देशातून आलेल्या सर्व प्रवाशांना विमानतळावरच ताब्यात घेऊन सक्तीने विलगीकरणात पाठविले जात आहे.बॉलिवूडच्या अनेक कलाकारांसह अतिमहत्वाच्या व्यक्तींनाही त्यातून कोणतीच सूट दिली गेली नाही.

विमानसेवा बंद झाली असली तरी गेल्या महिनाभरापासून कोरोनाचा नवा विषाणू इंग्लंडसह युरोपीयन देशात पसरल्यामुळे त्या देशांमधून मागील महिन्याभरात परतलेल्या सर्व प्रवाशांची यादी शासनाने संबंधित जिल्हाधिकारी व महापालिकेकडे पाठविली आहे.त्यानुसार नांदेड शहरात दाखल झालेल्या आठ ते दहा प्रवाशांना जिल्हा प्रशासनाने जिल्हा शासकीय रुग्णालयात सक्तीच्या विलगीकरणात पाठविले आहे.

नांदेड शहरातील काबरानगर, तरोडा नाका,वसंतनगर व पाटनूूरकरनगर या चार परिसरातील पाच कुटुंब नांदेडमध्ये 10 ते 12 डिसेंबरदरम्यान विमानाने दाखल झाले.या सर्वांची विमानतळावरच कोरोना चाचणी केल्यानंतर 12 डिसेंबर रोजी त्यातील दोन पुरुष प्रवासी पॉझिटिव्ह आढळले. त्यांना तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर प्रवाशांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले. परंतु केंद्र आणि राज्य शासनाने 22 डिसेंबर रोजी सुधारीत सूचना जारी करून खबरदारीचा उपाय अशा प्रवाशांना सक्तीच्या संस्थात्मक विलगीकरणाचे निर्देश दिले आहेत.त्यामुळे या दोन प्रवाशांसह त्यांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील आठ जणांना शुक्रवारी (दि.25) जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात देखरेखीसाठी दाखल करून घेण्यात आले आहे.या सर्वांना सध्या कोणतीही लक्षणे नाहीत,तसेच त्यांचा आहार नियमितपणे चांगला सुरू असल्याचे सांगण्यात येते.

दोन बाधित प्रवाशांचे स्वॅब पुण्याला पाठविले!

इंग्लंडहून परतलेले जे दोन रुग्ण नांदेडमध्ये १२ डिसेंबर रोजी पॉझिटिव्ह आढळले होते. आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार ते आता कोरोनामुक्त झाले आहेत.त्यांना भारतात आल्यानंतर कोविडची लागण झाली होती की इंग्लंडमधूनच विषाणूंचा त्यांच्या शरीरात शिरकाव झाला, यावर संशोधन करण्यासाठी दोघांचेही आरटीपीसीआर स्वबचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संशोधन प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. त्यांच्यात आढळलेला कोरोनाचा विषाणू हा नेहमीचा आहे की वेगवान पसरणारा नवा विषाणू आहे, याची सविस्तर माहिती हाती येण्यासाठी किमान आठ दिवसांचा कालावधी लागेल.तोपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या दोन्ही प्रवाशांना तसेच त्यांच्या संपर्कातील इतर प्रवासी तसेच कुटुंबीयांना रुग्णालयातील विलगीकरणात देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. शासन निर्देशानुसार त्यावर पुढील प्रक्रिया केली जाईल,असे नोडल ऑफिसर डॉ.निळकंठ भोसीकर यांनी सांगितले.

Categories
नांदेड

भोकर येथे युवक काँग्रेस ची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:दि.27.भोकर येथे युवक काँग्रेस ची महत्वपूर्ण बैठक दि २६ रोजी चिंचाळकर काम्पलेक्स येथे युवव चे जिल्हा अध्यक्ष पप्पू पाटील कोंडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आढावा बैठक पार पडली.

या बैठकीत मदन देशमुख अध्यक्ष भोकर विधानसभा काँग्रेस, संदीप सोनकांबळे नगरसेवक नांदेड, मा.नगरअध्यक्ष विनोद पाटील चिंचाळकर सह आदि.

प्रमुख कार्यकर्त्यांनी मार्गदर्शक करून कार्यक्रमाचा आढावा घेतला व पुढील कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली तसेच ग्रामपंचायत नगरपरिषद निवडणूक हा मुद्दा लक्षात घेऊन जास्तीत जास्त कार्यकर्तेना सहभाग करून घेण्यासाठी काही धोरणे ठरवण्यात आली.यावेळी केशव पाटील,शहर अध्यक्ष खाजूभाई ईनामदार,साहेबराव सोमेवाड,मधुकर गोवंदे.विक्रम क्षीरसागर,मनोज गिमेकर विलास हटकर
सना इनामदार,गौतम भाऊ कसबे,शेख साबेर,अफरोज इनामदार,सय्यद अशपाक(आशु),आरेफ इनामदार, तोसिफ इनामदार, गोविंद देशमुख,शिवेवार, मो.जमील मामू,इम्तितिया ईनामदार,आदि मान्यवर उपस्थित होते.या बैठकीला तरुणांची उपस्थिती ही लक्षणीय ठरली. सुमारे १५० युवक यात सामील झाले होते.बैठकीचे नियोजन युवक काँग्रेस पक्षाचे विकास क्षीरसागर,व गोविंद मेटकर यांनी केले होते.

Categories
सातारा

जनतेच्या सहभागातूनच उभे राहणार श्रीराम जन्मभूमी मंदिर, संक्रांतीपासून निधी संकलन सुरू

पाटण हिंदू सम्राट प्रतिनिधी उमेश सुतार यांजकडून

अयोध्येतील नियोजित श्रीरामजन्मभूमी मंदिर हे पूर्णपणे जनतेच्या आर्थिक सहभागातूनच उभे राहणार असून संक्रांतीपासून त्याचे निधी संकलन सुरू होणार असल्याची माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव, तसेच विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष श्री चंपतराय यांनी दिली. श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण व निधी संकलन याबाबत अधिक माहिती देण्याकरिता यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

ते म्हणाले की, अयोध्येची लढाई प्रभू श्रीरामांची जन्मभूमी पुन्हा प्राप्त करण्यासाठी होती. समाज त्या जागेस प्रभू श्रीरामांचे जन्मस्थान मानतो. तिथे पूर्वी मंदिर होते. परकीय आक्रमकांनी मंदिर तोडले हा राष्ट्राचा अपमान होता. हा अपमान संपवण्यासाठी आम्ही हे स्थान परत मिळवले. हे आंदोलन देशाच्या सन्मानाच्या रक्षणार्थ होते. यासाठी समाजाने ५०० वर्षे संघर्ष केला. अखेर समाजाच्या भावना सर्वांनी समजून घेतल्या. श्रीरामजन्मभूमी मंदिराशी निगडित तथ्ये सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आणि भारत सरकारला राम जन्मभूमीसाठी ट्रस्टची घोषणा करण्याचे निर्देश दिले. सरकारने या सूचनांचे पालन करत श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र नावाने ट्रस्टची घोषणा केली. मंदिराचे प्रारूप थोडे वाढविण्यात आले असून त्यानुसार सर्व तयाऱ्या करण्यात आल्या आहेत. पंतप्रधानांनी ५ ऑगस्ट रोजी अयोध्येत पूजन करत मंदिराच्या निर्मिती प्रक्रियेस वेग प्रदान केला. सध्या मंदिराच्या निर्मितीची तयारी सुरू आहे. मृदा परीक्षण करण्यात आले. गर्भगृहाच्या पश्चिमेस शरयूचा जलप्रवाह आणि जमिनीखाली भूरभूरित वाळू अशी येथील भौगोलिक स्थिती आहे.

मान. अशोक सिंहल यांनी मुंबईस येऊन लार्सन अँड टुब्रोच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. त्यानुसार लार्सन अँड टुब्रो कंपनी या मंदिराचे बांधकाम करत आहे. या कंपनीस सल्ला देण्यासाठी टाटा कन्सल्टंट इंजीनिअर्सची निवड करण्यात आली आहे. सर्व प्रकारची प्रबंध झाले असून मंदिराच्या वास्तूची जबाबदारी अहमदाबादच्या चंद्रकांत सोमपुरा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. ते १९८६पासूनच या प्रकल्पाशी संलग्न आहेत. सोमपुरा यांच्या आजोबांनी सोमनाथ मंदिर बांधले होते. स्वामी नारायण परंपरेची अनेक मंदिरे त्यांनी बांधली आहेत. दगडांपासून मंदिरे बांधणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. सध्या अयोध्येच्या वालुकामय जमिनीवर मजबूत पायाच्या दगडी मंदिरांचे बांधकाम कसे करावे यावर विचार सुरू आहे. पुढील तीन वर्षांत हे मंदिर उभे राहील अशी आशा ही त्यांनी व्यक्त केली.

मंदिराच्या प्रारूपाबद्दल ते म्हणाले की, संपूर्ण मंदिर दगडी बांधण्यात येणार असून प्रत्येक मजल्याची उंची २० फूट, मंदिराची लांबी ३६० फूट आणि रुंदी २३५ फूट आहे. जमिनीपासून १६.५ फूट उंचीवर मंदिराचा फरसबंदी पृष्ठभाग असेल. आयआयटी मुंबई, आयआयटी चेन्नई, आयआयटी गुवाहाटी. सीबीआरआय रुरकी, लार्सन अँड टूब्रो आणि टाटाचे इंजीनिअर पायाच्या रेखाटनावर परस्परांत चर्चा करीत आहेत. लवकरच पायाचे प्रारूपाची माहिती सर्वांना मिळेल.

भारताच्या वर्तमान पिढीस मंदिराच्या ऐतिहासिक तथ्यांची माहिती देण्याचीही योजना तयार करण्यात आली आहे. देशातील अर्ध्या लोकसंख्येस श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या ऐतिहासिक सत्याची जाणीव करून देण्याचा विचार करण्यात आला आहे. घराघरात संपर्क केला जाईल, देशाचा कोनाकोपरा यातून सुटणार नाही, अरुणाचल प्रदेश, नागालँड-अंदमान निकोबार, कच्छपासून पर्वतीय क्षेत्रांपर्यंत सर्वत्र जाऊन समाजास राम जन्मभूमीबाबत वाचनीय साहित्य पुरवले जाईल. प्रभू श्रीरामाच्या जन्मभूमीवर मंदिर उभे राहावे ही संपूर्ण देशाची मनःपूर्वक इच्छा आहे.

जन्मभूमी परत मिळवण्यास लाखो भक्तांनी हाल सोसले, मदत केली. त्याच पद्धतीने कोट्यवधींच्या स्वैच्छिक सहयोगाने हे मंदिर उभे राहावे अशी आमची इच्छा आहे. जेव्हा जनसंपर्क केला जाईल तेव्हा लाखो कार्यकर्ते गाव, वस्त्यांमध्ये जातील तेव्हा समाज स्वाभाविकच काही ना काही मदत नक्कीच करेल. देवाचे कार्य आहे, मंदिर देवाचे घर आहे, देवाच्या कार्यामध्ये पैसा ही अडचण ठरू शकत नाही. समाजाचे समर्पण कार्यकर्ते स्वीकारतील. आर्थिक विषयात पारदर्शकता अत्यंत आवश्यक आहे. पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी आम्ही दहा रुपये, शंभर रुपये, एक हजार रुपये अशी कूपन आणि पावत्या छापल्या आहेत. समाज जशी मदत करेल त्याला अनुसरून कार्यकर्ते पारदर्शकतेसाठी कूपन किंवा पावत्या त्यांना देतील. कोट्यवधी घरांमध्ये मंदिराचे चित्र पोहोचेल. जनसंपर्काचे हे कार्य मकरसंक्रांतीस सुरू होईल व माघ पौर्णिमेस पूर्ण होईल.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मार्चमध्ये ट्रस्टचे बँक खाते तयार करण्यात आले. या खात्यात या पूर्वीच लोकांनी आपला आर्थिक सहयोग देण्यास सुरुवात केली आहे. दररोज १००० ते १२०० बँक ट्रान्झॅक्शन होत आहेत. याच पद्धतीने कुपनांच्या माध्यमातूनही नागरिक आपला खारीचा वाटा नक्की उचलतील, असा विश्वासही चंपतराय यांनी व्यक्त केला.

Categories
नाशिक

शिवसेनेचा भाजपला टोला…ग्रीन जीम करणा-यांनो उड्डानपुलाचे स्वप्न सोडा! 

नाशिक शहर प्रतिनिधी सुनिल बेलदार
नाशिक दि 26 डिसेंबर : नाशिक महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना व भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांत चांगलाच वाद नाशिक शहरातच चांगलाच रंगला  आहे. नाशिक शहराचे नवनियुक्त शिवसेनेचे महानरप्रमुख श्री सुधाकर बडगुजर यांच्या अभिनंदनाच्या फ्लेक्सवर भाजपच्या आमदारांना सभामंडप व ग्रीन जीम करणा-यांनी उड्डानपुलाचे श्रेय घेऊ नये असा टोमणा मारला आहे. सिडकोतील त्रिमूर्ती चौकात लागलेल्या फ्लेक्सची शिवसेना- भाजपतील वादाचे प्रतिक  म्हणून चांगलीच चर्चा आहे. 

नाशिक शहरात गेल्या दोन दिवसांपासून सिडकोतील उड्डाणपुलावरून ” राजकीय श्रेयवाद ” पेटलेला असतानाच सिडको परिसरात ठीक- ठिकाणी शिवसेना महानगरप्रमुख श्री सुधाकर बडगुजर यांच्या समर्थकांनी लावलेले काही वादग्रस्त फलक झळकताना दिसत आहेत. या फलकाच्या आडून सरळ सरळ नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या भाजप आमदारांना टार्गेट केले आहे. त्यांच्यावर निशाणा साधण्यात आल्याचे पहायला मिळत आहे . त्यामुळे श्रेयवादाचे हे राजकीय वातावरण सध्या तरी काही करता क्षमण्याची चिन्हे नाहीत. 
शिवसेना- भाजपचा हा वाद भविष्यात “शिवसेना महानगरप्रमुख विरुद्ध नाशिक पश्चिमच्या भाजपा आमदार सीमा हिरे” यांच्यात रंगणार हेच यातून दिसतेय. या वादग्रस्त फलकावर पुढील काही ओळी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिक व वाहनधारकाचे लक्ष वेधून घेत आहे . “पंख नसणाऱ्यांनी उडण्याची स्वप्नं पाहू नये, फक्त ग्रीन जिम आणि सभामंडप बनवणा-यांनी उड्डाणपुलाचे श्रेय घेऊ नये” शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी पाठपुरावा करून त्रिमूर्ती चौक ते संभाजी चौक उड्डाणपुलाला मंजुरी मिळवून दिल्याबद्दल हार्दिक आभार! अशा आशयाचे टिका करणारे फलक सध्या शहरातील महापालिका निवडणुकीताल शिवसेना विरुद्ध भाजप या राजकीय लढाईचे प्रतिक बनले आहेत. अनेक ठिकाणी हे फलक लागल्याने भाजप समर्थकांच्या डोळ्यात मात्र ते खुपत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या या फलकांना भाजप काय उत्तर देते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 
….
 

Categories
कवठेमहांकाळ सांगली

देवराष्ट्रे येथे सोनार समाजाचा तालुकास्तरीय मेळावा संपन्न


दि.२६/१२/२०२०
कवठेमहांकाळ- विद्याधर रास्ते

देवराष्ट्रे ता.कडेगाव जि.सांगली येथे सोनार समाजाच्या तालुकास्तरीय मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यास ओबीसी संघटनेचे प्रदेशअध्यक्ष मा.श्री.मधुकर जंगम. सोनार समाजाचे राज्य अध्यक्ष प्रकाश पोतदार व ओबीसी संघटनेचे जिल्हाअध्यक्ष सुहास पंडित उपस्थित होते. यावेळी बोलताना मधुकर जंगम यानी इ.1ली ते 12वी च्या मुलांना शिष्यवृत्ती व इतर सुविधांची माहिती दिली त्याचबरोबर विद्यार्थ्यांना. समाजातील मुला-मुलींना मोफत आयएएस,आयपीएस, एमपीएससी करण्यासाठी नागपूर येथील महाज्योती संस्था, बिनव्याजी 1लाख रुपये देत असल्याची माहिती दिली. त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या व्यवसाय व कुटुंब उद्योगासाठी कर्ज, पुरवत असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षणासाठी व्यावसायिक शिक्षणासाठी वस्तीगृह सुविधेचा फायदा घ्यावा, असे सांगत विविध विषयांवर याबाबत मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमासाठी समाजातील बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे हा मेळावा अत्यंत उत्तम पद्धतीने पार पडला.

Categories
नांदेड

व्हीसेरा तपासणीतील दिरंगाई दुर करण्यासाठी शासनाने केले नियोजन

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:दि.26.न्यायवैधक प्रयोग शाळेला तपासणीसाठी पाठवलेले व्हीसेरा अहवाल तीन-तीन वर्ष प्रलंबित राहत असल्याने महाराष्ट्राच्या मानवी हक्क आयोगाने स्वत: याचिका दाखल करून दिलेल्या आदेशाप्रमाणे मुंबईसह राज्यभरातील पोलीसांना त्यांच्याकडील व्हीसेरा अहवाल तपासणीसाठी कोठे पाठवायचे याबद्दलचा सविस्तर शासन निर्णय वैद्यकीय शिक्षक व औषधी द्रव्य विभागाच्या कार्यासन अधिकारी स्वाती लोहार यांच्या डिजिटल स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आला आहे.

एखाद्या व्यक्तींच्या मृत्यूनंतर त्याचा प्राथमिक श्वविच्छेन अहवाल तयार होतो. तरीही सविस्तर तपासणीसाठी त्या मयत व्यक्तीच्या व्हीसेरा न्यायवैध शाळेला तपासणीसाठी पाठविला जातो. त्यात होणारी दिरंगाई आणि अतिउशीर त्या प्रकरणाच्या अंतिम अहवालासाठी अडचणीचा ठरतो. याबद्दल प्रसार माध्यमांनी आवाज उठवला तेंव्हा. महाराष्ट्र मानवी हक्क आयोगाने स्वत: याचिका दाखल करून घेतली आणि त्यावर दिलेल्या निर्णयानुसार व्हीसेरा तपासणीत होणारा विलंब अत्यंत जलदगतीने दुर करण्याचे आदेश राज्य शासनाला दिले.त्यानुसार राज्य शासनाने त्यासाठी एक सविस्तर शासन निर्णय जारी केला आहे. त्यात मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांना वेगवेगळी विभागणी करून त्या रुग्णालयात आपल्याकडील व्हीसेरा तपासणीसाठी पाठववावे. असे सुनिश्चित केले आहे. मुंबई शिवाय राज्य भरातील प्रत्येक जिल्ह्यातील कोणत्या रुग्णालयात हे व्हीसेरा तपासणीसाठी पाठवावे याला सुनिश्चित केले आहे. त्यात एक-एका शासकीय महाविद्यालयाला 3 ते 5 जिल्ह्यांचे व्हीसेरा तपासणी अहवाल तपासावेत असे सुचित केले आहे. हा शासन निर्णय संकेतांक क्रमांक 202012231101497313 नुसार शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केला आहे.

नांदेड येथील डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालयात नांदेड आणि हिंगोली या दोन जिल्ह्यामधील सर्व पोलीस ठाण्यांचे व्हीसेरा अहवाल तपासण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. सोबतच शासकीय महाविद्यालय औरंगाबाद येथे औरंगाबाद, जालना आणि नाशिक जिल्ह्यांची तपासणी होईल. परभणी आणि बीड या जिल्ह्यांचे व्हीसेरा अहवाल शाकीय महाविद्यालय अंबेजोगाई येथे तपासले जातील. लातूर एकच जिल्हा असा आहे. ज्यासाठी शासकीय वैद्यकिय विज्ञान संस्था लातूर यांची व्हीसेरा तपासणीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे

Categories
मुंबई

शेतकरी देशोधडीला लागणार?- रवींद्र जांभळे

( हिंदसम्राट मुंबई प्रतिनिधी:लक्ष्मण राजे )

इंदिरा गांधीच्या काळात कामगारांचा दीर्घकाळ चाललेला संप इंदिरा गांधींनी चिरडून टाकला होता. या संपामुळे कामगार देशोधडीला लागला. कामगार चळवळीवर त्याचे फार मोठे परिणाम झाले. कामगारांची लढण्याची हिमत च नष्ट झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात सरकारी कंपन्या बंद होऊन त्यांचे खाजगीकरण करण्याचा जोरदार सपाटा सुरू आहे. कामगारांच्या आंदोलनांना कोणत्याही मिडीयामधून, वृत्तपत्रांतून वाचा फोडली जात नाही. वृत्तपत्रे, मिडीया मोदींचे गुलाम झाले आहेत. त्यामुळे सरकारी कंपन्यातील कामगार देशोधडीला लागला आहे. आता देशोधडीला लागण्याची शेतकऱ्यांची वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या संपाला २८ दिवस उलटून गेले आहेत. तरी देखील, नरेंद्र मोदी संप मिटवण्यासाठी कोणत्याही हालचाली करताना दिसत नाहीत. शेतकऱ्यांच्या अन्यायाला वाचा फुटू नये, यासाठी संसदेचे अधिवेशन रद्द करण्याची पाळी नरेंद्र मोदींवर आली आहे. नरेंद्र मोदी यांचे विचारवंतांशी काहीही देणे घणे नाही. शेतकरी आंदोलन मिटविण्यासाठी कोणाबरोबरही चर्चा काढण्यास, माघार घेण्यास ते तयार नाहीत. नरेंद्र मोदींच्या या अहंकारामुळे कामगार वर्गाबरोबरच शेतकरीही देशोधडीला लागणार आहे.

Categories
नांदेड

हुजूरी खालसा फायनान्सच्या दिपूसिंघवर तेलंगणा राज्यात महिलेच्या विनयभंग केल्याचा गुन्हा

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:येथील फायनान्स व्यवसायात नामांकित असलेल्या रणदिपसिंघ विरुध्द तेलंगणा राज्यातील सायबराबाद जिल्ह्याच्या राजेंद्रनगर पोलीस ठाण्यात महिलेच्या विनयभंग केल्याप्रकरणी गुन्सहा दाखल झाला आहे. तेलंगणा पोलीसांनी नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेच्या मदतीने रणदिपसिंघला पकडून नेले आहे.

एका 28 वर्षीय महिलेने तेलंगणा राज्याच्या सायबराबाद जिल्ह्यातील राजेंद्रनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार तिच्या घटस्फोट झाल्यानंतर तिची ओळख नांदेडच्या हुजूरी खालसा फायनान्सचे मालक रणदिपसिंघ ईश्र्वरसिंघ सरदार सोबत झाली. त्यानंतर ती त्याच्यासोबत नांदेडमध्ये राहत होती. या सोबतच्या वास्तव्यात कांही व्हिडीओ तयार करण्यात आले आणि त्या व्हिडीओ आणि छायाचित्रांच्या आधारावर रणदिपसिंघ सरदार त्या युवतीला बॅल्कमेल करत होता. त्या युवतीने दुरध्वनीवरून सांगितले की, माझ्यावर केलेल्या अन्यायाबाबत मी नांदेड पोलीसांकडे, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे भरपूर तक्रारी केल्या पण मला नांदेड पोलीसांनी मदत केली नाही. त्यामुळे मला तेलंगणा राज्यातील पोलीसांकडे मदत मागावी लागली. घडलेला सर्व प्रकार जुना आहे. त्यात 12 ऑक्टोबर 2020 पासून रणदिपसिंघ सरदार त्या महिलेला बॅल्कमेल करत होता. युवतीच्या तक्रारीवरुन आता राजेंद्रनगर पोलीस, तेलंगणा यांनी गुन्हा क्रमांक 1758/2020 भारतीय दंड संहितेच्या कलम 454 आणि 506 नुसार दाखल केला आहे.

हा गुन्हा 24 ऑक्टोबर 2020 रोजी दाखल झालेला आहे. काल दि.25 डिसेंबर रोजी तेलंगणा पोलीसांनी नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखा पोलीसांची मदत घेवून रणदिपसिंघ ईश्र्वरसिंघ सरदारला पकडून तेलंगणात नेले आहे. या गुन्ह्याच्या हाकीकतीलमध्ये युवतीचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल केल्याची बाब नमुद आहे. पण गुन्ह्यात कलमे जोडली जातात. त्या ठिकाणी मात्र भारतीय तंत्रज्ञान कायदा किंवा त्याची कलमे लिहिलेली नाहीत. नांदेड येथील एका विधिज्ञाला या गुन्ह्याची कागदपत्रे दाखवून विचारणा केली असता या गुन्ह्यात भारतीय तंत्रज्ञान कायदा आणि त्याची कलमे आज अंतरभूत नसली तरी पुढे ती जोडली जातील असे सांगितले. तेलंगणा राज्यात आज 26 डिसेंबर रोजी या गुन्ह्याची काय परिस्थिती आहे याबद्दल माहिती मिळू शकली नाही.

Categories
लोहा

आंबेसांगवी जवळ कारच्या धडकेने दुचाकीस्वार गंभीर जखमी; सोनखेड पोलिसात गुन्हा दाखल

लोहा, प्रतिनिधी (शिवराज पवार)
‌‌लोहा तालुक्यातील आंबेसांगवी जवळ भरधाव वेगातील कार चालकाने दुचाकीस्वारास पाठीमागून जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील तीस वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी सोनखेड पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोहा तालुक्यातील आंबेसांगवी जवळ भरधाव वेगातील कार MH22 3444 च्या चालकाने आपल्या ताब्यातील कार हयगय व निष्काळजीपणाने भरधाव वेगाने चालवून मोटरसायकल क्र.MH26 4817 पाठीमागून जोराची धडक दिली. त्यामध्ये सुलेमान अब्दुल्ला चाऊस वय 30 वर्षे, व्यवसाय, व्यापार राहणार चौफाळा नांदेड त्यांना गंभीर जखमी केले या अपघातात त्यांचा उजवा पाय फॅक्चर झाला याप्रकरणी सुलेमान अब्दुल्ला चाऊस यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन सोनखेड येथे गुरंन 146 /2020 कलम 279, 237,338 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पो.हे.कॉ.हंबर्डे हे करीत आहेत.

Categories
राहुरी

“ख्रिसमस नाताळ सण उत्साहात साजरा”

राहुरी तालुका प्रतिनिधी
( जावेद शेख ) 26 डिसें ख्रिसमस नाताळ हा ख्रिश्चन धर्मियांचा एक महत्वपूर्ण सण आहे. २५ डिसेंबर, येशुंचा जन्मदिवस - दरवर्षी याच दिवशी नाताळाचा सण साजरा करण्यात येतो. ख्रिसमस नाताळ दिनानिमित्त 24 व 25 डिसेंबर रोजी किंग ऑफ किंग्ज चर्च इंडिया कणगर या ठिकाणी नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. येशू जन्माचा आनंद व्यक्त करण्यासाठी

नाताळ सणानिमित्त किंग ऑफ किंग्ज चर्च मध्ये विविध कार्यक्रम करण्यात आले.प्रमुख पाहुणे संजय पाटोळे
अँजल पाटोळे यांनी प्रभू येशूचे वचन सांगुन आशिर्वाद सभा घेतली. चर्चमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. पास्टर गोरख दिवे सिस्टर शितल दिवे सिस्टर छाया ताई दुशींग यांनी सभेस मार्गदर्शन केले.
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले अशोक कर्डे सर व करीश्मा कर्डे त्यांच्या कुटुंबीयांनी चर्चमध्ये शालेय साहित्य वह्या पेन व खाऊचे वाटप केले कार्यक्रमासाठी कणगर ताहाराबाद दरडगाव राहुरी फॅक्टरी या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर बांधव आले होते.सर्व जग कोरोना महामारीने त्रस्त झाले आहे या आजारातून मुक्तता व्हावी यासाठी प्रार्थना करण्यात आली.कार्यक्रमास उपस्थिती असलेल्या सर्व बांधवांना दोन दिवस स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले.सर्वानी एकमेकांस शुभेच्छा दिल्या.

Categories
राहुरी Uncategorized

गंगाधर बाबा छात्रालयातील अनाथ मुलांसोबत वाढदिवस साजरा

अनाथ मुलांसोबत वाढदिवस साजरा

राहुरी तालुका प्रतिनिधी
( जावेद शेख )26 डिसें अहमदनगर जिल्ह्यातील गुहा गावच्या गंगाधर बाबा छात्रालयातील अनाथ मुलांसोबत आज वाढदिवस साजरा केला, हे मी मोठेपणा मिरविणेसाठी सांगत नसून या मुलांसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी इतरांना प्रेरणा मिळावी व या अनाथ मुलांचा संपूर्ण वर्षाचा अन्नाचा प्रश्न मिटावा हाच यामागील एकमेव प्रांजळ हेतू. या कार्यक्रम प्रसंगी चैतन्य मिल्क चे अध्यक्ष गणेश भांड, आर.पी. आय. चे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या व महाराष्ट्र राज्य निधी फेडरेशन चे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष तथा राहुरी अर्बन निधी चे चेअरमन रामभाऊ काळे, कर्मवीर करिअर ऍकॅडमी चे संचालक मेजर राजेंद्र कडू,आप्पासाहेब ढुस, राष्ट्रीय जल पुरस्कार प्राप्त पत्रकार शिवाजी घाडगे, छात्रालायचे संचालक पप्पू सपकाळ आदींसह छात्रालयातील विद्यार्थी उपस्थित होते.

Categories
नांदेड

नांदेड वाघाळा महापालिकेत सातवा वेतन आयोग लागू

कर्मचाऱ्यांना अटीची पूर्तता करावी लागणार

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:वाघाळा महापालिकेला ता. एक जानेवारी २०१६ पासून सुधारित वेतनश्रेणी लागू करून ता. एक डिसेंबर २०२० पासून प्रत्यक्ष वेतन देण्यास शासनाने मान्यता दिली आहे.मात्र, शासनाकडून यावर होणाऱ्या खर्चासाठी कोणतीही स्वतंत्र अनुदान दिले जाणार नसल्याचे पत्रात नमूद केले आहे.

नांदेड वाघाळा महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने बुधवारी (ता. २३) एका पत्राद्वारे सातवा वेतन आयोग लागू केला आहे. त्यामुळे अधिकारी,कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला असला तरी दुसरीकडे कर निर्धारण, कर वसुली,थकबाकी वसुलीआणि इतर बंधनेही टाकली आहेत. त्यामुळे भविष्यात अधिकारी, कर्मचाऱ्यांना आणखी चांगल्या पद्धतीने कामे करावी लागणार आहेत.

नांदेड वाघाळा महापालिकेला ता. एक जानेवारी २०१६ पासून सुधारित वेतनश्रेणी लागू करून ता. एक डिसेंबर २०२० पासून प्रत्यक्ष वेतन देण्यास शासनाने मान्यता दिली आहे.मात्र, शासनाकडून यावर होणाऱ्या खर्चासाठी कोणतीही स्वतंत्र अनुदान दिले जाणार नसल्याचे पत्रात नमूद केले आहे. त्याचबरोबर महापालिकेतील विकासकामे,त्यासाठी घेतलेले कर्ज आणि व्याज यांच्या परतफेडीसाठी पुरेसा निधी शिल्लक राहिल, याची खात्री करावी, असेही सांगितले आहे.

उपाययोजना बंधनकारक
सातवा वेतन आयोगाचा भार पेलण्यासाठी शासनाने महापालिकेला काही वित्तीय सुधारणांच्या अटी बंधनकारक केल्या आहेत. त्यानुसार महापालिकेच्या उत्पन्न स्त्रोतात वाढ करून त्याचा आस्थापना खर्च निरंतर ३५ टक्केच्या मर्यादेत राहील,याबाबत उपाययोजना करणे अनिवार्य राहील. जीआयएस मॅपिंग अथवा अन्य मार्गाने मालमत्तेचे अद्ययावत सर्व्हे करून जुलै २०२१ पूर्वी शंभर टक्के मालमत्ता कराच्या कक्षेत आणण्यासाठी उपाययोजना बंधनकारक आहे.

महापालिकेला हे बंधनकारक
शंभर टक्के मालमत्तेच्या बाबतीत मालमत्ता कराची पुनर्निधारणा करण्याची कार्यवाही मार्च २०२१ पूर्वी करणे बंधनकारक राहील. अशा तऱ्हेने सुधारित होणाऱ्या मालमत्ता कराच्या चालू मागणीपैकी ९० टक्के वसुली मार्च २०२१ पर्यंत करणे महापालिकेवर बंधनकारक राहील. मालमत्ता कराच्या मागणीबाबत पुनर्निधारणा केल्यानंतर मालमत्ता कराच्या थकबाकीपैकी किमान पन्नास टक्के वसुली मार्च २०२१ पूर्वी करणे बंधनकारक राहील. पाणीपट्टीच्या रक्कमेपैकी ९० टक्के रक्कम संबंधित पाणी पुरवठा योजनेची सुधारणा, पाणी पुरवठा विषयक अनिवार्य व आवश्यक कामे यांच्यासाठीच करणे महापालिकेवर बंधनकारक राहणार आहे.

कामाचा वेग वाढवावा लागणार
सातवा वेतन आयोग लागू केल्यानंतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी महापौर मोहिनी येवनकर,आयुक्त डॉ.सुनील लहाने यांच्यासह पदाधिकारी व इतरांचे आभार मानले असले तरी आता महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांच्याकडे देण्यात आलेल्या कामांचाही वेग वाढवावा लागणार आहे. कर निर्धारण,करवसुली,थकबाकी वसुलीवर लक्ष केंद्रित करून ती कामे वेळेवर पूर्ण करावी लागणार आहेत.अन्यथा सातव्या वेतन आयोगाला मुकण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

Categories
राहुरी

१ जानेवारी फुले दांम्पत्य सन्मान दिवस गावा-गावात साजरा करावा: सचिन भाऊसाहेब गुलदगड संस्थापक अध्यक्ष श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य

राहुरी तालुका प्रतिनिधी ( जावेद शेख ) 26 डिसें. *नगर- कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षातील सर्व महापुरूषांच्या जयंती आणि पुण्यतिथी व विविध ऊत्सव कार्यक्रम विविध ठिकाणच्या आयोजकांनी रद्द केले. याच श्रुंखलेत पुणे येथे दरवर्षी १ जानेवारीला आयोजीत होणारी “१ जानेवारी फुले दांम्पत्य सन्मान दिवस महारॅली” यंदाच्या वर्षी आयोजकांना स्थगीत करावी लागली व प्रातिनिधीक स्वरूपात स्थानिक कार्यकर्त्यांनी भिडेवाडा व फुलेवाडा येथे जाऊन वंदन करावे तसेच महाराष्ट्रातील ईतर कार्यकर्त्यांनी त्यांच्या त्यांच्या स्थानीक ठीकाणि कोविड १९ च्या नियमाधिन राहुन हा ऊत्सव साजरा करावा. असे आवाहन श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊसाहेब गुलदगड यांनी केले आहे.*

१ जानेवारी १८४८ रोजी महात्मा जोतीराव फुले व माता सावित्रीआई फुले यांनी पहिली मुलींची शाळा भिडेवाडा पुणे येथे सुरू केली होती. या दिवसाचे व कार्यांचे औचित्य साधुन ही महारॅली दरवर्षी आयोजित करण्यात येत होती. यंदाच्या वर्षी ही महारॅली स्थगीत करण्यात आली आहे. म्हणुन गावागावात स्थानिक ठिकाणी हा ऊत्सव दिवस साजरा करावा असे आवाहन . स्थानिक पातळी वर हा ऊत्सव कसा साजरा करावा खालीलप्रमाणे…
१) १ जानेवारी फुलेदांम्पत्य सन्मान दिन ते ३ जानेवारी माता सावित्री फुले जन्मदिन ( महिला शिक्षक दिन) त्रीदिवसीय सप्ताहाचे आयोजन करावे.
२) या सप्ताहा मधे कोविड १९ च्या नियमाच्या अधिन राहुन रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा तसेच ईतर ऊपक्रम राबवावे.
३) आपल्या घरासमोर रांगोळी काढावी व शक्य असल्यास घरावर रोषणाई करावी.
४) मुख्य चौकात डिजीटल लाऊन फुले दाम्पत्य सन्मान दिनाच्या शुभेच्छा द्याव्या.
५) मुख्य चौकात मिठाई वाटप करावे.
६) स्थानिक वृत्तपत्रामधे बातम्या प्रसारीत कराव्या.
७) या शिवाय आपल्याला सुचेल असे अभिनव ऊपक्रम राबवावे.
अशा प्रकारे विविध ऊपक्रमा मार्फत हा ऊत्सव साजरा करावा असे आवाहन संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊसाहेब गुलदगड यांनी केले आहे.

Categories
सातारा

गुंडेवाडी (मराठा नगर )ग्रामपंचायत सलग ४५ वर्ष बिनविरोध निवडणूकीचा विक्रम करणार.हिवरवाडीही बिनविरोध कडे, चितळी,कलेढोणसाठी बिनविरोधसाठी बैठका.

मायणी : सातारा खटाव तालुका विशेष प्रतिनिधी तानाजी चव्हाण दि.२६/१२/२०२०

सध्या सर्वत्र ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. काही ठिकाणी अटीतटीच्या लढतीतर काही ठिकाणी बिनविरोध ग्रामपंचायत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मायणी जि.प. गटातील गुंडेवाडी व हिवरवाडी या दोन ग्रामपंचायती निवडणूक बिनविरोध होणार असून आणखी काही ग्रामपंचायती बिनविरोध होण्याची शक्यता आहे. गुंडेवाडी ( मराठानगर ) ता. खटाव या ग्रामपंचायतीने सलग ४५वर्षे बिनविरोध निवडणूक करण्याचा विक्रम केला आहे.यापूर्वी चितळी पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या गुंडेवाडी (मराठानगर ) हे गाव चितळी ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ठ केले होते .सन १९७५ साली चितळी ग्रुप ग्रामपंचायत मधून गुंडेवाडी ग्रामपंचायत स्वतंत्र झाली. त्यावेळेपासून ते आज अखेर या गावानेआपली बिनविरोध ग्रामपंचायतीची परंपरा कायम ठेवून इतर ग्रामपंचायतीने पुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
मायणी पासून सुमारे दहा कि.मीटर अंतरावर असलेल्या हिवरवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक देखील बिनविरोध होणार आहे .खटाव पंचायत समितीचे माजी उपसभापती व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते बाळासाहेब माने यांच्या नेतृत्वाखाली ही ग्रामपंचायत सध्या कार्यरत असून यावेळी देखील बिनविरोध होण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे .

ग्रामपंचायत बिनविरोध झाली तर १ लाखाचे देणार बक्षीस
राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या पाचवड ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी या गावातील रयत शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून नोकरी केलेल्या व सध्या सेवानिवृत्त असलेल्या रामचंद्र विठोबा घाडगे यांनी जर ग्रामपंचायत बिनविरोध झाली तर या गावांमध्ये पाणलोट विकास कामासाठी नाम फाऊंडेशन यांच्या मार्फत दिल्या जाणाऱ्या मशिनच्या डिझेल खर्चासाठी रु.१००००० इतकी मदत देण्याचे जाहीर केले आहे.

गटातील चितळी व कलेढोण ग्रामपंचायतींचे महत्व मोठे
मायणी जि प गटाच्या निवडणुकीत चितळी व कलेढोण या गावांच्या मताचे पारडे नेहमीच वजनदार व निर्णायक ठरते. या गावांवर आवश्यक असणारी छाप व भविष्यातील राजकारणातील आपली वाटचाल भक्कम राहण्यासाठी या गावांची | ग्रामपंचायत आपल्या विचाराची असावी हा कयास व प्रयत्न स्थानिक नेत्यांचा असणार आहे. आज कलेढोण येथे बिनविरोध निवडणुकीचे चाललेले डावपेच ,चितळीतही दिसून येत आहेत . परंतु एकीकडे निवडणूक बिनविरोध करण्याच्या बैठका पार पडत असताना “अर्ज भरण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करा,असा आदेशही स्थानिक नेत्यांनी दिल्याचे समजते आहे.

Categories
हदगाव

हदगाव तालुक्यातील ग्रामपंचायत उमेदवारांची धावपळ

निवडणूकीसाठी लागणाऱ्या कागदपत्राची जुळवाजुळवी

हदगाव ता.प्र.विकास राठोड याज कडून)
हदगाव तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूकीसाठीचा अर्ज भरण्याची कालवधी कमी असल्याने उमेदवार निवडणुकीसाठी अर्जासोबत लागणाऱ्या कागदपत्र काढण्यासाठी धावपळ करीत असल्यांचे चित्र तहसील कार्यालयाच्या परिसरात दिसून येत आहे.
तालुक्यात 118 ग्रामपंचायतीच्या निवडणूकाचे रंगधुमाळी सुरु झाले असुन या ग्रामपंचायतील सरपंच पदाचे आरक्षण ही जिल्हाधिकारी यांच्या सुचणेनुसार सोडण्यात आले होते. पण शासनाने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत घोडे बाजार होऊनये म्हणून सोडलेले आरक्षण रद्द करण्याचे आदेश देऊन सदरील आरक्षण हे निवडणुकीच्या नंतर सोडणार असल्याने इच्छुक उमेदवारांचे हिरमोड झाले असल्याने निवडणूकीत इच्छुक उमेदवारांचा खर्च व निवडणुकीसाठी लागणारे कागदपत्रे यांची जुळवाजुळवी करणार कोण? असा प्रश्न उपस्थित झाल्याने उमेदवारांना लागणारे कागदपत्रे काढण्यासाठी विलंब झाला असून आत्ता निवडणूकीसाठीचा अर्ज स्वीकारण्याची तारीख जवळ येताच उमेदवारांची पळापळी करून कागदपत्राची जुळवाजुळवी करीत आहेत.
ग्रामपंचायत निवडणूकीसाठी दि. २३ डिसेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत यात प्रत्येक गावातील इच्छुक उमेदवार आपले भवितव्य शोधण्यासाठी धावपळ धावपळ करून निवडणुकीसाठी लागणारे कागदपत्रे काढण्यासाठी जिवाचा आटापिटा करतांना दिसून येत आहे.

Categories
सातारा

सलग सुट्ट्यांमुळे कोकणाकडे पर्यटकांचा ओढा, हॉटेल्स, रेस्टॉरंट फुल्ल

पाटण हिंदू सम्राट प्रतिनिधी उमेश सुतार यांजकडून

सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे कोकणाकडे पर्यटकांचा ओढा वाढला आहे. महापालिका क्षेत्रात निर्बंध असल्यानं सध्या मोठ्या संख्येनं पर्यटन कोकणात दाखल होत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, सातारासह इतर भागांमधून पर्यटक कोकणात येत आहेत.

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची वाढती संख्या पाहता सध्या याठिकाणची हॉटेल्स, रेस्टॉरंटसह होम स्टे देखील फुल्ल झाल्याचं दिसून येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातील प्रसिद्ध पर्यटनस्थळांवर पर्यटकांची संख्या वाढली आहे.

या ठिकाणी कोणतेही कडक निर्बंध नसले तरी पर्यटकांनी कोरोनाकाळातील नियम पाळावेत असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.

Categories
मुंबई

नवी मुंबई येथील ज्ञानेश्वर शैलार समाज मंदीरामध्ये ७९ बाटल्या रक्तसंकलन

 

स्वप्निल तांडेल कारावेगाव प्रतिनिधी :-
नवी मुंबई – राज्यात सर्वत्र रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईने विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईच्या सदस्यानी यांनी शिबिरामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शवला. त्यामुळे एका दिवसात ७९ बाटल्या रक्त संकलित झाले आहे.
लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे संस्थापक अध्यक्ष विरेंद्र उर्फ गुरु म्हात्रे,लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई, उपाध्यक्ष अक्षय पाचारणे. लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईसचिव सचिन कोकरे ,लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई खजिदार रोशन पाटील, लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई उपखजिदार आलताफ शेख,लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई सदस्य प्रशांत पाटील, सोपनिल सोनवणे, किरण पंतगे,सोमनाथ बारवे,विक्की वांडे यांनी रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
रक्तदान
राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येक नैसर्गिक संकट आणि राष्ट्रीय आपत्ती यांमध्ये लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईमधील सदि आणि अन्य घटक नेहमीच साहाय्यासाठी पुढे येत असतात. त्यामुळे रक्तदानाचा तुटवडा भरून काढण्यासाठी आवाहन केल्यानंतर लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईमध्ये रांगा लागल्या होत्या.

Categories
मुंबई सातारा

सातारा येथील कुंभार कारागिरांचा सेंट्रल व्हिलेज पॉटरी इन्स्टिट्यूटचा महत्वपूर्ण अभ्यास दौरा

( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी:लक्ष्मण राजे )

अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. मोहनराव जगदाळे साहेब व प्रदेशाध्यक्ष मा. श्यामशेठ राजेसाहेब यांच्या उपस्थितीत सातारा शाखेच्या वतीने एक दिवसीय व्यावसायिक – शिक्षण सहलीचे आयोजन सेंट्रल व्हिलेज पॉटरी इन्स्टिट्यूट खानापूर (कर्नाटक) या ठिकाणी करण्यात आले. सातारा येथील कुंभार समाजाचे 100 तरुण कारागीर एकत्र येऊन राज्य परिवहन महामंडळाच्या दोन एस टी बस करून कर्नाटक राज्यातील, बेळगाव मधील, खानापूर या ठिकाणी असणारे खादी ग्रामोद्योग संचलित सेंट्रल व्हिलेज पॉटरी इन्स्टिट्यूटला भेट देऊन त्या ठिकाणी आधुनिक यंत्रसामग्रीद्वारे चालणाऱ्या मातीकामाचा अभ्यास केला. यामध्ये इन्स्टिट्यूटचे उपप्राचार्य मा. गोवर्धन साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार तेथील सर्व प्राध्यापकांनी 100 कारागिरांचे प्रत्येकी 10-10 चे गट तयार करून दुपारी 12:00 ते सायंकाळी 5:30 पर्यंत संपूर्ण माती कामाचे आधुनिक स्वरूप, त्यासाठी वापरली जाणारी आधुनिक मशनरी व प्रात्यक्षिक समजावून सांगितले. यामध्ये मातीचे एखादे विशिष्ट उपकरण बनवण्यासाठी कोणत्या प्रकारची माती किती प्रमाणात घ्यावी, त्यामध्ये विविध मातींचे मिश्रण कसे तयार करावे, माती चाळून – भिजवून त्यावर पगमिल व ब्लंजर मधून परिपूर्ण मातीचा गोळा कसा तयार करावा, विविध विद्युत उपकरणावर त्या मातीला कसा आकार द्यावा, त्यामधून शोभेच्या वस्तू, स्वयंपाक घरातील भांडी, बागेतील वस्तू , अन्नधान्य साठवणुकीच्या वस्तू कमीत कमी वेळात जास्तीत जास्त उच्च दर्जाच्या कशा बनवाव्यात हे प्रात्यक्षिकाने दाखविले. पूर्ण झालेल्या वस्तूंवर रंगकाम करून ते कसे सुशोभित करावे याचे मार्गदर्शनही ही खूप छान पद्धतीने केले. बरीच उपकरणे तरुण कारागिरांनी विविध मशीनवर तयार करूनही पाहिली. या मार्गदर्शनामध्ये इन्स्टिट्यूटचे प्राचार्य मा. प्रभाकर साहेब यांनी शेवटी समारोपाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. इन्स्टिट्यूटमध्ये चालणारे विविध अभ्यासक्रम, उपलब्ध असणाऱ्या सर्व सोयीसुविधा, केंद्र सरकारच्या असणाऱ्या विविध योजना यांचीही सखोल माहिती दिली. अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. मोहनरावजी जगदाळे साहेब यांनी आपल्या भाषणात कुंभार कलेचा समावेश विद्यापीठामध्ये व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमासाठी करावा, त्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे आणि याकडे आपण लक्ष देणार असल्याचे सांगितले. अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेचे राज्य प्रदेशाध्यक्ष मा. श्यामशेठ राजेसाहेब यांनी खादीच्या माध्यमातून, अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेच्या प्रयत्नाने कुंभार समाजा साठी महाराष्ट्रात विविध ठिकाणी 2700 विद्युत चाकांचे केलेले वितरण व राज्यातील तीन ठिकाणी अत्याधुनिक क्लस्टरची उभारणी केल्याची माहिती दिली. कुंभार समाजातील कारागिरांचे उत्पन्न पाचपट वाढविण्यासाठी उभ्या केलेल्या अभियानाची माहितीही मा. श्याम शेठ राजे साहेब यांनी दिली. विकास संस्थेचे कार्यकारिणीतील सदस्य श्री प्रकाश कुंभार बारामती यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते आपल्या भाषणामध्ये श्री प्रकाश कुंभार यांनी कुंभार समाजातील तरुण कारागिरांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी विविध योजनांची माहिती दिली. तसेच विकास संस्थेच्या सातारा कार्यकारिणीतील कार्याध्यक्ष मा.बळवंतराव कुंभार यांनी कारागिरांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. विकास संस्थेचे तालुका अध्यक्ष मा. नितीन राजे साहेब यांनी कार्यक्रमाचे आभार मानताना जिल्ह्यातील सर्व कुंभार कारागिरांना सक्षम बनविण्यासाठी साताऱ्या मध्येही क्लस्टरची योजना राबवणार असल्याची माहिती दिली. संपूर्ण अभ्यास दौऱ्याचे नियोजन मा.नितीन राजे व मा.दिनकर कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या अभ्यास दौऱ्यामध्ये सातारा येथील कार्यकारिणीतील , मारुती कुंडलिक कुंभार, दत्तात्रय जगन्नाथ कुंभार, नितीन नरहरी कुंभार, रवींद्र बाळकृष्‍ण कुंभार, धनंजय दत्तात्रय कुंभार, रामदास हरी कुंभार , संपत कुंभार,चंद्रकांत शंकर कुंभार यांनी खूप मोलाचे सहकार्य केले.

Categories
नांदेड

पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत किनवट तालुक्यातील शिवसेना पदाधिकार्‍यांची निवड

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:किनवट तालुका शिवसेनेत एकनिष्ठेने पक्षवाढीसाठी व जनहितासाठी काम करणारे सुरेश घुमडवार यांची तालुका उपसंघटक व अल्पसंख्यांक तालुका संघटक म्हणून शेख अफसर यांची निवड नांदेड येथे पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत व संपर्कप्रमुख आनंद जाधव जिल्हाप्रमुख दत्तात्रय कोकाटे जिल्हा प्रमुख बोंढारकर जिल्हाप्रमुख उमेश मुंडे जिल्हा उपप्रमुख ज्योतिबा खराटे तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे यांच्या शिफारशीने निवड करण्यात आली.
पक्षाचे हितसंबंध जोपासत तळागाळातील जनतेपर्यंत शिवसेनेचे धोरण पोहोचवत काम करीत असल्यामुळे सदर कार्यकर्त्यांची पदाधिकारी म्हणून निवड करण्यात आल्याचे तालुका प्रमुख बालाजी मुरकुटे यांनी सांगितले.येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका व जिल्हा परिषद निवडणूकित शिवसेनेला चांगले यश प्राप्त होणार असल्याचे भाकित ठरविल्या जात आहे. खासदार हेमंत पाटील हिंगोली लोकसभा निवडणुकीत विजय प्राप्त झाल्यामुळे तालुक्यात शिवसेनेला पोषक वातावरण दिसत आहे.सदर पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल शहर प्रमुख सुरत सातूर वार संतोष एलचलवार तालुका युवा सेना प्रमुख प्रमोद केंद्रे अतुल दर्शनवाढ राम मुंढे चंदू जायभाये सह इतर शिवसैनिकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

Categories
बीड

गल्ल्यावर डल्ला मारणाऱ्या कामगाराला ठोकल्या बेड्या

पेठ बीड पोलिसांची कामगिरी; ४८ तासात गुन्ह्याचा उलगडा

हिंदूसम्राट विशेष प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

बीड:दि.26.बारदाना पोत्याच्या दुकानातील कामगाराने गल्ला उघडून आतील सव्वा तीन लाख रुपये लंपास केल्याची घटना गुरुवारी (दि.२४) दुपारी बीड शहरातील जुना मोंढा भागात घडली होती.पेठ बीड पोलिसांनी ४८ तासात या चोरीचा छडा लावत अहमदनगर येथे जाऊन त्या फरार कामगाराला बेड्या ठोकल्या.यावेळी त्याच्याकडून २ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला.

बीडच्या जुना मोंढ्यातील बारदाना पोत्याचे व्यापारी मयूर जयनारायण काबरा यांच्या दुकानातील गल्ल्यात असलेले ३ लाख २५ हजार रुपये घेऊन दत्ता काशीद हा कामगार पसार झाला होता. चोरीचा हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. याप्रकरणी दत्ता काशीद याच्यावर पेठ बीड ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर या घटनेचा छडा लावण्याचे आदेश पेठ बीड पोलीस आणि ‘एलसीबी’ला देण्यात आले होते. दरम्यान, दत्ता काशीद अहमदनगर येथे असल्याची गुप्त माहिती पेठ बीड पोलिसांना मिळाली होती. माहितीची खातरजमा झाल्यानंतर पेठ बीड पोलिसांचे पथक अहमदनगरला गेले.सायबर सेलची मदत घेत पोलिसांनी दत्ताचा निश्चित ठावठिकाणा शोधला आणि सापळा रचून शिताफीने त्याच्या मुसक्या आवळल्या.पेठ बीड ठाण्यात आणून त्याची कसून चौकशी केली.पोलिसांनी त्याच्याकडून २ लाख ७४ हजार ५०० रुपये रोख आणि चोरीच्या रकमेतून खरेदी केलेला २० हजार ५०० रुपयांचा मोबाईल असा एकूण २ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक आर.राजा,अपर अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि एलसीबीचे पोलीस निरिक्षक भास्कर राऊत यांच्या मदतीने पोलीस निरिक्षक विश्वास पाटील,पीएसआय बनकर,पोलीस कर्मचारी राहुल गुरखुदे,गणेश जगताप,सुनील आलगट. आसेफ शेख,सचिन क्षीरसागर, महेंद्र ओव्हाळ,विकी सुरवसे यांनी पार पाडली.४८ तासात मुद्देमालासह आरोपीस अटक केल्याने पेठ बीड पोलिसांचे कौतुक होत आहे.

Categories
नांदेड

देगलूर तालुक्यातील लिंगन केरुर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध

सुज्ञ ग्रामस्थांच्या प्रयत्नांना यश

माधव जाधव व बालाजी कदम यांची सरपंच पदासाठी फिफ्टी – फिफ्टी

देगलूर (प्रतिनिधी) मिलिंद कावळगावकर तालुक्‍यातील लींगन केरुर ग्रामपंचायत निवडणूक ही सुज्ञ ग्रामस्थांच्या मध्यस्थीतून बिनविरोध पार पडली आहे. दहा वर्षापूर्वी अनुसूचित जातीतील सुधांशू कांबळे यांना खुल्या प्रवर्गातून बिनविरोध सरपंच करण्याचा विक्रम याच गावाने केला होता.

दीड हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या या गावात २०२० च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दोन गट तयार होऊन निवडणूक होण्याचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक जाणकार राजकिय पुढाऱ्यांना येथील होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विनाकारण वाद होऊन गावात दुफळी निर्माण होण्याची शंका वाटत असल्याने माजी सरपंच नरसिंग पा. कदम, तुकाराम पा.कदम, सुधांशू कांबळे, गिरीश देशमुख व्यंकट पा. जाधव,शामराव माने, सर्जेराव पा कदम, दिगंबर पा. कदम,विजय पा . भरत पा कदम,हनुमंत जाधव, निवृत्ती बजिरे, नागोराव वाघमारे, सोपान पांडवे, चंद्रकांत वाघमारे ,शेषराव चव्हाण, नागेश कदम, माजी उपसरपंच बाजीराव कदम,आनंद पा. कदम, भुजंग जोंधळे, देवराव ठावरे, मारुती कांबळे, दाऊ कांबळे आदींनी सामंजस्याची भूमिका घेऊन बिनविरोध निवडणुकीसाठी चर्चा घडवून आणली. यास ग्रामस्थ व निवडणुकीसाठी समोर आलेल्या गटाने संमती दिली. याचेच फलित लिंगन केरुर ग्रामपंचायत आज मितीस बिनविरोध निघाली आहे .

सदर ग्रामपंचायत दीड हजार लोकसंख्येची असून ग्रामपंचायतीवर सात सदस्य निवडून येतात. या सन २०२० च्या सार्वत्रिक निवडणुकीत तीन अनुसूचित जातीसाठी दोन ओबीसीसाठी तर दोन जागा या खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित आहेत . सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने संभाजी ब्रिगेडचे सक्रिय कार्यकर्ते महादेव सुधाकर जाधव व बालाजी वामनराव कदम यांनी सरपंच पदासाठी आपापले गट तयार करून फिल्डिंग लावली होती. दरम्यान येथील ग्रामपंचायत निवडणूक ही चुरशीची होणार असे चित्र दिसत दिसत असताना परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सरपंच पदाच्या शर्यतीत असलेल्या माधव जाधव व बालाजी कदम या दोघांना फिफ्टी-फिफ्टी सरपंच पद वाटून देण्याची ऑफर देऊन ग्रामस्थांनी होणाऱ्या निवडणुक नाट्यावर शिताफीने पडदा टाकला. सोबतच वार्ड क्रमांक एक मध्ये संजय माने,मारुती कांबळे ,वार्ड क्रमांक तीन मध्ये सिताराम चव्हाण या सदस्यांचीही निवड बिनविरोध करण्यात आली .
दरम्यान वार्ड क्रमांक दोन मध्ये मारुती पांडवे यांना बिनविरोध निवडण्यात आले असून एका जागे साठी बिनविरोध होण्यास अडचण येत असली तरीही त्यावर लवकरच तोडगा निघणार असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. या निवडणुकीत ०५ सदस्यासह सरपंच पदाच्या उमेदवारांची बिनविरोध निवड करून ग्रामस्थांनी मोठा आदर्श निर्माण केला आहे. मागील दहा वर्षांपूर्वी सन २००५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच पद हे खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असताना यावेळी सर्व ग्रामस्थ एकत्रित बसून अनुसूचित जातीतील उमदे नेतृत्व तथा बेधडक पत्रकार म्हणून ओळख असलेले सुधांशू कांबळे यांना बिनविरोध सरपंच करण्याचा मोठा विक्रम येथील ग्रामस्थांनी केला होता . पुन्हा दुसऱ्यांदा खुल्या प्रवर्गासाठी ही निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. सरपंच म्हणून गावकऱ्यांनी आमच्या नावावर शिक्कामोर्तब केला असून आम्ही गावाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची भावना निर्वाचित बिनविरोध सरपंच पदाचे दावेदार बालाजी कदम व माधव जाधव यांनी व्यक्त केली आहे. नवनिर्वाचित बिनविरोध सरपंच व सदस्यांचा ग्रामस्थांनी पुष्पहार व गुलालाची उधळण करून सत्कार केला तसेच आनंदोत्सव साजरा केला. या बिनविरोध निवडीसाठी तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Categories
कोल्हापूर सातारा

रणजित देशमुख यांची कोल्हापूर महानगरपालिका निवडणूकीसाठी निरीक्षक पदी निवड


खटाव तालुका प्रतिनिधी:-(रामदास देशमुख)
काँग्रेस पक्ष राज्यात पक्ष मजबूत करण्यासाठी ताकदीने उतरला आहे.येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीसाठी उत्कृष्ट नियोजन केले आहे.

येणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निरीक्षक म्हणून सातारा जिल्ह्यातील माण खटाव तालुक्याचे काँग्रेस नेते मा.रणजीत देशमुख यांची निवड केली आहे.तसेच त्यांच्या सोबत पुणे शहरातील काँग्रेस नेते मा.अभय छाजेड यांची पण निवड केली आहे.

रणजित देशमुख यांना काँग्रेस राज्यस्तरीय निवडणूक कमिटी मध्ये पण पक्षाने स्थान दिले आहे.रणजित देशमुख माध्यमांशी बोलताना म्हणाले काँग्रेस मध्ये प्रवेश केल्यानंतर माझ्यावर शिक्षक आणि पदवीधर निवडणूकीची जबाबदारी दिली होती ती मी यशस्वी पध्दतीने पार पाडली. नंतर मला राज्यस्तरीय काँग्रेस निवडणूक कमिटी मध्ये स्थान दिले. आणि येणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिका निवडणूकीसाठी निरीक्षक पदी निवड केली.

मी पक्षाने दिलेले जबाबदारी यशस्वी पध्दतीने पार पाडण्यासाठी प्रयत्न करेल आणि कोल्हापूर निवडणूक मध्ये जास्तीत जास्त काँग्रेस नगरसेवक कसे निवडणून येथील आणि पक्ष कसा मजबूत होईल यावर भर देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

तसेच त्यांनी कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक याचा प्राथमिक आढावा घेतला आहे.सध्या त्यांच्या तालुक्यात १५० ग्रामपंचायत निवडणूक आहेत त्यामुळे ते तालुक्यात ग्रामीण भागात पक्ष वाढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. असे आमच्या माध्यमांशी बोलताना सांगितले.

Categories
कोल्हापूर मुंबई

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या आजीव सेवकपदी —प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांची निवड

( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी: लक्ष्मण राजे )

उस्मानाबाद येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांची श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था,कोल्हापूरच्या आजीव सेवकपदी अभिनंदनीय निवड झाली आहे. प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांनी या अगोदर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादच्या, उस्मानाबाद येथील उपकेंद्रात संचालक म्हणून कार्य केले होते. तसेच ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद च्या व्यवस्थापन परिषदेचे विध्यमान सदस्य म्हणून कार्यरत आहेत.ते सध्या उस्मानाबाद जिल्हा प्राचार्य संघटनेचे अध्यक्ष म्हणून हि कामकाज पहात आहेत. या अगोदरच त्यांची श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था,कोल्हापूरच्या व्यवस्थापन मंडळात सदस्यपदी निवड झाली होती.सध्या ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण ,मुंबईच्या उस्मानाबाद विभागीय केंद्राचे उपाध्यक्ष म्हणून हि कार्य करत आहेत.
या त्यांच्या कार्याची दखल घेऊन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने त्यांची आजीव सेवकपदी निवड केली आहे या निवडीबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्राचार्य अभयकुमारजी साळुंखे ,संस्थेच्या सचिव शुभांगी गावडे , सहसचिव (प्रशासन)प्राचार्य डाॅ.युवराज भोसले,सहसचिव अर्थ प्राचार्य डाॅ.राजेंद्र शेजवळ यांनी प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुखांच्या निवडीबद्दल अभिनंदन केले आहे तर प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांनी वरील संस्था पदाधिकारी यांचे आभार मानले आहेत.

Categories
कोल्हापूर हातकणंगले

हातकणंगले येथे वारणा धरणग्रस्त व चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित समस्या मार्गी लावण्यासाठी खासदार धैर्यशील माने यांचा पुढाकार

पट्टणकोडोली ता.२६:- हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील वारणा धरणग्रस्त व चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्येंबाबत खासदार धैर्यशील माने यांनी अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार यांच्या सोबत घेतलेल्या बैठकीला यश आले असून येत्या मंगळवार (ता.२९) तारखेपासुन गावनिहाय भेटी देवून नागरिकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार आहेत.या याबाबतचे परिपत्रक नुकतेच जिल्हाधिकार्यांनी काढले आहे.
१० डिसेंबर राेजी खासदार धैर्यशील माने यांनी चांदोली अभयारण्य व वारणा प्रकल्प संघटनांतील पदाधिकारी व गौरव नायकवडी यांना सोबत घेऊन अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार यांच्याबरोबर बैठक घेतली होती.यामध्ये वसाहतींचे विविध प्रलंबित प्रश्न मांडले होते.प्रत्येकी सोळा वसाहतीमध्ये समक्ष जाऊन प्रश्न सोडवण्याबाबत सांगितले होते.
खासदारांच्या या बैठकीनंतर आज जिल्हाधिकार्यांनी प्रत्यक्ष वसाहतींमध्ये जाण्यासाठी परिपत्रक काढले आहे.यामध्ये पुनर्वसन उपजिल्हाधिकारी वारणा कालवे विभागाचे कार्यकारी अभियंता,प्रादेशिक वनविभागाचे उपवनसंरक्षक,जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी,तसेच हातकणंगले,पन्हाळा व शाहूवाडी तालुक्याचे तहसीलदार यांचा समावेश असणार आहे.
वसाहतींनुसार जमीन व भूखंड वाटपाबाबत प्रलंबित कामकाजाचा आढावा घेऊन कारवाई करणे,वसाहतीमध्ये ज्या नागरी सुविधा पूर्ण करण्यात आलेल्या आहेत त्या जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करणे,पूर्ण असलेल्या सुविधांमध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास ती करणे, तसेच अपूर्ण असलेल्यां सुविधा पूर्ण करण्याच्या अनुषंगाने पाहणी करणे,वसाहतींमधील लोकसंख्ये प्रमाणे ग्रामपंचायत स्थापन करण्याबाबतचे निकष तपासून वसाहतीमध्ये ग्रामपंचायती स्थापन करणे,वसाहतीनिहाय स्वतंत्र ७/१२ तयार करणे,ज्या वसाहतींना स्मशानभूमी नाही अशा वसाहतींना जमीन उपलब्ध करून देणे,प्रकल्पग्रस्तांच्या रस्त्यांबाबतच्या समस्यांवर कारवाई करणे अशा विविध अडचणी दूर करण्याचे काम या प्रत्यक्ष भेटी दरम्यान करण्यात येणार आहेत.यामुळे प्रकल्पग्रस्तांनी आपापले प्रलंबित प्रश्न घेऊन आपल्या गावातील नियोजित दिवशी,बैठकी ठिकाणी उपस्थित राहावे असे खासदार माने यांच्याकडून आवाहन करण्यात आले आहे.

Categories
कोल्हापूर क्रीडा

कोल्हापूर जिल्हा पासिंग व्हॉलीबॉल असोसिएशनची सर्वसाधारण सभा अत्यंत उत्साहात संपन्न

कोल्हापूर जिल्हा पासिंग व्हाँलीबाँल असोसिएशन मार्फत आयोजित18 वर्षाखालील राष्ट्रीय मुला-मुलींच्या व्हॉलीबॉल स्पर्धा कोल्हापूर / बाचणी / पेठवडगाव या तिन्ही पैकी एका ठिकाणी व्हाँलीबाँल सामने रंगणार : सचिव शिवाजी पाटील यांनी केली उदघोषणा

महाराष्ट्र राज्य व्हाँलीबाँल सघटनेचे अध्यक्ष मा.विजयभाऊ डांगरे , यांचे मार्गदर्शन आणि सुचनेनुसार आपल्या जिल्ह्यातील गुणवंत खेळाडू , प्रशिक्षक ,पंच , आणि संघटक यांना योग्य न्याय दिला जावा या सुचनेनुसार व्हाँलीबाँल खेळाचे विविध उपक्रम राबविणेबाबत वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते या मध्ये पुढील विषयावर चर्चा झाली १)जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजन आचार संहिता तयार करणे . २ )जिल्हा विभाग राज्य स्पर्धा आयोजन मागणी पत्र ३) जिल्हास्तर पंच परीक्षा प्रशिक्षण व संघटक उजळणी व प्रशिक्षण वेळापत्रक तयार करणे ४ ) विविध वयोगट खेळाडू पंच प्रशिक्षक नोंदणी करणे ५ ) जिल्हा संघटनेशी सर्व मंडळे शिक्षण संस्था व तालुका संघटना जिल्हा संघटनेशी संलग्न करून घेणे ६ )कोल्हापूर जिल्ह्यात होणाऱ्या 18 वर्षाखालील राष्ट्रीय हॉलीबॉल स्पर्धेच्या नियोजन संबंधी प्राथमिक चर्चा करणे ७ ) महाराष्ट्र राज्य हॉलीबॉल संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष माननीय श्री विजय भाऊ डोंगरे यांची भारतीय हॉलीबॉल महासंघाच्या कार्य कार्य उपाध्यक्षपदी तसेच सचिव माननीय श्री संजय नाईक यांची भारतीय हॉलीबॉल महासंघाच्या सचिव पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन ठराव संमत करणे ७ ) सभा अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयावर चर्चा करणे सभे करीता कोल्हापूर जिल्हा व्हाँलीबाँल असो.चे अध्यक्ष मा.रमेश तोडकर , सचिव मा.शिवाजी पाटील ( सर ) , आंतरराष्ट्रीय व्हाँलीबाँल कोच मा.अजित पाटील ( सर ) व सर्व पदाधिकारी व कोल्हापूर जिल्ह्यातील विविध व्हॉलीबॉल क्रीडा मंडळाचे सन्माननीय पदाधिकारी विविध शाळेतील क्रीडाशिक्षक तसेच व्हाँलीबाँल प्रेमी यांच्या उपस्थितीत बाचणी येथे सभा संपन्न झाली सभेकरिता पन्हाळा मुरगुड जयसिंगपूर पेटवडगाव वारणा देवाळे शिरोली कोल्हापूर शहर चंदगड कागल लिंगनूर बाचणी राधानगरी भोगावती आधी ठिकाणावरून 22 सेंटरची चाळीस लोकांची उपस्थिती होती कोल्हापूर जिल्ह्यातील व्हॉलीबॉल खेळाच्या विकासासाठी आजची सभा निश्चितच प्रेरणादायी व मार्गदर्शक असे ठरली

Categories
कोल्हापूर

विश्वास ट्रेडर्सचे दत्तात्रय पाटील राष्ट्रीय गुणीजन रत्नमोती पुरस्काराने सन्मानित .


  • कोल्हापूर- सुभाष भोसले
    विश्वास ट्रेडर्सचे संचालक दत्तात्रय पाटील यांना केलेल्या उत्कृष्ट कार्यामुळे ए .जे .फौडेंशनच्या राष्ट्रीय गुणीजन रत्नमोती पुरस्काराने महेश क्लब इचलकंरजी येथील महासन्मान सोहळ्यात गौरविणेत आले . दरवर्षी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतीक,उदयोग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तीनां हा पुरस्कार देणेत येतो .
    सिने अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता अरूण नलावडे यांच्या हस्ते हरूण भाई ईनामदार, निसार सुतार, अॅड सचिन माने , धनाजीराव जगदाळे, पृथ्वीसिंग नाईक, सुरेश उमप, शाहीन शेख, कौशिक गायकवाड
    संस्थेच्या अध्यक्षा सौ अबोली मुल्ला, प्रा खरात यांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार बहाल करणेत आला .
    त्यांना राष्ट्रीय गुणीजन रत्नमोती पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .
Categories
इंदापूर

इंदापूर तालुक्यातील बाभुळगाव येथे आढळले मांजराच्या दुर्मिळ प्रजातीतील रस्टी स्पॉटेड कॅट (वाघाटी) जातीचे पिल्लू

इंदापूर तालुक्यात पहिल्यांदाच वाघाटी जातीचे पिल्लू सापडल्याची माहिती

इम्तिहाज मुलाणी :
इंदापूर 😦 प्रतिनिधी ):

बाभूळगाव (ता. इंदापूर) येथील गोपीनाथ गुरगुडे यांच्या ऊस फडात दि.२४ रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास बिबट्याची हुबेहूब लहान प्रतिकृती असणारे पिल्लू आढळून आले असता काही प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या संदर्भात गोपीनाथ गुरगुडे यांचे पुतणे दीपक गुरगुडे यांनी पिल्लाचे छायाचित्रे काढून इंदापूर वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांना पाठवले.

यानंतर काळे यांनी पुण्याचे वनसंरक्षक राहुल पाटील,सहाय्यक वनसंरक्षक आशुतोष शेंडगे यांना या संदर्भातील माहिती कळवली तसेच पोलीस अधीक्षकांना त्याची कल्पना देऊन वनसंरक्षक कार्यालयाच्या सूचनेनुसार राहुल काळे यांनी वनपाल राहुल गीते,बी.एस खारतोडे यांना बाभूळगाव येथे पाठवले. पिल्लाची पाहणी केल्यानंतर ते रानमांजराच्या अत्यंत दुर्मिळ असणाऱ्या वाघाटी या जातीचे असल्याचा निष्कर्ष अधिकाऱ्यांनी काढला.या संदर्भातील माहिती देताना तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी लोकांना घाबरून जावू नये असे आवाहन केले आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी – रानमांजराच्या दुर्मिळ प्रजातीपैकी रस्टी स्पॉटेड कॅट अर्थात वाघाटी आहे. वाघासारखी कातडी असलेले हे वाघाटी हे मांजर घरगुती मांजराच्या आकाराचे रानमांजर आहे. याचा रंग व अंगावरिल ठिपके हे बिबट्याप्रमाणेच असतात व बिबट्याची हुबेहुब लहान प्रतिकृती हे मांजर दिसते. याचा वावर भारतातील पूर्वेकडील राज्ये, ब्रम्हदेश, थायलंड, इंडोनेशिया, जावा, सुमात्रा इत्यादी देशात आहे. कर्नाटक व केरळमधील सह्याद्रीच्या रांगात याचीच उपजात आढळून येते.

Categories
इंदापूर

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूरात वृक्षारोपण

देशी झाडांचे रोपण करून वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

इम्तिहाज मुलाणी :
इंदापूर (प्रतिनिधी ):

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया इंदापूर तालुका यांच्या वतीने इंदापूर बसस्थानकाच्या आवारात वृक्षारोपण व डस्टबिन वाटप करून वृक्षसंवर्धनाचा व स्वच्छतेचा सामाजिक संदेश देत वाढदिवस साजरा करण्यात आला.

पर्यावरण संवर्धन, संरक्षण व जतन काळाची गरज बनली आहे. स्वच्छ, शुद्ध व ताजी हवा राखण्यासाठी वृक्ष महत्त्वाचे आहेत. या उद्देशाने यावेळी अशोका, जांभूळ,कांचन,करंज,बेहडा, पळस,इ देशी झाडांचे रोपण रिपाइंचे पुणे जिल्हा संघटक सचिव शिवाजीराव मखरे, इंदापूर एसटी आगाराचे प्रमुख मेहबूब मणेर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी रिपाइंचे बारामती लोकसभा विभागाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब सरवदे, तालुकाध्यक्ष संदिपान कडवळे, शहराध्यक्ष अमोल मिसाळ, जैन समाज संघटनेचे अध्यक्ष धरमचंद लोढा आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी रिपाइंचे नितीन आरडे,सुनील सोनवणे, शहर कार्याध्यक्ष महेश सरवदे, सरचिटणीस प्रवीण मखरे, तालुका उपाध्यक्ष विकास भोसले, प्रताप मिसाळ, राजु घाडगे,सोमनाथ चितारे, विकास जाधव,अनिल माने,देवा माने, सतीश मिसाळ, नितीन मिसाळ,अमोल गुळीक, आण्णा काळे, देवा माने, अनिल माने यांनी परिश्रम घेतले.

Categories
शिरसगाव

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे औचित्य साधत देवदैठण येथे रक्तदान शिबिर संपन्न, रक्तदान शिबीरास उत्फुर्त प्रतिसाद

रक्तदान सर्वश्रेष्ठ दान , रक्तदान म्हणजे जीवनदान “
देवदैठण

(हिंदुसम्राट शिरसगाव बोडखा प्रतिनिधी आदेश उबाळे यांच्याकडून )
देवदैठण : माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयीयांची जयंती व सुशासन दिनाचे औचित्य साधत श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील जाणता राजा प्रतिष्ठाण, वसुंधरा बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठाण व नगर येथील जनकल्याण रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .
महान तपस्वी दधिची ऋषी यांनी पुरातन काळात आपल्या अस्थींचे दान दिले . त्यापासून देवांनी बनवलेल्या अस्त्राने वत्रासुराचा वध करण्यात आला . हा दान देण्याचा वारसा दैठणकरांनी जोपासताना दधिची आश्रमात तब्बल १०० रक्तदात्यांनी रक्तदान केले .
माजी उपसरपंच विश्वास गुंजाळ, उद्योजक वसंत बनकर, सदस्य निलेश गायकवाड, सदस्य अनिल बनकर , डॉ.सुशांत पारनेरकर ,डॉ.वसंत झेंडे, वसुंधरा फाउंडेशचे अध्यक्ष सागर बनकर , चित्रपट कलाकार संदीप बोरगे सर यांच्या उपस्थित रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले.
विद्याधामचे क्रीडा शिक्षक संदीप घावटे सर यांनी सर्वात प्रथम रक्तदान केले . तर १०० वा रक्तदाते ठरले ते सोमनाथ कौठाळे .
प्रशांत ढवळे , कृष्णराज वायदंडे यांनी सपत्नीक रक्तदान केले . रविवारी विवाह संपन्न होणाऱ्या संकर्ष आहोळ व गणेश बनकर या नवरदेवांनी सुद्धा रक्तदान केले . यावेळी ५५ वर्षीय महिला मंगल सुखदेव बनकर , कल्पना ढवळे ,मिना वायदंडे यांनीही रक्तदान केले .साईकृपा कारखान्याचे जनरल मॅनेजर आर .टी . यादव यांनी सुद्धा रक्तदान केले .
कोरोना संकटकाळात १०० रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जोपासली.
रक्तदात्यांना विमा प्रतिनिधी कालिदास बनकर यांनी दिनदर्शिकेचे वाटप केले . ग्रा.सदस्य रवींद्र ढवळे ,संदीप भालेकर व गणेश बनकर यांच्यावतीने अन्नदान करण्यात आले .
रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी माजी उपसरपंच विश्वास गुंजाळ ,सागर बनकर , सुधीर ढवळे , तुषार वाघमारे , संदीप बोरगे , चतुर्भुज कौठाळे, धनंजय शिंदे , अमोल कौठाळे , संकेत अलभर , ज्ञानेश्वर बनकर , आकाश धावडे , रोहीत कौठाळे, सुजय धोत्रे , विकास धोत्रे , परवेझ मन्यार , किशोर बनकर , अमर डेंगळे ,अनिकेत धोत्रे, संचित उल्हारे, प्रतिक बनकर, यश ढवळे , सुयोग धोत्रे ,करण शिंदे , सादिक मन्यार , भूषण टकले , नागेश धोत्रे , आकाश भालेकर , अनिकेत जाधव ,जाणता राजा प्रतिष्ठाण व वसुंधरा बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठाणचे सदस्य यांनी परीश्रम घेतले .

Categories
कोपरगाव

मराठा उद्योजक जिल्हा कार्यकारणी जाहीर


कोपरगाव बिपिन गायकवाड हिंदूसम्राट तालुका प्रतिनिधी–

कोपरगाव मराठा उद्योजक लॉबीचे संस्थापक अध्यक्ष विनोदराव बडे यांच्या मार्गदर्शनाखाली व मराठवाडा संपर्क प्रमुख राजेंद्र औताडे यांच्या उपस्थितीत शिर्डी येथील कार्यक्रमात अहमदनगर जिल्हा मराठा उद्योजक कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे यावेळी अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी कोपरगाव येथील संतोष कुठे पाटील यांची निवड करण्यात आली तसेच जिल्हा संपर्क प्रमुख पदी कोपरगाव येथील राहुल आढाव पाटील यांची तर डॉ.आदित्य पाटील यांची जिल्हा आरोग्य सचिव कुमारी राविजा पिंगळे यांची अहमदनगर महिला जिल्हा सहसंपर्कप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे मराठा समाजातील तरुण आणि तरुणींना नवीन उद्योग सुरू करण्यासाठी शेती उत्पादनावर प्रक्रिया कर्ज तसेच सर्व प्रकारचे मार्गदर्शन सहकार्य हेही या संघटनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे यावेळी नूतन अहमदनगर जिल्हाध्यक्ष संतोष कुठे पाटील व जिल्हा संपर्कप्रमुख राहुल आढाव पाटील यांचा सत्कार कोपरगाव चे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी केला सदर प्रसंगी संदीप आहेर यांच्यासह अनेक उद्योजक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Categories
मुंबई

धक्कादायक बाब; नवी मुंबई, खारघर, पनवेलकर घेत आहेत प्रदूषित हवेत श्वास..!!

नवी मुंबई (बातमी/रुपाली वाघमारे) :- एका स्वयंसेवी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार वातावरन फाउंडेशनने उघड केले की खारघर, पनवेल आणि तळोजा पट्ट्यातील रहिवाशी हे प्रदूषित हवेत श्वास घेत आहेत.

पर्यावरण गटाने केलेल्या महिन्याभराच्या हवामानाच्या अभ्यासानुसार पहाटेच्या वेळी प्रदूषण हे शिगेला पोहोचले आढळून आले. यामुळे, मॉर्निंग वॉक करणारे आणि जॉगर्सना धोका निर्माण होतो आहे. तथापि, रहिवासी दररोज सुमारे १७ तास प्रदूषित हवा श्वास घेत आहेत.

या भागातील हवेमध्ये पार्टिक्युलेट मॅटर पी एम २.५ (PH2.5) चे उच्च प्रमाण पहाटे ६ ते सकाळी ८ च्या दरम्यान पहाण्यात आले आसुन. यापैकी बरीच धूळ, परागकण, काजळी आणि धूर यांचे जटिल मिश्रण आहे आणि ते मानवी जीवनास घातक आहेत, ज्यामुळे ते कमी दृश्यमानता आणि धुके यासाठी जबाबदार आहेत. ते लहान सूक्ष्म कण आहेत जे दिवस किंवा आठवडाभर हवेमध्ये राहू शकतात आणि फुफ्फुसांच्या वायुमार्गाच्या अरुंद भागावर आक्रमण करण्यासाठी आणि आरोग्यास आजार निर्माण करण्यास पुरेसे आहेत.

दरम्यान, या पट्ट्यावरून गोळा केलेल्या हवेच्या गुणवत्तेच्या आकडेवारीवरून असेही सूचित झाले आहे की पनवेलमधील १ महिन्याच्या कालावधीत ‘खराब हवा दिवस’ साचली आहे, जिथे बहुतेक दिवस हवेच्या गुणवत्तेच्या अनुज्ञेय पातळीचे भारतीय मानक पार केले होते.

सकाळी ७ वाजता सुमारास सरासरी पातळी २.५ असावी, स्वयंसेवी संस्थेने १३ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर या कालावधीत पाच ठिकाणी कमी किंमतीच्या रिअल-टाइम एअर क्वालिटी मॉनिटर्स (Real-Time Air Quality Monitors) बसवून हा अभ्यास केला.

तळोजाच्या एमआयडीसी क्षेत्रात एक मॉनिटर बसविण्यात आले, तर पनवेलमधील सेक्टर १३, सेक्टर-३६ खारघर आणि सेक्टर -७ तळोजा मधील नावडे या भागातील निवासी क्षेत्रात ४ पाचही ठिकाणी एमआयडीसी, तळोजा येथे (PM 2.5) पी एम २.५ पातळी सर्वाधिक असल्याचे दिसून आले.

कंपन्यांकडून विषारी वायू हवेत सोडल्या जाणार्‍या, सुरू असलेल्या बांधकामांमुळे आणि महामार्गावरून जाणार्या वाहनांच्या धूरांमुळे तळोजा एमआयडीसी भागातील प्रदूषणाची पातळी ही चिंताजनक पातळीवर गेली आहे.

सलग महिन्यासाठी तपासणी केलेल्या हवेच्या गुणवत्तेत सुमारे २०० पर्यंत प्रदूषण पातळी नोंदविली गेली आहे. जर वायू प्रदूषणाची पातळी सायंकाळी ६० च्या खाली असेल तर त्याचा मानवी शरीरावर परिणाम होत नाही.

Categories
कोल्हापूर हातकणंगले

यळगुड येथे राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या शाखेचं उद्घाटन

उद्घाटन आज नाताळ दिनाचे औचित्य साधून यळगुड येथे राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या शाखेचं उद्घाटन करण्यात आले
उद्घाटन प्रसंगी कोल्हापूर जिल्हाध्क्ष श्री जयराज कोळी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून फलकाचे अनावरण केले,तेव्हा प्रहार मार्फत दिव्याग गोरगरीब शेतमजूर अनाथ सर्वसामान्य गरजू लोकांच्यासाठी लढेल असे सांगितले याप्रसंगी श्री वैभव झुंजार यांची युवक सचिव हातकणंगले तालुका पदी नेमणूक करून नियुक्ती पत्र श्री कोळी यांच्या हस्ते देण्यात आले या कार्यक्रमास जिल्हा संघटक अक्षय जाधव अनिल गावडे शितल कुर्ले ,सचिन कांबळे ,सचिन चौगुले, अर्जुन वड्ड , रणवीर शिंदे
बबन शिंदे, सौरभ पाटील किशोर परीट शांतीनाथ चौगूले अधी मान्यवर उपस्थित होते

Categories
नांदेड

धर्माबादेत अनाधिकृत फ्लाटिंगची विक्री,जनतेची फसवणूक होण्याची शक्यता?

जनतेची फसवणूक करू नका- नगरसेवक संजय पवार

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:दि.26.जिल्यातील धर्माबाद नगरपरीषदेच्या क्षेत्रीतील बाळापुर शिवारात शहरातील सुप्रसिद्ध डॉ.कमलकिशोर काकाणी व व्यापारी माधव बिजमवार यांच्या मालकीची तरीची जमीन असून सदरील जमीनीवर आरक्षण आहे.परंतु ती अंदाजित ३ एकर १४ गुंटे तरीची जमीन नांदेड येथील एका कापड दुकानाच्या मालकास विक्री करण्यात आली आहे.व सदरील जमीनीची सौदा चीठी करण्यात आली आहे.अजून सदरील जमीनीची दस्तनोंदणी झाली नाही.परंतु सदरील जमीनीवर नियमबाह्य पद्धतीने प्लाटींग करून शहरातील काही दलाल मंडळी प्लाटची विक्री करीत असल्याचे उघडकीस आल्यामुळे गोर गरीब जनतेची फसवणूक होत असून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल सुध्दा बुडत असल्याची चर्चा शहरातील जनतेत होत आहे.
धर्माबाद शहरातील सुप्रसिद्ध डॉ.कमलकिशोर काकाणी व व्यापारी माधव बिजमवार यांच्या मालकीची बाळापुर शिवारात तरीची जमीन असून सदरील जमीनीवर आरक्षण असल्याची चर्चा होत आहे.ती अंदाजित ३ एकर १४ गुंठे जमीन नांदेड येथील एका कापड दुकानाच्या मालकास विक्री करण्यात आली आहे.व सदरील जमीनीची सौदा चीठी सुध्दा करण्यात आली आहे.परंतु ठरल्याप्रमाणे सदरील जमीनीचे पैसे जमीन खरेदीदार मुदतीत दिला नाही.व उलट सदरील जमीनीवर नियमबाह्य पद्धतीने प्लाटींग करून विक्री करीत असल्याचे उघडकीस आल्यामुळे जमीन मालकांनी सदरील जमीनीवर नियमबाह्य पद्धतीने प्लाटींग करून खांबे रोपण्यात आलेले जमीनदोस्त केले आहे.सदरील प्ररकरणाची माहिती प्लाट विकत घेतलेल्या गोर गरीब जनतेला कळाली आहे.त्यामुळे सदरील गोर गरीब नागरीक आपली फसवणूक होत आहे कि काय? यासंदर्भात शहरातील अनेक नगरसेवकांशी संपर्क साधत असल्याचे चित्र दिसत आहे.परंतु सदरील अनाधिकृत प्लाटींग प्ररकरणात शहरातील एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकेच्या मुलाचा पुढाकार असल्यामुळे शहरातील जनतेत उलट सुलट चर्चा सुरू आहे. सदरील तरीच्या जमीनीवर नियमबाह्य पद्धतीने अंदाजित ६४ प्लाट तयार करण्यात आले असून त्यापैकी ३० ते ३५ प्लाटची विक्री करून सौदा चीठी करून दिले.व प्रत्येकाकाडून २ लक्ष रुपय बयाना घेऊन अंदाजित ६० ते ६५ लाख रुपये जमा करण्यात आले असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.वार्डातील लोकांना मुलभूत सुविधा वेळेवर उपलब्ध व्हावे,यासाठी मतदारांनी चांगल्या व्यक्तीस निवडणुकीत मतदान करून पालिकेत पाठवितात.परंतु त्याच नगरसेवकांनी पालिकेचा लाखोंचा महसूल बुडवत जनतेची फसवणूक करीत असल्याची चर्चा शहरातील जनतेत होत आहे. त्यामुळे सदरील तरीच्या जमीनीवर नियमबाह्य पद्धतीने प्लाटींग करून विक्री करणारे व दलांलावर कठोर कारवाई करण्याची मागणी जनतेतून होत आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झोपडपट्टी मुक्त अभियान राबवून गोर गरीब जनतेला घरे उपलब्ध करून देत आहेत.परंतु अशा नियमबाह्य पद्धतीने प्लाट खरेदी केल्यास सदरील योजनेचा लाभ मिळणार नाही.व सदरील घराची नोंद पालिकेत सुध्दा राहणार नाही.त्यामुळे अनाधिकृत प्लाटे विकत घेऊनका व प्लाटींग करणाऱ्यांनी सुध्दा नियमानुसार कारवाई करूनच प्लाटे विक्री करा,असे आवाहन भाजपचे नगरसेवक संजय पवार यांनी केले आहे.
शहरात अनाधिकृत प्लाटींग करून गोर गरीब जनतेची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक गंगाधरोड साय्यारेड्डी यांनी केले आहे.
बाळापुर शिवारातील आमच्या मालकीची जमीन नांदेड येथील एका कापड दुकानाच्या मालकास विक्री केलो आहे.व सौदा चीठी सुध्दा झालेली आहे.परंतु जमीन विक्री केलेली पूर्ण रक्कम अद्याप आम्हाला मिळली नाही.आमचा सौदा कायम आहे.परंतु सदरील जमीनीचे मालक होण्यापूर्वीच सदरील जमीनीवर नियमबाह्य पद्धतीने प्लाटींग करून विक्री करणे चूकीचे असल्याचे डॉ.कमलकिशोर काकाणी व व्यापारी माधव बिजमवार यांनी बोलताना सांगितले आहे.

Categories
नांदेड

माकपच्या लढ्याने झाला ख्रिश्चन दफनभूमिचा कायापालट !

एक सप्टेंबर ते तेवीस डिसेंबर पर्यंत केलीत सात आंदोलने, इतर मागण्यासाठी लढणार न्यायालयीन व रस्त्यावरची लढाई

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:सीटू आणि मा.क.प.च्या यशस्वी प्रयत्नाने नांदेड येथील एकमेव ख्रिश्चन दफन भूमी चे गंभीर प्रश्न महापालिका आयुक्त डॉ.सुनिल लहाने आणि जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर तसेच उपायुक्त बाबूराव बीक्कड यांच्या निदर्शनास आणून देत आतापर्यंत सात वेळा आंदोलन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आणि आयुक्तांनी संबंधित विभागांना कार्य तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत परंतु बांधकाम,विद्युत,पाणीपुरवठा व वित्त विभागातील काही कामचुकार अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक काम पूर्ण करण्यास विलंब केला होता.
साफसफाईचे काम ऐंशी टक्के पूर्ण झाले असून ते पूर्ण करावे तसेच दफनभूमितील अंतर्गत रस्ते,विद्युत पुरवठा,स्ट्रीट लाईट, पाणी पुरवठा व लोकसंख्येच्या आधारावर दहा एकर जमीन ख्रिश्चन दफनभूमिसाठी शासनाने महापालिका हद्दीत द्यावी ह्या मुख्य व कळीच्या मागण्या अपूर्णच आहेत. त्या साठी पुढील काळात लढा आणखी तीव्र करणार असल्याचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा कमिटी सभासद तथा सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांनी जाहीर केले.
मागील अनेक आंदोलनात ह्या मागण्या सातत्याने केल्या असून वरिष्ठांच्या आदेशाला कनिष्ठांनी केराची टोपली दाखाविली होती परंतु त्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आंदोलन करण्याची नोटीस देऊन केली होती.परंतु मनपाच्या कामचुकार व आडमुठे धोरण राबविणार्या सहाय्यक आयुक्तांनी व अभियंत्यांनी पूर्वीप्रमाणेच काम न करण्याची भूमिका घेतली. तेव्हा सीटू व माकपच्या कार्यकर्त्यांनी दि.21 डिसेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर कॉ.मारोती केंद्रे व कॉ.अनुराधा परसोडे यांच्या वतीने अमरण उपोषण सुरू केले होते.तरीसुद्धा प्रशासनातील मुजोर अधिकाऱ्यांनी न जुमानता कसलाही प्रतिसाद दिला नाही.शेवटी दि.23 डिसेंबर पासून तेवीस कार्यकर्त्यांनी सुरू असलेल्या उपोषणास पाठिंबा देत निवेदन देऊन दोन दिवस उपोषण करणार असल्याचे पत्र जिल्हाधिकारी,आयुक्त,पोलीस अधिक्षक आदींना दिले.
तेव्हा कुठे प्रशासकीय अधिकारी जागे झाले व तातडीने कारवाई करण्यात आली.ख्रिस्ती बांधवांचा महत्त्वपूर्ण सन नाताळ असल्याने मानपाचे कर्तव्यदक्ष उपायुक्त बीकड साहेबांनी दफनभूमीतील काम सुरू केले. तसेच एम.जी.एम.कॉलेज समोरील बजरंग कॉलनी येथील दलित समुदायांच्या घरा समोर सर्व नागरी सुविधा तातडीने पुरविण्यात येतील असे लेखी अश्वासन दिले आहे. एकंदरीतच ख्रिश्चन दफनभूमीचा कायापालट झाल्याने ख्रिस्ती बांधवामध्ये आनंद दिसत आहे.या साठी सीटू संलग्न अ.सं.कामगार संघटनेचे युनिट अध्यक्ष कॉ.रविंद्र जाधव यांनी परिश्रम घेतले.इतर मागण्या मध्ये सर्वे नंबर ५६ बी वजिराबाद मधील पिडीता अल्का राजीव गुल्हाने यांना त्यांचा दहा लक्ष रूपये मावेजा अग्रीम रक्कम स्वरूपात मिळवून दिला व मनपाने कबूल केलेली पैसे देण्याची तारीख गेल्यामुळे तात्काळ सर्व रक्कम त्यांना मिळावी या साठी लढा चालूच राहील.पोलीस ठाणे वजिराबाद येथील गु.र.न.६/२०२० ॲट्रॉसीटी कायदा मधील मुख्य आरोपी आर.मंगाचार्यलू व एस.के.वल्ली यांचे नावे तपास अधिकारी तथा उप विभागीय पोलीस अधिकारी अभिजित फस्के यांनी दोषारोप पत्रातून वगळली आहेत.ते पूर्ववत घेण्यासाठी व तपास अधिकारी यांच्यावर कलम चार नुसार कारवाई करण्याची लढाई मंत्रिमंडळात व न्यायालयात ताकीदीने लढण्याचे ठरले आहे. गोदावरी नदीपात्रात पाण्यात बूडून मृत्यू झालेल्या आनंद केंद्रे व इतर दोन मुलांच्या मरणास कारणीभूत ठरलेल्या तहसिलदार,मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करणे व कॉ.गंगाधर गायकवाड यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्याच्या अनुषंगाने पोलीस अधिक्षक नांदेड यांना भेटावे असे पत्र देण्यात आले आहे.उपोषण सोडविण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सिध्देश्वर भोरे आणि पोलीस निरीक्षक संदिप शिवले यांनी यशस्वी प्रयत्न केले आहेत. कॉ.विजय गाभणे,कॉ.गंगाधर गायकवाड व कॉ.उज्वला पडलवार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या आंदोलनात कॉ.सं.ना.राठोड,कॉ.दत्तोपंत इंगळे,कॉ.मुकेश गर्दनमारे,कॉ.मिरा बहादूरे,कॉ.शे.मगदूम पाशा,कॉ.रब्बाणा बी पठाण,कॉ.बंटी वाघमारे,कॉ.सचिन आंबटवाड,कॉ.सत्यभामा बोईनवाड,कॉ.सिमा गजभारे,कॉ.रमा खिल्लारे,कॉ.पंचशिला सिरसाठ,कॉ.पुष्पा लोणे,कॉ.भारतीबाई सदावर्ते आदींनी सहभाग नोंदविला.रास्त मागण्या असल्या कारणाने भाकप युनायटेड चे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी कॉ.सदाशिव भूयारे व कॉ.अंबादास भंडारे,बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष सुखदेव चिखलीकर,एम.आर.पी.एस.चे जिल्हा अध्यक्ष संजय गोटमुखे,प्रहार चे जिल्हा अध्यक्ष संतोष बोराळकर व इतरही समविचारी संघटनांच्या वतीने पाठिंब्याचे पत्र जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत.
कॉ.गंगाधर गायकवाड
जनरल सेक्रेटरी सीटू नांदेड जिल्हा कमिटी.
मो. 7709217188.

Categories
लोहा

लोहा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुक प्रक्रिया काळजीपूर्वक पार पडावी -तहसीलदार विठ्ठल परळीकर


———————————
लोहा, प्रतिनिधी ( शिवराज पवार)
लोहा तालुक्यातील ८४ ग्रामपंचायत साठी निवडणूक होत असून ही निवडणूक स्थानिक पातळीवर उत्साहात होत असतात त्यामुळे मतदान अधिकारी कर्मचारी यांनी अंत्यत काळजीपूर्वक ही प्रक्रिया पार पाडावी येणाऱ्या समस्यांचे वेळोवेळी निराकरण केले जाईल सर्वांनी ही निवडणूक प्रक्रिया सुरळीत पूर्ण करावी असे मार्गदर्शन तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी केले आहे
लोहा तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे त्यासाठी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात कर्मचाऱ्यांचे पाहिले प्रशिक्षण २६ रोजी पार पडले. तहसीलदार विठ्ठल परळीकर नायब तहसीलदार राम बोरगावकर यांनी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले यावेळी निवडणूक नायब तहसीलदार देवराये, नायब तहसीलदार अशोक मोकले, निवडणूक विभागाचे प्रमुख तिरुपती मुंगरे, अव्वल कारकून बडवणे, संगणक तज्ज्ञ गिरी, प्रशांत अपशेट्टे, सूर्यकांत पांचाळ तसेच तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी यांनी या प्रशिक्षणासाठी परिश्रम घेतले.
तहसीलदार परळीकर यांनी ८४ ग्रामपंचायत विषयी सविस्तर माहिती ही स्थानिक पातळीवरची निवडणूक आहे लोकसभा, विधानसभा निवडणुकी यापेक्षा काळजीपूर्वक व गावात अटीतटीच्या होत असते एक प्रभाग म्हणजे एक मतदार संघ असते त्यामुळे मतदान अधिकारी व कर्मचारी यांनी गंभीर्याने प्रक्रिया पूर्ण करावी जेणेकरून कोणताही वाद आपल्या चुकीमुळे होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच मतदान केंद्र अधिकारी व त्यांचे सहकारी यांनी कोणत्या जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या आहेत हे संगीतले.नायब तहसीलदार राम बोरगावकर यांनी ही मार्गदर्शन केली
● प्रशिक्षण पूर्वी कर्मचाऱ्यांची तपासणी●
————————
ग्रामपंचायत साठीच्या पहिले प्रशिक्षण शनिवारी तहसील कार्यालयात सकाळी अकरा वाजता सुरू झाले त्या करीता प्रशिक्षणासाठी येणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांची थर्मर स्कॅनिंग , तसेच ऑक्सि मीटर ,व सॅनेटायझर यांचा वापर करण्यात आला .त्यानंतर प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र टेबल ठेवण्यात आले होते त्यामुळे शिस्त पळून नियोजनबद्ध हे प्रशिक्षण तहसीलदार विठ्ठल परळीकर व टिमने पार पडले

Categories
कागल कोल्हापूर

कागलमध्ये सामाजिक न्याय मंत्री मा. ना. रामदासजी आठवले यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबीर व मसाले दुधाचे वाटप.


कागल/प्रतिनिधी●गोरख कांबळे. . कागलमध्ये केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. मा. रामदासजी आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे नियोजन जिल्हाध्यक्ष उत्तम दादा कांबळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या मार्फत करण्यात आले यावेळी कागल स्टॅंडवर मसाले दूध वाटप करण्यात आले तसेच रक्तदान शिबिराचे आयोजनही करण्यात आले होते.या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी रक्तपेढीच्या नर्स व स्टाफ तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बऱ्याच युवकांनी रक्तदान केले. तसेच प्रत्येकाने रक्तदान करावे. आपण केलेल्या रक्तदानामुळे कुणाचा तरी जीव वाचू शकतो जीवदान मिळू शकते. आपण नेहमी रक्तदान करतो अशाच प्रकारे इतरांनीही रक्तदान करावे.असे आवाहनही यावेळी करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. उत्तमदादा कांबळे (जिल्हाध्यक्ष)यांच्या हस्ते झाले.
यावेळी तालुकाध्यक्ष श्री बाबासो कागलकर.कार्याध्यक्ष श्री बी. आर. कांबळे.सचिव श्री सचिन मोहिते.कागल तालुका युवा आघाडी अध्यक्ष श्री विनोद कांबळे.संघटक श्री सातापा हेगडे. कागल तालुका उपाध्यक्ष श्री चंद्र शेखर कोरे. तथा अजित भोसले.सामाजिक कार्यकर्ते श्री भिकाजी कांबळे, मंजुनाथ वराळे, श्रीकांत मालेकर, आनंदा कांबळे, पंडित कांबळे, दिलीप कांबळे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Categories
कोपरगाव

सरपंच कसा असावा हे एकदा वाचा नंतरच आपला निर्णय घ्या

कोपरगाव हिंदूसम्राट तालुका प्रतिनिधी बिपिन गायकवाड –

कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीच्या निवडणूका लागल्या असून ग्रामपंचायतीच्या सार्वगिण विकासासाठी लोकप्रतिनिधी योग्य गरजेचे आहेत सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य प्रमुख हा लोकाभिमुख असेन असे गरजेचे आहे लोकप्रतिनिधी गावांमधील लोकांमध्ये भांडण लावून स्वतःची पोळी भाजणारा नसावा गावाचा होणारा सरपंच गावात राहणारा असावा जेव्हा गावाला अडचण असेल तेव्हा वेळेवर मदत करणार असावा जर गावामध्ये भीषण दुष्काळ पडला असताना शासनाकडून लोकांना पाण्याची ची व्यवस्था करणार असावा गावाच्या विकासासाठी आलेल्या 14 वा वित्त आयोग निधी पेस निधी लोकहितासाठी वापरणारा असावा शासनाच्या योजना लाभार्थीनां फसवून पैसे उकळून पुन्हा वाटून खाणारा नसावा एम आर जी एस मधून मिळालेल्या विहिरीच्या लाभार्थी कडून कमिशन घेणार नसावा ग्रामपंचायत सदस्य आपल्या वार्डातील समस्याची जाणीव असणारा आणी लोकांचे प्रश्न सोडवणारा असावा गावात मंजूर झालेल्या विविध सरकारी योजनेची काम अर्धवट करुन पूर्ण बिल उचलणारा आणी शाळेतील मुख्याध्यापकाला सोबत घेऊन धाब्यावर जाणारा नसावा गावातील सर्व पदे आपल्याच घरात ठेवणारा नसावा गावातील सर्व लोकांना सोबत घेऊन काम करणारा असावा सरपंच आणि प्रशासन एखादा सामान्य नागरिक ग्रामपंचायत कार्यालय कामानिमित्त गेल्यावर त्यांच्या बरोबर विनम्रपणे बोलणारा असावा त्याच्या समस्या काय आहे ते जाणून घेणारा असावा गावातील घनकचरा गटारी रस्ते याचे नियोजन करून स्वच्छ ठेवणारा आणि प्रशासनावर वचक ठेवणारा असावा कायम वरवर गोड गोड गप्पा मारुन हात हलवून फसवणारा तर अजिबात नसावा जवळच्या व्यक्तिची कामे करणारा नसावा सर्व समाजातील लोकांची कामे करणारा असावा सरपंच झाल्यावर फक्त आपल्याच पॅनलच्या लोकांची कामे करायची आणि विरोधी पॕनलच्या लोकांची कामे करायची नाही असा सरपंच नसावा सरपंच झाल्यावर फक्त आपल्या पॅनलच्या लोकांची कामे करायची आणि विरोधी त्यांच्या लोकांची कामे करायची नाही असा सरपंच नसावा सरपंच झाल्यावर कोणत्याही प्रकारचे राजकारण नकरता समाजातील सर्व घटकांना बरोबर घेवुन काम करणारा असावा गावातील काही रिकाम टेकडे गुंड प्रवृत्तीचे लोकांना सोबत घेवुन आपल्या विरोधाकांविरोधित गावातील आपल्या पेक्षा सभ्य चांगल्या वरचड व्यक्ति विरुध्द षडयंत्र रचणारा नसावा तु यांच्यात राहातो त्यांच्या सोबत फिरतो तुला बघुन घेईन मी तुला मदत केली होती अशी उपकाराची धमकीची भाषा करणारा नसावा दारु पाजुन तरुणांनांना बिघडवणारा व फक्त मतदाना साठी वापर करणारा नसावा ग्रामपंचायत मधुन कमवलेल्या पैशातुन लोकांना मटन दारु पाटर्या देणारा नसावा गावात लंग्न सोहळा , अंत्यविधी व धार्मीक सोहळ्यास सहभागी असताना चमचेगिरी करुन श्रेय लाटणारा नसावा गावातील आरोग्य केंद्राकडुन पैशाची मागणी करणारा नसावा गावासाठी खरेदी केलेल्या एल.ई.डी बल्ब खरेदीत कमिशन खाणारा नसावा गावाला मिळालेल्या तंटा मुक्त गावाचे बक्षिस भ्रष्टाचार करुन खाणारा नसावा गावात निवडुण येण्यासाठी लोकांना पैशे वाटुन पाटर्या देऊन निवडुन येणारा नसावा गावात पहिल्यांदा निवडुन आल्या नंतर लबाडीने सरपंच झाल्यावर पुढे जाऊन जिल्हापरीषद सदस्य बघण्याचे स्वप्न पाहणारा तर अजिबात नसावा.

Categories
मुंबई

आत्मविश्वास व सकारात्मक दृष्टिकोन हे यश प्राप्तीचे मूलमंत्र-राजीव तांबे

( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी:लक्ष्मण राजे )

दिनांक 24 डिसेंबर, 2020 रोजी बॅरिस्टर नाथ पै.शिक्षण प्रसारक मंडळाच्या विक्रोळी विद्यालयात ‘ प .पू . साने गुरुजींची जयंती ‘मोठ्या उत्साहात साजरी केली. संस्थेचे अध्यक्ष श्री. अजयकुमार चोपडेकर यांनी साने गुरुजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरीय पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध लेखक ,कवी, नाटककार व टीव्ही स्टार श्री. राजीव तांबे हे उपस्थित होते.मुलांमध्ये रमणारे श्री. राजीव तांबे यांनी त्यांच्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले . जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर चुका करा ,पण त्या उगाळत बसू नका तर काय चुकले ते शोधून तिथे लक्ष केंद्रित करा, सुधारणा करा आणि पुढे जा.आत्मविश्वास व सकारात्मक दृष्टिकोन हे यश प्राप्तीचे मूलमंत्र आहेत. अभ्यासाचे वेळापत्रक न करता अभ्यासपत्रक तयार करा व त्याप्रमाणे अभ्यास करा. तसेच स्वतःला बदलवायचे असेल तर प्रथम कृती बदला,विचार बदला, भाषा बदला प्रत्येक गोष्ट अंतर्मनात ठसवा म्हणजे ती प्रत्यक्षात साकार होईल .लॉकडाऊन मुळे मरगळलेले आमचे विद्यार्थी कार्यक्रमाच्या निमित्ताने उत्साही झाले. त्यांनी अनेक प्रश्न पाहुण्यांना विचारले. पाहुण्यांनी ही आवडीने त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली . खरोखरच ते आमच्या विद्यार्थ्यांचे आज सानेगुरुजी झाले. या कार्यक्रमास संस्थेचे संचालक सचिव मा. श्री. गणेश बटा सर हे उपस्थित होते . सर्व शाळा समूहाचे मुख्याध्यापक श्री .येजरे सर ,श्री शेळके सर ,सौ चोपडेकर मॅडम , सौ. मनस्वी कोयंडे व कु शैला दीक्षित मॅडम उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिक्षिका सौ .तरे मॅडम यांनी केले.पाहुणयांचा परिचय शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ .अनिता जाधव मॅडम यांनी केले. पाहुण्यांचे व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप माध्यमिक विभगाचे मुख्याध्यापक श्री. भिवा येजरे यांनी केले.अशी माहिती
गणेश हिरवे यांनी दिली.

Categories
अजब गजब कोल्हापूर

श्रीम कमलादेवी नेगी( वय ५७) पती व मुलांच्या मृत्यूनंतरही पीएम केअर्स फंडास वृद्धापकाळाची ठेव ठेवलेलेे दीड लाख रूपये दान केले

  • कोल्हापूर- सुभाष भोसले
    उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्यातील गौचर परिसरातील दुसरी दातृत्ववान दुर्गा. पती कमलसिंह नेगी शिक्षण विभागात परियोजना अधिकारी होते. त्यांचे निधन झाले आहे. पती ग्राम पंचायत झिरकोटीचे रहिवासी होते. चार वर्षापूर्वी दुर्घटनेत दोन्ही मुलांचे अकाली निधन झाले आहे. कमला देवी स्वत: राजकीय इंटर कॉलेज लंगासू येथे प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करतात.
    गौचर क्षेत्रातील देवकीदेवी भंडारी यांनी दहा लाख तर शांतीदेवी गुंसाई यानी एक लाख करोना विरोधातील लढ्यासाठी दिले होते. त्यांचाच आदर्श समोर ठेऊन कमलादेवी नेगी यांनी दीड लाख रूपये पंतप्रधान केअर्स फंडास दान केले आहेत. गौचर येथील भारतीय सेंट्रल बँकेत त्यांनी धनादेश सुपूर्द केला.
    कमलादेवी नेगी यांनी करोनामुळे बेरोजगारी व उपासमारीमुळे जनता होरपळून निघत असल्याने आपण दान दिल्याचे सांगितले. देवभूमीतून करोना लवकर नाहिसा व्हावा व जनजीवन पूर्वपदावर यावे असे कमलादेवी यांना वाटते.
    आयुष्याच्या उत्तरार्धात नोकरीचे अखेरचे वर्ष असताना आयुष्यभर साथ दिलेला नवरा गेला आहे. दोन्ही मुलांचे दुर्घटनेत निधन झाले आहे. एकाकी आयुष्याची संध्याकाळ असताना समजातील दु:ख पाहून मदतीचा हात पुढे करणे साधी सोपी गोष्ट नाही. कमला देवी तुम्हाला आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभू दे. दु:खाचा डोंगर कोसळला तरी रक्तातील दातृत्व उफाळून आले त्या दातृत्वास सांष्टांग दंडवत.
    उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी कमलादेवी यांचे भरभरून कौतुक केले. कमलादेवी यांची कृती समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
    समाज हेच कुटंब मानणाऱ्या कमलादेवी तुमचा अभिमान वाटतो.

  • संपत गायकवाड
    (माजी सहाय्यक शिक्षण संचालक)
Categories
अजब गजब कोल्हापूर

डॉ संकेत मेहता यांनी स्वत: ऑक्सिजवर असताना रुग्णावर उपचार करण्यासाठी देवदूत बनणे पडले ६० लाख रूपयांना व ९६ दिवस गेले दवाखान्यात


कोल्हापूर- सुभाष भोसले
डॉ संकेत मेहता भूलतज्ञ सूरत ( गुजरात) स्वत: ऑक्सिजनवर उपचार घेत असताना ICU मध्ये ७१ वर्षांच्या पेशन्टला ऑक्सिजन ट्यूब लावायला डॉक्टर लवकर न आल्याने डॉ मेहता यांच्यातला देवदूत जागा झाला त्यांनी स्वत:चा ऑक्सिजन मास्क काढून रूग्णाला ऑक्सिजन ट्यूब टाकली. बावीस मिनीटे डॉ मेहता यांना स्वत:ला ऑक्सिजन न मिळाल्याने फुफ्फुसावर गंभीर परिणाम होऊन ९६ दिवस दवाखान्यात राहावे लागले. चेन्नई येथे जाऊन केलेल्या उपचाराचा खर्च साठ लाख (६०,००,०००) रुपये आला.
डॉ संकेत मेहता हे सूरत येथील हॉस्पिटलमध्ये भूलतज्ज्ञ म्हणून सेवा बजावत आहेत. डॉ मेहता यांना करोनाची लागण होऊन त्यांचे ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने ते स्वत: ऑक्सिजनवर उपचार घेत होते. ICU मध्ये ७१ वर्षीय रुग्ण उपचाराखाठी आले. त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास होत होता. तात्काळ ऑक्सिजन लावणे आवश्यक होते. डॉक्टरांना यायला उशीर होतोय हे लक्षात येताच रूग्णाचा जीव वाचावा म्हणून डॉ मेहता यांच्यातील देवदूत जागा झाला. त्यांनी आपला ऑक्सिजन मास्क काढून आलेल्या रूग्णास व्हेंटीलेटरवर ठेऊन ट्यूब टाकली. हे सर्व करेपर्यंत २२ मिनीटे डॉ मेहता विना ऑक्सिजन मास्क होते. याचा त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊन फुफ्फुस खराब झाले. फुफ्फुस प्रत्यारोपन करण्याची शक्यता निर्माण झाली.
फुफ्फुस प्रत्यारोपन करण्यासाठी डॉ मेहता यांना चेन्नई येथे एअर अॅम्बुलन्स ने हलविले. चेन्नई येथे फुफ्फुस प्रत्यारोपन न करता हॉस्पिटलमधील डॉक्टरांना बरे करण्यात यश आले. एकूण एक कोटी रूपये खर्च आला. पण हॉस्पिटलने साठ लाख रूपये बील केले. सुरत येथील डॉक्टर व डॉ मेहतांच्या मित्रांनी क्राऊड फंडींग सुरू केले, कारण हा प्रचंड कुवतीच्या पलिकडचा खर्च होता. सुरतच्या हॉस्पिटलमध्ये उपचाराचा खर्च माफ केला.
२२ दिवस व्हेंटिलेटरवर, ९६ दिवस हॉस्पिटलमध्ये, एकूण उपचाराचा खर्च ६० लाख रूपये भरून घरी आले. वॉकरचा आधार घेऊनच अजूनही चालावे लागते.
डॉ संकेत यांचे वय केवळ ३७ वर्ष आहे. रूग्णावर डॉक्टर लवकर न आल्याने आपला जीव धोक्यात घालून रुग्णावर उपचार करणे केवढ्या पडले? स्वत: ऑक्सिजनवर उपचार घेत असताना कोणीही दुसऱ्या रूग्णावर स्वप्नातही वा कल्पनेतही उपचार करणार नाही. तरीही डॉ मेहता यांनी धाडस केले ते त्यांना खूपच महागात पडले
डॉ संकेत मेहता यांना हॉस्पिटलचे बील साठ लाख म्हणजे प्रचंड आहे. लोकांनी जीव धोक्यात घालून उपचार केले म्हणून कौतुक झाले, वर्तमानपत्रांचे रकाणे भरून आले. टी व्ही चॅनलवर प्रशंसा झाली. आता मात्र त्यांना आर्थिक अडचणीस सामोरे जावे लागत आहे. सुरतबरोबर संपूर्ण देशासाठी नव्हे तर जगासाठी मिसाल बनलेले डॉ संकेत यांना सर्व स्तरातून मदत मिळावी ही परमेश्वराचे चरणी प्रार्थना.
रक्कम उभी राहील, आर्थिक संकट दूर जाईल पण तब्बेतीचं काय??बायको मुले, आई -वडील यांचं काय ??? डॉ संकेत मेहता तुम्ही परमेश्वराचे अवतार नव्हे तर परमेश्वरच आहात. देशाच्या वैद्यकीय इतिहासात आपले नाव सुवर्णअक्षरांनी लिहीले जाईल. डॉक्टर तुमच्या पायावर नतमस्तकच. तुम्हाला परमेश्वर आरोग्यदायी दीर्घायुष्य देऊ दे
जीवावर उदार होऊन सेवा बजावणाऱ्यासाठी ही गोष्ट शंभरवेळा वाचून विचार करण्यासारखी आहे. शेवटी सर्व स्वत:ला, पत्नीला, मुलांना व आई-वडील यांनाच निस्तरावे लागते.


संपत गायकवाड (माजी सहाय्यक शिक्षण संचालक)

Categories
सातारा

आर्यन पाटील यांची राज्यस्तरीय स्विमिंग चॅम्पियनशीप साठी जोरात तयारी

सातारा जिल्हा प्रतिनिधी- केदार जाधव

सातारा जिल्ह्यातील, पाटण तालुक्यातील, विहे या गावात पोहायला सुरुवात करून आर्यन पाटील यांनी वयाच्या 14 व्या वर्षी पुणे जिल्हा अंडर फोर्टीन चॅम्पियनशीप मध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकवून विजेते झाले. आर्यन पाटील यांची कोरोनाच्या काळात लॉकडाऊन मध्ये सुद्धा स्विमिंग ची तयारी प्रॅक्टिस पूर्णपणे मन लावून चालू आहे. 2021 मध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आर्यन पाटील भाग घेणार असून त्यांची चिकाटीने प्रॅक्टिस चालू आहे. स्विमिंग करताना पूर्ण मार्गदर्शन प्रमोद पाटील, दिपक जाधव, अमोल पाटील करत आहेत. आर्यन पाटील यांनी हिंदूसम्राट न्यूज बरोबर बोलताना सांगितले की ह्या वेळी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे विजेतेपद पटकवनारच. दररोज तीन किलोमीटर पाण्यात पोहण्याचे प्रॅक्टिस आर्यन पाटील करत आहेत. गावातील सर्व ग्रामस्थांकडून आर्यन पाटील यांना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत.

Categories
परळी

वैद्यनाथ साखर कारखान्याच्या चोरीत ना.मुंडेंच्या कार्यकर्त्याचा हात

हिंदूसम्राट विशेष प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

परळी:दि.24.परळी तालुक्यातील वैद्यनाथ साखर कारखान्यात झालेल्या चोरी प्रकरणात राष्ट्रवादीच्या नगरसेविकेच्या पतीचा हात असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
वैद्यनाथ साखर कारखान्यातील स्टोअर गोदाम व वर्कशॉप गोदामातून नुकतेच संगणक संच, मॉनिटर, कॉपर मटेरियल, बिअरिंग, ब्रास मटेरियल, बुश राऊंड असे विविध साहित्य चोरट्यांनी लंपास केले होते, ज्याची किंमत सुमारे 37 लाख 94 हजार 914 इतकी होती. कारखान्याचे लिपीक खदीर शेख यांच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी भादवि 461, 380 कलमान्वये गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली होती. या प्रकरणात काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय होता, त्यावरून पोलिसांनी रमेश उर्फ पिंटू माणिक काळे, सलाऊद्दीन गफार सय्यद, मोशीन गौस काकर (सर्व रा.परळी) व मुतजीन मुनीर शेख रा.लातूर यांना अटक केली. या चोरी प्रकरणी पोलिसांनी अजीज इस्माईल शेख रा.परळी याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.मंगलदादा हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकेचा पती आहे.आतापर्यंत त्याच्यावर विविध प्रकरणात गुन्हे दाखल झालेले आहेत.वैद्यनाथ कारखान्यातील चोरीमागे त्याचा हात असल्याने पोलिसांनी त्याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. काल शोध घेताना पोलिसाच्या तावडीतुन तो निसटला पण त्याच्या ड्रायव्हरला ताब्यात घेण्यात यश मिळाले आहे.पोलिस मंगलदादाच्या मागावर असून त्याला लवकरच अटक करू असे पोलिसांनी सांगितले

Categories
नांदेड Uncategorized

इतवारा पोलीसांनी एक चोरटा पकडला; जवळपास चोरीचे 40 मोबाईल जप्त केले

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:दि. 25.नोव्हेंबर महिन्यात घडलेल्या एका चोरी प्रकरणातून चोरी गेलेल्या 55 हजार 500 रुपयांच्या ऐवजापैकी इतवारा पोलीसांनी 42 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. यासोबतच एकूण 36 दुसरे मोबाईल जप्त केले आहेत. या चोरट्याला न्यायालयाने 27 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

दि.2 नोव्हेंबर आणि 3 नोव्हेंबरच्या रात्री खान मोबाईल शॉपी देगलूर नाका येथील टीनपत्रे काढून त्यातील विविध कंपन्यांचे मोबाईल असा एकूण 55 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक बाळू गिते यांच्याकडे होता.

24 डिसेंबर रोजी पोलीस उपनिरिक्षक एम.जे.बेग,पोलीस कर्मचारी सत्तार,चाऊस, साहेबराव शिंदे,निवृत्ती घुले यांनी हमीदीया कॉलनी खुदबेईनगर येथील मोहम्मद अली शेख नबी (20) या युवकास ताब्यात घेवून त्याच्याकडून खान मोबाईल शॉपीमधील चोरलेल्या ऐवजापैकी 42 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. तसेच नांदेड शहरातील वाजेगाव आणि अनेक जागी मोबाईलची दुकाने फोडून मोहम्मद अली शेख नबीने चोरलेले 36 मोबाईल पोलीसांकडे जप्तीत दिले आहेत. मोहम्मद अली शेख नबीला न्यायालयाने 27 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे,अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे,पोलीस उपअधिक्षक सिध्देश्र्वर भोरे,पोलीस निरिक्षक साहेबराव नरवाडे यांनी या पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.

Categories
सातारा

शांतिकाका सराफ दुकानात खरेदीस आलेल्या जोडप्याकडून चाेरी

फलटण प्रतिनीधि अभिषेक सरगर फलटण-दहिवडी रस्त्यावरील पृथ्वी चौक, फलटण या अत्यंत गजबजलेल्या व रहदारीच्या चौकातील शांतीकाका सराफ नावाचे दुकानातून खरेदीच्या बहाण्याने आलेल्या अज्ञात जोडप्याने सुमारे दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे गंठन हातचलाखीने चोरुन नेल्याच्या आरोपाचा गुन्हा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गुरुवार दि. २४ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास शांतीकाका सराफ नावाचे वरील दुकानात अंदाजे 30 वर्षीय अनोळखी स्त्री व 35 वर्षीय अनोळखी पुरुष अशा दोघांनी सोन्याचे गंठन खरेदी करण्यासाठी आल्याचे सांगितले. सदर जोडप्याने गंठण पहात असताना फिर्यादी व दुकानातील अन्य व्यक्तींची नजर चुकवून हात चलाखीने सुमारे दीड लाख रुपये किमतीचे ३१ ग्रॅम ७१० मिली ग्रॅम वजनाचे पूर्ण सोन्याची पट्टी असलेले सोन्याचे गंठण घेऊन पोबारा केल्याचे फिर्यादीत नमूद असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघा अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार वीरकर अधिक तपास करीत आहेत.

Categories
इचलकरंजी

पत्रकार रंगराव बन्ने यांना राज्यस्तरीय कार्यगौरव समाजरत्न पुरस्काराने सन्मानित


आश्विन लोहार /इचलकरंजी
बारवाड येथील पत्रकार व साहित्यिक रंगराव बन्ने यांना दौण्ड जि. पुणे येथील ज्ञानसंकल्प सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय कार्यगौरव समाजरत्न पुरस्काराने 20 डिसेंबर रोजी दौण्ड जि. पुणे येथील अष्टविनायक बहुउद्देशीय सभागृह भोईटे नगर येथे डौंड चे फौजदार भगवान पालखे, माजी आमदार रमेश थोरात,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष आप्पासो पोवार,हिंदू सम्राटचे संपादक उत्तम कागले,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिन कुलटे, शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र काळे आदींच्या हस्ते देवून सन्मानित करण्यात आले.
रंगराव बन्ने हे गेली ३० वर्षे पत्रकार क्षेत्रात व ३३वर्षे साहित्य क्षेत्रात कार्यरत असून या कार्या बरोबरच धार्मिक,सामाजिक,सहकार क्षेत्रात पण चांगले काम करत आले आहेत.तर पत्रकारितेत व साहित्य क्षेत्रात गेली ३०वर्षे प्रामाणिक सेवा करत सर्वांशी मिळून मिसळून माणुसकी जपण्याचे काम केले आहे, त्याच बरोबर साहित्य संमेलन,भजन,सामाजिक कार्य,धार्मिक कार्य यामध्ये हिरीरीने सहभाग घेत असतात. याचीच दखल घेऊन दौण्ड येथील ज्ञानसंकल्प संस्थेने त्याना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी मानवाधिकार संघटनेचे विनायक दोरगे,प्रा.एच.आर.पाटील,ज्ञान संकल्प संस्थेचे अध्यक्ष सदाशिव रणदिवे,सुभाष भोसले, कारदगा येथील बाळासो नाडगे,तातोबा बत्ते,सिधाप्पा गावडे,बारवाडचे प्रल्हाद चौगुले,गजानन लोहार,विकास चौगुले,प्रदीप जाधव,यांच्यासह महाराष्ट्रातील मान्यवर व पुरस्कार विजेते उपस्थित होते.

डौंड येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना रंगराव बन्ने
Categories
Uncategorized

पाडळी गावात ख्रिसमस उत्साहात साजरा..

प्रतिनिधी वजीर शेख

माता माऊली यात्रा मोहत्सव वर्ष 4थे व ख्रिस्त जयंती 2020 मौजे पाडळी (शांतिनगर )येथे प्रभु येशु जन्माच्या पूर्वसंध्येला प्रार्थना सभेचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख पाहुणे ब्रदर काकासाहेब आल्हाट, पास्टर नवगिरे हे उपस्थित होते त्यांनी येशुने संपूर्ण जगाला शांतीची शिकवण दिली असे सांगितले त्यामुळे आपण ती शिकवण जिवन जगत असताना अंगिकारली पाहिजे व त्यातुन आपले जिवन समृद्ध केले पाहिजे असे विचार व्यक्त केले. तसेच या कर्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणुन हजर असलेले वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य सचिव प्रा. किसन चव्हाण सर, यांनी पाडळी व पंचक्रोशीतुन उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांना माता माऊली यात्रा मोहत्सव व ख्रिस्त जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. आपले मनोगत व्यक्त करतांना ते म्हणाले की पुर्वी या देशामध्ये मनुस्मृती होती व येथील बहुजन वर्गाला या मनुस्मृती नामक ग्रंथाने मानसिक दृष्टीने गुलाम बनविले होते तसेच मानवाच्या विविध स्वांतत्र्यावर निर्बंध लादले होते या मनुस्मृती नामक ग्रथांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दहन केले व भारतीय राज्य घटनेच्या माध्यमातुन भारत देशातील नागरिकांना विविध अधिकार बहाल केले त्यामध्ये शिक्षणाचा अधिकार, आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार, धर्मिक स्वातंत्र्याचा अधिकार दिला, व त्याचबरोबर श्रद्धा व उपासनेचा देखिल अधिकार दिला त्यामुळेच हा उत्सव आपण मोठया आनंदात व उत्साहात साजरा करत आहोत पुढे ते म्हणाले की प्रभु येशूने संपूर्ण मानवजातीवर प्रेम करण्याची शिकवण दिली “प्रभु येशु म्हणतो की आपल्या शत्रुवर वर देखिल प्रेम करा” त्याचबरोबर जेंव्हा प्रभु येशूला क्रुसावर दिले तेंव्हा “प्रभु येशु म्हणाले की हे पित्या ह्यांना क्षमा कर कारण हे काय करत आहेत हे त्यांना समजत नाही” तिच शिकवण घेऊन येशूच्या अनुयायांनी (मिशनरी) भारत देशातील वंचित पीडित शोषित अनाथ दलित उपेक्षित घटकाचे आश्रु पुसण्याचे काम केले व येथे प्रचंड मोठया प्रमाणावर समाजकार्य उभे केले याचे संपूर्ण श्रेय ख्रिश्चन मिशनरी लोकांना आहे असे प्रतिपादन केले. यावेळी विविध सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन समिती कडुन करण्यात आले होते त्यामध्ये पायल व कोमल जालिंदर कांबळे यांच्या दोन मुलींनी अप्रतिम असे नृत्य सादरीकरण केले, महिला संगित खुर्ची,पुरुष संगित खुर्ची, तसेच उत्कृष्ट हार्मोनियम वादक स्पर्धेला अप्रतिम प्रतिसाद स्पर्धकांनी दिला. संपूर्ण कर्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय कांबळे सर, सहकारी डॉ नितेश कांबळे, सुहास दादा कांबळे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन समिती उपाध्यक्ष जितेश कांबळे, व अशोक कांबळे यांनी केले यावेळी. VBA चे शेवगांव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलाल भाई, तालुका संघटक सलीम जिलानी, पाडळीचे माजी सरपंच अशोक गर्जे, पत्रकार वजीर शेख, समिती अध्यक्ष बाबासाहेब राजगुरू, उपाध्यक्ष जितेश कांबळे, अशोक कांबळे, जालिंदर कांबळे, पास्टर विजय कांबळे, डॉ संदीप मच्छिन्द्र कांबळे, रोहिदास नाना कांबळे, पोपट कांबळे विमा सल्लगार लाजरस कांबळे, संदेश कांबळे, आनंद कांबळे येशुदास खरात, बाळासाहेब कांबळे सर, प्रतिक कांबळे अमोल ढगे, जय कांबळे, कृपेश कांबळे, प्रेमकुमार कांबळे येशुदास मोहन कांबळे. विनोद कांबळे, आप्पा कांबळे, निलेश कांबळे,अमोल कांबळे इ कार्यकर्ते उपस्थित होते.

Categories
मुंबई

महापालिका स्तरावरील स्वच्छता प्रभाग स्पर्धेत नवी मुंबईत प्रभाग ९६चा प्रथम क्रमांक

विरेंद्र म्हात्रे नवी मुंबई प्रतिनिधी : नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून राबविण्यात येत असलेल्या महापालिका स्तरावरील स्वच्छता प्रभाग स्पर्धेत नवी मुंबईमध्ये प्रभाग 96चा प्रथम क्रमांक आला आहे. विभागिय जनतेने दिलेल्या योगदानामुळेच हा पुरस्कार प्राप्त झाला असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे स्थानिक नेतृत्व जनसेवक गणेश भगत यांनी व्यक्त केली आहे.
नवी मुंबई शहराचा स्वच्छता अभियानात प्रथम क्रमांक यावा यासाठी महापालिका प्रशासनाने जय्यत तयारी गेल्या काही महिन्यापासून केली आहे. या पार्श्‍वभूमीवर नवी मुंबई शहरात नेरूळ सेक्टर १६,१६ए आणि १८ या परिसराचा समावेश होत असलेल्या प्रभाग 96चा प्रथम क्रमांक यावा यासाठी जनसेवक गणेश भगत, माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी प्रशासन दरबारी पाठपुरावा केशला होता. महापालिका अधिकाऱ्यांचे पाहणी अभियानही वेळोवेळी राबविले होते. महापालिका आयुक्त अभिजित बांगर आणि नेरूळ विभाग अधिकारी यांना स्वच्छता अभियानात प्रभाग स्वच्छतेसाठी करावयाच्या कामाबाबतही सातत्याने पाठपुरावा केशला होता.
प्रभागातील रस्ते, पदपथ व उद्यानासह, रस्त्यांची दुरावस्था यासह प्र्रभागातील अंर्तगत भागातही रंगरंगोटी व प्रबोधनात्मक सुभाषितांबाबत आग्रही पाठपुरावा गणेश भगत आणि सौ. रुपाली किस्मत भगत यांनी प्रशासन दरबारी केला होता. महापालिका अधिकाऱ्यांना घेवून गणेश भगत आणि सौ. रुपाली किस्मत भगत यांनी वेळोवेळी पाहणी अभियान राबवून समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. महापालिका प्रशासनाकडून स्वच्छता प्रभाग स्पर्धेत जाहिर करण्यात आलेल्या निकालामध्ये प्रभाग ९६चा प्रथम क्रमांक जाहिर झाला आहे. हा पुरस्कार गणेश भगत व माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांच्या पाठपुराव्यामुळे व कार्यामुळे प्राप्त झाला असल्याची प्रभागातील रहीवाशांकडून व्यक्त केली जात आहे.

Categories
मुंबई

नवी मुंबईत बलात्काराची भीषण घटना घडली, एका २३ वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिला चालत्या ट्रेनमधून खाली फेकण्यात आलं.


नवी मुंबईतील वाशी येथील रेल्वे रुळांवर मंगळवारी पहाटे ती गंभीर अवस्थेत.

 विरेंद्र म्हात्रे नवी मुंबई प्रतिनिधी

नवी मुंबईत बलात्काराची भीषण घटना घडली आहे. एका २३ वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिला चालत्या ट्रेनमधून खाली फेकण्यात आलं. नवी मुंबईतील वाशी येथील रेल्वे रुळांवर मंगळवारी पहाटे ती गंभीर अवस्थेत आढळली.

मंगळवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास वाशी रेल्वे स्थानकाच्या व्यवस्थापकाने, रेल्वे स्टेशनपासून अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या वाशी पुलाजवळील ट्रॅकवर एक तरुणी आढळल्याची माहिती रेल्वे पोलिसांना दिली. त्यानंतर जीआरपीचे कॉन्स्टेबल भाऊसाहेब शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता, तरुणी डोक्याला गंभीर जखमा आणि शरीरावरही जखमा असलेल्या अवस्थेत आढळली.तरुणीला गंभीर जखमा आणि डोक्यातून रक्तस्त्राव होत होता. तिला त्वरित वाशीच्या एन एम एम सी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिची प्राथमिक तपासणी आणि उपचार करून तिला जेजे रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. ती तरुणीने केवळ कसंबसं आपलं नाव सांगू शकली असून, ती टिटवाळा येथे राहणारी असल्याची माहिती मिळाली आहे.

पोलिसांनी टिटवाळा येथे तिच्या कुटुंबाचा शोध घेतला असून ती पवईत नोकरी करत असल्याची माहिती मिळाली आहे. शनिवारी व रविवारी ती आपल्या कुटुंबाला भेटायला यायची. रविवारी संध्याकाळी आपल्या घरुन निघून ती पवईत येत आसताना.

सेक्शन ३०७ अंतर्गत खूनाचा प्रयत्न आणि बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच ठाणे, पनवेल आणि वाशीपर्यंतच्या सर्व स्थानकांचे सीसीटीव्ही फुटेज मागण्यात आले आहेत. सध्या तरुणी ऑक्सिजन सपोर्टवर असून तिचा वैद्यकीय तपासणी अहवाल अद्याप आलेला नाही. ती शुद्धीत आल्यानंतर पुन्हा तिचा जबाब नोंदवला जाणार आसल्याचे पोलिसांनी सांगितले
.

Categories
सातारा

अंधारल्या वाटेवर, उजेड थोडा पेरूया…

सातारा खंडाळा तालुका प्रतिनिधी/मंगेश माने

लोणंद
” कचर्‍यातून भंगार गोळा करून उदरनिर्वाह करणार्‍या महिलेस साथ प्रतिष्ठाण च्या मदतीने मिळाली दृष्टि व स्वाभिमानाने जगण्याचा आधार…”

लोणंद मधील कचर्‍यातून भंगार गोळा करित उदरनिर्वाह करीत असलेल्या श्रीमती.शालन सुभाष जाधव वय 50 वर्षे यांना सुमारे एक वर्षांपासून दिसने बंद झाले होते यातच लोखंडी तारेने डोळ्यांना दुखापत झाली होती, त्यांना एक मुलगा आहे कु. संतोष जाधव हा किरकोळ आचारी काम करतो, श्रीमंत सईबाई सोसायटी जवळच कृषि उत्पन्न बाजार समितीचे गेट लगत सरकारी जागेवर एक पत्र्याचे शेड मध्ये हे छोटे कुटुंब राहते.
लोणंद शहरातील बसस्थानक परिसरात कचर्‍यातून भंगार गोळा करताना काही शालेय विद्यार्थी व युवक त्यांना चिडवुन द्यायचे तेव्हा अक्षरशः दगड घेऊन विद्यार्थी व युवकांचे पाठीमागे त्या धावायच्या यामुळे लोणंद च्या नागरिकांना माहिती /परिचित आहेत.

अंदाजे एक वर्षांचे आसपास श्रीमती शालन जाधव यांना भंगार गोळा करताना हळूहळू दिसायचे कमी होत गेले अत्यंत हालाकीची परिस्थिती असल्याने उदरनिर्वाह करणे जिकिरीचे होत असताना डोळ्यांवर औषधोपचार करने अवघडच असल्याने ते घरातच बसून राहायला लागल्या .
यातच कोरोना व्हायरस आटोक्यात आणण्यासाठी लाॅकडाऊन परिस्थिती समोर उभी राहिली यातुन आर्थिक संकटाला सामोरे जात असताना पुन्हा कधीच आपली लोकं व मुलगा दिसणार नाही व दैनंदिन जीवनातील घडामोडी हालाकित काढायला लागणार अशी परिस्थिती निर्माण झाली असताना याबाबतची माहिती साथ प्रतिष्ठाण चे अध्यक्ष कय्युम मुल्ला यांना समजली त्यांनी सुलोचना नेत्रालय लोणंद डॉ. देवदत्त राऊत सर यांचेशी संपर्क साधला व श्रीमती शालन जाधव यांच्या डोळ्यांची तपासणी केली, बाहेरून काही चाचण्या करायला सांगितल्या सदर पुर्वचाचण्या करण्यात आल्या त्या प्रमाणे आलेल्या रिपोर्ट नुसार सदर ऑपरेशन करणे गरजेचे होते व ते खुपच कठीण व खर्चिक होते, साथ प्रतिष्ठाणचे अध्यक्ष कय्युम मुल्ला व श्रीयुत नागराज चव्हाण यांनी डॉ. देवदत्त राऊत यांना समक्ष भेटीद्वारे सदर ऑपरेशन दरात सवलत मिळावी अशी विनंती केली त्याप्रमाणे विनंतीचा मान ठेवून त्यांनी ती मान्य केली व काही रक्कम द्यावी लागेल असे सांगितले ती संपुर्ण रक्कम साथ प्रतिष्ठाण वतीने लगेच आदा करण्यात आली व सदर ऑपरेशन तातडीने होऊन यशस्वी झाले, काही वेळाने डोळ्यांची पट्ट्या काढण्यात आल्या तेव्हा त्यांना विचारले गेले समोर कोण आहे तेव्हा साथ प्रतिष्ठाण चे अध्यक्ष कय्युम मुल्ला यांकडे पाहत माझा भैय्या आहे तसेच शेजारी मुलगा आहे असं सांगताच केलेल्या कार्याचे समाधान वाटले, श्रीमती शालन जाधव यांना डोळ्यांनी दिसु लागलेने चेहर्‍यावर मोठा आनंद दिसुन येत होता त्यांस जगण्याची उमेद मिळाली होती.

याकामी सुलोचना नेत्रालय लोणंद डॉ. देवदत्त राऊत, श्रीयुत नागराज चव्हाण, जावेद पटेल यांचे सहकार्य लाभले, साथ प्रतिष्ठाण चे अध्यक्ष कय्युम मुल्ला, सचिव मंगेश माने, उपाध्यक्ष दिपक बाटे, खजिनदार सचिन चव्हाण, दिपक जाधव,प्रतिक क्षीरसागर, सुनील जगताप आदींनी परिश्रम घेतले.

Categories
Uncategorized

ग्राहकांचे हक्क अबाधित राखण्यासाठी ग्राहक कायद्याचे महत्व अधिक: जिल्हाधिकारी डॉ.राजेन्द्र भोसले

राहुरी तालुका प्रतिनिधी ( जावेद शेख ) 26 डिसें ग्राहकांच्या हक्क अबाधित राखण्यासाठी राष्ट्रीय ग्राहक कायद्याचे महत्व अधिक आहे. या कायद्याच्या जागृतीबाबत प्रशासन आणि ग्राहक संरक्षणासाठी काम करणाऱ्या संस्थांची जबाबदारी अधिक असल्याचा सूर आजच्या राष्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उमटला. ग्राहक कायदयाचा हेतू आणि उद्देश समजावून घेऊन त्याबाबत ग्राहकांना माहिती मिळाली पाहिजे. तो ग्राहकांचा अधिकार असल्याचे प्रतिपादन यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी केले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचे पालन करीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले अध्यक्षस्थानी होते. जिल्हा ग्राहक संरक्षण मंचाचे अध्यक्ष न्या. व्ही.एस. प्रेमचंदानी, न्यायिक अधिकारी चारु डोंगरे, कायदेविषयक अभ्यासक प्रज्ञा हेंद्रे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी डॉ. भोसले म्हणाले, ग्राहकांच्या हितासाठी असणाऱ्या कायद्याची अंमलबजावणी करताना प्रशासनाची भूमिका खूप महत्वाची आहे. त्यामुळेच नव्या कायद्यात प्रशासनाला दिलेले अधिकारांचा वापर ग्राहकांच्या हितासाठी अधिकाधिक केला जाईल, यासाठी यंत्रणांनी पुढाकार घेतला पाहिजे. प्रशासनासोबतच ग्राहक चळवळीत काम करणाऱ्या संस्थांची जबाबदारी अधिक आहे. अधिकाधिक जनजागृती करुन, कायद्याची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवून त्यांना हक्काची जाणीव करुन देणे महत्वाचे आहे. सध्याच्या बदलत चाललेल्या परिस्थितीत ही भुमिका महत्वाची आहे. ग्राहकांनीही त्यांच्या हक्कांसाठी उपलब्ध असलेल्या व्यासपीठाचा उपयोग केला पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.

न्या. प्रेमचंदानी यांनी नवीन कायद्यातील तरतूदी आणि ग्राहकांच्या हक्कांबाबत त्याची अंमलबजावणी याबाबत सविस्तर विवेचन केले. नव्या ग्राहक कायद्यात प्रत्येक गोष्टीशी निगडीत बाबी समाविष्ट करण्यात आल्या आहेत. सध्या ईलेक्ट्रॉनिक पद्धतीने तसेच डिजीटल पद्धतीने व्यवहार वाढले आहेत. त्याबद्दलही नव्या कायद्यात ग्राहकांना संरश्रण तसेच फसवणूकीबद्दल दाद मागण्याची संधी असल्याचे त्यांनी सांगितले. ग्राहक संरक्षण कक्षाकडे दाखल झालेल्या दाव्यांच्या निराकरणाचे प्रमाण सुमारे 92 टक्क्यांहून अधिक असल्याचे त्यांनी नमूद केले.

श्रीमती हेन्द्रे यांनी सध्याचा कायद्याची व्यापक भूमिका स्पष्ट केली. सध्या ग्राहकांकडे क्रयशक्ती आहे. मात्र, खरेदी कौशल्य नसल्याने उत्पादक अथवा विक्रेत्यांकडून फसवणूक होण्याची शक्यता असते. या कायद्यान्वये अशा फसवणूक प्रकरणी दाद मागण्याचा हक्क ग्राहकांना मिळाल्याचे त्या म्हणाल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती माळी यांनी केले. यावेळी त्यांनी सादरीकरणाद्वारे कायद्याबाबत सविस्तर माहिती दिली.

ग्राहक संरक्षण अधिनियम 2019 हा दिनांक 20 जुलै 2020 पासून लागू करण्यात आला आहे., सध्याच्या बाजारातील ऑफलाईन आणि ऑनलाईन खरेदी करणारा ग्राहक अशी ग्राहकाची विस्तारित व्याख्या करण्यात आली आहे. जिल्हा ग्राहक आयोग आणि राज्य ग्राहक आयोगोत दाखल करावयाच्या दाव्यांच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. जिल्हा तक्रार निवारण आयोगात रुपये एक कोटीपर्यंत तर राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगात रुपये 10 कोटी तसेच राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगात रुपये 10 कोटीचे पुढील दावे दाखल करता येणार आहे. सुरुवातीच्या कायद्यात आधी विक्रेता किंवा सेवा जेथून घेतली असेल किंवा सेवा जेथून घेतली असेल तिथेच तक्रार दाखल करावी लागत होती. या कायद्यानुसार आता ग्राहक ज्या जिल्ह्यात राहत असेल तिथे तक्रार दाखल करता येणार आहे. कंपन्यांच्या भ्रामक व फसव्या जाहिरातींवर तक्रार आल्यास कारवाई करता येणार आहे.ई-फायलिंग हे या कायद्याचे वैशिष्ट्य असून तक्रारदार आता ऑनलाईन तक्रार दाखल करु शकतो तसेच सुनावणी, साक्षीपुरावे तपासणी यासाठी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहू शकतो.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सोनाली कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा पुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले. 

Categories
कोल्हापूर

ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूर महानगर तर्फे ‘ राष्ट्रीय ग्राहक दिन ‘ उत्साहात साजरा


कोल्हापूर- सुभाष भोसले
कोल्हापूर येथे ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या कोल्हापुर महानगर शाखेच्या वतीने सानेगुरुजी वसाहत केदारलींग बेकरी येथील पाटील हाॅल मध्ये ‘ राष्ट्रीय ग्राहक दिन ‘ साजरा करणेत आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा कायदेशीर सल्लागार अँड राजेंद्र वायगणकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष बी. जे. पाटील हे होते. सुरवातीला प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन मार्फत सल्लागार सुधाकर भदरगे यांनी महाराष्ट्र राज्य शासन आयोजित लोकसंवाद ऑनलाईन वेबीनारचे प्रक्षेपण स्क्रीनवर दाखवणेत आले. त्यानंतर मान्यवरांचे हस्ते फोटो पुजन करून महानगर सदस्या आरती पोतनीस यांच्या गणेश आराधनेने कार्यक्रमास सुरवात झाली…..!
सुरवातीला महानगर अध्यक्ष अशोक पोतनीस यांनी पाहूण्यांचे स्वागत केले. त्यानंतर अॅड वायगणकर यांनी ग्राहक संरक्षण कायद्याचे महत्व विशद करताना ग्राहक कायद्याची निर्मीती व २०१९ च्या सुधारीत कायद्याची तरतुदीची विस्तारीत माहिती दिली. यानंतर उपाध्यक्ष जगदीश पाटील यांनी ग्राहक पंचायतचे काम करत असताना खुप काही शिकायला मिळते असे अपले मनोगत व्यक्त केले.यानंतर सल्लागार राजन पाटील यांनी ग्राहक पंचायतचे काम उत्कृष्ट पध्दतीने सुरू असून सदर कामाची व्याप्ती वाढत असून आपण बॅक, आरोग्य, राशन, शैक्षणिक, विज वितरण आशा विविध कामाच्या कमिटी नेमून कामं करणेचा सल्ला दिला. अध्यक्ष बी. जे .पाटील यांनी थोडक्यात केलेल्या कामाचा आढावा सांगीतला व ग्राहक पंचायतच्या माध्यमातून पदाधिकारी यांनी वर्षभर कोणते कार्यक्रम कशा पद्धतीने राबवायचे यांचे यांची सविस्तर माहिती दिली.
यानंतर उपस्थितीत पदाधिकारी यांना महानगर तर्फे प्रशस्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन महानगर अध्यक्ष अशोक पोतनीस, सचिव सचिन गणबावले, उपाध्यक्ष ई.जी.खोत यांनी केले. यावेळी महानगरचे नुतन सदस्य पदी सत्वशिल खाडे यांची निवड झाले बद्दल पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक पोतनीस यांनी केले व आभार दिप्ती कदम यांनी मानले यानंतर प्रीती भोजनाचा कार्यक्रम पार पाडून कार्यक्रमाची सांगता झाली…!
यावेळी जिल्हा सचिव दादासो शेलार, जिल्हा संघटीका पूनम देसाई, जिल्हा सदस्य संजय पोवार, इचलकरंजी अध्यक्ष सुरेंद्र दास, करवीर अध्यक्ष यशवंतराव शेळके, महानगर पदाधिकारी मणीषा जाधव, प्रज्ञा यादव, प्रसन्नता चव्हाण, तानाजी पाटील, इचलकरंजीचे पदाधिकारी लालचंद पारीख, सुरेश सारवडे, संजय शिरदवडे, अशोक ठोमके, अमोल पराडकर, निळकंठ देसाई, शिवाजी पाटील, अक्षय पोतनीस इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते…..!

Categories
कोल्हापूर हातकणंगले

सुभेदार राजेश सूर्यवंशी यांचा सेनादलातील सेवा निवृत्ती सोहळा मा.कॅप्टन गणपतराव घोडके यांच्या उपस्थित संपन्न

शिरोली गावचे सुपुत्र सुभेदार  राजेश आबासाहेब सूर्यवंशी यांनी सेनादलात सिग्नल रेजिमेंट मध्ये प्रामाणिकपणे 30 वर्षे देश सेवा केली .करत असताना प्राथमिक व माध्यमिक शिक्षण शिरोली येथे झाले.व त्यानंतर त्याचें मामा यांच्या प्रेरणेने मुळातच खिलाडू वृत्ती व देशसेवेने प्रेरणीत झालेले राजेश  1999 ला सेना दलामध्ये भरती झाले .भरती झाल्यापासून  भारत देशामधील विविध बॉर्डर वर सिग्नल रेजिमेंट या पदावर  काम केले .या वेळी पाकिस्तान , लढाख ,चीन ,दिल्ली ,जम्मू काश्मीर, व वाघा बॉर्डर वर प्रामाणिक पणे सेवा 30 वर्षे सेवा बजावली . श्री राजेश सूर्यवंशी यांची डिसेंबर महिन्यामध्ये सेवा निवृत्ती झाली असून त्या प्रसंगी विशेष असा गौरव सत्कार विश्ववारणा पब्लिक स्कूल (सैनिकी पॅटर्न )शाळेचे संस्थापक कॅप्टन गणपतराव घोडके यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी प्रा.संभाजी पाटील व श्री.शशिकांत खवरे (सरपंच, शिरोली) तसेच श्री.महेश चव्हाण ( माजी जि. प.सदस्य) ,श्री राजेश पाटील (हातकणंगले तालुका भाजप अध्यक्ष) या मान्यवरांनी आपल्या राजेश सूर्यवंशी यांच्या विषयीच्या देशभावना ,आठवणी व संस्कार याविषयीचे मनोगत व्यक्त केले.     
याप्रसंगी त्यांच्या आई श्रीमती शांताबाई सूर्यवंशी तसेच पत्नी सौ सुनीता सूर्यवंशी तसेच दै. सकाळचे मेकॅनिकल विभागाचे  त्यांचे भाऊ श्री .महेश सुर्यवंशी , तसेच त्यांच्या पत्नी , मुले व मुली, व पुतणे  , चुलते, बहीण ,दाजी व आत्या तसेच  श्री .शिवाजी पाटील (उद्योगपती) ,श्री सुरेश यादव (डे. सरपंच ),श्री प्रकाश कंवदाडे , श्री.अनिल खवरे , श्री विठ्ठल पाटील , श्री राजू यादव तसेच सूर्यवंशी व मित्र परिवार प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री राजेश येसुगडे यांनी केले. हा कार्यक्रम सतेज पाटील मल्टीपर्पज हॉल , बावडा या ठिकाणी दि .२३/१२/२०२० रोजी सायंकाळी 6 वाजता सामाजिक, राजकीय ,शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील आजी-माजी सेनादलातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

Categories
मुंबई

नवी मुंबईतील विकास कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

सिडको आणि महापालिकेने समन्वयातून नवी मुंबईचे विकास प्रकल्प वेळेत करावेत- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

विरेंद्र म्हात्रे नवी मुंबई प्रतिनिधी : नवी मुंबईतील विविध विकास कामांचा आढावा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. पाम बिच ट्रॅक, ज्वेल ऑफ नवी मुंबई, गवळ देव वन पर्यटन प्रकल्प, ऐरोलीतील धर्मवीर आनंद दिघे मैदान या सारखे प्रकल्प लवकरात लवकर पुर्ण करुन नागरिकांना त्याचा लाभ द्यावा असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीस नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. राजीव, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर आदी उपस्थित होते. नवी मुंबईतील घनसोली येथे राखीव भुखंडावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्पोर्टस कॉम्प्लेक्स बांधण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. यासंदर्भातील तांत्रिक बाजू पूर्ण करुन नवी मुंबई महापालिकेने सिडकोकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. नवी मुंबईला जोडणारा आणि ठाणे-बेलापूर रस्त्याला पर्यायी ठरणारा कोस्टल रोडला जोडणाऱ्या प्रकल्पाच्या कामाबाबत यावेळी चर्चा झाली. संपुर्ण नवी मुंबई विमानतळ आणि इतर शहरांना जोडणारा कोस्टल रोड हा प्रकल्प पूर्ण झाल्यास त्यामुळे वाहतूकीचा ताण कमी होईल, असे नगरविकास मंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले. घनसोली, ऐरोली उर्वरित रस्त्यावर खाडीपुल बांधण्याबाबतच्या प्रकल्पाचा आढावा यावेळी घेण्यात आला. या संदर्भात सिडको आणि नवी मुंबई महापालिका या दोन संस्थांनी समन्वयातून तांत्रिक बाबी पूर्ण कराव्यात असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. हा महत्वाचा प्रकल्प असून प्रलंबित रस्ता पूर्ण झाल्यास नागरिकांना दिलासा मिळेल. सीआरझेड आणि कांदळवन महत्वाचा विषय असून कांदळवन सुरक्षित ठेऊन पुढे जाता येईल अशा पद्धतीने काम करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Categories
Uncategorized

रेशनवर धान्य नको खात्यात पैसे_टाका

पाटण हिंदू सम्राट प्रतिनिधी उमेश सुतार यांजकडून

दिल्लीत चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे मुळ धान्याच्या सरकारी खरेदीत लपले आहे. धन्याची सरकारी खरेदी का केली जाते? तर स्वस्त धान्य दुकानांवर गोर गरिबांसाठी जी धान्य वाटपाची योजना राबवली जाते त्यासाठी ही खरेदी केली जाते. शिवाय थोड्या प्रमाणात बफर स्टॉक नावाने सरकारी खरेदी केली जाते.

ही वेळ का आली? दुसर्‍या महायुद्धानंतर जगभरच अन्नधान्याची चणचण भासत होती. इंग्रजांनी त्यांच्या सोयीसाठी सैन्याला पुरवण्यासाठी म्हणून धान्य खरेदी व वितरण योजना आणली. ज्याला आपण रॅशनिंग म्हणून ओळखतो. रॅशनिंग व नंतरच्य काळातील लेव्ही ही सगळी तत्कालीन सरकारी योजनांची सोय होती.

भारत स्वतंत्र झाल्यावरही धान्याची उपलब्धता पुरेशी नव्हती. सगळ्या जनतेला पोसायचे म्हणजे परदेशांतून धान्य आयात करण्याशिवाय पर्याय नव्हता. या सगळ्या आपत्तीच्या काळात स्वातंत्र्यानंतरही लोकांना जगविण्यासाठी रॅनशनिंग व्यवस्था टिकून राहिली.

1965 च्या हरितक्रांती नंतर हळू हळू देश धान्याच्या बाबत स्वतंत्र बनला. गेल्या 50 वर्षांतील एकूणच धान्य उत्पादन लक्षात घेता देशात अतिरिक्त धान्याची समस्या आता निर्माण झाली आहे. म्हणजे स्वातंत्र्य मिळाले त्यापेक्षा अगदी उलटी विपरित अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे.

अन्नधान्य महामंडळाकडे एकुण गरजेनुसार 412 लाख टन अन्नधान्याचा साठा करण्याची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात 970 लाख टनापेक्षा जास्तीचा साठा सध्या होवून बसला आहे. म्हणजे गरजेच्या दुप्पट सव्वादोनपट धान्य उपलब्ध आहे.

मग अशा परिस्थितीत ही खरेदी योजना राबवायचीच कशासाठी? काय म्हणून सर्वसामान्य करदात्यांचा पैसा यात वाया घालवायचा? हा सगळा अतिरिक्त गहु तांदूळ खुल्या बाजारात गेलेला बरा. काय म्हणून तो सरकारी गोदामात सडू द्यायचा?

आता आंदोलन करणारे आणि त्यांना पाठिंबा देणारे या प्रश्‍नाचे चुकूनही उत्तर द्यायला तयार नाहीत. गहु तांदळासारख्या पाणी खाणार्‍या पिकांवर एरव्ही टीका करणारे पर्यावरणवादी आता चुप आहेत. भाताचे तुस जाळण्याने प्रदुषण होते म्हणणारे पर्यावरणवादी आता त्याच तांदळाच्या शेतकर्‍याच्या पाठीशी कसे काय उभे आहेत? बागायतदार बडे शेतकरी अशी थट्टा करणारे आणि शेतकरी आंदोलनावर टीका करणारे डावे आज या पाणीवाल्या बड्या बागायतदार गहु तांदूळवाल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाची बाजू काय म्हणून लावून धरत आहेत? हा बौद्धिक भ्रष्टाचार राजरोसपणे चालू आहे.

हा सगळा विवाद मुळातूनच सोडवायचा असेल तर आधी रॅशनवर धान्य वाटप याला पर्याय शोधला पाहिजे. स्वयंपाकाचा गॅस आणि त्याची सबसिडी हा एकेकाळी मोठा डोकेदुखीचा विषय होवून बसला होता. ही सबसिडी पूर्णत: कमी करून सिलिंडरच्या किंमती बाजार भावाप्रमाणे सरसकट करण्यात आल्या. जे खातेधारक असतील त्यांच्या खात्यात ती सबसिडीची रक्कम जमा करण्याची योजना शासनाने राबविली. ज्या लोकांना शक्य आहे त्यांच्यासाठी सबसिडी परत करणे म्हणजेच ‘गिव्हअप’ योजना आणण्यात आली. या सगळ्याचा सकारात्मक परिणाम म्हणजे खोटे बनावट खाते उघडकीस आले. नविन गरजूंना गॅस जोडण्या पुरवता आल्या. सरकारचे पैसे वाचले. ग्रामीण भागातील प्रदुषण वाचले. आता स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडर सहजपणे उपलब्ध होत आहे. त्याच्या काळाबाजाराला आळा बसला. सामान्य लोकांची आणि सरकारचीही या सर्व गैरव्यवहारातून सुटका झाली.

आता हाच विचार रॅशनवरील धान्य वितरणाचा केला पाहिजे. जेंव्हा धान्य उपलब्ध नव्हते, भूकेने लोक व्याकूळ होते तोपर्यंत जूनी यंत्रणा राबविणे यात एक नैतिकता तरी होती. पण आता मोठ्या प्रमाणात धान्याची उपलब्धता. त्यासाठी रॅशनवर प्रत्यक्ष धान्य वाटपाची गरज शिल्लक राहिली नाही. दारिद्र्य रेषेखालील लोकांना पर्याय देण्यात यावा. ज्यांना धान्याच्या ऐवजी त्यांच्या खात्यात पैसे हवे आहेत त्यांची वेगळी यादी करण्यात यावी. अशा लोकांच्या जनधन खात्यात रक्कम जमा करण्याचा सोपा सुटसुटीत पर्याय निवडण्यात यावा. जेणे करून भारतीय अन्नधान्य वितरण व्यवस्थेवरचा ताण कमी होईल. ही धान्य सबसिडी सरळ पैशाच्या रूपात गरिबांच्या खात्यात जमा करणे सरकारी यंत्रणेला सहज शक्य आहे. तसे प्रयोग विविध योजनांसाठी सरकारने राबविले आहेतच. शिवाय ज्यांना धान्यच हवे आहे त्यांच्यासाठी ही यंत्रणा अबाधीत ठेवल्या जावी.

दुसर्‍या बाजूने शेतकर्‍यांनाही याचा फायदा देता येवू शकतो. शेतकर्‍यांकडून धान्य खरेदी करण्यापेक्षा त्यांच्याही खात्यात काही एक रक्कम धान्य सबसिडीची जमा करण्यात यावी. वाचलेली सर्व रक्कम ग्रामीण भागात रस्ते आदी संरचनांसाठी खर्च करण्यात यावेत. या सगळ्यांचा सकारात्मक परिणाम काही दिवसांतच दिसू शकतो. जसा की गॅस सिलिंडरच्या बाबत दिसून येतो आहे.

एक तर यामुळे शेतमालाची बाजारपेठ खुली होवून जाईल. त्यातील सरकारी हस्तक्षेप संपून जाईल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतमालाचा होणारा काळाबाजार संपून जाईल. सरकारी यंत्रणेवर- तिजोरीवर पडणारा ताण संपूष्टात येईल.

नविन योजनेत सर्वच कोरडवाहू गरिब शेतकर्‍यांचा फायदा होईल. शिवाय गोरगरिबांपर्यंत पोचणारी मदत थेटपणे पोचू शकेल. त्यातील गैरव्यवहाराला आळा बसेल.

आजपर्यंत रॅशनिंग व्यवस्थेत गहू आणि तांदूळ या दोन पाण्यावरच्या पिकांनाच काही एक फायदा (ज्यांना हा फायदा होतो आहे असे मानायचे त्यांच्यासाठी) मिळत होता. ही व्यवस्था बंद करून हेच पैसे शेतकर्‍यांच्या खात्यात द्यायचे म्हटले तर सर्वच शेतकर्‍यांना समान पद्धतीने ही मदत पोचवता येईल.

मुळात शेतकर्‍याला देण्यात येणारी जी काही सबसिडी आहे ती सरळ त्याच्या खात्यातच जामा करण्यात यावी. त्याला वीज फुकट नको, त्याला खते फुकट नको, त्याच्या धान्याची खरेदी नको, त्याला आयकरातून सुट नको. कसलाच भीकवाद नको. शेतमालाचा बाजार खुला असावा. देशातील इतर नागरिकांप्रमाणेच ताठमानेने त्यालाही जगायचे आहे. इतर देशांमध्ये शेतीवर अवलंबून असणारी लोकसंख्या कमी आहे. पण आपल्याकडे अजूनही बहुसंख्य लोक शेतीवरच जगतात. त्यामुळे शेतमालाची बाजारपेठ खुली करणे ही बाब बहुसंख्य लोकांच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम करू शकते.

आज पंजाब हरियाणाचे जे शेतकरी दिल्लीत आंदोलन करत आहेत त्यांना वीज फुकट आहे. मग देशातील इतर शेतकर्‍यांना ती फुकट का दिली जात नाही? याच शेतकर्‍यांच्या मालाला एक प्रकारे संरक्षण दिले गेले आहे. ते देशातील इतर शेतकर्‍यांना का नाही? आज जे डावे हे शेतकरी आंदोलन बळकावून बसले आहेत आणि आडमुठपणाने मागण्या समोर करत आहेत त्यांच्या केरळ राज्यात कृषी उत्पन्न बाजार समिती का अस्तित्वात नाही? डाव्यांचा बालेकिल्ला राहिलेल्या त्रिपुरात एम.एस.पी.का अस्तित्वात नाही? डाव्यांचा गढ राहिलेल्या पश्चिम बंगालात एम.एस.पी. प्रमाणे किती शेतमाल खरेदी केली जाते?

स्वस्त धान्य दुकान बंद झाल्याने सर्वांचाच फायदा होवू शकतो. गरिबांच्या खात्यात थेट रक्कम आल्याने त्यांना फायदा होवू शकतो आणि सरकारी यंत्रणेवरील ताण कमी झाल्याने इतर कामांकडे सरकार लक्ष देवू शकते. या सगळ्याचा विचार करून धान्याची सरकारी खरेदी योजना बंद करण्यात यावी. आपत्कालीन परिस्थितीत सरकारला जेवढा धान्यसाठा हवा आहे तो सरकारने खुल्या बाजारातून खरेदी करावा. त्याची खुली निविदा काढून पुरठवादारांना सरकारी गोदामापर्यंत धान्य पोचविण्यास सांगण्यात यावे.

सध्याचे आंदोलन पूर्णत: डाव्यांनी बळकावले आहे. दुसर्‍यांचे भले करण्याचे समाजवादी नशेचे व्यसन अतिशय भयानक असे आहे. ते सहजा सहजी जात नाही. त्यासाठी कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. पु.ल. देशपांडे म्हणाले होते. ‘मोहाचा त्याग सहज शक्य आहे पण त्यागाचा मोह मात्र आवरत नाही’ तशा या समाजवादी गरिबांचे कल्याण करणार्‍या योजना आहेत. या त्यागाचा मोह सरकारी पातळीवर आवरला गेलाच पाहिजे.

Categories
Uncategorized

सोलापुरच्या सिद्ध रामेश्वरयात्रेचं राजकारण नको – अविनाश कुलकर्णी

( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी:लक्ष्मण राजे )

सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रा यंदा कोरोना पार्श्वभूमीवर कशापध्दतीनं होईल याची चर्चा गेली अनेक दिवस सुरू आहे. प्रशासनाकडून सिद्धेश्वर यात्रा पंचकमिटीला किंवा इतर मानकरी यांना याबाबत अधिकृतपणे अद्याप कोणतीही माहिती पाठवली गेलेली नाही. मात्र प्रशासनाने यासंबंधीचा एक आराखडा तयार करून तो मंजूरीसाठी शासनाकडे सादर केला आहे. कोरोना पार्श्वभूमीवर देशातील आणि महाराष्ट्रातील अनेक सण-उत्सव अगदी शेकडो वर्षाची परंपरा असलेले धार्मिकविधी कार्यक्रम मग ते कोणत्याही जाती-धर्माचे असोत यावर प्रतिबंध आले आहेत. सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ मंदिर बंद होती. अनेकांनी घरांमध्ये प्रार्थना केल्या. देवदेवतांचे उत्सव घराच्या उंबर्‍याच्या आत साजरे केले. अलीकडच्या काळात काही नियमावली घालून मंदिर प्रार्थनास्थळ सुरू करण्यात आली आहेत. उत्सव विधीनाही परवानगी देण्यात आली आहे पण बंधने आहेतच. सहा महिने मंदिर बंद होती पण नित्य नियमित पूजाविधी किंवा अन्य धार्मिक कार्यक्रमांना बंदी नव्हती. सरकारला कोणत्याही प्रकारची बंदी लादण्यात स्वारस्य नाही. सरकारने कुठल्या धर्माला, जातीला झुकतं माप दिलं आहे असंही नाही. जीव वाचवण्यासाठी प्राधान्य दिलं आणि लॉकडाऊन किंवा संचारबंदी लावताना कठोर निर्णय घेतले. अर्थात जनतेनही त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. अपवादात्मक घटना वगळता सर्वांनी प्रशासनाचे नियम पाळले. सिद्धेश्वर महायात्रेतही असंच झालं पाहिजे. जरी अनेक वर्षाची परंपरा असली तरी गर्दी होणारे सोपस्कार विधी टाळले गेलेच पाहिजेत. आमचा धर्म, आमचं मंदिर, आमची परंपरा हे सारे बोलण्यासाठी ठीक आहे. पण आपल्या या रुढी परंपरेत आपणच सहभागी होणार आणि आपलेच आरोग्य बिघडणार याची भीतीही आहेच. आवश्यक विधी करण्यास कोणतीही बंदी नाही. ठराविक लोकांच्या उपस्थितीत याला परवानगी मिळेलच. खरंतर पंचकमिटी असो किंवा पुजारी मानकरी असून या सर्वांनी यंदा धार्मिक विधीस परवानगी मागितली आहे. संपूर्ण जत्रा-यात्रा भरण्यास परवानगी मागितलेली नाही. अक्षता सोहळा आणि होमविधी सारखे कार्यक्रम ठराविक मानकरी यांच्या उपस्थितीत पार पाडता येतील. विविध वाहिन्यांवर हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येईल अशी सुविधा करून घ्यावी. विज्ञानाने हे साध्य झालं आहे. एखाद्या वर्षी आपण एखाद्या धार्मिक विधीत सहभागी झालो नाही तर धर्म बुडत नाही. पापही लागत नाही. आपला देव आपल्या भक्तांना जाणून असतो. त्याला सध्य स्थिती ज्ञात आहे. यामुळे या विषयाला सिद्धरामेश्वराच्या भक्तांनी कोणत्याही धार्मिक अथवा राजकीय स्वरूप येणार नाही याची काळजी घ्यावी. पुढील वर्षी आपण याहीपेक्षा आनंदात, मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा करू शकतो. इतर सर्वांनी आजवर नियम पाळले आहेत. आपण नियम, कायद्यापेक्षा मोठे नाही. या समाजाचेच एक भाग आहोत. परंपरा जाणीवपूर्वक कोणी खंडित करत नाही. त्यामागचे कारणही तितकेच महत्त्वपूर्ण आहे. या मुद्द्यांचा विचार सार्वत्रिकपणे करावा. प्रशासनानेही नियमावली लादू नये. लोकांचं यानिमित्ताने प्रबोधन करावे. अनेकदा लोक कायद्याचा सन्मान करण्यासाठी तयार असतात त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते. कोरोना काळात घरात बसलेल्या लोकप्रतिनिधी, पुढार्‍यांनी आता या मुद्द्यावर राजकारण करण्यासाठी घराबाहेर पडू नये. बैठका लावणे, चर्चा घडविणे यासाठी काही पुढार्‍यांची लगबग सुरु आहे. हे कशासाठी हे सारेजण जाणत आहेत.

Categories
Uncategorized

विभागीय आयुक्तांच्या आदेशाला सहकारी बँका , पतसंस्था, वित्तीय संस्था आणि पतपेढ्याकडून कोलदंडा

कमलेश शेवाळे /अहमदनगर प्रतिनिधी

अहमदनगर दि-२५ (प्रतिनिधी)- पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यां दिनांक १ऑक्टोबर २०२० रोज शासकीय परिपत्रक क्र-सा. प्र.१/आर आर/११५१/२०२० काढून सर्व बँका, पतसंस्था, पतपेढी यांना स्पष्टपणे वसुलीबाबतचे आदेश दिलेले असताना या आदेशाला कोलदंडा देण्याचे काम या बँका, पतसंस्था आणि पतपेढी यांच्याकडून केले जात आहे. या आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे की ,कर्जाच्या वसुली साठी कोणत्याही सर्व सामान्य जनतेला वा कर्जदाराला वेठीस धरू नये,त्यांचा मानसिक , शारीरिक, त्रास देऊ नये तरी पण या बँका ,पतसंस्था, पतपेढ्या या विनंती पत्र,स्मरण पत्र आणि चर्चासत्राच्या गोंडस नावाखाली मनमानी आणि बेमालूमपणे कर्ज वसुली करत आहे.
कोरोनामुळे आधीच लोकांची आर्थिक परिस्थिती बिकट असताना जर या बँका, पतसंस्था, पतपेढ्या उर्मटपणा करत असतील तर याना वेळीच चाप लावला पाहिजे. या बँका, पतसंस्था, पतपेढ्या आम्हाला विभागीय आयुक्त यांचा आदेश लागू होत नाही असे उडवा उडवीचे उत्तरे देतात. विभागीय आयुक्त आम्हाला माहिती नाही असे टोलवाटोलवी करत आहेत. लॉकडाऊन संपले म्हणजे लगेचच काय लोकांकडे पैशाचा महापूर आला आहे असे या बँक ,पतसंस्था ,पतपेढ्या यांना वाटत आहे.यांनी परत लोकांना मानसिक त्रास, धमकी, कायदेशीर कारवाई , छळवणूक चालू केली आहे.अश्या या मुजोर बँकांना , पतसंस्था आणि पतपेढ्या याना वेळीच शासनाने लगाम घालावा ,अशी मागणी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती राष्ट्रीय अध्यक्ष दिपक कांबळे यांनी राज्यशासनाकडे केली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी लवकरात लवकर राज्य शासनाने परिपत्रक काढून ते वर्तमानपत्रा मध्ये जाहीररीत्या प्रकाशित करावे कारण शासनाचा कोणताच आदेश सर्वसामान्य जनतेला माहीत नसतो याचाच गैरफायदा या बँका, पतसंस्था ,पतपेढ्या घेत असतात. काही बँका, पतसंस्था तर जळू लागल्याप्रमाणे सर्व सामान्य जनतेला भरमसाठ व्याज घेऊन लुटत आहे .याला कुठे तरी पायबंद घातला गेला पाहिजे.
लॉकडाऊन कालावधीमध्ये किती बँका, पतसंस्था, पथपेढ्या यांनी शासनाला आर्थिक मदत केली हा संशोधनाचा विषय आहे. प्रत्येक वेळी शासनच यांच्या पाठीशी उभे राहत असते ,मग या बँका , पतसंस्था, पथपेढ्या जर शासनाचा आदेश पाळत नसतील तर यांचा परवाना रद्द करावा अशीही मागणी दिपक कांबळे यांनी केली आहे.कारण जर शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार आणि रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार जर या बँका, पतसंस्था, पतपेढ्या चालत नसतील तर यांच्यावर कठोर कारवाई शासनाने करावी . तसेच जिल्हाधिकारी यांनी दरमहा जिल्हा अग्रणी बँकेसह सर्व बँकांच्या प्रतिनिधीची जिल्हास्तरीय शासकीय अधिकाऱ्यासोबत बैठक घेऊन याबाबत वेळोवेळी आढावा घ्यावा अशी मागणी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

Categories
Uncategorized

पट्टण कोडोली येथे एस. टि. च्या इंजिनला शाँर्ट सर्कीटने लागली आग


हिंदुसम्राट प्रतिनीधी
दिपक सुतार
पट्टण कोडोली
25-12-2020 1-15
पट्टण कोडोली येथील नविन बसस्थाक परिसरामघ्ये भर रस्त्याच हुपरी रंकाळा एस टि च्या इंजिनला अचानक आग लागुन धुरांचे लोट वाहु लागल्याने तेथील उपस्थीतांची चांगलीच भांबेरी उडाली आज दुपारी रंकाळा स्टँन्ड मधुन दुपारी 12वाजता सुटलेली एम एच 40-8893हि गाडी हुपरी येथे 1वाजता पोहचते पट्टण कोडोली येथील बसस्थानका जवळ येताच या गाडीच्य इंजिनने पेट घेतले प्रसंग धाव म्हणुन मनसे शहराध्यक्ष रवि आडके नागरीक जहांगीर जमादार,अशोक दिगडे,संभाजी कणसे,प्रशांत डावरे यांनी कोणताही विलंब न लावता मिळेल त्या हाँटेल मधील पाण्याच्या घागरी बादलीच्या सहाय्याने आग विझवली यामधे चालक वाहक यानीं हि आपले चोख कर्तव्य बजावत एस टी थेट कन्या विध्या मंदिर मराठी शाळेच्या पटागंनात नेली सगळ्यात महत्वाचे कि या एस टी च्या अवघ्या दहा फुटावरच एक सिलेंडर डिलेवरीचा ट्रक थांबलेला या लागलेल्या आगीचा झळामुळे मोठा धोका होता या तरुण व चालक वाहक तसेच मनसे शहराध्यक्षानीं हा अनर्थ हाणुन पाडला या केलेल्या रेस्क्युचे आभार व कौतुक होउ लागले

Categories
Uncategorized

सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त ब्लॅंकेट वाटप

करवीर पूर्व : प्रतिनिधी : गजानन रानगे

  • सामाजीक न्याय मंञी आणि आरपीआय चे राष्ट्रीय अध्यक्ष नाम.रामदासजी आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त आरपीआयच्या वतीने गांधीनगर येथे वसाहत रुग्नालयात ब्लँकेट आणि फळे वाटप तर तावडे हॉटेल चौक येथे मिठाई आणि फळे वाटप करण्यात आले.
  • केंद्रीय सामाजीक न्याय मंञी आणि आरपीआय आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष नाम.रामदास आठवले यांच्या वाढदिवसा निमित्त युवा जिल्हा अध्यक्ष अविनाश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गांधीनगर वसाहत रुग्नालयाला 100 ब्लँकेट देण्यात आले.तर रुग्नांना फळे वाटप करण्यात आली.प्रेम प्रकाश मंदिर फरीसरातील फिरस्ते,महीला हमाल यांनाही ब्लँकेट आणि फळ वाटप करण्यात आली.यावेळी अंकुश वराळे,नितिन कांबळे ,कुमार भोसले,तानाजी इंगवले ,दादु कोगले,सतिश बळे उपस्थित होते.
    दरम्यान तावडे हॉटेल चौकातही फिरस्ते,प्रवाशी यांना फळे आणि मिठाई आरपीआयचे जिल्हा नेते सतीश माळगे यांचे हस्ते वाटप करण्यात आले.यावेळी सतीश माळगे यांच्या हस्ते केक कापण्यात आला.यावेळी सतीश यादव,किरण नामे , दिनकर कांबळे आप्पा मोरे उमेश माने सुशांत खाडे, विशाल कांबळे, प्रदीप ढाले सिद्धार्थ रणपिसे अमर कांबळे, विजय कांबळे यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त आरपीआयच्या वतीने रुग्णांना ब्लॅकेट, फळे वाटप करण्यात आली.
Categories
कोल्हापूर हातकणंगले

आळते गावातील ‘ रेणुका ‘ देवीची यात्रा रद्द

हातकणंगले प्रतिनिधी –
कोविड -19 या विषाणूजन्य आजाराचा फैलाव व केंद्र आणि राज्य शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या निर्देशानुसार आळते ता हातकणंगले येथे दि 28-12 – 2020 ते 30 -12 2020या कालावधीत भरणारी
‘ रेणुका ‘ देवीची यात्रा रद्द करण्यात आली आहे.या बाबतचे निर्देश तहसीलदार हातकणंगले यांनी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनास दिले आहे.
प्रतिवर्षीप्रमाणे रेणुका देवीची यात्रा भरवणे संबंधि स्थानिक प्रशासनाच्या वतीने तहसीलदार हातकनंगले यांच्याकडे मार्गदर्शन मागितले होते त्या अनुषंगाने यात्रेच्या निमित्ताने होणारी गर्दी व कोविड -19 या विषाणुजन्य आजाराचा फैलाव रोखण्यासाठी ही परवानगी नाकारण्यात आली आहे.याबाबतच्या पत्राद्वारे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने स्थानिक प्रशासनाला कळविण्यात आले आहे.
रेणुका यात्रेसाठी संपूर्ण महाराष्ट्रासह, कर्नाटक ,आंध्रप्रदेश या राज्यातून लाखो भाविक लोक मोण्या प्रमाणात येत असतात.

…………

Categories
Uncategorized

प्रांत ग्राहक सरक्षणच्या राज्य प्रभारी विदया रमेश चव्हाण यांना ज्ञानसंकल्प सामाजिक संस्थेचा राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला नारीरत्न गौरव पुरस्कार प्रदान


  • कोल्हापूर- सुभाष भोसले
    प्रांत ग्राहक संरक्षणच्या महाराष्ट्र गोवा दिव दमन च्या राज्य प्रभारी सौ विद्या चव्हाण यांना ज्ञानसंकल्प सामाजिक संस्था, दौंड, जि. पुणे यांच्यावतीने या वर्षीचा प्रतिष्ठेचा ‘ राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष,माजी आमदार रमेशअप्पा थोरात, विद्यमान आमदार राहूल कुल, राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष सोहेल शेख यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
    सौ विद्या चव्हाण यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन ज्ञानसंकल्प सामाजिक संस्थेच्यावतीने पुरस्कार देण्यात आला.
    याप्रसंगी शिवसेना जिल्हाध्यक्ष डॉ. राजेंद्र काळे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, मनसे तालुकाध्यक्ष सचिन कुलथे, कोजिमाशिचे माजी अध्यक्ष हिंदुराव पाटील, मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनायक दोरगे, ज्ञानसंकल्प संस्थेचे अध्यक्ष सदाशिव रणदिवे, प्रदेश उपाध्यक्षा रोहिणी पवार, सुभाष भोसले, दिपक जाधव, प्रा दिनेश पोवार आदी मान्यवर उपस्थित होते. श्री जितेंद्र सावंत यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान करताना माजी आमदार रमेशअप्पा थोरात, राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष सोहेल शेख,शिवसेना जिल्हाध्यक्ष डॉ. राजेंद्र काळे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, आदी.
Design a site like this with WordPress.com
Get started