Categories
शैक्षणिक

10वी, 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी सह्याद्री चॅनेलवर 15 मार्चपासून पुन्हा विषयनिहाय तासिकांचे आयोजन


पाटण हिंदू सम्राट प्रतिनिधी उमेश सुतार यांजकडून
महाराष्ट्रामध्ये दिवसागणिक कोरोना बाधितांची रूग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातही शाळा, कॉलेजेस पुन्हा बंद करण्याचा निर्णय झाला आहे.
या निर्णयामुळे यंदा बोर्डाची परीक्षा देणार्‍या 10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून आता सरकार एक पाऊल पुढे आले आहे.
शिक्षण विभागाकडून आता पुन्हा 10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी डीडी सह्याद्री वर विषयनिहाय तासिकांचे आयोजन करण्यात आले आहे. 15 मार्च पासून सह्याद्री चॅनेलवर विद्यार्थ्यांना विशेष कार्यक्रम पाहता येणार आहे.

Categories
कोल्हापूर हातकणंगले

वाचन, मनन व चिंतन यामुळे मनुष्य समृद्ध बनतो :श्री.वसंत भागवत

वाचन,लेखन व संभाषण-एक कला या विषयावर बोलताना श्री.वसंत भागवत सोबत प्राचार्य डाॕ.अर्जुन राजगे व श्री.अजितकुमार कांबळे

रुकडी ( दि. ११-३-२०२१ प्रशांत भोसले) वाचनामुळे आपल्यामध्ये सर्जनशीलता व परिवर्तनशीलता यांना वाव मिळतो वाचनामुळे विचार करण्याचे व विचार मांडण्याचे कौशल्य विकसित होत असते. वाचन, मनन व चिंतन यामुळे मनुष्य समृद्ध बनतो. नेहमीच दर्जेदार पुस्तके वाचण्याचा प्रयत्न करा, दर्जेदार पुस्तके ही आपणाला प्रेरणा देण्याचे काम करतात त्यामुळे आपले जीवन बदलू शकते. केवळ वाचन करू नका तर त्या वाचनाचा आस्वाद घ्या असे मत जयवंत महाविद्यालय इचलकरंजीचे ग्रंथपाल श्री.वसंत भागवत यांनी व्यक्त्त केले. ते येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या वाचन, लेखन व संभाषण – एक कला या विषयावरील व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अर्जुन राजगे होते.स्वागत व प्रास्ताविक ग्रंथपाल श्री.अजितकुमार कांबळे यांनी केले.श्री.भागवत यांनी आपल्या भाषणात लेखना विषयी माहिती दिली तसेच भाषण कौशल्य विकसित करण्यासाठी विविध उदाहरणे देऊन श्रवणीय भाषण कसे करावे याचे विवेचन केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.अर्जुन राजगे म्हणाले वाचन, लेखन व संभाषण हे हेतू निगडीत असावे. यशस्वी कहाण्यांच्या वाचनातून आपणास संदेश मिळतो परंतु अयशस्वी कहाण्यांमधून यशाचा मार्ग सापडतो.आज वाचनासाठी विविध साहित्य आपणाला उपलब्ध आहे, त्यामुळे वाचनामध्ये कथा, कादंबऱ्या, आत्मकथा यासारखे वैविध्य असावे. आपणाला कोणत्या प्रकारचे साहित्य वाचायचे आहे हे ठरवावे लागेल आपण कोणत्या प्रकारच्या कथा, कादंबऱ्या,कवितासंग्रह किंवा आत्मचरित्र वाचणार आहोत हे निश्चित करायला पाहिजे, त्यासाठी वाचना पाठीमागील आपला हेतू निश्चित केला पाहिजे, म्हणजे आपल्या वाचनाची दिशा निश्चित होईल. आपणाला विचार करायला भाग पाडेल असे साहित्य वाचावे तसेच आत्मपरीक्षण करायला लावणारे साहित्य वाचा. लेखन या विषयावर बोलताना प्राचार्य डॉ. अर्जुन राजगे म्हणाले लेखन हे प्रतिभाशक्तीवर अवलंबून असते,लेखनांवर तत्कालीन परिस्थिती व विचार करण्याची दिशा यांचा परिणाम होत असतो.स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्यावर कविता लिहिल्या गेल्या तर बहुतेक तरुण विद्यार्थी प्रेम कविता लिहितात. लेखन करताना परिस्थितीचे भान असले पाहिजे. भाषण कौशल्यावर बोलताना ते म्हणाले भाषण कला विकसित करण्यासाठी चौफेर वाचन केले पाहिजे तरच तुमचा आत्मविश्‍वास वाढेल व तुम्ही आत्मविश्वासाने श्रोत्यांसमोर आपले विचार मांडू शकाल. या कार्यक्रमाचे आभार श्री. अमर बुल्ले यांनी मानले तर सूत्रसंचालन कु. सोनम कांबळे ( बी.ए.भाग ३ ) हिने केले. सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळून विद्यार्थी व शिक्षक या कार्यक्रमास उपस्थित होते

Categories
कोल्हापूर हातकणंगले

कुटुंब व्यवस्थेत प्रत्येक नातं हे पवित्र नातं असते :डॉ. एस.जी. शेख

रुकडी येथे आयोजित केलेल्या घरगुती हिंसाचार या विषयावरील व्याख्यानात बोलताना डाॕ.एस.जी.शेख सोबत डाॕ.सविता रासम, प्राचार्य डाॕ.अर्जुन राजगे व डाॕ.शर्मिला साबळे

रुकडी ( दिनांक ९ – ३- २०२१ प्रशांत भोसले ) कुटुंबातील प्रत्येक व्यक्त्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे कुटुंब व्यवस्थेत प्रत्येक नातं हे पवित्र नातं असते, मग ते वडील – मुलगा, आई – मुलगी, पती – पत्नी किंवा सासू – सून असो कुटुंबात प्रत्येकाने एकमेकांचा सन्मान केला पाहिजे. काही कुटुंबात सासू कडून सुनेचा छळ होतो किंवा तिच्या पतीकडून छळ होतो. जेव्हा मुलगी लग्न होऊन सासरी जाते, तेव्हा ती त्या कुटुंबातील एक सदस्य बनते तिला त्या घरात सन्मानाने राहण्याचा अधिकार आहे. जेव्हा मुलीचा सासरी छळ होतो तेव्हा तिने तो छळ सहन न करता कायद्याचा आधार घेऊन त्या घरात सन्मानाने राहिले पाहिजे तरच मुलीचा सासरी होणारा छळ थांबेल, घरातील सर्व सदस्यांनी एकमेकांना समजावून घेणे महत्वाचे आहे तरच कुटुंबातील सर्व सदस्य आनंदाने राहतील. घरात कायम भांडण – तंटा होत असेल तर कोणालाच स्वाथ्य मिळत नाही असे मत शहाजी लॉ कॉलेज कोल्हापूरचे डॉ. एस.जी. शेख यांनी व्यक्त्त केले ते येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयात जेंडर चॕंंपिअन क्लब च्या वतीने आयोजित केलेल्या घरगुती हिंसाचार या विषयावरील व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अर्जुन राजगे होते स्वागत व प्रास्ताविक डॉ.शर्मिला साबळे यांनी केले. या कार्यक्रमात महाविद्यालयातील जेंडर चॕपिअन क्लबच्या सदस्या व शहाजी लॉ कॉलेज कोल्हापूरच्या डॉ. सविता रासम यांनीही मनोगत व्यक्त्त केले, त्यांनी स्त्रीयांवर होणाऱ्या अत्याचार विरोधी कायद्याची सविस्तर माहिती दिली. त्यांनी विविध उदाहरणासह घरगुती हिंसाचार थांबवून गुण्यागोविंदाने कसे राहता येईल ते सांगितले. अध्यक्षीय भाषण डॉ.अर्जुन राजगे यांनी हिंसाचाराचे कायिक हिंसाचार, वाचिक हिंसाचार व मानसिक हिंसाचार असे तीन प्रकार सांगितले यात कायिक हिंसाचारामध्ये मारझोड किंवा शारीरिक इजा करणे, वाचिक हिंसाचारामध्ये एखाद्याचे मन बोलून दुखावणे तर मानसिक हिंसाचारामध्ये एखाद्याबद्दल मनात वाईट विचार देहबोलीतून किंवा विशिष्ट हावभावातून व्यक्त्त करणे अशा हिंसाचाराचे प्रकार उदाहरणासह स्पष्ट केले. प्राचार्य डाॕ.अर्जुन राजगे आपल्या भाषणात पुढे म्हणाले आयुष्य जगत असताना संघर्ष निर्माण न होण्यासाठी समायोजना बरोबरच परस्परांना समजून घेणे आवश्यक आहे. कौटुंबिक हिंसाचार टाळण्यासाठी जरी कायदेशीर तरतुदी असल्या तरी प्रत्येक स्त्रीने शिक्षणाच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबन प्राप्त करावे तसेच स्वतःचे संरक्षण स्वतः करण्यासाठी सक्षम व्हावे कारण सेल्फ डिफेन्स इस बेस्ट डिफेन्स असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमास सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळून विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. आभार बी. ए. भाग ३ मधील विद्यार्थी रोहित भोळे यांनी मानले तर सूत्रसंचालन बी.ए.भाग ३ मधील विद्यार्थीनी कु. सोनम कांबळे हिने केले

Categories
कोल्हापूर हातकणंगले

सध्याच्या अनिश्चितेतून बाहेर पडण्यासाठी योग्य व्यवस्थापनाची गरज निर्माण झाली आहे :डॉ.श्रीकृष्ण महाजन

बदलते व्यवस्थापन व कोविड -१९ या विषयावर बोलताना डाॕ. श्रीकृष्ण महाजन सोबत प्राचार्य डाॕ.अर्जुन राजगे व डाॕ.मुकुंद हळदकर

रूकडी ( दि. ७-३-२०२१ प्रशांत भोसले ) कोरोना महामारी मुळे आरोग्य व आर्थिक व्यवस्थेला फार मोठा धक्का बसला आहे, आर्थिक व्यवस्था कोलमडून गेली आहे. सध्याच्या अनिश्चितेतून बाहेर पडण्यासाठी योग्य व्यवस्थापनाची गरज निर्माण झाली आहे. कोरोनामुळे लाॕकडाऊन सारखा अपरिचित शब्द परिचयाचा झाला आहे. या कोरोनामुळे मात्र नियमितपणे मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे, नियमित हात धुणे,ऑनलाईन अध्यापन, ऑनलाइन पेमेंट, वर्क फ्रॉम होम अशा नवीन संकल्पना निर्माण झाल्या. कामाच्या ठिकाणी आरोग्य व सुरक्षितता याबाबत जागरूकता निर्माण झाली. उत्पादनापासून ते विक्री यामध्ये बदल झाले आहेत. ऑनलाईन खरेदीच्या सुविधा निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे घरबसल्या आपणाला आवश्यक असणाऱ्या वस्तू खरेदी करता येत आहेत, हे बदल कोरोणामुळे पाहावयास मिळत आहेत अशा विविध बदलांची आपणाला आता सवय करून घ्यावी लागेल असे मत शिवाजी विद्यापीठ वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे अधिष्ठाता डॉ.श्रीकृष्ण महाजन यांनी व्यक्त्त केले ते येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयात वाणिज्य विभागाच्यावतीने आयोजित केलेल्या ” बदलते व्यवस्थापन व कोविड-१९ ” या विषयावरील व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन राजगे होते. स्वागत व प्रास्ताविक डॉ. मुकुंद हळदकर यांनी केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. अर्जुन राजगे म्हणाले व्यक्त्तीला प्रत्येक वेळी प्रत्येक स्तरावर व्यवस्थापन करावे लागते, कुटुंब प्रमुखाला जसे कुटुंब चालविताना व्यवस्थापन करावे लागते त्याप्रमाणे देश पातळीवर योग्य व्यवस्थापन करावे लागते. कोणत्याही क्षेत्रात योग्य व्यवस्थापन केले नाही तर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, म्हणून कोणत्याही क्षेत्रात पुढे जायचे असेल तर योग्य व्यवस्थापन करावे लागते तसेच व्यवस्थापनात सकारात्मक बाबींबरोबर नकारात्मक बाबींचाही विचार करावा लागतो म्हणजेच कोणत्याही क्षेत्रात नियोजन करताना येणाऱ्या संभाव्य अडचणी विचारात घेतल्या पाहिजेत म्हणजे त्या अडचणीवर उपाय योजना तयार ठेवता येतात, त्यामुळे पूर्वनियोजित उपक्रम पूर्ण करता येतो. जीवनामध्ये स्वयंशिस्त महत्त्वाची आहे परंतु आपण शिस्तीचे पालन करीत नाही.कोरोनाने मात्र लोकांना शिस्त शिकविली आहे. या कार्यक्रमाचे आभार बी.कॉम. भाग 3 मधील विद्यार्थीनी कु. आरती कांबळे हिने मानले तर सूत्रसंचालन बी.कॉम. भाग 3 मधील विद्यार्थीनी कु. सिमरण पेंढारी हिने केले.या कार्यक्रमास सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळून विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

Categories
सांगली

महाराष्ट्र केसरी सांगली जिल्हा निवड चाचणी संपन्न


दि.२८/०२/२०२१
कवठेमहांकाळ- विद्याधर रास्ते.

सन २०२१ साठी च्या कुस्तीगिरांचा निवडी दिनांक २६ व २७ फेब्रुवारी रोजी सांगली जिल्हा तालीम संघाच्या विद्यमाने शांतीनिकेतन सांगली येथे पार पडलेल्या. सांगली जिल्हा निवड चाचणी स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष व सांगली जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष मा.पै. नामदेवराव (बापु) मोहीते यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी तालीम संघाचे उपाध्यक्ष मा.पै.संपतराव जाधव, मा.पै.विलास शिंदे तालीम संघाचे चिटणीस मा.पै.प्रतापराव शिंदे संचालक मा.पै.शिवाजी जाधव मा.पै.राजेंद्र शिंदे, मा.पै.सुनिल मोहिते. मा.पै.मोहन बडरे यांच्या उपस्थितीत व राष्ट्रीय पंच मा.पै.हणमंतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी पार पडल्या.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणारे पैलवान पुढीलप्रमाणे गादी विभाग
५७ किलो पै.निनाद मोहन बडरे (आटपाडी)
६१ किलो पै.तेजस बबन पाटील (सुरुल)
६५ किलो पै.नाथा लहु पवार (बेणापूर)
७० किलो पै.अनिकेत नंदकुमार पाटील (बेणापूर)
७४ किलो पै.वैभव श्रिकांत शिंदे (बेणापूर)
७९ किलो पै.सागर प्रकाश (पवार पेठ)
८६ किलो पै.अमर मारुती पाटील (बिळाशी )
९२ पै.सागर तामखडे (भिकवडी)
९७ किलो पै.सुबोध सुनिल पाटील (सांगली)
महाराष्ट्र केसरी गट पै.अक्षय प्रकाश कदम (बेणापूर)
माती विभाग
५७ किलो पै.रोहीत संपत तामखडे भिकवडी)
६१ किलो पै.राहुल पाटील (सुरुल)
६५ किलो पै.इंद्रजित शिंदे (बेणापूर)
७० किलो पै.मयुर जाधव (चिंचोली )
७४ किलो पै.श्रिकांत निकम (देविखिंडी)
७९किलो पै. प्रथमेश गुरव (शिराळा )
८६ किलो पै.खशाबा मदने (बेणापूर)
९२किलो पै.पृथ्वीराज पवार
सांगली
९७ किलो पै. विनय पाटील (नागठाने)
महाराष्ट्र केसरी गट
पै.सुरज निकम (नागेवाड)
वरील पैलवानांच्या निवडी करण्यात आल्या. सदर स्पर्धा पार पाडण्यासाठी शांतीनिकेतन महाविद्यालयाचे अध्यक्ष मा.गौतम (भाऊ) पटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सांगली जिल्ह्यातील जुन्या काळातील नामवंत पैलवान बाळू मुल्ला यांची शारीरिक स्थिती ठिक नसल्यामुळे व परिस्थिती बेताची असल्याने त्यांना उपचारासाठी सांगली जिल्हा तालीम संघाच्या वतीने मदत म्हणून २१,००० रुपये आर्थिक मदत करत त्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला. स्पर्धेसाठी पंच म्हणून पै.विनायक पाटील पै.नामदेव बडरे पै.युवराज पाटील पै.शंकर पाटील पै.रविंद्र पाटील पै.धनंजय महाडीक पै.सुहास पाटील पै.सुनिल चंदनशिवे पै.शामराव मासाळ पै.दिपक पाटील यांनी काम पाहिले. तर जोतिराम वाझे, कृष्णा शेंडगे यांनी कुस्तीचे धावते समालोचन केले. स्पर्धा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या सर्व मल्लांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Categories
कोल्हापूर हातकणंगले

सौ.छाया सयाजी शिंदे(माई) यांचेदुःखद निधन

: मनपाडळे येथील सौ छाया सयाजी शिंदे वय 55 यांचे शनिवारी दिनांक 27-02-2021 रोजी हृदयविकाराने निधन झाले. मनमिळावू स्वभावाच्या प्रामाणिक सर्वांच्या लाडक्या माई अचानक कुटुंबातून गेल्यामुळे कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळला आहे त्यांच्या जाण्याणे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे .वारणा कारखान्याचे इंजिनियरिंग विभागाचे कर्मचारी श्री सयाजी महादेव शिंदे यांच्या त्या पत्नी होत्या. तसेच वारणा सहकारी बँकेचे माजी असिस्टंट जनरल मॅनेजर श्री वसंतराव शिंदे व श्री विलासराव शिंदे त्या वाहिनी होत , त्यांच्या मागे दोन मुले अक्षय व रोहित आहेत. शितलकुमार ,सचिन उर्फ शरद व अधिकराव यांच्या चुलती प्राध्यापक संभाजी पाटील सर यांच्या मामी (सासू ) सौ. भारती पाटील व सौ.अर्चना बेलेकर सौ.सारिका पाटील यांच्या चुलती तसेच दीर, भावजय ,पुतणे असा शिंदे परिवार आहे. रक्षाविसर्जन त्यांचे राहते घरी मु.पो. मनपाडळे येथे सोमवार दिनांक 1-03-2021 रोजी सकाळी9:00 वाजता आहे.

Categories
कोल्हापूर हातकणंगले

किणी हायस्कूलमध्ये मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा

मराठी राजभाषा दिनानिमित्त कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करताना पर्यवेक्षक डी. एच. पाटील, मुख्याध्यापिका सुरेखा शिरोटे, वाय. पी. पाटील आदी

प्रशांत भोसले
किणी ,ता. २७ : येथील किणी हायस्कूल, किणी मध्ये मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

मराठी राजभाषा दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी मातृभाषेचा गौरव करणारी मनोगते व्यक्त केली. इयत्ता नववीच्या विद्यार्थीनींनी मराठी गौरव गीताचे सादरीकरण केले. यानिमित्ताने विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व व निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
एस.एस. शेटे यांचे ‘ मराठी भाषेची थोरवी’ या विषयावरती व्याख्यान झाले.

प्रास्ताविक यु. एम. पाटील, सूत्रसंचालन स्वाती मतसागर यांनी केले. वाय.पी. पाटील यांनी आभार मानले.

Categories
कोल्हापूर हातकणंगले

मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांनी अथक परिश्रम घेतले :- प्राचार्य डॉ. प्रशांत नागांवकर

मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात बोलताना डाॕ.प्रशांत नागांवकर सोबत प्राचार्य डाॕ.अर्जुन राजगे डाॕ.लता मोरे व डाॕ.गिरीश मोरे

रुकडी ( दि.२७ – २ -२०२१ बातमीदार / प्रतिनिधी ) मराठी भाषेचे सौंदर्य वाढविणे आणि मराठी भाषेचे संवर्धन करणे प्रत्येक मराठी भाषिकांचे कर्तव्य आहे. आपणा सर्वांची मातृभाषा ही मराठी आहे , मातृभाषा म्हणजे आईची भाषा, आईचे महत्व इतरांना सांगण्याचे कार्य प्रत्येकाने केले पाहिजे. मराठी भाषेला वैभव प्राप्त करून देणे आवश्यक आहे. प्रत्येक माणसाची भाषा ही वेगवेगळी असते, आपणाला जसा मराठीचा अभिमान आहे तसा प्रत्येकाला आपल्या मातृभाषेचा अभिमान असतो हे विसरून चालणार नाही म्हणून आपण इतर भाषेचा द्वेष करू नये. आज जगातील बाहत्तर देशात मराठी भाषा बोलली जाते. देशातील अनेक विद्यापीठात मराठी भाषा अभ्यासली जाते मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी श्री.विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी अथक परिश्रम घेतले .कुसुमाग्रजांचा सत्तावीस फेब्रुवारी हा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो असे मत यशवंतराव चव्हाण महाविद्यालय कोल्हापूरचे ( केएमसी ) प्र. प्राचार्य डॉ. प्रशांत नागांवकर यांनी व्यक्त्त केले ते येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अर्जुन राजगे होते. स्वागत व प्रास्ताविक डॉ. लता मोरे यांनी केले डॉ. नागांवकर यांनी मराठी भाषेच्या उदयापासून ते आज पर्यंतच्या वाटचालीचा इतिहास मांडला. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. अर्जुन राजगे म्हणाले कोणतीच बोली भाषा अशुद्ध नसते, बारा मैलावर बोलीभाषा बदलते खरेतर याच मराठी भाषेच्या छटा आहेत. प्रत्येक भाषेचा आदर केला पाहिजे, ती प्रगत झाली पाहिजे किंवा आहे ते टिकवून ठेवले पाहिजे, मात्र मराठी भाषेवर इतर भाषांचे आक्रमण होत आहे हे मान्य करायला पाहिजे. एखाद्या वक्त्त्याने मराठीतून व्याख्यान देताना अधून- मधून इंग्रजीचा वापर केलातर लोक त्या वक्त्त्याची वाहवा करतात परंतु एखाद्या वक्त्त्याने इंग्रजी बोलताना अधून-मधून मराठी शब्द वापरले तर मात्र लोक त्याची वाहवा करीत नाहीत, हेच मराठी भाषेला मारक आहे.मराठी भाषा ही बहुजनांची भाषा आहे, मराठीतून ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे महत्वाचे कार्य संत ज्ञानेश्वरांनी केले आहे. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी , शिक्षक सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळून उपस्थित होते.आभार बी. ए.भाग एक मधील विद्यार्थीनी कु. ऋतुजा जाधव हिने मानले तर सूत्रसंचालन कु. सुयेशा नांगनुरकर ( बी.ए.भाग एक ) हिने केले

Categories
कोल्हापूर

ज्योतिर्लिंग ग्राम विकास पॅनेलच्या शोभा पाटील यांची नेर्लेच्या सरपंचपदी निवड

कोल्हापूर:संजय पाटील

नेर्ले, ता.शाहूवाडी येथील ज्योतिर्लिंग ग्रामविकास पॅनेलच्या शोभा आण्णा पाटील यांची सरपंचपदी निवड तर उपसरपंचपदी कोमल योगेश पाटील यांची निवड झाली आहे.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत शिवसेना – राष्ट्रवादीच्या आघाडीने विजयश्री खेचून आणली. नेर्लेच्या इतिहासात २५ वर्षानंतर प्रथमच शिवसेना व राष्ट्रवादी या पक्षाचा सरपंच व उपसरपंच झाला आहे. अटीतटीच्या या निवडणुकीमध्ये शिवसेनेला लढतीमध्ये सात पैकी पाच जागांवरती यश खेचून आणण्यामध्ये बांधकाम व आरोग्य सभापती हंबीराव पाटील (बापू) तसेच मा.आम.सत्यजित पाटील (आबा) यांचे मार्गदर्शन तसेच गावातील तरुण वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
नेर्लेच्या सरपंचपदी शोभा आण्णा पाटील तर उपसरपंचपदी कोमल योगेश पाटील काल दि.२५ फेब्रुवारी रोजी निवडी एकमताने बिनविरोध करण्यात आल्या. या निवडीसाठी सरपंच एक-एक अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी पराग कानडे यांनी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
या निवडीप्रसंगी तलाठी हिंदुराव कुंभार,ग्रामसेवक विजय पाटील, कोतवाल निवास कांबळे ,निवृत्ती पाटील (दाजी), आण्णा पाटील, पांडुरंग डांगे,महिपती दिंडे (माजी सरपंच), विनायक पाटील.सागर पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

Categories
कोल्हापूर हातकणंगले

अश्विनी पाटील पोलीस निरीक्षकपदी निवड


किणी ( ता. हातकणंगले) येथील सौ. अश्विनी संतोष पाटील यांची पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती झाली असून त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागात सहा. पोलीस आयुक्त पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यांनी विवाहानंतर अभ्यास करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २००९ साली पोलीस उपनिरीक्षक पद मिळवले होते.

त्या किणी येथील प्रतिष्ठित वकील संतोष पाटील यांच्या पत्नी व स्थानिक देवस्थान सल्लागार उपसमिती किणीचे माजी अध्यक्ष कै. आण्णासो पाटील यांच्या स्नुषा होत. किणी गावातील वर्ग-१ पदावर पदोन्नती मिळालेल्या त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत.

Categories
कोल्हापूर

कोजीमाशि’ सभासदांच्या सुख दुःखात आम्ही सहभागी: दादासाहेब लाड


मुरगूड विद्यालयात चेअरमन बाळ डेळेकर यांचा सत्कार


कोल्हापूर -सुभाष भोसले
कोजीमाशी पत संस्था सभासदांच्या सुखदुःखात नेहमीच सहभागी झाल्याने राज्यात एक आदर्श संस्था म्हणून नावलौकिक प्राप्त झाला असल्याचे मत शिक्षक भारतीचे पुणे विभागीय अध्यक्ष दादासाहेब लाड यांनी केले तर मुरगूड विद्यालयाचे संस्कार हेच माझ्या जीवनाची प्रेरणा आहे. या प्रेरणेतून आणि शिक्षण प्रसारक मंडळाच्या आशिर्वादाने मिळालेल्या अध्यक्षपदाच्या संधीचे सोने करेन. असे उदगार कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष व शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे कौन्सिल सदस्य बाळ डेळेकर यांनी केले.
मुरगुड विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज मुरगूड ता. कागल येथे आयोजित केलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी शिक्षक नेते दादा लाड प्रमुख उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य एस.आर. पाटील होते.कोल्हापूर जिल्हा शिक्षक पत संस्थेच्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा बाळ डेळेकर यांचा सत्कार प्राचार्य एस.आर. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य एस.आर.पाटील यांनी केले.यावेळी उपप्राचार्य एस.पी.पाटील,पर्यवेक्षक एस.वाय.बेलेकर,प्रा बी.एस. मडीवाल,मनोहर पाटील,संजय सूर्यवंशी,एस.बी. बोरवडेकर,ए.एच. भोई,फुलसिंग जाधव,पी एस पाटील,सौ.वाय.ई.देशमुख,
शशांक कोंडेकर,विराजित घोरपडे,आर जी पाटील,वाय. आर बेलेकर,एम एस कांबळे, संपत कोळी उपस्थित होते.
सूत्रसंचालन एम.बी.टेपुगडे,
आभार एस.पी.पाटील यांनी मानले

Categories
कोल्हापूर

श्रीमती सुशिलादेवी मल्हारराव देसाई युवती सचेतना फौंडेशन शाखेचे उद्धाटन.

कोल्हापूर- सुभाष भोसले
श्रीमती सुशिलादेवी मल्हारराव देसाई यांच्या स्मरणार्थ दिनांक १७/०२/२०२१ रोजी श्री शाहू हायस्कूल ज्युनिअर काॅलेज मध्ये गोपाळराव गोखले महाविद्यालयाच्या प्राध्यापिका व संस्थेच्या प्रशासन अधिकारी डाॅ.मंजिरीताई देसाई मोरे यांच्या प्रेरणेने झालेल्या सुशिलादेवी मल्हारराव देसाई युवती सचेतना फौंडेशन शाखेचा उद्घाटन सोहळा काॅलेजच्या प्रांगणात पार पडला. शिक्षण प्रसारित मंडळ कोल्हापूर संचलित श्री शाहू हायस्कूल ज्युनिअर काॅलेज कागल येथे सुशिलादेवी मल्हारराव देसाई स्मृतिदिन व सुशिलादेवी मल्हारराव देसाई युवती सचेतना फौंडेशन कोल्हापूर शाखा श्री शाहू हायस्कूल ज्युनिअर काॅलेज येथे संयुक्त कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला . अध्यक्षस्थानी काॅलेजचे प्राचार्य जे.डी.पाटील उपस्थित होते. शिक्षण महर्षी एम.आर.देसाई यांच्या पत्नी श्रीमती सुशिलादेवी यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.श्री एन एन गिरी यांनी केले.व्याख्याता प्रा.सौ. एस. एस. पाटील यांनी युवती सचेतना फौंडेशनच्या उदिष्टावर प्रकाश टाकून आईसाहेबांच्या जीवनकार्याची माहिती दिली.तसेच प्राचार्य श्री जे.डी.पाटील यांनी अध्यक्षिय मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी प्राचार्य श्री जे.डी.पाटील उपमुख्याध्यापक श्री बाळ डेळेकर , उपप्राचार्य श्री बी.के.मडीवाळ पर्यवेक्षिका सौ.एस.ए.कुलकर्णी आदी मान्यवरांसह सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Categories
कोल्हापूर शैक्षणिक

आमदार तुपाशी शिक्षक उपाशी

कोल्हापूर:संजय पाटील

आमदार स्थानिक विकास निधीमध्ये एक कोटीची वाढ करणारे महाविकास आघाडी शासनाने अनेक वर्षे वेतनपासून वंचित ठेवलेल्या शिक्षक शिक्षकेत्तर प्रति असणारी असलेली दृष्ट मानसिकता संपुष्टात आणून सदर बांधवाना तात्काळ न्याय देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कार्याध्यक्ष तथा नागपूर विभाग शिक्षक आमदार नागो गाणार यांनी शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शासन निर्णय दिनांक २३ फेब्रुवारी२०२१ अन्वये आमदार स्थानिक विकास कार्यक्रमा अंतर्गत सन २०२०-२१ या आर्थिक वर्षापासून प्रतिवर्षी रुपये एक कोटीची वाढ करण्यात आली ही वाढ करताना शासनाला कोरोना संकट आडवे आले नाही. परंतु राज्य मंत्रिमंडळाने तीन वेळा घेतलेले निर्णय त्या आधारावर निर्गमित केलेली शासन निर्णय विधिमंडळात मंजूर केलेल्या निधी या सर्व संवैधानिक बाबी पूर्ण झाल्या असताना शासनाने शिक्षकांना दिनांक १ एप्रिल २०१९ पासून २०टक्के वेतन अनुदान व वीस टक्के वाढीव वेतन अनुदान वितरित करण्याचा शासन आदेश निर्गमित केला नाही . तसेच व घोषित शाळा व नैसर्गिक वाढीच्या तुकड्यांना निधी सह अनुदानास पात्र घोषित करण्याचा निर्णय घेऊन आदेश निर्गमित केला नाही . शिक्षक शिक्षकेतर प्रति शासनाची दृष्ट मानसिकता सुस्पष्ट करणाऱ्या या घटनेचा शिक्षक शिक्षकेत्तर समुदायाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त होत आहे. म्हणून शासनाने आपली दृष्ट मानसिकता संपुष्टात आणून २० टक्के वेतन अनुदान व २० टक्के वाढीव वेतन अनुदान वितरित करण्याचा आदेश तसेच घोषित शाळा व नैसर्गिक वाढीच्या तुकड्यांना निधी सह अनुदानास पात्र घोषित करण्याचा आदेश तात्काळ निर्गमित करण्याची मागणी सदर निवेदनात करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे विभाग कोषाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी यांनी दिली आहे .

Categories
कोल्हापूर

संत गाडगेबाबांचे विचार आत्मसात करा- अनिल चव्हाण

लोकराज्य जनता पार्टीच्या वतीने संत गाडगे महाराज जयंती साजरी.


कोल्हापूर: सुभाष भोसले
संत गाडगेबाबांनी आपल्या उभ्या आयुष्यात अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता ,जातीभेद निर्मूलन याबरोबरच समाजसुधारणेचे महान कार्य केले. गावोगावी स्वच्छता मोहीम राबविण्या बरोबरच कीर्तनातून लोकप्रबोधनाचे महान कार्य केले. ‘कर्ज काढून तीर्थयात्रा करू नका, देव देवळात नसून तो दीनदु:खीतापाशी आहे ,म्हणून गोरगरिबांना मदत करावी ‘असा उपदेश गाडगेबाबांनी कीर्तनातून केला. संत गाडगेबाबांचे महान कार्य व विचार प्रत्येकाने आत्मसात केले पाहिजेत असे प्रतिपादन लोकराज्य जनता पार्टीचे अध्यक्ष अनिल चव्हाण यांनी केले .सानेगुरुजी वसाहत येथील लोकराज्य जनता पार्टीच्या कार्यालयात संत गाडगेबाबा यांची 145 वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी अनिल चव्हाण बोलत होते. गाडगेबाबांच्या प्रतिमेस पुष्पहार सौ. संध्या कुराडे यांच्या हस्ते घालण्यात आला. प्रास्ताविक सुधाकर डोनोलिकर यांनी केले. आभार सर्जेराव भोसले यांनी मानले.यावेळी सौ .जयश्री चव्हाण, मनोहर कुराडे, सुनील कुंभार ,शशिकांत जाधव ,अभिजित पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Categories
कोल्हापूर हातकणंगले

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण द्यावे म्हणजे विद्यार्थी विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतील : माजी खासदार डॉ. निवेदिता माने

गुरुकूल प्रकल्प कार्यशाळेत मार्गदर्शन करताना श्री.के.एस.महामुनी सोबत मा.खास.डॉ.निवेदिता माने, प्राचार्य डाॕ.अर्जुन राजगे व इत

प्रशांत भोसले रुकडी ( दि. २३ – २- २०२१ )राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय, रोटरी कल्ब आॕफ इचलकरंजी सेंट्रल आणि रोटरी कल्ब आॕफ अतिग्रे यांच्या वतीने रुकडी येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयात आयोजित केलेल्या ” गुरुकुल प्रकल्प ” एक दिवसीय शिक्षक व प्रशासकीय सेवक यांच्या प्रशिक्षण कार्यशाळेत माजी खासदार डॉ. निवेदिता माने अध्यक्षीय मार्गदर्शन करताना त्यांनी शिक्षकांनी स्वतः विविध कौशल्ये आत्मसात करून विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण द्यावे म्हणजे विद्यार्थी विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतील , शिक्षक हा व्यवसाय किंवा पेशा नसून ते एक व्रत आहे हे व्रत आपण स्वइच्छेने स्वीकारलेले आहे, हे व्रत सुजाण नागरिक घडविण्याचे आहे याची जाणीव प्रत्येक शिक्षकांनी ठेवली पाहिजे. विद्यार्थ्यांचे यश हेच शिक्षकांच्या श्रमाचे फळ आहे याची जाणीव आपणाला असली पाहिजे,आपले विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत राहतील या दृष्टीने विद्यार्थ्यांना घडवावे असे मत व्यक्त्त केले. स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ. अर्जुन राजगे यांनी केले. या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी रयत शिक्षण संस्था सातारा येथील गुरुकुल प्रकल्पाचे शिक्षक उपस्थित होते. या कार्यशाळेत बाळासाहेब माने एज्युकेशन ट्रस्टच्या कै. संभाजीराव माने गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, काकासाहेब माने हायस्कूल, संभाजीराव माने प्राथमिक विद्यालय , छत्रपती शिवाजी शिक्षणशास्त्र महाविद्यालय, राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय, श्री. कलमेश्वर हायस्कूल सांबरे, सोनाबाई बाळगोंडा पाटील हायस्कूल हारोली व नागोजीराव पाटणकर हायस्कूल कोल्हापूर या विद्यालयातील सर्व शिक्षक व प्रशासकीय सेवक सहभागी झाले होते.

दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेत श्री. के. एस. महामुनी विभागीय अधिकारी, रयत शिक्षण संस्था मध्य विभाग सातारा यांनी गुरुकुल व नवोपक्रम या विषयावर बिजभाषण केले. श्री. ए. के. निकम गुरुकुल प्रकल्प प्रमुख, कर्मवीर विद्या प्रबोधिनी रयत शिक्षण संस्था सातारा यांनी प्रवेश व आर्थिक नियोजन आणि मुख्याध्यापक व प्रकल्प प्रमुख यांची भूमिका या विषयावर, श्री. ए. बी. गायकवाड माजी प्रकल्प प्रमुख अण्णासाहेब कल्याणी विद्यालय सातारा यांनी सूक्ष्म गुणविश्लेषण या विषयावर, श्री. डी.बी. दाभाडे उपशिक्षक संजय भैरवनाथ काळे विद्यालय तासगाव यांनी विज्ञान प्रयोग नियोजन – कार्यवाही ,फाईल व फॉर्म्स या विषयावर, श्री. एस. एम. महामुलकर पर्यवेक्षक अण्णासाहेब कल्याणी विद्यालय सातारा यांनी गुरुकुल रेकॉर्ड व विविध उपक्रम या विषयावर तर श्री. एस. आर. भोसले मुख्याध्यापक यशवंतराव चव्हाण विद्यालय पिंपोडे यांनी वार्षिक नियोजन या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत बाळासाहेब माने एज्युकेशन ट्रस्टच्या विविध शाखांचे शाखाप्रमुख श्री. रामचंद्र पाटणकर,श्रीमती रिचा यादव,रो.संजयसिंह गायकवाड रो.विमलकुमार बंब , रो. नितीनकुमार कस्तुरे, रो. डाॕ.हिंदुराव संकपाळ उपस्थित होते श्री. रामचंद्र पाटणकर व रो. संजयसिंह गायकवाड यांनी या कार्यशाळेस शुभेच्छापर मनोगत व्यक्त्त केले. या कार्यशाळेत गुरुकुल प्रकल्प राबविण्याबाबत येणाऱ्या अडचणीवर कशी मात करायची ते उपस्थित वक्त्यांनी स्पष्ट केले तसेच सहभागी शिक्षक व प्रशासकीय सेवकांच्या शंकांचे निरसन केले. आभार या कार्यशाळेचे समन्वयक डॉ. प्रशांत कांबळे यांनी मानले तर सूत्रसंचालन डॉ. माधवी सोळांकूरकर यांनी केले.

Categories
कोल्हापूर शिराळा

मा. खासदार धैर्यशील माने यांची शिरोळतालुक्यातील दत्तवाड व नवे दानवाड या गावांना भेटी

मा. खासदार धैर्यशील माने यांनी शिरोळतालुक्यातील
दत्तवाड व नवे दानवाड या गावांना भेट दिली. दरम्यान भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये मयत झालेल्या नागरिकांच्या घरी भेटून सांत्वन केले तसेच हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या नागरिकांची दत्तवाड ग्रामीण रुग्णालयामध्ये भेट घेऊन चौकशी केली व डॉक्टरांना योग्य उपचारांबाबत सूचना केली. मयत झालेल्या नागरिकांच्या वारसांना व जखमी नागरिकांना शासनाकडून मदत मिळण्याच्या अनुषंगाने प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी दिल्या. तसेच दत्तवाड व नवे दानवाड ग्रामपंचायतीमध्ये विविध विकासकामे व कोरोनाबाबात आढावा बैठक घेतली.


यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख वैभव उगळे, सहाय्यक
पोलिस निरीक्षक विकास आडसुळ, गुरुदत्त शुगर्स संचालक बबन चौगले, माजी सरपंच बी.वाय. शिंदे, प्रा.चंद्रकात मोरे, सौ. वंदना कांबळे सरपंच नवे दानवाड, माजी सरपंच प्रकाश परीट, लाडखान डे.सरपंच, हरिश्चंद्र कांबळे, तानाजी मोहिते, हरिश्चंद्र कांबळे, प्रकाश परीट, माजी सरपंच, सुरेश दळवी,
अशोक पाटील, बादशहा मुल्ला, पोपट चौगुले, रजपूत सर, शिवाजी साळुखे, सागर परीट, नवे दानवाड ग्रामपंचायत सदस्य, दत्तवाड नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य, शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Categories
कोल्हापूर क्रीडा

राष्ट्रीय सबज्युनियर व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी कागलच्या खेळाडू व प्रशिक्षक यांची अभिनंदनीय निवड


कोल्हापूर- सुभाष भोसले
पन्हाळा येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय सबज्युनियर व्हॉलीबॉल स्पर्धेमधून कागल मधिल शाहू हायस्कूल ज्युनियर कॉलेजचे व क्रीडा विकास फाउंडेशन कागल,भगवा रक्षक व्हॉलीबॉल क्लब कागल चे खेळाडू कुमार मयूर सुतार व कुमारी स्मृती पोटले यांची महाराष्ट्र राज्य संघामध्ये निवड झाली आहे.तसेच महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी महेश शेडबाळे व सहाय्यक प्रशिक्षक कधी प्रवीण मोरबाळे यांची निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्याचा संघ वेल्लूर तामिळनाडू येथे होणाऱ्या राष्ट्रीय सबज्युनिअर व्हॉलीबॉल स्पर्धेत सहभागी होणार आहे सदर स्पर्धा 24 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2021 दरम्यान संपन्न होणार आहेत.
खेळाडूंना भारतीय व्हॉलीबॉल संघाचे सह सचिव व महाराष्ट्र राज्य हॉलीबॉल असोसिएशनचे सचिव बाळासाहेब सुर्यवंशी, शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सचिव जयकुमार देसाईसो, पेट्रन कौन्सील सदस्य दौलत देसाई ,प्रशासन अधिकारी मंजिरी मोरे(देसाई),उपाध्यक्ष शिवाजी सावंत यांचे प्रोत्साहन व शाहू हायस्कूल ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य जे.डी पाटील, कोजिमाशि चेअरमन व उपमुख्याध्यापक बाळ डेळेकर,उपप्रचार्य बी . के . मडीवाळ, श्री एस जी पाटील पर्यवेक्षिका सविता कुलकर्णी, श्री एस यु देशमुख ,भगवा रक्षक व्हॉलीबॉल क्लबचे अध्यक्ष नितीन दिंडे ,चंद्रकांत कासोटे,वैभव आडके यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सर्व खेळाडू व प्रशिक्षक यांचे अभिनंदन होत आहे .

Categories
कला व मनोरंजन

कलाकार लेखक संतोष आनंद यांच्या सोनी इंडियन आयडल मधील हृदयस्पर्शी भावना

त्यांच्या लेखणीने त्यांना काय नाही मिळवून दिलं? .. नाव, पैसा, प्रसिद्धी, इभ्रत… पण नशिबाचे चक्र असे फिरले की ना पॆसा उरला ना इभ्रत … सर्वात महत्वाचं म्हणजे ना एकुलता एक मुलगा उरला आणि ना सून! .. अगदी एकाकी आयुष्य त्यांच्या वाटेला आलं. थोडी कृपा झाली ईश्वराची म्हणून त्यांची नात त्यांच्यासोबत आहे! संतोष आनंद हा तो दुर्दैवी कलाकार!

इक प्यार का नगमा है…
मेघा रे मेघा रे…
तेरा साथ है जो मुझे क्या कमी है…
मोहब्बत है क्या चीज…

सारखी कितीतरी अर्थपूर्ण आणि सुपरहिट गाणी लिहिणारा… त्याकाळी नावाजलेला… दोन फिल्मफेअर आणि प्रतिष्ठित यश भारती अवॉर्ड्स जिंकणारा … एकेकाळी प्रसिद्धीच्या, आप्त मित्र यांच्या वलयात रहाणारा गीतकार..!

सगळं ठीक होतं… एकुलता एक मुलगा, सून आणि एक गोड नात… पण मुलगा कसल्याशा फ्रॉडमध्ये अडकला… अडकवला गेला आणि अडकतच गेला… फ्रॉड वाढत वाढत २५० करोडपर्यंत गेलं… खूप प्रयत्न केले वर निघायचे पण त्या दलदलीतून अधिकच रुतत गेला! एक दिवस निर्णय घेतला आणि पत्नी व ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलीसमवेत एका भरधाव आगगाडीखाली झोकून दिलं. तो आणि त्याची पत्नी तर गेले पण अंगावर गंभीर जखमा झालेली मुलगी सुदैवाने वाचली. कदाचित संतोष आनंद यांना आधार द्यायलाच असावी!

मुलाने मृत्यूपूर्वी १० पानांची सुसाईड नोट लिहून ठेवली.. मोठमोठ्या पदाधिकाऱ्यांवर आरोप केले पण त्यावर अजूनपर्यंत तरी काही झालं नाही.. झालं तरी मुलगा, सून परत मिळणार नाहीत.. ते दिवस फिरून येणार नाहीत!

जो बीत गया वो दौर अब फिर न आएगा
मेरे दिल में तेरे सिवा कोई और न आएगा
घर फुक दिया हमने, अब राख उठानी है..
जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है…

आजोबा आणि नात दोघंच उरले एकमेकांसाठी पण दुर्दैवाचा फेरा अजून सुटला नाही… गीतकार संतोष आनंद अपंग झाले… ३-४ वेळा पायाचं ऑपरेशन झालं. व्हील चेअरवर आले… हातपाय प्रचंड थरथरतो… आवाज कापतो… जगायला पैसा नसला तरी लेखणीत दम मात्र पाहिलेसारखाच आहे..!

कुछ पाकर खोना है,
कुछ खोकर पाना है
जीवन का मतलब तो,
आना और जाना है

दो पल के जीवन से,
इक उम्र चुरानी है
जिंदगी और कुछ भी नहीं,
तेरी मेरी कहानी है…

काल इंडियन आयडॉल कार्यक्रमात संतोष आनंद यांची कथा ऐकून अगदी भडभडून आलं. कौतुक वाटलं ते नेहा कक्करचं. त्यांना पाहून ती अगदी हमसून हमसून रडली.. त्यांच्या गळ्यात पडून रडली.. त्यांच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला… त्यांना भावनिक धीर दिला… मुख्य म्हणजे ५ लाखांची आर्थिक मदत केली!…

स्वाभिमानी संतोष आनंद यांनी ती त्याही परिस्थितीत नम्रपणे नाकारली.. ‘मी अजूनही काम करतो… इकडे तिकडे जातो…’ हे सांगताना त्यांना आवाज भरून आला आणि ऐकताना आमचे डोळे! नेहाने त्यांना ती भेट तितक्याच स्नेहाने स्वीकारायला भाग पाडलं. नेहाबद्दल मी वर्षांपूर्वीच एफबीवर पोस्ट लिहिली होती जेव्हा तिने अशाच एका फुटपाथवर हार्मोनियमवर कला सादर करून गुमनामीत जगणाऱ्या बॉलिवूडच्याच एका अवलियाला १ लाखाची मदत जाहीर केली… मला तिचं रडणं कधीच नाटकी वाटलं नाही… यापूर्वीदेखील तिने कितीतरी गरीब स्पर्धकांना १ लाख -२ लाख अशी आर्थिक मदत केली आहे. तशी ती नावाजलेली असली तरी इतर अनेक सेलिब्रिटीजसारखी वर्षानुवर्षे प्रस्थापित नाही. १० वर्षांपूर्वी इंडियन आयडॉलमधूनच वर आली आहे … गरिबी पाहिलेली आहे… वयाने लहान आहे… पण दानत असायला सामाजिक जाण असावी लागते, ती तिच्यात ठासून भरली आहे. कुणाचीही समस्या ऐकली की तिचा हात लगेच पुढे येतो मदतीसाठी… पैसा असला तरी दानत असतेच असं नाही! गायिका पलक मुच्छल नंतर मला मनापासून आदर वाटलेली ही दुसरी संवेदनशील गायिका! ईश्वर तिला खूप सुखी आयुष्य आणि भरभरून यश देवो!!..

कालचा इंडियन आयडॉल कार्यक्रम फारच सुंदर झाला.. हृदयस्पर्शी झाला…अगदी पुन्हा पहावा असा!… संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांची अवीट गाणी.. . तोडीचे स्पर्धक… सर्वात महत्वाचं म्हणजे काळाआड गेलेल्या एका अशा असामान्य गीतकाराची ओळख ज्याबद्दल आपण कधी ऐकलं नाही आणि तशी शक्यताही नाही! … तसेही आपण गाणी ऐकतो पण त्यामागील गीतकार संगीतकार यांच्याबद्दल फार कधी जाणूनही घेत नाही! संतोष आनंद यांना जगासमोर आणल्याबद्दल इंडियन आयडॉलचे खूप खूप आभार!…

त्यांचे ‘किसी ने तो याद किया..’ हे शब्द काळजाला घर करून गेले! घळघळा रडले मी आणि ते सर्वच रडले असतील ज्यांनी हा कार्यक्रम पाहिला…

आँखों में समंदर है,
आशाओं का पानी है
ज़िंदगी और कुछ भी नहीं,
तेरी मेरी कहानी है…

असामान्य शब्दांचे धनी गीतकार संतोष आनंद यांना ईश्वर सुदृढ आयुष्य देवो ही मनःपूर्वक इच्छा!

– ✍………आसावरी इंगळे

Categories
कोल्हापूर

कोल्हापूर अहमदाबाद विमान सेवेचा शुभारंभ

प्रवाशांच्या लक्षणीय प्रतिसाद

गोकुळ शिरगाव प्रतिनिधी
डॉ राजेंद्र सूर्यवंशी
कोल्हापूर ते अहमदाबाद या विमान सेवेचा आज शुभारंभ झाला असून पहिल्याच विमानांमधून ५९ प्रवासी कोल्हापूरला आले असून कोल्हापूर हून अहमदाबादला ५४ प्रवाशांनी प्रयाण केले. सकाळी ठीक अकरा वाजून अकरा मिनिटांनी अहमदाबादहून आलेल्या इंडिको कंपनीच्या विमानाने कोल्हापूर विमानतळावर लँडिंग केले. प्रथेप्रमाणे कोल्हापूर विमानतळावर विमानाचे मान्यवरांच्या उपस्थितीत वाॅटर सॅल्यूट ने स्वागत करण्यात आले. इंडिगो एअरलाईन्सच्या कोल्हापूर अहमदाबाद विमान सेवेमुळे कोल्हापुर , इचलकरंजी, कराड व सातारा येथील व्यापारी व उद्योजकांची मोठी सोय झाली असून विमान सेवेला मिळत असलेला प्रतिसाद पाहता सदर विमानसेवा आठवड्यातील सातही दिवस सुरू करण्याचे सूतोवाच विमानतळ प्रशासन व खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी केले.
यावेळी कोल्हापूर विमानतळावरून देशातील प्रमुख शहरांना जोडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे खासदार संजय मंडलिक यांनी सांगितले तसेच बऱ्याच वर्षापासून मागणीअसलेली अहमदाबाद विमानसेवा सुरू झाल्याचा आनंद असून विमानतळाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितले. तसेच विमानतळ अधिकाऱ्यांनी विमानतळावरील विकासकामांना अधिकाधिक गतीमान करण्यासाठी अधिक प्रयत्नांची गरज असल्याचे मत आमदार चंद्रकांत जाधव यांनी केले विमानतळाच्या विमानतळ संचालक कमल कुमार कटारिया यांनी विकासासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मंत्री खासदार आमदार चेंबर ऑफ कॉमर्सचे व कमिटीचे सदस्य यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी अहमदाबाद साठी प्रथम प्रवासी म्हणून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री एग्रीकल्चर चे ललित गांधी यांनी प्रवास केला.
यावेळी खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, कोल्हापूर विमानतळाचे संचालक कमल कुमार कटारिया, अॅड. सुरेश कुराडे, विजय अग्रवाल, विज्ञान मुंडे, अमर गांधी, अमित हुक्केरी, विजय घाडगे, विक्रांत सिंह कदम, इंडिगो एअरलाइन्सचे एअरपोर्ट मॅनेजर विशाल भार्गव आदी मान्यवर उपस्थित होते.


तिरुपती कोल्हापूर तिरुपती विमान सेवा ही सुरू
कोल्हापूर विमानतळावरून कोरोणा संसर्गामुळे खंडित झालेली तिरुपती मार्गावरील विमानसेवा आजपासून सुरू झाली असून या विमान सेवेलाही प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

Categories
कोल्हापूर हातकणंगले

ज्याप्रमाणे आई घराची काळजी घेते त्याप्रमाणे शिक्षकांनी आईच्या भूमिकेत राहून समाजाची काळजी घ्यावी:- मा.खासदार श्रीमती निवेदिता माने

अतिग्रे : “समाजामध्ये महिलांकडे सहनशीलता हा मोठा गुण असतो. ज्याप्रमाणे आई घराची काळजी घेते त्याप्रमाणे शिक्षकानेही सोशिकपणाने आईच्या भूमिकेत राहून समाजाची काळजी घ्यावी. असे प्रतिपादन मा.खासदार श्रीमती निवेदिता माने यांनी केले.
यावेळी ढाकाळे विद्यामंदिरच्या अध्यापिका राणी पाटोळे यांना”आदर्श शिक्षक पुरस्कार” देऊन गौरवण्यात आले.
अतिग्रे येथील संजय घोडावत शैक्षणिक संकुल सभागृहात आनंद फौंडेशनच्यावतीने घेण्यात आलेल्या गुणवंत पुरस्कार वितरणप्रसंगी श्रीमती माने बोलत होत्या.
संजय घोडावत शिक्षण संकुलामध्ये आनंद गंगा फौंडेशनचे अध्यक्ष तानाजी पोवार यांच्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमातुन हा कार्यक्रम झाला.
यावेळी विश्वस्त विनायक भोसले, कोल्हापूर जि.प.चे शिक्षण सभापती प्रविण यादव,हातकणगले पंचायत समिती सभापती डॉ.प्रदिप पाटील,प्राचार्य विराट गिरी,शिक्षक नेते अर्जुन पाटील,एन वाय पाटील,सरपंच रंजना जाधव,जीएस पाटील आदी पुरस्कारार्थी व शिक्षणप्रेमी उपस्थित होते.
प्राचार्य विराट गिरी यांनी शिक्षणक्षेत्रातील विविध बदल, अडचणी व सकारात्मक पर्याय आदींबाबत मार्गदर्शन केले.सभापती यादव यांचेही भाषण झाले. जिल्ह्यातील तीस गुणवंतांना ट्रॅाफी, प्रशस्तीपत्र व शाल देऊन गुणवंत पुरस्काराने गौरविण्यात आले.

Categories
कोल्हापूर हातकणंगले

भिमराव मलगुंडे यांची उपाध्यक्षपदी निवड

प्रशांत भोसले
घुणकी ,ता. २२ : किणी हायस्कूल किणीचे ज्येष्ठ विज्ञान शिक्षक भिमराव धोंडीबा मलगुंडे यांची शिक्षक भारती या शिक्षक संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली. या निवडीबद्दल त्यांचे शिक्षण क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

त्यांना मुख्याध्यापिका सुरेखा शिरोटे ,पर्यवेक्षक डी.एच. पाटील ,किणी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आण्णासाहेब पाटील, उपाध्यक्ष सुहास माने, राजेंद्र पाटील व सर्व संचालक यांचे मार्गदर्शन लाभले.

Categories
कोल्हापूर हातकणंगले

योग व क्रीडा याचा योग्य समन्वय साधला तर आपण ऑलिम्पिक पदकापासून वंचित राहणार नाही – डॉक्टर कृष्णदेव गिरी

प्रशांत भोसले मिणचे ता . हातकणंगले येथील आदर्श विद्यानिकेतन अॅण्ड ज्युनियर कॉलेज , मिणचे या प्रशालेचा वार्षिक क्रीडा महोत्सव उद्घाटन सोहळा मंगळवार दि .16/2/2021 रोजी संपन्न झाला.आदर्श विद्यानिकेतनच्या कॅडेटस च्या वतीने मान्यवरांना मानवंदना देऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली .
डॉक्टर कृष्णदेव गिरी यांच्या हस्ते ध्वज पूजन व ध्वजारोहण करण्यात आले . संभाजी हटकर यांच्या हस्ते क्रिडा ज्योतीचे पूजन करण्यात आले .तसेच अविनाश पाटील यांच्या हस्ते मैदानाची पूजन करून वार्षिक क्रीडा महोत्सव चे औपचारिक उद्घाटन करण्यात आले . प्रशालेचा राष्ट्रीय खेळाडू सौरभ शिंदे याने खेळाडूंना खिलाडूवृत्तीसाठी शपथ दिली .
प्रशालेच्या राष्ट्रीय खेळाडूंनी ज्योत मैदानावर फिरवली . प्रशालेतील योग व मल्लखाम खेळाडुंनी चित्तथरारक प्रात्यक्षिके दाखवत उपस्थितांची वाहवा मिळवली . उद्घाटन सोहळा जागतिक कीर्तीचे योगगुरू डॉक्टर कृष्णदेव गिरी , राष्ट्रीय खेळाडू व रेल्वे पोलीस संभाजी हतकर , महाराष्ट्र शासन गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्राप्त अविनाश पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डी . एस . घुगरे सर उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिमखाना विभाग प्रमुख शिवाजी पाटील यांनी केले .त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून वार्षिक क्रीडा महोत्सवाचे महत्व व आपल्या प्रशालेचा जिमखाना विभागाचा वार्षिक अहवाल मांडताना क्रीडा क्षेत्रातील प्रशालेची गौरव गाथा सर्वांसमोर ठेवली .
प्रशालेचे ध्येय 2028 ओलंपिक स्पर्धा असल्याचे त्यांनी नमूद करत मयुर रोकडे ,आदित्य जाधव, पार्थ खोत या खेळाडूंच्या माध्यमातून हे ध्येय गाठण्यासाठी प्रशालेचा क्रीडा विभाग कार्यरत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले . डॉक्टर कृष्णदेव गिरी यांनी आपल्या मनोगतातुन क्रीडा व योग यांचा समन्वय साधत आपण ऑलिंपिक स्पर्धेतील ते गाठू शकतो असे नमूद केले . संभाजी हतकर यांनी आपल्या मनोगतात क्रीडा क्षेत्रातील प्रावीण्य प्राप्त प्रमाणपत्रांच्या आधारे आपण शासकीय नोकरीत सन्मानाचे पद प्राप्त करू शकतो असे विषद केले .आपल्या रांगड्या भाषेतील मनोगतातून आपण बिकट परिस्थितीतून राष्ट्रीय स्पर्धेत 41 पदक प्राप्त करत यश संपादन केल्याचे त्यांनी नमूद केले .
मी करणारच , मी करू शकतो असा आत्मविश्वास खेळाडूंच्या अंगी असावा असा संदेश त्यांनी आपल्या मनोगतातून दिला . अध्यक्षस्थानावरून बोलताना संस्थापक अध्यक्ष व प्राचार्य डॉक्टर डी एस घुगरे यांनी संस्थेच्या वतीने क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक त्या सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले . आपणही खेळाडू असून , खेळाडू हा समाजाचा एक उत्तम प्रशासक असतो असे आपल्या मनोगतातून आपल्या भावना व्यक्त करत त्यांनी वार्षिक क्रीडा महोत्सवासाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या .
कार्यक्रमाला संस्थेचे सचिव मा श्री एम ए परीट तसेच प्रशालेचे सर्व क्रीडा प्रशिक्षक ,शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार रणजीत पाटील यांनी मांडले .
विद्यालयातील सर्व पालकांना सदर कार्यक्रमाचे ऑनलाइन प्रक्षेपण देखील करण्यात आले . 167 पालकांनी या प्रक्षेपणाचा आनंद घेत सदर कार्यक्रमाबद्दल चांगल्या भावना व्यक्त केल्या.

Categories
कोल्हापूर हातकणंगले

विश्ववारणा पब्लिक स्कूल तळसंदे येथे छ .शिवाजी महाराज जयंती निमित्त वार्षिक क्रीडा स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न

दि 19 फेब्रुवारी 2021 रोजी विश्ववारणा पब्लिक स्कूल तळसंदे ( सैनिकी निवासी पॅटर्न ) प्रशालेत छ शिवाजी महाराज जयंती निमित्त फिट ऑफ इंडिया व खेलों इंडिया या द्वारे तसेच ” चला कोरोनावर मात करू ..शालेय खेळाडूंना प्रोत्साहन देऊ ” या शासनाच्या ब्रीद वाक्या प्रमाणे विश्ववारणा पब्लिक स्कूल मध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .यामध्ये सांघिक खेळामध्ये कबड्डी , फुटबॉल ,हॅन्डबॉल , हॉलिबॉल या खेळाचा समावेश करण्यात आला होता तसेच वैयक्तीक स्पर्धेमध्ये 100 मी ,200 मी ,400मी 800मी धावणे तसेच लांब उडी , गोळा फेक , थाळीफेक , या खेळाचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभागी होऊन प्रथम ,द्वितीय ,तृतीय विजेत्या खेळाडूंना मान्यवर पाहुण्यांच्या शुभहस्ते गौरवण्यात आले यावेळी संस्थेचे संस्थापक कॅप्टन गणपतराव घोडके ,तसेच सचिव श्री डी पी पाटील सर , व्यवस्थापक श्री दीपक महाडिक सर, तसेच यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालयाचे HOD डॉ अभिजित इंगवले ,तसेच चावरे गावचे उपसरपंच श्री अमरसिह शिंदे सरकार , वारणा कारखान्याचे संचालक श्री सुभाषराव जाधव (घुणकी ) तसेच फारणेवाडी येथील सरपंच श्री रामराव देशमुख , व तंटामुक्ती अध्यक्ष व माजी सैनिक प्रकाशराव साळूखे , व इंजिनिअर मनोहर पाटील इत्यादी प्रमुख पाहुणे उपस्थित होते उपस्थित पाहुण्यांना स्कूल कमांडर कु विनायक घराळ व पायलट कु शिवतेज नाळे ,कु विनोद शिंदे यांनी मानवंदना देऊन कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख , जिमखाना अहवाल वाचन प्रा संभाजी पाटील यांनी केले तसेच कॅप्टन गणपतराव घोडके यांनी आपल्या मनोगतामध्ये छ शिवाजी महाराजांच्या इंडीयन आर्मी मराठा इन्फंट्रीचा इतिहास सांगितला तसेच सचिव श्री डी .पी .पाटील यांनी आपले मनोगतामध्ये शिवाजी महाराजांच्या शिकवण व संस्कार सांगितले तसेच डॉ अभिजीत इंगवले यांनी छ शिवाजी महाराज यांचे बालपण व सर्वसामान्य रयतेसाठी ऐतिहासिक गनिमी कावा याची जाणीव करून दिली . तसेच यावेळी संस्थेच्या संचालिका सौ व्ही डी पाटील मॅडम व डॉ दीपिका महाडिक व शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी ,पालक , विद्यार्थी व खेळाडू उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रोहित पाटील सर व श्री शंकर काळे सर यांनी केले व आभार श्री प्रशांत भोसले यांनी केले

Categories
शैक्षणिक

रुग्णवाढ कायम राहिल्यास दहावी, बारावीच्या परीक्षांवरही संकट


पाटण हिंदू सम्राट प्रतिनिधी उमेश सुतार यांजकडून
राज्यात करोना रुग्णांच्या वाढत्या आकडय़ांनी दहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेल्या शिक्षण क्षेत्रासमोर पुन्हा संकट उभे केले आहे. रुग्णवाढीचा आलेख असाच राहिल्यास दोन दिवसांआधी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांच्या संभाव्य वेळापत्रकावर संकट उद्भवण्याची भीती शिक्षण मंडळातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे, करोनामुळे पुन्हा परीक्षा पद्धतीमध्ये किंवा वेळापत्रकात बदल झाल्यास कमी मनुष्यबळावर काम करणाऱ्या शिक्षण मंडळालाही नियोजनासाठी कसरत करावी लागणार आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच परीक्षा फेब्रुवारी-मार्चऐवजी एप्रिल-मे या कालावधीत होणार आहे. बारावीची लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे 2021 या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे या कालावधीत होणार आहे. मात्र, मागील आठ दिवसांपासून राज्यात करोना रुग्णांच्या संख्येत रोज वाढ होत आहे. त्यामुळे विदर्भातील अमरावती, अकोला आणि यवतमाळमध्ये बाधित क्षेत्र जाहीर करण्यात आले. औरंगाबाद जिल्ह्य़ामध्ये सुरू झालेल्या इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा करोनाच्या धडकीने पुन्हा बंद करून ऑनलाइन वर्ग सुरू करण्यात आले.
पालकांमध्ये भीती: इयत्ता दहावी आणि बारावी हे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची पुढील दिशा ठरवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे वर्ष असते. मात्र, करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने वेळापत्रकात बदल झाल्यास विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नियोजन बिघडणार आहे. शिवाय लेखी परीक्षा ही तीन तासांची असल्याने संक्रमणाच्या भीतीने पालक चिंतीत झाले आहेत.

Categories
कोल्हापूर

अनंतशांती संस्थेचे कार्य समाजाला प्रेरणादायी हिताचे : अमित वेंगुर्लेकर


कोल्हापूर- सुभाष भोसले
तळागाळात काम करणाऱ्या आणि समाजासाठी आपले योगदान देणाऱ्या लोकांची निवड करून त्यांना पाठबळ देण्याचे काम अनंतशांती सामाजिक संस्था करत आहे.असे प्रतिपादन ह्युमन राइट्स प्रोटेक्शन ट्रस्ट चे प्रदेश महासचिव अमित वेंगुर्लेकर यांनी केले. ते अनंतशांती सामाजिक संस्थेने वितरित केलेल्या सामाजिक आणि जिजाऊ पुरस्कार प्रसंगी बोलत होत.अध्यक्षस्थानी महंमद शेख हे होते.
रविश पाटील पुढे म्हणाले.आजकाल समाजात असे पुरस्कार देऊन पाठबळ देणारे लोक मोजकेच आहेत.अनंतशांतीने सर्वसामान्य लोकांना पुरस्कार देऊन आणखीन काम करण्याची त्यांच्यात उर्जा निर्माण केली आहे.असेच कार्य या संस्थेने राबवावे.
कार्यक्रमात रविश पाटील, अमित वेंगुर्लेकर ,अनिशा पाटील,प्रकाश कांनकेकर सर,संजय शिंदे आदींनी आपली मनोगते व्यक केलीत
कार्यक्रमात ४०च्या वर माहिला व पुरुष यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.प्रमाणपत्र व ट्रॉफी व मानाचा फेटा असे पुरस्काराचे स्वरूप होते.
जिजाऊ पुरस्कार असे- श्वेता पोवार,अनिशा पाटील, वैशाली चौगले,सविता जाधव, शैलजा कांनकेकर ,सविता बुगडे,सविता कवडे, सुवर्णा पाटील,आश्विनी शिंदे,सुजाता हुंदळकर,रेश्मा पाटील,मदिना मुजावर ,ज्योती नगारे आदी तर स्वामी विवेकानंद पुरस्कार कर्ते -रविष पाटील,सुभाष चौगले,रणजित जाधव,सम्राट शेंडगे,साताप्पा कुरणे,उमेश पोवार, एकनाथ पाटील,डॉ.एस. डी. पाटील,सचिन चौगले,सर्जेराव पाटील,शाम चौगले,समीर मकांनदार,सतीश शिंदे,सागर सावंत,चंद्रकांत बुगडे,आदी
कार्यक्रमास संस्थापक अद्यक्ष भगवान गुरव,मदन कोरे,राविष पाटील,महंमद शेख,अमित वेंगुर्लेकर,संजय शिंदे,महेश नंदे, प्रकाश कांनकेकर सर,अभिजित शिंदे,श्वेता पोवार,अनिशा पाटील ,आदी मान्यवर उपस्थित होते,या कार्यक्रमास मदन कोरे (सर) संकल्प अॕकडमी यांनी मोलाचे सहकार्य केले.
स्वागत संदीप कांबळे यांनी, सूत्रसंचालन शाम चौगले यांनी तर आभार अभिजित कांबळे यांनी मानले.

Categories
मुंबई

मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू ; कुटुंबावर शोककळा

विरेंद्र म्हात्रे नवी मुंबई प्रतिनिधी

  : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर पाच जण जखमी झाले आहेत. जखमीनां जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले असून मृतांमध्ये नवी मुंबईतील एकाच कुटुंबातील चार जणांचा समावेश आहे. मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर खालापूर टोलनजीक फुडमॉलजवळ सोमवारी रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमाराला हा भीषण अपघात झाला.

याबाबत वृत्त असे की पुणे एक्सप्रेस वेवर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका कंटेनरने टेम्पोला मागून धडक दिली. त्यामुळे पलटी झालेल्या टेम्पोला मागून येणाऱ्या दोन कार धडकल्या. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या टेम्पोने या दोन्ही गाड्यांनी धडक दिल्याने झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात नवी मुंबईतील डॉक्टर वैभव झुंजारे यांची आई, पत्नी आणि 5 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून ११ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. तर, दुसऱ्या कारमधील एका महिलेचा मृत्यू झाला आहे
डाॅ. वैभव झुंजारे नवी मुंबई महानगरपालिकेत पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. डाॅ. वैभव झुंझारे हे आपल्या कुटुंबासमवेत पुण्याला एका कार्यक्रमासाठी गेले होते. पुण्याहून मुंबईला परतत असताना फुडमॉल जवळ हा अपघात घडला आहे. या अपघातात मंजू नाहर, डॉ. वैभव झुंझारे, उषा झुंझारे, वैशाली झुंझारे, श्रिया झुंझारे यांचा मृत्यू झाला आहे. तर स्वप्नील कांबळे, प्रकाश नाहर, अर्णव झुंझारे, किशन चौधरी, काळूराम जाट हे जखमी झाले आहेत.

Categories
सोलापूर

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती साजरा झाला श्री विठ्ठल रुक्माई चा शाही विवाह सोहळा!

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

मंगळवारी वसंतपंचमी दिवशी श्री विठ्ठल व रूक्मिणीचा विवाह सोहळा पंढरपूरमध्ये मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.
दुपारी वाजता श्री विठ्ठल रखुमाई यांचा विवाह सोहळा झाला.मंदिरे समिती सह अध्यक्ष ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनीही देवाच्या लग्नात मंगल अष्टका म्हंटल्या. व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्यासह मंदिरातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते. सभामंडपात आकर्षक सजावट करण्यात आली होती.

कोरोनाविषयक सारे आरोग्याचे नियम या सोहळ्यास लागू असल्याने मोजके लोक यासाठी हजर होते. घरी मंदिरे समितीच्या वतीने विवाहाची जय्यत तयारी करण्यात आली होती. पाच टन विविध फुलांनी मंदिर सजविले गेले होते. तर वधूवरांसाठी विवाहाचा पेहराव बंगलोर येथील प्रसिद्ध फॅशन डिझायनर सविता चौधरी यांनी डिझाईन करून अर्पण केला आहे.
श्री विठ्ठलासाठी पांढर्‍या रंगाची अंगी व उपरणे बनविण्यात आले आहे. यावर विष्णूच्या शुभ खुणा असलेला शंख, चक्र व ओम विविध प्रकारच्या रंगीबेरंगी मोत्याच्या बनविण्यात आले आहे. रुक्मिणी मातेलाही अतिशय उंची सिल्कची कांजीवरम साडी निवडण्यात आली आहे.

पुण्यातील फुल सजावटीची सेवा देणारे भारत भुजबळ हे पाच टन फुलांनी मंदिर सजविले होते.यात थोरियम, विविध रंगी गुलाब, ओर्केड ,जरबेरा, मोगर्‍यासह 36 प्रकारच्या फुलांचा वापर करण्यात आला आहे.
कोरोनाचे संकट अजूनही संपूर्णतः संपले नसल्याने या देवाच्या विवाहातही कोरोनाविषयक सर्व आरोग्य नियम पाळले गेले. या विवाह सोहळ्यानिमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात रूक्मिणी स्वयंवराची कथा भागवताचार्य अनुराधाताई शेटे यांनी सांगितली.

Categories
कोल्हापूर

शिक्षकांना न्याय द्या अन्यथा भविष्यात याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील माजी खासदार श्री. राजू शेट्टी यांनी आझाद मैदानावर दिली आंदोलनास भेट

दै.हिंदुसम्राट / प्रतिनिधी संतोष चव्हाण
मुबंई:-आज सोमवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार श्री.राजू शेट्टी यांनी आझाद मैदानावर विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनला भेट दिली. राज्यातील विविध विनाअनुदानित शिक्षक संघटना एकत्र येऊन शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून विनाअनुदानित शिक्षकांच्या प्रलंबित न्याय मागण्यांसाठी गेल्या 18 दिवसांपासून सुरू आहे.राज्यातील जवळपास साठ हजारहुन अधिक शिक्षकांची गेल्या 20 वर्षांपासून होत असलेली अवहेलना व शिक्षकांच्या अनुदानबाबतची सद्य परिस्थिती समन्वय संघाचे समन्वयक श्री.खंडेराव जगदाळे सर यांनी शेट्टी साहेबांसमोर कथन केली.तसेच हे सरकार निधी उपलब्ध असूनही हेतुपुरस्सर कसे दुर्लक्ष करत आहे याचा पाढा वाचला.
यावेळी बोलताना श्री.राजू शेट्टी म्हणाले की आजच्या या परिस्थितीला सद्याचे व पुर्वीचे दोन्ही राज्यकर्ते जबाबदार असून आता तरी त्यांनी एकमेकांना दोष देणे थांबवावे.ते पुढे म्हणाले की भारतीय संस्कृतीत गुरूला अनन्यसाधारण महत्त्व असून ते वंदनीय आहेत.मात्र आज त्यांना हक्काचा पगार नाकारून राज्यकर्ते मोठे पाप करत आहेत.या शिक्षकांना उपाशीपोटी राबवून घेणे अजिबात व्यवहारार्य नसून संतापजनक आहे.तसेच या प्रश्नांवर सर्व शिक्षक संघटना एकत्र आल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.शांततेत व सनदशीर मार्गाने जर सरकार जुमानत नसेल तर मग मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा गनिमी कावा वापरून यश खेचून आणण्याचा कानमंत्र त्यांनी यावेळो दिला. शिवाय औरंगाबाद आंदोलनमध्ये शिक्षकांवर दाखल झालेले खोटे गुन्हे व आजवरच्या शिक्षकांच्या संघर्षाचा देखील उहापोह केला.तसेच खंडेराव जगदाळे सर हे माझ्या शिरोळ गावचेच असून त्यांचे विनाअनुदानितसाठीचे कार्य प्रशंसनीय आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

यावेळी समन्वय संघाचे श्री.ज्ञानेश्वर शेळके,सौ.नेहा गवळी,श्री.दीपक कुलकर्णी, श्री.राहुल कांबळे,श्री.कर्तारसिंग ठाकूर आणि इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते.

Categories
कोल्हापूर

बाबासो कुंभार यांचा गुरुवर्य डी. डी. आमगावकर शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा विकास ट्रस्टकडून सन्मान

कोल्हापूर:संजय पाटील

बाबासो मारुती कुंभार
सहा. शिक्षक, श्री. विलासराव शामराव तळप – पाटील माध्यमिक विद्यालय,
गोगवे ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर या ठिकाणी कार्यरत आहेत.विज्ञान विषयाचे तज्ज्ञ अध्यापक या नात्याने विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी; म्हणून सतत कार्यरत. विज्ञान विषयाचा पुनर्रचित पाठ्यक्रम, अविरत प्रशिक्षण आणि आय.सी.टी. विषयाचे राज्यस्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले आहे. याशिवाय कला, कार्यानुभव व शारीरिक शिक्षण विषयाचेही जिल्हास्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शन म्हणून काम केले आहे. शाळेतील सांस्कृतिक, क्रीडा आणि महाराष्ट्र छात्र सेना विभागात सक्रिय सहभाग असतो.
त्यांच्या या बहुमोल कार्याचा गौरव व्हावा; म्हणून
आणि यापुढेही त्यांच्या हातून उत्तुंग कार्य घडण्यासाठी प्रेरणा मिळावी या हेतूने त्यांना
‘डी. डी. आसगावकर गौरव पुरस्कार’
देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
गुरुवर्य डी.डी.आसगावकर संस्थापक,सचिव, सांगरुळ शिक्षण संस्था, सांगरुळ यांनी कोल्हापूरच्या पश्चिमेकडील डोंगराळ, दुर्गम भागात कार्यरत असलेल्या सांगरुळ शिक्षण संस्थेचा शाखाविस्तार केला. या हीरकमहोत्सवी संस्थेच्या कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यात एकंदर १७ शाखा कार्यरत आहेत. संस्थेचे एकूण
३०० कर्मचारी असून सुमारे ७००० विद्यार्थी संस्थेत शिक्षण घेत आहेत. संस्थेच्या सचिव पदावरुन संस्थेचा हा डोलारा यशस्वीपणे सांभाळत डी. डी. आसगावकर सरांनी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाला उर्जितावस्था प्राप्त करुन दिली. श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस या संस्थेच्या विकासात सक्रिय सहभाग घेतला. तसेच संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या आर्थिक गरजा भागविणेसाठी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली.त्यामुळे अत्यंत प्रतिकूल परिस्थतीतही असंख्य गोरगरिबांचे संसार उभे
राहिले. त्यांचे असंख्य माजी विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर, उद्योजक, उच्चपदस्थ अधिकारी बनून सेवा बजावत आहेत. असे अलौकिक कार्य करणाऱ्या या विभूतीच्या नावे हा पुरस्कार दिला जातो.या पुरस्कार वितरण प्रसंगी आम.प्रा.जयंत आसगावकर,शिक्षणाधिकारी किरण लोहार आम.चंद्रकांत जाधव,आम. ऋतुराज पाटील तसेच शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मा. आमदार प्रा. जयंत दि.आसगावकर अध्यक्ष
गुरुवर्य डी. डी. आमगावकर शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा विकास ट्रस्ट यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.
बाबासो कुंभार यांना पुरस्कार मिलेल्याबद्दल शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातुन त्यांच्यावर कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

Categories
कोल्हापूर हातकणंगले

लोकांनी माध्यमातून व्यक्त होत असताना देशाची एकात्मता, जातीय सलोखा यांचा आदर राखून व्यक्त्त झाले पाहिजे : डॉ. शिवाजी जाधव

सामाजिक माध्यमे या विषयावर बोलताना डाॕ.शिवाजी जाधव

रुकडी ( दि. १५-२-२०२१ बातमीदार / प्रतिनिधी ) प्रत्येक भारतीय व्यक्त्तीला राज्यघटनेने अभिव्यक्त्ती स्वातंत्र्य दिले आहे, त्यामुळे प्रत्येक व्यक्त्ती आपले विचार इतरांसमोर कोणत्याही माध्यमांतून मांडू शकते किंबहुना इतरांसमोर व्यक्त्त होण्याचा आपला हक्क आहे, परंतू अभिव्यक्त्ती स्वातंत्र्यावर मर्यादा आहेत.आपण इतरांसमोर व्यक्त्त होत असताना देशाची एकात्मता, जातीय सलोखा यांचा आदर राखून व्यक्त्त झाले पाहिजे. एखाद्या व्यक्त्तीच्या मनाविरुद्ध त्यास फोन करणे किंवा संदेश पाठविणे हा गुन्हा आहे, याची जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे. सामाजिक माध्यमांद्वारे संदेश देऊन संकटाच्या वेळी मदत करता येते, सामाजिक माध्यमे लोकांना माहिती देण्याचे काम करतात काही वेळेस आपणास काही माध्यमाद्वारे चुकीची माहिती प्राप्त होते. आपण त्या माहितीतील सत्यता न पडताळता आलेली माहिती किंवा संदेश इतरांपर्यंत पोहचवितो.चुकीचा संदेश इतरांपर्यंत पोहचविणे कायद्याने गुन्हा आहे, त्यामुळे प्रत्येक व्यक्त्तीने आलेला संदेश इतरांना पाठविताना दक्षता घ्यावी, अन्यथा आपल्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते असे मत शिवाजी विद्यापीठातील जर्न्यालिझम आणि मास कम्युनिकेशन विभागातील डॉ. शिवाजी जाधव यांनी व्यक्त्त केले ते येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयात अंतर्गत तक्रारी समितीच्यावतीने आयोजित केलेल्या सामाजिक माध्यमे : फायदे व तोटे या विषयावरील ऑनलाइन व्याख्यानात बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अर्जुन राजगे होते स्वागत व प्रास्ताविक डॉ. शर्मिला साबळे यांनी केले. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. अर्जुन राजगे म्हणाले सामाजिक माध्यमे हे साधन आहे, ते वाईट नाहीत एखाद्या व्यक्त्तीने या माध्यमांचा वापर वाईट हेतूने केला तर विनाकारण माध्यमांना दोष दिला जातो ते पूर्णतः चुकीचे आहे माध्यमांचा वापर करताना सदविवेक बुद्धीने वापर करावा. मला काय वाटते त्याचबरोबर इतरांना काय वाटेल याचा विचार करावा , आपण आपले हक्क सांगतो पण कर्तव्य व जबाबदारी विसरतो. त्यामुळे हक्का बरोबरच कर्तव्य व जबाबदारीची जाणीव आपणाला असली पाहिजे,या सामाजिक माध्यमांद्वारे आपण संपूर्ण जगाशी जोडले गेलो आहोत पण कुटुंबापासून आपण दूर जात आहोत याचा दोष सामाजिक माध्यमांना देता येणार नाही. आभार डॉ. लता मोरे यांनी मानले तर सूत्रसंचालन कु.सोनम कांबळे यांनी केले. या व्याख्यानाचा लाभ विद्यार्थी व शिक्षकांनी घेतला

Categories
कागल कोल्हापूर

कागल मध्ये मोफत महिला आरोग्य मेळावा संपन्न.


खास महिलांसाठी वाण आरोग्याचं मोफत तपासणी केली गेली. महिला राष्ट्रवादी काँग्रेस,कागल नगरपरिषद व राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेवेच्या वतीने आयोजित.


कागल/प्रतिनिधी◆गोरख कांबळे.
ग्रामविकास मंत्री नाम. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी महिला जिल्हाध्यक्षा सौ. शितल फराकटे, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. हरीश पाटील, नगराध्यक्षा सौ माणिक माळी,आरोग्य सभापती शोभा लाड, महिला बालकल्याण सभापती नूतन गाडेकर, नगरसेविका माधवी मोरबाळे, कागल शहर महिला अध्यक्ष पद्मजा भालबर, सुषमा पाटील आदी उपस्थित होते.
कागल ग्रामीण रुग्णालतील डॉ.सुनिता पाटील, डॉ. घेवडे, डॉ सादिलगे, डॉ मगदूम, डॉ संदीप पाटील, डॉ गीता पिलाई, डॉ जयंता पाटील, डॉ. नीलिमा पाटील, डॉ सुनिता पाटील, डॉ शैलेश पाटील,डॉ पुनम पाटील यांनी रुग्णांची तपासणी केली.
या शिबिरामध्ये हृदयरोग, मधुमेह, अस्थीरोग, स्त्रीरोग, नेत्ररोग, दंतरोग, हाडाचे रोग व इतर सर्व रोगांवरील तपासणी करण्यात आली व गरजू रुग्णांची मोफत ब्लड टेस्ट घेऊन औषधे वाटप करण्यात आली. कागल व परिसरातील 380 रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.

Categories
कागल कोल्हापूर

भारती कांबळे यांनी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून ज्ञानदानाचे काम प्रामाणिकपणे केले: सुवर्णा सावंत यांचे प्रतिपादन.


कागल/प्रतिनिधी◆गोरख कांबळे.
भारती कांबळे यांनी विध्यार्थी केंद्रबिंदू मानून ज्ञानदानाचे काम प्रामाणिकपणे केल्याचे प्रतिपादन एस.एस.सी बोर्डाच्या सहसचिव सुवर्णा सावंत यांनी केले.त्याव्हन्नूर (ता.कागल)येथील श्री. दौलतराव निकम माध्यमिक विद्यालयातील सहाय्यक शिक्षिका सौ.भारती कांबळे यांच्या सेवानिवृत्ती प्रसंगी बोलत होत्या.अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्षा श्रीमती.सुनंदा निकम होत्या.सौ.सावंत पुढे म्हणाल्या, प्रतिकूल परिस्थितीमध्ये भारती कांबळे यांनी आपल्या प्रभावी व उत्कृष्ट अध्यापनाद्वारे आदर्श विद्यार्थी निर्माण केले.
कागल तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस.टी.चौगुले म्हणाले,भारती कांबळे यांनी महिलाशिक्षकांसाठी आदर्शवत काम करून समूहगीत व गीतगायन प्रकारात प्रशंसनीय काम केले आहे.
यावेळी मनोज जिरगे,कांबळे सर,माजी विद्यार्थीनी रोहिणी पाटील,कृष्णाबाई पाटोळे, समृद्धी पाटील तर प्रशालेच्या विद्यार्थिनी समृद्धी निकम,अमृता पोवार यांनी आपली मनोगते व्यक्त केली.प्रशालेच्या वतीने सौ.कांबळे यांना मानपत्र देण्यात आले.
यावेळी गावातील विविध संस्था,ग्रामपंचायत,माजी विद्यार्थी,नातेवाईक, यांच्याकडून त्यांचा सत्कार करण्यात आला व कांबळे यांनी ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी दौलतराव निकम यांचा आदर्श मानून आपण काम करत असल्याचे सांगून शेवटच्या श्वासापर्यंत या शाळेच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील राहू असे सांगितले.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक व्ही.जी.पोवार यांनी केले.सूत्रसंचालन एम.जी.मोरे यांनी केले तर आभार बी.बी खाडे यांनी मानले.

Categories
कागल कोल्हापूर

जीवनात आई व गुरु हेच आपले मार्गदर्शक- शिक्षक नेते दादासाहेब लाड


बाळ डेळेकर व जे .डी.पाटील यांचा सत्कार संपन्न
कोल्हापूर- सुभाष भोसले
जीवनाला आकार देणारे शिक्षक, आई-वडील हेच आपले खरे मार्गदर्शक असतात ,त्यांचा आपण आदर, सन्मान राखला पाहिजे असे प्रतिपादन शिक्षक नेते श्री दादासाहेब लाड यांनी केले ते श्री शाहू हायस्कूल,ज्युनियर कॉलेज कागल येथे आयोजित सत्कार समारंभात बोलत होते. शिक्षण प्रसारक मंडळाच्या कौन्सिल सदस्य पदी निवड झाल्याबद्दल बाळ डेळेकर यांचा तर महाराष्ट्र मुख्याध्यापक संघाच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल प्राचार्य जे .डी.पाटील यांचा सत्कार शिक्षक नेते दादासाहेब लाड यांच्या हस्ते करण्यात आला.माझ्या वाटचालीत शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी जयकुमार देसाईसो, उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत, युवा नेते व पेट्रन सदस्य दौलतराव देसाईसो, प्रशासन अधिकारी मंजिरी मोरे -देसाईसो ,शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच शिक्षक नेते दादासाहेब लाड यांचेही योगदान मोलाचे आहे असे प्रतिपादन शाहू हायस्कूलचे उपमुख्याध्यापक व कोजिमाशिचे नूतन चेअरमन बाळ डेळेकर यांनी केले.माझा सन्मान हा माझ्या प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान आहे असे प्रतिपादन प्राचार्य जे.डी.पाटील यांनी केले यावेळी उपप्राचार्य बी .के. मडिवाळ,पर्यवेक्षिका सौ एस. ए .कुलकर्णी , श्री एस जी पाटील, श्री एस यु देशमुख ,एस आर पोतदार,के एच भोकरे, टी सी सुतार,सर्व शिक्षक- शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते सूत्रसंचालन के. आय. जमादार तर आभार पर्यवेक्षिका सौ .एस. ए .कुलकर्णी यांनी मानले.

Categories
कागल कोल्हापूर

कागल येथे विभागीय व्हॉलीबॉल निवड चाचणी संपन्न


कोल्हापूर- सुभाष भोसले
कागल मधील शाहू हायस्कूल मौदानात १६ वर्षाखालील मुलांची विभागीय व्हॉलीबॉल निवड चाचणी संपन्न झाली.सदर संघ पन्हाळा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सब ज्युनियर अजिंक्य स्पर्धेसाठी खेळणार आहे. या निवडी प्रसंगी महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनचे सचिव बाळासाहेब सुर्यवंशी,माजी उपनगराध्यक्ष नितीन दिंडे, राष्ट्रीय व्हॉलीबॉल कोच महेश शेडबाळे, चंद्रकांत कासोटे, प्रंशात दळवी,माजी राष्ट्रीय खेळाडू समीर खोडवे,संदिप शिंदे, योगेश माडवकर,प्रंशात म्हातुकडे,अमोल सुतार उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रविण मोरबाळे तर आभार वैभव आडके यांनी मानले. विभागीय संघ पुढील प्रमाणे करण फराकटे कोच,अभिषेक भुरले संघव्यवस्थापक,विवेक साळोखे कर्णधार, जीवक वाघमारे, विनित चव्हाण, मयुर सुतार, सुमित पाचगावे,मयुर कदम, विजय निमंग्रे, राजवर्धन पाटील, कुणाल साळगावकर, आदित्य मांगले, मानव साठे,तनिष खरात

Categories
कोल्हापूर हातकणंगले

परवेझ चे काम उल्लेखनीय -प्रमोद पाटील

शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील समाज कार्याला वाढून घेऊन सर्वसामान्य नागरिकांना मदत करणेचे काम परवेझ सनदी करत असलेने त्याचा आम्हाला अभिमान वाटतो असे मत कबनुर चे युवा नेते यांनी केले.
परवेझ सनदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने सहारा फौंडेशनाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी श्री.प्रमोद पाटील हे बोलत होते.
यावेळी नूतन सरपंच सौ.शोभा पोवार, ग्राम.सदस्य सौ.सुधाराणी पाटील,सौ.सुलोचना कट्टी, सौ.अर्चना पाटील,सुनील काडप्पा,सैफ मुजावर,रुई चे सरपंच सौ.करिश्मा मुजावर,उप सरपंच युनूस मकानदार,ग्रा. सदस्य दोरूगडे,तिळवणी चे सरपंच सूरज पाटील,उप सरपंच दीपक गायकवाड,महेश कांबळे,परवेझ मुजावर,रवी धनगर, किशोर पाटील,शकील मुल्ला,आबा कुपटे,निंबाळकर, एस एस कांबळे यांचा सत्कार सौ.रेश्मा सनदी व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी समीर भोकरे,अल्ताफ नाईकवाडी,ओबेद भोकरे, समीर सनदी,नसरू सनदी,गोट्या सनदी,असिफ सनदी,कबीर हाजारी,महेश जासूद आदी उपस्थित होते.

Categories
कोल्हापूर गुन्हेगारी

कोल्हापूर येथे खुनाचा काही तासातच उलगडा: सोन्यासाठी केली ८० वर्षांच्या वृद्धेची हत्या

पन्हाळा हिंदूसम्राट प्रतिनिधी प्रदिप सुतार यांजकडून

कोल्हापूर :: राजाराम तलाव इथं अर्धवट जळालेल्या स्थितीत एक मृतदेह आहे, अशी वर्दी पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता राजराम तलाव परिसरात धाव घेतली. क्षणाचाही उसंत न घेता पोलिसांनी या प्रकरणात कसून तपास केला आणि सायंकाळपर्यंत संशयिताच्या हाती बेड्या ठोकल्या. प्रथम दर्शनी तपासासाठी अत्यंत किचकट असणारा या गुन्ह्याचा तपास पोलिसांनी काही तासात लावला. या खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांनी संतोष निवृत्ती परीट या ३५ वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.
संतोष हा कर्जबाजारी असून या वृद्ध महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरण्यासाठी हा खून केल्याचे निष्पन्न झालेले आहे. तर मयत महिलेचे नाव शांताबाई श्यामराव आगळे (८०, रा. जगताप कॉलनी) पाचगाव असे निष्पन्न झाले आहे.एक महिलेचा अर्धवट स्थितीत जळालेला मृतदेह मिळल्याची बातमी कोल्हापूर शहरात वाऱ्यासारखी पसरली होती. पोलिसही या गुन्ह्यामुळे चक्रावून गेले होते. या महिलेची ओळख पटवणे हे पोलिसांसमोरील सर्वांत मोठे आव्हान होते.पोलिसांनी तातडीने गेल्या काही दिवसांतील मिसिंग रेकॉर्ड तपासण्यास सुरुवात केली. त्यातून त्यांना पाचगावमधील शांताबाई आगळे बेपत्ता असल्याची तक्रार नोंद असल्याचं दिसून आलं. पोलिसांनी तातडीने त्यांच्या नातेवाईकांना बोलवून घेत मृतदेहाच्या अंगावरील कपडे इतर काही वस्तू यावरून नातेवाईकांनी शांताबाई यांचाच हा मृतदेह असल्याचं सांगितलं.यानंतर पोलिसांनी चौकशी सत्र सुरू केले. पोलिसांना सूत्रांकडून संतोष परिट या व्यक्तीबद्दल संशयास्पद माहिती मिळाली. संतोष हा टाकाळा येथील रहिवाशी असून तो गेली ५ वर्ष शांताबाई आणि त्यांच्या नातेवाईकांना ओळखतो.पोलिसांनी संतोषला ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता त्याने या गुन्ह्याची कबुली दिली.संतोष हा कर्जबाजारी आहे. शांताबाई यांच्या अंगावर सोन्याचे दागिने असतात याची माहिती त्याला होती. ५ फेब्रुवारीला त्यांने शांतबाई यांना देवकार्य करण्याच्या बहाण्याने स्वतःच्या घरी बोलवले आणि तिथं त्यांचा खून करून त्यांच्या अंगावरील दागिने काढून घेतले.पोलिस या प्रकरणात अधिक तपास करत आहेत.
तपास पथक – पोलीस अधीक्षक डॉ.शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, उप विभागीय पोलिस अधिकारी मंगेश चव्हाण, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, राजारामपुरी पोलिस ठाणेचे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल, पोलिस निरीक्षक संदिप कोळेकर पोलिस निरीक्षक अनिल गुजर, सहा पोलिस निरीक्षक सत्यराज घुले, महिला सहा पोलिस निरीक्षक जौंजाळ, पोलिस उप निरीक्षक विवेक राळेभात, विनायक सपाटे, समाधान घुगे, पोलिस अमलदार अमित सर्जे, खराडे, सागर कांडगावे, अमोल कोळेकर, संदिप कुंभार, राम कोळी, अजय वाडेकर, सुरेश पाटील, अर्जुन बंदरे, तानाजी गुरव, फिरोज मुल्ला, तसेच आरसीपी टीम.

Categories
इंदापूर

पुणे-सोलापूर महामार्गावर मोठा अपघात तिघांचा मृत्यू , तर दोन जखमी.

इम्तिहाज मुलाणी :
इंदापूर (प्रतिनिधी):

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील डाळज नं. २ च्या हद्दीत फाॅर्च्यूनर व ट्रॅक्टर चा अपघात झाला हा अपघात एवढा भयानक होता की या अपघातात
फाॅर्च्यूनर मधील तिघांचा मृत्यू झाला आहे.दि.०७ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.यामध्ये गीता अरूण माने वय ३६ वर्षे,मुकुंद अरुण माने वय २५ वर्षे,अरुण बाबुराव माने वय ४५ वर्षे सर्व रा.लातूर जिल्हा-लातूर अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नांवे असून साक्षी अरुण माने वय १८ व महादेव रखमाजी नेटके वय ५६ हे या भिषण अपघातात जखमी झाले आहेत.

याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेली माहिती अशी दि.०७ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टर नं एम.एच ४५ एफ ७७७९ दोन ट्रेलर मौजे केत्तुर येथून ट्राॅलीमध्ये ऊस भरुन माळीनगर साखर कारखाना येथे जात असताना मौजे डाळज नं २ गावचे हद्दीत पुणे – सोलापूर हायवे रोडवर पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या फाॅर्च्यूनर (गाडी नं.- एम.एच.२४ ए.टी २००४) हीने ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर च्या मागील ट्राॅलीस जोरदार धडक दिली.

हा आपघात इतका गंभीर होता की यात गीता अरूण माने,मुकुंद अरुण माने व अरुण बाबुराव माने यापैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.तर साक्षी अरुण माने व चालक महादेव रखमाजी नेटके हे जखमी झाले आहेत.या अपघातात वाहनाचे ही प्रचंड नुकसान झाले असून याबाबत ट्रॅक्टर चालक गोरख मल्हारी बिडबाग वय ६० रा.संग्रामनगर अकलूज ता – माळशिरस जि सोलापूर यांनी भिगवण पोलिसांत खबर दिली आहे.पुढील तपास सहा.पोलिस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनिरिक्षक सुभाष रुपनवर करीत आहेत

Categories
कोल्हापूर हातकणंगले

कॅन्सरची लक्षणे जाणवताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे कॅन्सरला घाबरण्याची गरज नाही : डाॕ.माधुरी चौगुले

कॅन्सर तपासणी व उपचार शिबिर उद्घाटन प्रसंगी बोलताना डाॕ.माधुरी चौगुले, प्राचार्य डाॕ.अर्जुन राजगे व इतर

प्रशांत भोसले
रुकडी ( दि.७- २-२०२१ ) आपल्या शरीरात होणाऱ्या वेदना आपल्या मनात न ठेवता डॉक्टरांना सांगितल्या तर डॉक्टर त्या वेदना पाठीमागील कारणे शोधून त्यावर योग्य ते उपचार करतील डाॕक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे उपचार केले तर कॅन्सर निश्चित बरा होतो, कॕन्सरची लक्षणे जाणवताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे कॕन्सरला घाबरण्याची गरज नाही असे मत डाॕ.माधुरी चौगुले यांनी व्यक्त्त केले, त्या रूकडी येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयात कोल्हापूर कॅन्सर सेंटर यांच्या सहकार्याने व रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल, रोटरी क्लब आॕफ अतिग्रे, रोटरॕक्ट क्लब व राष्ट्रीय सेवा योजना राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय रूकडी यांच्या वतीने आयोजित केलेल्या कॅन्सर तपासणी व कॅन्सर उपचार शिबिर उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अर्जुन राजगे होते. स्वागत रो. डॉ. प्रशांत कांबळे यांनी केले तर प्रास्ताविक रो. संजयसिंह गायकवाड यांनी केले या शिबिरात रूकडी परिसरातील सुमारे पन्नास स्त्री-पुरुषांनी कॕन्सर तपासणी करून घेतली या वेळी डाॕ.माधुरी चौगुले यांनी कॕन्सरची लक्षणे सांगितली. या शिबिरासाठी कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे संचालक डॉ.अर्जुन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सर्व स्टाफने उपस्थित स्त्री-पुरुषांची तपासणी केली. यावेळी प्राथमिक आरोग्य पथक रूकडीचा सर्व स्टाफ, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराइजचे रो. श्रीकांत झेंडे रो.चंदन मिरजकर, रोटरी क्लब आॕफ इचलकरंजी सेंट्रलचे कम्युनिटी सर्व्हिस डायरेक्टर रो.सतीश पाटील, रोटरी क्लब आॕफ अतिग्रेचे अध्यक्ष डाॕ.हिंदुराव संकपाळ उपस्थित होते. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. अर्जुन राजगे म्हणाले हे महाविद्यालय विद्यार्थ्यांना फक्त्त शिकविण्याचे काम करीत नाही तर सामाजिक बांधिलकी मानून समाज उपयोगी विविध कार्यक्रमाचे आयोजन करते त्याचाच एक भाग म्हणून रुकडी परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी या शिबिराचे आयोजन केले आहे. त्याचा लाभ नागरिकांना होईल. आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर गिरिश मोरे यांनी मानले

Categories
कोल्हापूर शैक्षणिक

महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा ग्लोबल टीचर अवार्ड-2020 शिक्षक मच्छिंद्र कुंभार यांना मिळाला .


कोल्हापूर- सुभाष भोसले

आदर्श हायस्कूल भामटे ता. करवीर जि. कोल्हापूर या विद्यालयातील सहाय्यक शिक्षक
श्री मच्छिंद्र रघुनाथ कुंभार यांना नुकताच मानाचा 110 देशांचा सहभाग असलेला ग्लोबल टीचर पुरस्कार 2020 ने सन्मानित करण्यात आले.

श्री कुंभार हे गणित विषयाचे अध्यापक आहेत. त्यांनी गणित विषयांमध्ये तयार केलेली 105 ॲप्स, अनेक व्हिडिओ ई- कन्टेन्ट , गणित विषयासाठी बनविलेल्या 5000 हून अधिक कृतीपत्रिका, वर्गामध्ये राबविलेले विविध नवोपक्रम त्याचबरोबर भूमितीसारखा काठिण्य पातळीचा विषय सुलभ व्हावा यासाठी त्यांनी राबवलेल्या कृतीतून शिक्षण या नवोपक्रमांची दखल विद्या प्राधिकरण पुणे (SCERT) यांनी घेतली आहे.

त्याचबरोबर नवोपक्रमाविषयीचे त्यांचे पाच लेख आंतराष्ट्रीय जर्नल मध्ये झळकले आहेत. इयत्ता नववी व दहावीच्या गणित विषयासाठी *इंटरॅक्टिव्ह ॲनिमेटेड फ्लिपबुक ही संकल्पना राबवून एका क्यूआर कोड मध्ये संपूर्ण पाठ्यपुस्तक तयार करून शिक्षकांचे अध्यापन व विद्यार्थ्यांचे अध्ययन त्यांनी सुलभ केले आहे. गणित भाग 1 व गणित भाग 2 या दोन्ही पाठ्यपुस्तकातील प्रत्येक घटकाला एक स्वतंत्र क्यूआर कोड तयार करून त्याचे पाठ्यपुस्तक तयार केले आहे. विद्यार्थ्यांनी स्वतः QR कोड तयार करून आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये ते चिकटवलेले आहेत. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या साह्याने अध्ययन व अध्यापन या दोन्ही प्रक्रिया अत्यंत सुलभ होण्यास मदत झाली आहे. नियमित उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होत आहेच शिवाय जर एखादा विद्यार्थी गैरहजर राहिल्यास त्याचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी QR कोडयुक्त पाठ्यपुस्तक एक वरदान ठरले आहे.

विद्यार्थ्यांच्यासाठी त्यांनी केलेल्या या व अशा विविध शैक्षणिक कार्याची दखल घेऊन AKS फाउंडेशन, दिल्ली यांनी त्यांना मानाचा ग्लोबल टीचर-2020 हा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

श्री कुंभार यांनी हे यश आपल्या सर्व विद्यार्थ्यांना, तंत्रस्नेही मित्रांना व आपल्या गुरुवर्यांना समर्पित केले आहे.
त्यांना हे सुयश मिळण्यामागे डायटचे प्राचार्य डॉ.श्री. आय. सी. शेख , माध्यमिकचे शिक्षणाधिकारी . श्री. किरण लोहार उपशिक्षणाधिकारी श्री डी. एस. पोवार करवीरचे गटशिक्षणाधिकारी श्री. एस. के. यादव , विस्तार अधिकारी मा. श्री ओतारी , श्री. डी. सी. कुंभार व श्री विश्वास सुतार , कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव श्री दत्ता पाटील व संघाचे सर्व पदाधिकारी व संचालक, आदर्श हायस्कूल भामटे ता करवीर जि. कोल्हापूरचा सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद, त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा तंत्रस्नेही टिम (TSTS) चे सर्व सन्माननीय तंत्रस्नेही शिक्षक मित्र व मुख्याध्यापक संघातील गणित-विज्ञान विषय समितीतील सर्व सन्माननीय सदस्य या सर्वांचे लाख मोलाचे सहकार्य, प्रसंगी मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले आहे. या सर्वांच्या सहकार्यामुळेच मला हे सुयश मिळाले आहे. अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
ग्लोबल टीचर अवार्ड-2020 हा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या श्री मच्छिन्द्र कुंभार यांचे कौतुक होत आहे.

Categories
Uncategorized

आमचे सरकार जर पाच वर्षे टिकले तर…? विकास कामे करू व मते मागू – अजित पवार

इंदापूर येथील पीडीसी बँकेच्या नूतन इमारतीसह अनेक विकास कामाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते उद्घाटन : विरोधकांसह पक्षातील कार्यकर्त्यांवरती जोरदार टोलेबाजी

इम्तिहाज मुलाणी :
इंदापूर (प्रतिनिधी):

इंदापूर : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या इंदापूर विभागीय कार्यालय तसेच जुन्या पुणे सोलापूर महामार्गावरील बॅंकेच्या नूतन शाखेचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी (ता. 6 फेब्रुवारी) पार पडले.

या वेळी पवार आपल्या भाषणात म्हणाले की, इंदापूर नगरपरिषद आमच्या राष्ट्रवादी पक्षाच्या ताब्यात नसताना सुद्धा आम्ही ३३ कोटी रुपयांचा निधी इंदापूर नगरपरिषदेच्या विकास कामांसाठी मंजूर केला. जर इंदापूरची नगरपरिषद आमच्या पक्षाच्या ताब्यात असती तर आम्ही इंदापूर साठी जास्तीत जास्त निधी मंजूर केला असता आणि इंदापूरचा चेहरामोहरा बदलून टाकला असता. या पुढील काळात आपण इंदापूरकरांनी जर आमच्या पक्षाला साथ दिली तर आम्ही इंदापूरची कायापालट करू. यापुढे आमचे सरकार जर पाच वर्षे टिकले तर….. इंदापूर मध्ये व इंदापूर तालुक्यात अनेक विकास कामे करू आणि त्या जोरावर ती जनतेला मते मागू.

यापुढे जाऊन पवार यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला, याच्या अगोदर सुद्धा आमचे सरकार असताना इंदापूर येथील नेत्याला मंत्रिपदे मिळाली होती. परंतु त्यांना इंदापूरचा विकास करता आला नाही. त्यांनी आपल्या स्वार्थासाठी व आपली पोळी भाजण्यासाठी पक्ष बदलला.

यापुढेही जाऊन त्यांनी आप्पासाहेब जगदाळे यांचेही नाव न घेता त्यांना टोला लगावला की, आमच्या राष्ट्रवादी पक्षाने इंदापूर तालुक्यातील नेत्याला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पद दिले. परंतु त्यांनीही स्वतःच्या स्वार्थासाठी विधानसभा निवडणुकीच्या वेळी दुसऱ्याला मदत केली.

या वेळी व्यासपीठावरील उपस्थित इंदापूर तालुक्यातील पुढारी आणि कार्यकर्त्याकडे पाहून तुम्ही सर्वांनी एकजुटीने काम केले असते, तर बारामतीप्रमाणे विरोधकाचे अनामत रक्कम जप्त झाले असते, वालचंदनगर मध्ये साहेबांच्या आजूबाजूला बसणारे यांनी फसवलं तसेच इंदापूर तालुक्यातील अनेक जणांनी फसवाफसवीचे काम केले आहे . इथून पुढे असं चालणार नाही असा कडक इशारा देत त्यांनी इंदापुर तालुक्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना चिमटा घेतला. 
या वेळी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात, जिल्हा बॅंकेच्या उपाध्यक्ष अर्चना घारे, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष वैशाली नागवडे, तालुकाध्यक्ष छाया पडसळकर, शहराध्यक्ष उमा इंगुले, व इतर राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सरपंच, सदस्य या कार्यक्रमास उपस्थित होते.

Categories
सांगली

प्रशासनावर पकड नसलेल्या लोकप्रतिनिधींना अजित पवार कोणता कानमंत्र देणार.

इंदापूर : प्रतिनिधी

विधानसभेच्या निवडणुकीनंतरच प्रथमच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आ.अजित पवार हे इंदापूर येथे (दि. ६) रोजी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाकरिता येणार आहेत. यावेळी तालुक्याचे विद्यमान लोकप्रतिनिधी यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेली जनता तसेच बेरोजगारी, अवैध धंद्यांचा सुळसुळाट, खाजगी सावकारी, नागरिकांचा प्रशासनावरील उडालेला विश्वास याविषयी काय बोलणार याकडे संबंध तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

सध्या तालुक्यात खाजगी सावकारकीने अक्षरशः डोके वर काढले आहे. सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने बारामतीमध्ये सावकारीला आळा घालण्यासाठी घेतलेली कठोर भूमिका तालुक्यातही घेतील का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. सध्या तालुक्यात अवैध धंदे करणे हा माझा छंद आहे, ते तर मी हे केलेच पाहिजेत असे सामान्य जनतेत बोलले जाते. कोणाचा कोणावरही दबाव राहिलेला नाही. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मिळून भिमा नदीच्या पात्रात बोटीच्या सहाय्याने खुले आम रात्रंदिवस वाळू काढत आहेत, कोणी मटका, झुगार, क्लब, वेशाव्यवसाय लाॅज वरती करत आहेत, यावर अंकुश ठेवायला पाहिजे तो प्रशासकीय अधिकारी यांनी कारवाई करताच जबाबदार व्यक्तीचा फोन येतो, तो माझाच माणूस आहे, द्या सोडून, ‘ काय चाललयं इंदापूर तालुक्यात आंधळं दळतयं आणि कुत्रं पीठ खातयं’ अशी अवस्था झाली आहे.

सुरुवातीला राज्यमंत्री भरणे यांच्याविषयी जनतेमध्ये असलेली आपुलकी नष्ट होत असल्याचे पहायला मिळत आहे. तालुक्यात पोलिस प्रशासनाकडून नागरिकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रकारावर नागरिकांना उपोषणही करावे लागले. एका महिलेला तर आपल्या पोटच्या मुलावर झालेल्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी महिलेचा उद्रेक राज्यमंत्र्यांच्या शर्टाच्या कॉलरपर्यंत पोहोचल्याचा प्रकार संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. या प्रकाराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शरमेने मान खाली घालायला लावणारी घटना घडली. लोकप्रतिनिधीविरुद्ध सर्वसामान्य जनतेत असलेला असंतोष, त्यांना निवडून दिले असल्याची चूक जनता उघडपणे बोलून दाखवत आहेत. याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. याविषयी अजित पवार आपल्याच पक्षाच्या मंत्री असलेल्या भरणे यांना कोणता राजकीय डोस पाजणार याकडेही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

राज्यमंत्री यांविषयी जशी नाराजी जनतेत आहे तशी ती त्यांच्या पक्षामध्ये ही पहायला मिळत आहे. आ.अजित पवार हे कडक शिस्तीचे नेते मानले जातात.एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्यातील जुणे-जाणते नेते, पदाधिकारी हे विधानसभा निवडणुकीनंतर दुरावल्याचे चित्र तालुक्यात पक्षाच्या बैठकीत, कार्यक्रमात वारंवार दिसून आले आहे. तसेच तालुक्यात पक्षांतर्गत असलेले अंतर्गत बंडाळीचे दर्शनही वारंवार घडत आहे. याबाबत पदाधिकाऱ्यांना आ. पवार कशी कान उघडणी करणार याकडेही पक्षातील निष्ठावंतांचे लक्ष लागून राहिले आहे.

Categories
कोल्हापूर क्रीडा

जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा व निवड चाचणीचे १३ तारखेला आळते येथे आयोजन

जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा (१६ व १८ वर्षाखालील मुले व मुली) व निवड चाचणीचे आयोजन १३ तारखेला आळते येथे

महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन मार्फत राज्यस्तरीय १६ वर्षाखालील (२७ फेब ते १ मार्च २०२१,उस्मानाबाद) व १८ वर्षाखालील (०५ ते ०७ मार्च २०२१, बीड) या ठिकणी या स्पर्धेंचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर स्पर्धेमध्ये कोल्हापूर विभागाचा संघ साहभागी होणार आहे.त्या पूर्वी कोल्हापूर जिल्ह्याचा संघ निवड चाचणी कोल्हापूर पासिंग व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या वतीने शनिवार,दिनांक १३ फेब्रुवारी २०२१ रोजी,मॉडर्न विद्यानिकेतन आळते ता.हातकणंगले या ठिकाणी स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. या स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील व्हॉलीबॉल खेळाडू,शाळा व क्रीडा मंडळानी सहभाग घ्यावा

सदर स्पर्धेमध्ये जे खेळाडू,शाळा व मंडळ सहभागी होणार आहेत त्यांनी मा.श्री.गौरव खामकर (९५११८२३७८७) व इब्राहीम शेख (८६६८७३३०४२) यांना संपर्क करावा असे संघटनेचे सचिव मा.श्री.शिवाजी पाटील यांनी कळविले आहे. सदर स्पर्धेमध्ये सहभागी होण्या-या खेळाडूंची जन्म तारीख :-१६ वर्षाखालील मुले व मुली (०१/०१/२००५) व १८ वर्षाखालील मुले व मुली (०१/०१/२००३) च्या नंतर जन्मलेले असावेत.

Categories
कागल कोल्हापूर

कागलमध्ये पोलिओ लसीकरण मोहीमेला उस्फुर्त प्रतिसाद.


कागल गोरख कांबळे.
कागलमध्ये आज रविवार दिनांक ३१ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ लसीकरणाचा डोस देण्यात आला. कागल ग्रामीण कार्यक्षेत्र नगरपरिषद कागल मधील ० ते ५ वयोगटातील बालकांना पोलिओ लस देण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनिता पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कागल ग्रामीण रुग्णालय कार्यक्षेत्र नगरपरिषद कागल येथे विविध बुथवर पोलीओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली आहे. यामध्ये कागलमध्ये एकूण १९ बुथ तयार करण्यात आले आहेत. या बुथवर वेगवेगळ्या वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्ती, एवढे मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले आहे. यामध्ये ट्रान्झिट टीम व मोबाईल टीम कार्यरत राहणार आहेत.
३१ जानेवारी रोजी पोलीओपासून वंचित राहिलेल्या बालकांना २ ते ४ फेब्रुवारी २०२१ असे ३ दिवस आरोग्य कर्मचारी आशा कार्यकर्ते घरोघरी, वाडी-वस्ती, ऊसतोड टोळी,वीट भट्टी या ठिकाणी भेटी देऊन लस देणार आहेत. अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.रवी बल्लुरगी,डॉ.मदने डॉ. तृप्ती भोसले तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुनीता पाटील मॅडम यांनी दिली आहे. सर्व पालकांनी आपल्या ० ते ५ वयोगटातील बालकांना पोलिओ केंद्रावर नेऊन लस पाजून घ्यावी.कागल शहरांमध्ये २८३५बालकांना १००% लस देण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार आहे. यापैकी ७५% बालकाना पोलिओ डोस देण्यात आला आहे.
या लसीकरण मोहीमेत वैद्यकीय अधिकारी डॉ.रवी बल्लुरगी,डॉ.मदने,डॉ. तृप्ती भोसले वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनीता पाटील,पर्यवेक्षक जगन्नाथ खोत,अरुण कांबळे,श्री मुजावर, सतीश ढेकळे,डॉ. किल्लेदार मॅडम, डॉ. सुलभा पाटील ,डॉ.वाघमारे,डॉ.रत्नदिप कांबळे, रत्नाकर सिस्टर,द्रविड सिस्टर, नर्सिंग प्रशिक्षण ए.एन.एम.व सर्व ग्रामीण रुग्णालय स्टाफ उपस्थित होता.

Categories
पंढरपूर सोलापूर

सुस्ते ग्रामपंचायत विजय ऐतिहासिक! विजयी उमेदवारांचा मा.खा. धनंजय महाडिक यांच्या हस्ते जंगी सत्कार!

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

श्री अंबिका महाविकास परिवर्तन आघाडीच्या उमेदवारांचा भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. खा.धनंजय महाडिक यांच्या हस्ते जंगी सत्कार करण्यात आला.
सत्कार समारंभाला प्रसंगी श्री.अंबिका महा विकास परिवर्तन आघाडीचे सर्व आठ उमेदवार भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर उपस्थित होते. यावेळी खा. महाडिक म्हणाले की सर्वांनी एकत्र येऊन चांगल्या पद्धतीने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाचा विकास साधावा व ग्रामपंचायतीचा कारभार चांगल्या पद्धतीने चालवुन पंढरपूर तालुक्यांमध्ये हे एक आदर्श निर्माण करावा. काही जर कमी पडले तर मला अवश्य सांगा,मी सदैव आपल्या मदतीसाठी हजर असेन!
यावेळी शिवाजीराव गुंड पाटिल, भीमा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सतीश जगताप,भिमाचे संघटक समन्वयक
प्रा. संग्राम चव्हाण, सर ,पुळुजचे पांडुरंग ताटे, राजाराम बाबर, भारत पाटील, भिमाचे संचालक बिभिषण वाघ, भीमाचे संचालक तुषार दादा चव्हाण, तानाजी भाऊ चव्हाण, तात्या मामा नागटिळक, एस के चव्हाण सर, सप्तशृंगी पतसंस्थेचे अतुल भैय्या चव्हाण, रामदास (बापू) चव्हाण, माधव (बापू) चव्हाण, आनंता दादा चव्हाण,बालाजी नागटिळक, पांडुरंग कदम,यशवंत (बंडु) चव्हाण,महादेव गावडे,धनंजय घाडगे, विजय नागटिळक, संतोष चव्हाण, गणेश चव्हाण, संतोष सुळे, गणेश बोबडे, एस.के. चव्हाण सर, संजय चव्हाण, संभाजी चव्हाण, अमोल चव्हाण, तानाजी शिंगण, अजिंक्य वाघमारे, संजय लोखंडे, आनंदा चव्हाण, विकास चव्हाण, मुकुंद चव्हाण, बाजीराव वाघमारे, सुभाष रणदिवे, देविदास वाघमारे, दत्तात्रेय वायदंडे, संजय रणदिवे, दत्तात्रय रणदिवे, मसु वाघमारे, आदि प्रमुख मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुस्ते येथील विजयी उमेदवार विठ्ठल-भीमा परिवार पॅनल मधून राणी चव्हाण, विष्णू गावडे, स्नेहा बोबडे, उर्मिला चव्हाण, नंदाबाई वायदंडे, तुषार चव्हाण, जुबेदा शेख, कांताबाई रणदिवे हे उमेदवार विजयी झालेले सर्व उमेदवार यावेळी खा. महाडिक यांची भेट घेण्यासाठी कारखाना कार्यस्थळावर उपस्थित होते.यावेळी सर्व युवक कार्यकर्ता वर्ग मोठ्या संख्येने हजर होता.

.

पंढरपूर तालुक्यातील अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या सुस्ते ग्रामपंचायतीमधे महाडिक गटाचे पॅनल तब्बल ४० वर्षानंतर निवडून आल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. जिद्दीने ने काम करून हा विजय संपादन केल्याबद्दल मला तुम्हा सर्वांचा अभिमान वाटतो. आज भीमरावदादा असायला पाहिजे होते, मी हा विजय स्वर्गीय भीमरावदादा यांच्या पवित्र स्मृतीस अर्पण करतो असे भावविवश उद्गार श्री महाडिक यांनी काढले. ग्रामपंचायतीच्या सर्व नूतन सदस्यांना मी मनापासुन शुभेच्छा देतो व सर्व सदस्यांनी एकदिलाने काम करून गावाचा विकास साधावा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले

Categories
कोल्हापूर हातकणंगले

रोटरी क्लब आॕफ अतिग्रेच्या वतीने व्यावसायिकांना ” रोटरी व्यवसायिक सेवा पुरस्कार ” देऊन सन्मानित करण्यात आले

रोटरी क्लब आॕफ अतिग्रेच्या वतीने देण्यात आलेले  ” रोटरी व्यवसायिक सेवा पुरस्कार ” प्राप्त व्यवसायिक व रो . नरींदर बरवाल, प्राचार्य डाॕ.अर्जुन राजगे व इतर

रुकडी ( दि. २७- १-२०२१ /प्रतिनिधी: प्रशांत भोसले) माणसाची खरी ओळख त्याच्या कार्यावरून होत असते, आपला देश समृद्ध करण्यासाठी प्रत्येक व्यक्त्तीचे योगदान महत्त्वाचे आहे माझे कार्य हे माझ्या देशासाठी आहे याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे, त्याचबरोबर आपण कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असू आपण सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे असे मत रोटरीचे डिस्ट्रिक्ट लिटरसी चेअरमन रो.नरींदर बरवाल यांनी व्यक्त्त केले ते रोटरी क्लब आॕफ अतिग्रेच्या वतीने देण्यात आलेल्या ” रोटरी व्यवसायिक सेवा पुरस्कार ” वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय रुकडीचे प्राचार्य डॉ. अर्जुन राजगे होते. स्वागत रोटरी क्लब आॕफ अतिग्रेचे अध्यक्ष रो. डॉ. हिंदूराव संकपाळ यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय व प्रास्ताविक रो. डॉ.प्रशांत कांबळे यांनी केले . यावेळी अतिग्रे परिसरातील विविध क्षेत्रातील व्यावसायिकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, यामध्ये श्री. श्रीकांत सांगावे मंडप डेकोरेशन व हॉटेल व्यवसाय, श्री.महादेव चौगुले पोल्ट्री व दुग्ध व्यवसाय, श्री. आप्पासाहेब पाटील प्रगतशील शेतकरी, श्री. विश्वास गोंधळी मंडप डेकोरेशन व्यवसाय. डॉ. धन्वंतरी जाधव- पवार वैद्यकीय सेवा श्री. सुदाम चव्हाण गारमेंट व्यवसाय,श्री. सचिन पाटील शिक्षक यांचा सन्मान करण्यात आला.

अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. अर्जुन राजगे म्हणाले प्रतिकूल परिस्थितीकडे संधी म्हणून पाहिले तर यश निश्चित मिळते किंबहुना प्रतिकूल परिस्थितीतच मनुष्य यशस्वी होऊ शकतो हे आजच्या सत्कारमूर्तीच्या यशस्वी वाटचाली वरून लक्षात येते हे सत्कार मूर्ती आजच्या समाजाचे आयडॉल आहेत असे गौरवपर मत त्यांनी व्यक्त्त केले. यावेळी पुरस्कार प्राप्त डॉ.धनवंतरी जाधव-पवार श्री.सुदाम चव्हाण श्री. महादेव चौगुले श्री.सचिन पाटील यांनी मनोगत व्यक्त्त केले. या कार्यक्रमासाठी श्रीमती रोझी बरवाल, प्रोजेक्ट चेअरमन रो.पुष्पक पाटील, रोटरी क्लब आॕफ अतिग्रेचे सर्व सदस्य सत्कार मूर्तींचे कुटुंबीय व मित्रपरिवार तसेच शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार सेक्रेटरी रो. सचिन चौगुले यांनी मांनले

Categories
कोल्हापूर हातकणंगले

जीवन समृद्ध व संपन्न होण्यासाठी मातृभाषा महत्वाची :- डॉ. डी. ए. देसाई

मातृभाषेचे जीवनातील महत्व या विषयावर बोलताना डाॕ.डी.ए.देसाई सोबत प्राचार्य डाॕ.अर्जुन राजगे व इतर

रुकडी (दि. २८ -१-२०२१ ) आपल्या मातृभाषेतून समोरच्या व्यक्तीसमोर आपले विचार मांडले तर ते अधिक प्रभावीपणे आपण मांडू शकतो. मानवी विकास व मानवी परिवर्तन होण्यासाठी मातृभाषा महत्वाची आहे. इतर भाषा आपण शिकल्या पाहिजेत याबद्दल दुमत नाही, परंतु जी आईकडून आपल्याकडे भाषा आली आहे तीच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जीवनामध्ये साधन महत्वाचे नसून साध्या महत्वाचे आहे. मराठी भाषा ही साध्या आहे तर इतर भाषा हे साधन आहे. मानवी संस्कृतीचा अभ्यास करावयाचा असेल तर प्रत्येकाला आपली मातृभाषा अवगत असली पाहिजे, मातृभाषेमुळे आपणाला आत्मविश्वास मिळतो. जीवन समृद्ध व संपन्न होण्यासाठी प्रत्येकाची मातृभाषा महत्वाची आहे, असे मत विवेकानंद महाविद्यालय कोल्हापूरचे मराठी विषयाचे सेवानिवृत्त शिक्षक डॉ. डी. ए. देसाई यांनी व्यक्त केले ते येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य
महाविद्यालय आणि दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा यांच्या वतीने आयोजित केलेल्या मराठी भाषा संवर्धन
पंधरवडानिमित्त ” मातृभाषेचे जीवनातील महत्व ” या विषयावर आयोजित केलेल्या व्याख्यानात प्रमुख वक्ते
म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी महाविद्यालाचे प्राचार्य डॉ. अर्जुन राजगे होते. स्वागत व प्रास्ताविक डॉ. गिरीश
मोरे यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. अर्जुन राजगे यांनी ज्या महाराष्ट्रात मराठी ही मातृभाषा आहे तेथेच मराठी
भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करावा लागतो अशी खंत व्यक्त केली, ते पुढे म्हणाले ज्याची मातृभाषा मराठी आहे अशा प्रत्येकाने आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे. मातृभाषा ही मनातून व हृदयातून येत असते.विषय समजावून घेणे व इतरांशी चांगला संवाद साधण्यासाठी प्रत्येकाला मातृभाषाच उपयोगी पडते.मातृभाषेचे संवर्धन करीत असताना आपले कर्तव्य आहे असे न समजता हे माझे काम आहे या भावनेतून करावे.कारण हे माझे काम आहे असे समजून ज्यावेळी आपण काम करतो तेव्हा ते आपण मनापासून करतो.
मातृभाषेशिवाय आपण इतर भाषा चरितार्थासाठी किंवा करियरसाठी शिकत असतो महाराष्ट्र हे इतर राज्याच्या
तुलनेत आर्थिक दृष्ट्या प्रगत आहेच परंतु ते इतके प्रगत व्हावे की इतर राज्यातून महाराष्ट्रात लोक कामधंद्यानिमीत्त यावेत व त्यासाठी त्यांना मराठी भाषा शिकण्याची आवश्यकता भासली पाहिजे असे मत
प्राचार्य डॉ. अर्जुन राजगे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त “ मतदार जागृती शपथ उपस्थितांकडून डॉ.शंकर दळवी यांनी घेतली. आभार डॉ.लता मोरे यांनी मानले तर सूत्रसंचालन कु. सोनम कांबळे हिने केले. सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम महाविद्यालयात आयोजित करण्यात
आला. याचा लाभ शिक्षकांनी व ऑनलाइन विद्यार्थ्यांनी घेतला.

Categories
कोल्हापूर शैक्षणिक

संचमान्यतेचे अधिकार शिक्षण उपसंचालक यांना देण्यात यावे – श्री खंडेराव जगदाळे

हिंदुसम्राट प्रतिनिधी/ संतोष चव्हाण कोल्हापूर
संचमान्यता बाबत शिक्षण उपसंचालक यांना अधिकार देण्यात यावे याकरिता मा शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांची मुंबई येथे मा पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, व मा आ.जयंत आसगावकर यांच्या समवेत काही दिवसापूर्वी भेट घेतली होती, त्यावेळी शिक्षणमंत्री महोदया यांनी ही मागणी मान्य केली होती,त्या अनुषंगाने आज पुणे येथे मा आयुक्त कार्यालय, व शिक्षण संचालक येथील अधिकारी यांच्या भेटी घेतल्या ,संचमान्यता नसल्याने अनुदानासाठी अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत, पदे असताना ही संचमान्यता चुकल्यामुळे सतत पुणे येथे येण्यास राज्यातील विविध जिल्ह्यातील मुख्याध्यापक,शिक्षकांना त्रासाचे होत आहे, त्यामुळे या अडचणी समजून पूर्वीप्रमाणे शिक्षण उपसंचालक यांना अधिकार देण्यात यावेत जेणेकरून राज्यातील विविध लोकांना होणारा त्रास होणार नाही, याबाबत यापूर्वी मा शिक्षणमंत्री महोदया यांना याबाबत सविस्तर माहिती दिली आहे,
याबाबत आपल्या स्तरावरून लवकर निर्णय घ्यावा ही विनंती
मा आयुक्तसो व मा संचालक सो यांना करण्यात आली यावेळी म.रा.का.वि.कृ.समितीचे राज्य उपाध्यक्ष मा.श्री.खंडेराव जगदाळे, मा प्रकाश पाटील, मा गजानन काटकर, जनार्धन दिंडे, रामराजे सुतार, सावंता माळी, हे उपस्थित होते,

Categories
कागल कोल्हापूर

कागल तालुक्यातील १२ गावांमध्ये सरपंचपदाचे आरक्षण अनु. जाती प्रवर्गाकडे.


कागल◆गोरख कांबळे.
कागल तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये स्थापनेपासून आजतागायत सरपंच पदासाठी होत असलेल्या आरक्षण सोडतीमध्ये अनुसुचित जाती प्रवर्ग हा काही ठिकाणी या आरक्षणापासून अजूनही वंचीतच राहिला होता. रोटेशन पद्धतीनुसार ग्रामपंचायत स्थापनेपासून झालेल्या सर्व निवडणूकीत अनुसुचित जाती प्रवर्ग सोडता सर्व इतर प्रवर्गासाठी आरक्षण आरक्षित झाले.मात्र अनुसुचित जातीचे आरक्षण रोटेशन पद्धतीनुसार अद्याप का आले नाही?. हा संशोधनाचा विषय बनला होता.व याची गावामध्ये चर्चाही होत होती.त्यामुळे दलित असलेल्या या समाजातील नागरिकांना सरपंच पदाची संधी कधी मिळणार ? असा प्रश्न गावातील अनु.जाती समाजातील नागरिकामध्ये निर्माण झाला होता. ग्रामपंचायतीमध्ये दर पंचवार्षीक निवडणूकीत सोयीच्या युतीच्या आघाड्या होतात.प्रशासनातील प्रमुख पद या समाजापासून वंचीतच राहिल्यामुळे या समाजाचा विकास खुंटला होता. त्यामुळे दलित समाजाच्या भौतिक सुविधा व समस्या आहे तशाच राहील्या आहेत.
या सर्व गोष्टींचा विचार करून कागल तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतीचा निवडणूक निकाल जाहीर झाला असून सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत २७ जानेवारी रोजी पार पडली आहे. त्यामध्ये साके,सोनाळी,शेंडूर, कौलगे,लिंगनूर कापशी, बोळावी,कापशी सेनापती व बाळीक्रे,बेलेवाडी काळम्मा,नंद्याळ,मांगनूर,केनवडे,आलाबाद येथील ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण अनुसुचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे.या सर्व गोष्टींचा विचार करून कागल तालुक्यातील १२ गावांमध्ये सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जाती प्रर्वगासाठी राखीव झाले.त्यामुळे कागल तालुक्यातील १२ गावामध्ये ही आनंद व्यक्त केला जात आहे.

Categories
Uncategorized

माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण आणि पोलीसमित्र फौंडेशनचा पदाधिकारी मेळावा संपन्न

माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण आणि पोलीसमित्र फौंडेशन अंतर्गत माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती आणि पोलीसमित्र समिती या दोन आघाड्या स्थापन करण्यात आल्या आणि काल दिनांक २४ जानेवारी २०२१ रविवार रोजी कला व वाणिज्य महाविद्यालय, राधिका चौक, राजवाडा येथे नयन रम्य सोहळा आयोजित करण्यात येवून माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण आणि पोलीसमित्र फौंडेशनसह माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती आणि पोलीसमित्र समित्यांच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला.

उद्घाटनपर पदाधिकारी मेळाव्यात उपस्थित सन्माननीय प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून, संघटना स्थापनेचे उद्घाटन, लोगोचे प्रकाशन तसेच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा सन्मानपूर्वक सत्कार आणि नूतन पदाधिकार्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले. त्याबरोबरच वरील दोन्ही समितीसह पर्यावरण संरक्षण समिती आणि माथाडी कामगार संरक्षण समिती यांची घोषणा करण्यात आली

सदरील मेळाव्यास राष्ट्रीय कार्यकारिणीतील राष्ट्रीय अध्यक्ष श्री दिपक कांबळे, आणि राष्ट्रीय महासचिव श्री कमलेश शेवाळे, सह माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या राज्य कार्यकारिणीतील महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री महेश सारणीकर, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री अमर बेंद्रे, श्री पुष्कर सराफ व श्री उमेश काशीकर, महाराष्ट्र राज्य सचिव श्री इद्रीस सिद्दिकी, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस श्री सखारामपंत कुलकर्णी, महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख श्री सुभाष भोसले, महाराष्ट्र राज्य संघटक श्री दिनेश शिंदे, महाराष्ट्र राज्य मार्गदर्शक श्री निजाम पटेल आणि महाराष्ट्र राज्य सहसंपर्कप्रमुख श्री सागर पाटील हे उपस्थित होते, तसेच सर्व विभागीय कार्यकारिणी, जिल्हा कार्यकारिणीसह तालुका कार्यकारिणीचे सभासद उपस्थित होते. त्याबरोबरच पोलीसमित्र समितीच्या राज्य कार्यकारिणीतील महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष श्री वजीर शेख, महाराष्ट्र राज्य सचिव श्री पुष्कर सराफ, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री जावेद सय्यद बरोबर पोलीसमित्र समितीचे विभागिय पदाधिकारी आणि सोलापूर जिल्हाध्यक्ष श्री महेंद्रकुमार देशमुख सह विविध जिल्ह्यातील आणि तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री महेश सारणीकर यांनी केले, विविध मान्यवर पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शनपर भाषणात संघटनेची गरज, संघटन करणे किती गरजेचे आहे जेणेकरून विविध विषय संघटनेच्या माध्यमातून शासनाकडे मांडणे कसे आवश्यक आहे, याबरोबरच माहिती अधिकार कायदा, नागरिकांचे हक्क, भ्रष्टाचार निर्मुलनासाठी माहिती अधिकाराचे महत्व, अर्जाचे प्रकार, अर्ज करण्याची पद्धती, त्यासंबंधीचे नियम, कालावधी, शुल्क आणि कार्यकर्ते यांना होणारा त्रास, अन्यायकारक कालावधी यावरील उपाय, आयोगाची कार्यपद्धती, कार्यकर्त्यांनी संयम पाळणे त्याबरोबरच लोकशाहीचा चतुर्थ स्तंभ असलेल्या पत्रकारिता क्षेत्रात काम करतांना येणाऱ्या अडचणी, पत्रकारितेची सामाजिक गरज, पत्रकारांची आर्थिक व सामाजिक पिळवणूक तसेच पत्रकारांना प्रशासनासह समाजाकडून होणारा त्रास आणि माहिती अधिकार कायदा, कार्यकर्ते आणि पत्रकारिते बरोबरच पत्रकारांचे संरक्षण करण्याच्या हेतूने सदरील दोन्ही विषय शासन दरबारी मांडण्यासंबंधी चर्चा करण्यात आली. महत्वाची बाब म्हणजे माहिती अधिकार कार्यकर्ते आणि पत्रकार यांना संघटनेचे पाठबळ देवून वेळोवेळी कर्तव्य पार पडतांना येणाऱ्या अडचणी, समाज विघातक प्रवृत्तींकडून होणारे त्रास आणि त्यासंबंधी उपाययोजना यासंबंधी सुद्धा अनुभवी व्यक्ती कडून मार्गदर्शन मिळाले. ग्रामीण तरुणांना रोजगाराची उपलब्धता, पोलिसांना मदत आणि राष्ट्रसेवा हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवण्याची पोलीसमित्र समितीची उद्दिष्ट्ये यांची माहिती देण्यात आली. सूत्र संचालन श्री अमर बेंद्रे यांनी केले व अध्यक्षीय भाषणात श्री दिपक कांबळे यांनी मार्गदर्शन करून दोन्ही समित्यातील पदाधिकाऱ्याच्या प्रश्ने आणि अडीअडचणी समजून घेवून संबंधित उपाययोजना यांची माहिती दिली. सर्व प्रमुख पाहुणे, राष्ट्रीय सह महाराष्ट्रातील पदाधिकारी आणि नियोजन समितीचे आभार मानले.

विशेष म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष श्री दिपक कांबळे, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री अमर बेंद्रे, सातारा जिल्हाध्यक्ष श्री आदेश गंगावणे सह सर्व सातारा जिल्हा कार्यकारिणी यांनी अपार कष्ट घेवून कार्यक्रमाचे नियोजन केले आणि त्यांनी कष्ट घेतले म्हणूनच इतका सुंदर कार्यक्रम होवू शकला हे सत्य आहे. अगदी नयनरम्य सोहळ्यासाठी सर्व नियोजन समितीचे मनःपूर्वक आभार आणि हार्दिक अभिनंदन, त्याबरोबरच पोलीसमित्र समितीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्री महेंद्रकुमार देशमुख यांनी स्वतः व बरोबर असलेल्या पोलीसमित्रांनी कार्यक्रमाच्या शिस्तबद्धतेसाठी अथक परिश्रम घेतले. त्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.

Categories
Uncategorized

सलाम बॉम्बे फाउंडेशन मीडिया अकादमीच्या विद्यार्थ्यांचे मीडियाची क्षमता व व्यापकता दर्शविणारे अनोखे व्हर्च्युअल प्रदर्शन

संपूर्ण जगभर पसरलेल्या कोविड – १९ मुळे निर्माण झालेल्या लॉकडाऊन दरम्यान सलाम बॉम्बे फाऊंडेशन आणि सेंट झेविअर्स बीएमएम कॉलेज संयुक्त विद्यमाने आर्थिकदृष्ट्या गरजू कुटुंबातील मुलांमध्ये मीडिया क्षेत्रातील करिअर बद्दल जागृतीचे कार्य केले जात आहे.
नेल्सन मंडेला म्हणतात, “शिक्षण हे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे ज्याचा वापर करून तुम्ही जग बदलू शकता”. त्यांच्या ह्याच ओळींना साजेसा असा आंतरराष्ट्रीय शिक्षण दिनाच्या निमित्ताने सेंट झेविअर्स बीएमएम कॉलेजच्या सहकार्यातून सलाम बॉम्बे फाऊंडेशन मीडिया अॅकॅडमीतर्फे #EducationBeyondBooks (पुस्तकाच्या पलीकडील शिक्षण) या नावाचे एक अनोखे व्हर्च्युअल प्रदर्शन आयोजित केले आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूवर सर्व देशभर बंद असल्याने संपूर्ण शिक्षण व्यवस्था ऑनलाईन झालेली आहे. ह्यातून प्रेरित होऊन संस्थेने ‘ई-लर्निंग – अ कॅटॅलिटिक ट्रान्झिशन’ या थीमसह ऑनलाइन प्रदर्शन आयोजित केले आहे. मागील वर्षी सुरू झालेला हा उपक्रम खासगी आणि महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांना मदत करणारा एक परस्परसंवादी अभ्यास अनुभव म्हणून डिझाइन करण्यात आला होता, ज्याद्वारे मीडियाची शक्ती समजून घेण्यास आणि करियरच्या माहितीची निवड करण्यासाठी विद्यार्थी प्रेरित होतील.
भारतातील माध्यमिक शिक्षणाची एक महत्वाची बाब म्हणजे विद्यार्थ्यांचा गळतीचा दर. मानव संसाधन आणि विकास मंत्रालयाच्या मते, भारतातील 36.37% मुले वर्ग ८ पर्यंत शाळा सोडतात (शैक्षणिक आकडेवारी एका दृष्टीक्षेपात, २०१४). सध्याची शिक्षण प्रणाली विद्यार्थ्यांना संबंधित करियरसाठी तयार करत नसली तरी, विद्यमान स्किलिंग इकोसिस्टम अल्पकालीन कौशल्य विकास पुरविण्यावर लक्ष केंद्रित करते. सलाम बॉम्बे फाउंडेशनने या आव्हानांचा सामना केला आहे आणि हे शिकले आहे की शिक्षणाबरोबरच दिलेली कौशल्ये एक्सपोजर प्रदान करतात, आकांक्षा विकसित करतात आणि विद्यार्थ्यांना नियमितपणे शाळेत जाण्यासाठी आणि त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यास प्रेरित करतात. शाळेत असताना विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचे आणखी महत्त्वाचे पैलू म्हणजे त्यांना तयार करण्यात मदत करण्याची संधी कामाच्या वातावरणाला यशस्वीरित्या नेव्हिगेट करण्यासाठी संवाद, समस्या सोडवणे, निर्णय घेण्याची क्षमता आणि डिजिटल जगाशी सामना करण्याची क्षमता यासारख्या कौशल्यांबरोबर विद्यार्थ्यांना तयार करणे हे काही महत्त्वपूर्ण घटक आहेत जे नोकरतीसाठी नियुक्ती करणारे लोक उमेदवारांमध्ये शोधतात.
व्हर्च्युअल प्रदर्शनाविषयी बोलताना राजश्री कदम, उपाध्यक्षा , प्रोजेक्ट्स (आर्ट्स अँड मीडिया) म्हणाल्या, “या उपक्रमाचे उद्दीष्ट तरुण विद्यार्थ्यांना करियरचे पर्याय शोधण्यासाठी प्रेरित करणे आहे जे करियर केवळ रोमांचकच नाही तर अनेक संधीही उपलब्ध असणारे आहेत. खासगी आणि सरकारी दोन्ही शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी, या क्षेत्राविषयी फार मर्यादित ज्ञान आहे. त्यांनी दूरदर्शनवर पत्रकार पाहिले आहेत आणि वर्तमानपत्रे वाचली आहेत. पण त्यांनी माध्यमांचा अभ्यास करणे किंवा स्वतः क्षेत्रात करिअर करण्याचा विचार केला नाही आणि त्यांचा हा दृष्टिकोन पूर्णपणे बदलण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आहे. माध्यमांची शक्ती समजून घेण्यात आणि त्यांची ओळख पटवून देण्यासाठी आणि करियरच्या माहितीची निवड करण्यात मदत करण्यासाठी हा एक परस्परसंवादी शिकण्याचा अनुभव आहे. ‘#EducationBeyondBooks’ या प्रदर्शनामध्ये समाजातील विविध स्तरातील विद्यार्थ्यांना – खासगी शैक्षणिक संस्था तसेच सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना मीडिया सारख्या विस्तृत क्षेत्राकडे कल वाढविण्यासाठी प्रोत्साहित करण्यावर भर देण्यात आला आहे.”
शिक्षण आणि कौशल्य विकासाचे एकत्रीकरण करण्याचे महत्त्व ओळखून सलाम बॉम्बे फाउंडेशन आपल्या व्यावसायिक कौशल्य विकास कार्यक्रम – Project Résumé या माध्यमातून ही दरी भरून काढत आहे. हा कार्यक्रम औपचारिक माध्यमिक शासकीय शाळा प्रणालीत सेट करण्यात आला आहे आणि त्यात चार महत्त्वाचे व्यावसायिक कौशल्य विकास कार्यक्रम आहेत ज्यात मीडिया अकादमी, कला अकादमी, क्रीडा अकादमी आणि Skills@School प्रोग्राम आहे.
सलाम बॉम्बे फाउंडेशनची मीडिया अकादमी दोन महत्त्वपूर्ण साधनांसह विद्यार्थ्यांना सुसज्ज करते – एक व्यासपीठ आणि एक आवाज, युवकांना त्यांच्या अमर्याद क्षमतेचा शोध घेण्यास आणि त्यावर विश्वास ठेवण्यास मदत करण्यावर लक्ष केंद्रित करते. हा तीन वर्षांचा कार्यक्रम विद्यार्थ्यांना पत्रकारिता, छायाचित्रण, मुद्रण उत्पादन आणि डिझाइन या विषयांत प्रशिक्षण देते. त्यांना संप्रेषण, लेखन आणि परस्पर कौशल्य विकसित करण्यास मदत करतो. ऑनलाईन प्रदर्शन हिंदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे, ज्यात प्रिंट मीडिया, रेडिओ, टीव्ही, सोशल मीडिया, जनसंपर्क, छायाचित्रण आणि चित्रपट बनवणे यावर थेट स्टॉल्स आणि वेबिनार आहेत. एक लाइव्ह चॅट कॉर्नर देखील असेल जेथे सहभागी तज्ञांच्या मुलाखतींमध्ये प्रवेश करू शकतात. सादर प्रदर्शन 24 जानेवारी 2021 रोजी लाँच केल्यापासून ते मार्च 2021 अखेरपर्यंत सुरू राहील आणि http://www.sbfmediaexhibition.com वर बघता येईल.

सलाम बॉम्बे फाउंडेशन बद्दलः
सलाम बॉम्बे फाउंडेशनने २००२ मध्ये मुंबईच्या झोपडपट्टीत वाढणार्या १२ ते १ ७ वर्षांच्या किशोर मुलांबरोबर काम करण्यासाठी सुरुवात केली. ही मुले अत्यंत गरीबीने आणि ‘धोकादायक’ वातावरणात राहतात. ते ज्या शाळांमध्ये जातात त्यांच्याकडे वैयक्तिक लक्ष, करिअर मार्गदर्शन किंवा मनाला उत्तेजन देणार्या कार्यक्रमांमध्ये प्रवेश देण्याची संसाधने नाहीत. बरेच लोक कुपोषित आहेत आणि त्यांना तंबाखूजन्य पदार्थांच्या वापराचा धोका आहे. ते आर्थिकदृष्ट्या अडचणी असलेल्या घरांमधून येतात आणि त्यांना घरातून माध्यमिक शाळा सोडण्याचे आणि नोकरी मिळवून त्यांच्या कुटुंबियांना मदत करणे दबाव आणला जातो.
हि वास्तविकता लक्षात घेऊन , सलाम बॉम्बे फाउंडेशनने मुलांना साजेशी , कलात्मक शैक्षणिक साधने व जीवन कौशल्ये विकसित करण्याची क्षमता आणि ही किशोरांचे सर्वांगीण व्यक्तिमत्त्वात विकसित होण्याची व त्यांच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी व नेतृत्व करण्यास सक्षम होऊन सामाजिक समस्यांना सामोरे जाण्याची क्षमता विकसित करण्यावर भर देत आहे.

फाउंडेशन मुलांचे आरोग्य, शिक्षण आणि उदरनिर्वाहाविषयी योग्य निवडी करुन त्यांना उज्ज्वल भविष्यासह संपन्नतेची खात्री करुन देऊन शाळेत ठेवते. शालेय नेतृत्व आणि वकिलांचे कार्यक्रम “जोखीम” किशोरांना त्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांनी सुसज्ज करतात. क्रीडा, कला आणि माध्यम अकादमी त्यांना स्वत: ला व्यक्त करण्यासाठी आणि आत्म-सन्मान निर्माण करणार्या कामगिरीच्या संधी प्रदान करण्यास प्रोत्साहित करतात. Skills@school कार्यक्रमामुळे त्यांची करियर क्षेत्र विस्तृत होते आणि त्यांना शाश्वत करिअरसाठी व्यावसायिक कौशल्य प्रदान करते. अशाप्रकारे सलाम बॉम्बे उपक्रम आत्मविश्वास वाढवतात, असुरक्षित किशोरांना अर्धवेळ कमावण्याचे साधन देतात आणि शाळेत ठेऊन आणि त्यांची संपूर्ण क्षमता शोधण्यासाठी साधने उपलब्ध करून देतात.

अधिक माहितीसाठी, कृपया http://www.salaambombay.org ला भेट द्या.

Categories
Uncategorized

जनजागृती सेवा समितीची बैठक उत्साहात संपन्न.

कणकवली-सामाजिक,कला,क्रीडा,सांस्कृतिक,शैक्षणिक,सामाजिक अशा विविध क्षेत्रात कार्यरत असण-या’जनजागृती सेवा समिती,महाराष्ट्र या सामाजिक संस्थेची बैठक तेली आळी,कणकवली येथे गुरुनाथ तिरपणकर यांच्या निवासस्थानी विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी संपन्न झाली. जनजागृतीने कोकणातही समाजकार्य करण्यास सुरुवात केलेली आहे. त्याच अनुषंगाने कणकवली तालुक्यातील करंजे गावातील राजश्री छत्रपती शाहु महाराज मतिमंद निवासी विद्यालयात जीवनावश्यक वस्तुंचे वाटपकरण्यात आले होते, या कार्यक्रमासाठी महनिय व्यक्तींचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले होते,त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.याप्रसंगी जनजागृतीच्या उपक्रमास सहकार्य केल्याबद्दल जनजागृती सेवा समितीचे जेष्ठ सल्लागार बाळासाहेब सावंत यांच्या हस्ते सन्माननीय चंद्रशेखर उपरकर,सौ.अक्षता कांबळी,रविकिरण शिवलकर,राजन दाभोळकर,करंजे गावचे सरपंच मंगेश तळगांवकर,संतोष सावंत,भरत तोरसकर यांना “आभार पत्र “देऊन कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी लावण्य सिंधु चित्रपट संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर उपरकर यांनी शैक्षणिक,मत्सव्यवसाय,शासकीय अनुभव,सांस्कृतिक,सामाजिक अशा विविध विषयांवर आपले सकारात्मक व उदभोदक असे विचार मांडले. तसेच अभिनेत्री सौ अक्षता कांबळी यांनी चित्रपट,सांस्कृतिक,अभिनय क्षेत्रातील आपले अनुभव उपस्थितीतांसमोर मांडले. करंजे गावचे सरपंच मंगेश तळगांवकर यांनीही आपले विचार व्यक्त केले. शेवटी अनुभव संपन्न व्यक्तिमत्व तसेच जनजागृती सेवा समितीची जेष्ठ सल्लागार बाळासाहेब सावंत यांनी महिला बचत गट,सहकार चळवळ,सामाजिक दायितत्व,गृहनिर्माण महासंघ,शासकीय करप्रणाली,कणकवलीची सुबत्ता-शहरीकरण अशा विविध विषयांवर उदाहरणादाखल मौलिक मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन सामाजिक कार्यकर्ते भरत तोरसकर यांनी केले. बैठक खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात संपन्न झाली.

Categories
कोल्हापूर क्रीडा

पुणे येथील ज्युनियर राज्यस्तरीय स्पर्धेत मोमेंटम अकॅडमीचे उज्ज्वल यश

पिंपरी चिंचवड पुणे येथे चालू असणाऱ्या ज्युनियर राज्यस्तरीय स्पर्धेत मोमेंटम अकॅडमीचे विजेते खेळाडू पुढील प्रमाणे
18 वर्षाखालील मुले 100 मीटर

  1. दिग्विजय चौगुले -प्रथम क्रमांक (१०.९५से.)
  2. सार्थक शेलार -द्वितीय क्रमांक(११.११से.)

18 वर्षाखालील मुले 400 मीटर

  1. अविनाश पाटील- द्वितीय क्रमांक(४९.९०से.)

20 वर्षाखालील मुले लांब उडी

  1. रामेश्वर महाडिक -तृतीय क्रमांक(६.५१मी.)
    या खेळाडूंच्या सत्कार प्रसंगी कोल्हापूर जिल्ह्याचे सुपुत्र राष्ट्रीय खेळाडू पीएसआय मा.नंदकुमार कदम व पीएसआय मा. पुजारी यांचे हस्ते झाला.या प्रसंगी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष श्री. अमर सासणे, उपाध्यक्ष श्री.महेश पोवार , संस्थेचे सचिव व आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स मार्गदर्शक श्री. सुभाष पवार, प्रशिक्षक श्री दिग्विजय मळगे व गौरेश पोवार
Categories
कोल्हापूर हातकणंगले शैक्षणिक

भिमराव मलगुंडे यांना ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार

‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार किणी हायस्कूल किणीचे अध्यापक भिमराव मलगुंडे यांना शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्या हस्ते प्रदान

किणी ,ता. १९: डी.बी. पाटील शैक्षणिक विचारमंच कोल्हापूर यांच्या वतीने देण्यात येणारा ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार किणी हायस्कूल किणीचे अध्यापक भिमराव मलगुंडे यांना शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

वृक्षारोपण, निर्माल्य दान उपक्रम, इको फ्रेंडली रंगपंचमी, फटाकेमुक्त दिवाळी यासारखे विविध पर्यावरणपूरक उपक्रम त्यांनी राबवले आहेत. किणी परिसरात ते सर्पमित्र म्हणून सुपरिचित आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यावरण संवर्धन, सर्प-शेतकऱ्यांचा मित्र या विषयांवर त्यांनी शेकडो व्याख्यानातून सामाजिक प्रबोधनाचे कार्य केले आहे.

त्यांच्या या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

त्यांना मुख्याध्यापिका सुरेखा शिरोटे ,पर्यवेक्षक डी.एच. पाटील ,किणी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आण्णासाहेब पाटील, उपाध्यक्ष सुहास माने, सचिव राजेंद्र पाटील व सर्व संचालक यांचे मार्गदर्शन लाभले.

Categories
कोल्हापूर हातकणंगले

हातकणगले तालुक्यातील २१ पैकी एक बिनविरोध वगळाता २० गावच्या ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल आज जाहीर

हातकणंगले ( प्रतिनिधी ) हातकणगले तालुक्यातील २१ पैकी एक बिनविरोध वगळाता २० गावच्या ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल आज जाहीर करण्यात आला.तालूक्यातील
निवडणून आलेल्या ग्रामपंचायतच्या सदस्याची नावे पुढील प्रमाणे १ ) पाडळी ग्रामपंचायत घोगराई विकास पॅनेल यांनी बाजी मारली मारून सत्तातर झाले , निवडून आलेल्याची नावे , व मिळालेली मते, निवृत्ती गणपती वाघमोडे,, ( ३४३ ), शिवाजी राजाराम पाटील ( 3५१ ) सुजाता सुभाष पाटील ( 3५७ ), रविंद्र वसंत पाटील – मेथे ( 3४० ) भाग्यश्री निवृत्ती गायकवाड ( 3४४ ) ऐश्वर्या अनिकेत पाटील ( 3४3 ), श्रीधर सुभाष पाटील ( २९६ ), विभा दिपक पाटील ( २९९ ), कोडींबा पाडूरंग पोवार ( 3८५ ), उषा वसंत दाभाडे ( 3७९ ) नुरजहाँ दरवेशी शेख मलंग ( ३९९ )
२ )मनपाडळे ग्रामपंचायतीचे सत्ताधारी यांनी सत्ता राखली, विजयी उमेदवार पुढील प्रमाणे . उल्हास मधुकर वाघमारे ( ३२३ ), निता शामराव कुरणे ( २५० ), शिल्पा सुभाष पाटील ( २९९ ), माणिक विलास खांडेकर ( 3८0 ), शंकर शामराव सुर्यवंशी ( २८९ ), बाळाबाई शामराव गुरव ( 3५५ ), अनिल यशवंत घोडके ( २४४ ), राजलक्ष्मी राजेंद्र कुमार पाटील ( २५O ), रायबा हंबीरराव, शिंदे ( २१४ ), अरुणा पाडूंरंग वाघमारे ( २९२ ),
३ ) वाठार तर्फ वडगाव ग्रामपंचयतीचे सत्तांतर शंकर चौगुले यांच्या गटाची सत्ता ,विजयी उमेदवार पुढील प्रमाणे, सचिन सर्जराव कुंभार ( ५९१ ), सुहास महादेव पाटील ( ६00), सुरेखा सचिन मस्के( ५७६), महेश श्रीकृष्ण शिर्के( ३१९), अशवनी दिलीप कुंभार ( ३00), सुशिला धोंडीबा चौगुले (३२२ ), गजेंद्र शंकर माळी ( ५८४), महेश कृष्णात कुंभार ( ५८८), सुजाता संजय मगदूम ( ३0५ ), राहूल बाबूराव पोवार ( ४४८ ), सचिन आप्पासो कांबळे ( २३६ ), नाजूका राजहंस भुजिगे( २६० )
४ )हालोडी ग्रामपंचायती सत्ताधारी विजयी उमेदवार पुढील प्रमाणे. किरण सुंदर कांबळे ( ३२८ ), महावीर आण्णा पाटील ( 3६९ ), वर्धमान महावीर बेळकें( २९१ ), सुनिता महावीर शेटे ( 3५१ ), अजय अशोक पाटील ( 3५२ ),
५ ) किणी ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे. सचिन बबन पाटील ( ६७२ ), योगीता रोहीत दणाणे ( ६५८ ) प्रवीण काकासो कुरणे ( ४६२ ), सुज।ता विजय धनवडे ( ५४3 ), सुप्रिया सुनिल समुद्रे, ( ५६७ ), संताजी सर्जराव माने ( ५४0 ), मनिषा रघूनाथ शेळके ( ५६८ )
६ ) बिरदेववाडी ग्रामपंचायतमध्ये सत्तांतर विजयी उमेदवाराचे नावे पुढीलप्रमाणे. रामचंद्र नागू नाईक ( १९८ ), सरिता राजेद धनगर ( १८९ ) बाबासो सदाशीव खरात ( १३७ ), संगिता नागेश वाघमोडे ( १३१ ), सतिश दत्तायत्र कागले ( १५७ ), शेंवता मोहन नाईक ( १६१ )
७ ) तिळवणी ग्रामपंचायती मधील विजयी उमेदवार यांची नावे पुढीलप्रमाणे. राजेश बाबासो पाटील ( ३२९ ), मंगल जयसिंग मिणचेकर ( २८३ ) अरुणा योगेश कुंभार ( 3४९ ), निवास श्रीरंग कोळी ( २०० ), निता कुमार चव्हान ( २0३ ), सुकुमार बाळू चव्हान ( २८O ), सिंधू रघूनाथ माने ( २७१ ), शबाना दिलावर एकसंबे ( 3१५ ),
८ ) रुई ग्रामपंचायतमध्ये शाहूविकास आघाडीचा झेंडा विजयी उमेदवार यांची नावे पुढीलप्रमाणे.. अवधूत सुधाकर कुलकणी , ( ८३५ ), करिष्मा इम्रान मुजावर ( ७१२ ) शालन बाबूराव बेनाड
( ८१६ ) अशोक विश्वास आदमाने ( ५५८ ) .शालाबाई विठ्ठल साठे ( ६३७ ) जितेद्र चिंतू यादव ( २७३ ) रेखा रोहीत पाटील ( ५o८ ) अभ कुमा भालचंद्र काश्मीरे (८२१ ), गीता विष्णू सावंत ( ७७५ युनूस बाबासाहेब मकानदार ( ७०७ ) शकीला उस्मानसो कोन्नूर ( ५९४ ) गौतम भरमू उपाध्ये ( ६३७ ) सुभाष यशवंत चौगुले ( ७७३ ) आश्वनी वैभव पोवार ( ४७४ ) ९ ) दुर्गवाडी ग्रामपंचायतीमध्ये पाच जागेपैकी चार जागा बिनविरोध झाल्या होत्या, एका जागेसाठी निवडणूक लागली होती, सचिन धोंडीबा घोलप यांना ( १२३ ) हे विजयी झाले.
१0 ) चंदूर ग्रामपंचायत आवाडे प्रणीत सभापती महेश पाटील गटाचे वर्चस्व, विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे… भगवान बिरु पुजारी ( ८२0 ), संजय विठ्ठल जिंदे, ( ८७३ ),रोहणी संजय घोरपडे ( ८६४ ) मारुती आप्पा पुजारी ( ७६५ ), वैशाली दरगोंडा पाटील ( ८७१ ), संदीप वसंत कांबळे ( ६९७ ), अनिता प्रशांत माने ( ८०१ ), ललीता बाबासो पुजारी ( ७४९ ), महादेव सत्तगोडा पाटील ( ७१२ ), सचिन रुपाली पुजारी ( ८३९ ), स्वाती सुधाकर कदम ( ८६0 ), बाबासो देवाप्पा मगंसुळे ( ९११ ), स्नेहल अतुल कांबळे ( ९२७ ), शालन बसगोंडा पाटील ( १११३ ), फिरोज बाबू शेख ( ४८३ ), योगीता सचिन हळदे ( ५७४ ),
११ ) नेज ग्रामपंचायतमध्ये सत्तातर आघाडी विजयी उमेदवार पुढील प्रमाणे, आकाश बाबासो शिंगे ( ४०९ ), शुभम तुषार खोत ( ५५३ ), ज्योती अरविंद नेर्ल ( २९४ ), मनोज धोंडीराम कांबळे ( 3५८ ) सजाबाई गोपाळ कांबळे ( 3७९ ), हनिफा जाकीर मुल्ला ( 3५३ ), अमोल बाळासो चव्हान ( २८४ ), ज्योती दिपक नेजकर ( २९३ ) रमेश बापू घाटगे ( 3६७ ), दिपाली सदाशीव गोंधळी ( ४७४ ) विद्या संदीप च०हान, ( ५४२ )
१२ ) माणगाव ग्रामपंचायतमध्ये ग्रामविकास आघाडी या सत्ताधारी गटानेच बाजी मारली विजयी उमेदवार यांची नावे .. मनोज कुबेर आदाणा ( ५५२ ), बन्ने वसुधा दत्तायत्र ( ५९३ ), अमर सुरेद्र उपाध्ये, ( ६६८ ), सुधाराणी मनोज पाटील ( ७७३ ), अभय आप्पासो मगदूम ( ८०६ ), स्वप्नील अविनाश माने. ( ७६८ ), नितीन पाडूरंग कांबळे ( ६३४ ), संध्याराणी पोपट जाधव ( ५५२ ) गुलाब अख्तर हुसेन भालदार (.५६९ ), प्रकाश पायगोंडा पाटील ( ६१५ ) रमिजा अमजद जमादार ( ५८0 ), राजगोंडा सिंदगोडा पाटील ( ४४९ ), विद्या उमेश जोग, ( ४२९ ),
१३ ) जंगमवाडी ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतार कॉग्रेस व भाजप यांची सत्ता विजयी उमेदवाराचे नावे पुढीलप्रमाणे. चंपाबाई सुभाष खोत ( १७० ), महानंदा चिंदानंद खोत ( १७० ), संभाजी बळवंत मोरे ( १०९ ) चंपाबाई सुभाष खोत ( ११८ ), चिंदानंद शंकर खोत ( ९८ ), स्नेहा शशिकांत खोत (८७ ),
१४ ) मिणचे ग्रामपंचायतीमध्ये युवा शक्ति आघाडीची सत्ता कायम . विजयी उमेदवार यांची नावे संभाजी भिमराव जाधव ( ४३७), सावित्री शंकर नाईक ( ४६४ ), सविता यशवंत वाकसे ( ४७८ ), अभिनंदन जिनपाल शिखरे ( २८२ ) शाकीरा अकबर मुजावर ( २७७ ), महादेव आणा परीट ( २९३ ), नलिनी यशवंत जाधव ( २५५ ) सुजीत सुकुमार वायदंडे, ( ३४१ ), निलम भगवान घाटगे, ( ४४१ ), अजय संभाजी कांबळे ( ४४५ ), जब्बार ईलाई मोमीन ( ४२७ ), रंजना अशोक जाधव ( ४४९ ),
१५ ) वाठार तर्फ उदगाव ग्रामपंचायतीमध्ये जनसुराज्य पक्षाने विजयाचा झेंडा रोवला. विजयी उमेदवार पुढील प्रमाणे. मारूती शंकर शिंदे ( ४४९ ), ताई लक्ष्मण अनूसे ( ४६५ ), शोभा निवृत्ती शिंदे ( ४१९ ), कृष्णा पाडूंरगवा वठारकर ( ४२८ ) जावेद चंदूलाल पाथरवट ( ४५१ )रिना प्रवीण शिंदे ( ४७९ ), विजय श्रीपाल कागवाडे, ( २३0 ), मंगल बबन परीट ( २३५ )दत्तायत्र रामचंद्र पाटील ( ३१२ ), कोमल स्वप्नील शिंगे ( ३08 ), उज्वला बाजीराव शिंगे, ( २५७ )
१६ ) लाटवडे ग्रामपंचायतमध्ये सत्तांतर विजयी उमेदवार पुढील प्रमाणे.. बाळासो तुकाराम भोपळे ( ५२० ), किरण मोहन धनगर ( ३४८ ), राधीका सचिन पाटील ( ४६१ ), संभाजी शामराव पवार ( ५८९ ), रेखा शिवाजी नाईक ( ५७० ) निशा वसंत पाटील ( ५०३ ), किरण राजाराम पाटील ( ४२८), दिनकर बाबूराव पाटील ( ४३२ ), स्वाती उत्तम पाटील ( ४१0 ), महादेव ,राजाराम पाटील ( ४४४ ), हर्षदा कृष्णात कांबळे

( ४८० ), विमल अशोक कोळी ( ४९७ )रणजीत सदाशीव पाटील ( ५१९ ) नलिमा बाजीराव सकटे ( ४७२ ),
( १७ )

कबनूर ग्रामपंचायतमधील विजयी उमेदवार, समीर बाबूभाई जमादार ( १२४९ ) सुधीर सात्तापा लिगाडे ( १५२० ) सुनिता सुरेश आडके ( १०२५ ), मधुकर देवाप्पा मणेरे ( ८६३ ), रजनी रमेश गुरव ( १४२६ ), रोहिणी शिवानंद स्वामी ( १३७0 ),उत्तम इरगोंडा पाटील ( ८६९ ), स्वाती नितिन काडाप्पा (८५४ ) साहिफ शहाबुद्दीन मुजावर ( १०९३ ) अर्चना सुधीर पाटील , सिंधू रंगराव महाजन ( ६८८ ) ( ११०५ ) कुमार मारुती कांबळे ( १२४८ ), सुलोचना संजय कट्टी , शोभा शंकर पोवार ( ७९५ ),( ८५७ ), सुनिल धनपाल काडाप्पा ( १६११ ), प्रवीण सुरेश जाधव ( १४७० ), सुधाराणी किशोर पाटील ( १४५६ )
(१९ ) खोची ग्रामपंचायीमधील विजयी उमेदवार नावे… प्रमोद बाबासो सुर्यवंशी ( ४३२ ), स्वाती राजराम सिध्द ( ४१0 ) प्रमोद प्रकाश गुरव ( ३१८ ) वैशाली दिपक वाघ ( २९७ ), राजकुमार सयाजी पाटील ( २२१ ) प्रतिक्षा आमोल आडके ( २४० ), जगदीश भिमराव पाटील ( ४४६ ) पूनम आशिष गुरव ( 3८२ ), स्नेहा सचिन पाटील ( ४०६ ) सुहास पंडीतराव गूरव ( २७८ ) कमल रघूनाथ ढाले ( २७९ ), रोहनी दादासो पाटील ( ३१० ) ( २० )माणगांववाडी येथून सागर खोत , व दिपाली जितेंद्र खोत बिनविरोध भाऊसो महादेव खोत ( १६४ ) , पुष्पलता सखाराम कुंभार ( १७०), सुजाता मधुकर खोत ( १५७ ), बाळासो आण्णाप्पा खोत ( ११६), आकाशी भाऊसो मायगोंडा ( १०९ ) ,

Categories
Uncategorized

कन्या तिर्था हीचे घोडके- महाडिक कुटुंबीयांकडून राजेशाही थाटात स्वागत

प्रशांत भोसले
हातकणंगलेः

मेरे घर आई एक नन्ही परी, एक नन्ही परी….।
चांदनी के हसीन रथ पे सवार
मेरे घर आई….।

उसके आने से मेरे आंगन में
खिल उठे फूल गुनगुनायी बहार
देख कर उसको जी नहीं भरता
चाहे देखू उसे हज़ारों बार
मेरे घर आई….।

असाच काहीसा आनंद चावरे गावातील महाडिक कुटुंबियांना झालेला आहे. भारतीय सैन्य दलात आपली सेवा सलग 32 वर्षे 6 महिने अविरत बजावणारे तसेच राष्ट्रपती सन्माने सन्मानित मा.कॅप्टन गणपतराव घोडके-महाडिक साहेब सौ.अलका घोडके- महाडिक श्री. संपतराव घोडक महाडिक सौ.कल्पना घोडके महाडिक यांची नात व विश्ववारणा पब्लिक स्कूल तळसंदेचे व्यवस्थापक मा.दिपक महाडिक व संचालिका डॉ. सौ. दीपिका महाडिक यांची कन्या कु. तीर्था ही जन्मानंतर (कुरळप) आजोळहून प्रथमत चावरे गावी निवासस्थानी गृहप्रवेश करीत असल्याने तिचे स्वागत भव्य राजेशाही थाटात संपन्न झाला.

आज-काल मुलगी म्हटले की पालकांना नको वाटतात व त्यांची कदर केली जात नाही एवढेच नाही तर स्त्री-भ्रुणहत्या केली जाते म्हणून समाजामध्ये जणजागृती करण्यासाठी घोडके-महाडिक परिवाराकडून आपल्या घरी जन्मास आलेल्या कन्येचे स्वागत गावच्या वेशीपासुन ते घरापर्यंत सुबक रांगोळी तसेच कु.तिर्था व आई या दोघींची हत्तीवरून जंगी मिरवणूक सोहळ्यामध्ये प्रबोधनाचे सामाजिक संदेश देणारे लेक वाचवा, पर्यावरण संवर्धन असे विविध फलक लावून , फुलांच्या वर्षावात, रंगी बिरंगी कोल्हापुरी फेटे , हलगीच्या तालात शिवकालीन मर्दानी खेळ , लेझीम, स्वर संगीताचा कार्यक्रम , तसेच फक्कड तांबडा पांढरा व शाकाहारी भोजनाची मेजवानी असे भव्यदिव्य नियोजन केले होते. गावामध्ये सर्वत्र आनंदाचे वातावरण जणूकाही एखाद्या ऐतिहासिक भव्य सोहळा आयोजित केला. सामान्य घोडके महाडिक कुटुंबीयांनी या सोहळा संपन्न केल्याने यांचे कौतुक सर्व स्तरावरून केले जात आहे.

या कार्यक्रमाचे नियोजन विश्ववारणा शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षक तसेच जिल्हा उपवनविभाग कोल्हापूर व डी.वाय. एस.पी.ऑफीस कोल्हापूर व नांदनी मठ यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व स्वागत प्रा.संभाजी पाटील सर यांनी केले या कार्यक्रमाद्वारे घोडके महाडिक परिवाराने लोकांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे.

यावेळी कु. तिर्था यास शुभ आशीर्वाद देण्याकरिता श्री आर. डी. घोडके साहेब(शास्त्रज्ञ ऍग्री) मा.राजवर्धन मोहिते ( जिल्हा परिषद सदस्य), मा. शिवाजीराव शिंदे (घुणकी ) मा.अशोकराव जाधव (ग्रामपंचायत सदस्य घुणकी) मा. प्रकाश चौगुले (सरपंच पारगाव) मा. शिरीष जाधव (सरपंच बहिरेवाडी). उदय पाटील (वारणा कारखाना संचालक) ,श्री.जगन्नाथ पाटील (चावरे घुणकी पाणी पुरवठा चेअरमन )श्री. बी.जी.बोराडे सर ,मा.माणिक निकम ,दिलीप महाडिक (पोलीस पाटील), इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Categories
कवठेमहांकाळ सांगली

सांगली जिल्हा मैदानी निवड चाचणी जिल्हा क्रीडा संकुल मिरज येथे उत्साहात संपन्न झाली.


दि.१७/०१/२०२१
कवठेमहांकाळ- विद्याधर रास्ते

आज सांगली जिल्हा क्रीडा संकुल मिरज येथे जिल्हा मैदानी चाचणी घेण्यात आली. यामध्ये जवळपास ८५० खेळाडूंनी सहभाग नोंदाविला. कोविड १९ मुळे गेल्या वर्षभरामध्ये प्रथमच मैदानी निवड चाचणी स्पर्धाचे आयोजन केले गेल्यामुळे खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण होते. या निवड चाचणी मधून पहिला व दुसरा क्रमांक मिळविलेल्या खेळाडूंची निवड १९ ते २२ जानेवारी २०२१ रोजी पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धांसाठी करण्यात येणार आहे. असे राज्य अँथलेटिक असोसिएशनचे उपाध्यक्ष व जिल्हा मैदानी संघटनेचे सचिव श्री संजय पाटील यांनी सांगीतले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राजेंद्र, कदम, बाळासाहेब माने, हिम्मत पाटील, छ्त्रपती पुरस्कार प्राप्त युवराज खटके, विजयकुमार शिंदे, उदय गायकवाड, प्रा.डॉ.गणेश सिंहासने, प्रा.अक्रम मुजावर, प्रितेश पाटील, गजानन सुतार, मंडले सर, माया खटके, गंगा शिंदगी, राहूल कांबळे, आर्यदिप लोंढे, दिपक ऐवळे, पवन घोडके, अभिजीत तासगावकर, अंकुश कलगुटगी, अविनाश वाघमारे, या सर्वांनी स्पर्धा चांगल्या पार पाडण्यासाठी उत्तम पद्धतीने नियोजन व सहकार्य केले. स्पर्धकांमध्ये खूपच उत्साही वातावरण होते. त्यामुळे स्पर्धा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या.

Categories
कोल्हापूर हातकणंगले

मानवाने वेळीच सावध होऊन पर्यावरणातील आपल्या वाढत्या हस्तक्षेपावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहेः डॉ.एम.ए.पाटील

प्रशांत भोसले

रूकडी ( दि. १६-१-२०२१ ) मानव स्वतःच्या विकासासाठी नैसर्गिक साधन संपत्तीचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहे, त्याचा परिणाम म्हणजे हवा प्रदूषण, जल प्रदूषण, मृदा प्रदूषण आणि सागरी प्रदूषण हे होय. मानवाने वेळीच सावध होऊन पर्यावरणातील आपल्या वाढत्या हस्तक्षेपावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, नाहीतर मानवासह संपूर्ण सजीव सृष्टीचे जीवन धोक्यात येईल असे मत श्री. विजयसिंह यादव कला व विज्ञान महाविद्यालय पेठवडगाव येथील भूगोल विषयाचे शिक्षक डॉ.एम.ए. पाटील यांनी व्यक्त्त केले ते येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयात सामाजिक शास्त्रे विभागाच्यावतीने आयोजित केलेल्या भूगोल दिन कार्यक्रमात ” बदलते पर्यावरण ” या विषयावरील व्याख्यानात बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अर्जुन राजगे होते. स्वागत व प्रास्ताविक श्री. अशोक पाटील यांनी केले डॉ.एम.ए.पाटील आपल्या भाषणात पुढे म्हणाले विविध उद्योगधंदे आणि वाढती वाहनांची संख्या यातून बाहेर पडणाऱ्या विषारी वायूमुळे हवेचे प्रदूषण झाले आहे, जागतिक तापमान वाढीमुळे ध्रुवीय प्रदेशातील बर्फ वितळू लागले आहे, त्यामुळे समुद्राची पातळी वाढण्याचा धोका निर्माण होऊन समुद्र किनार्‍यावरील अनेक शहरे पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त्त केली जात आहे. जंगल म्हणजे पर्यावरणाचे फुप्फुस परंतु जंगल तोड आणि जंगलातील आगी यामुळे जंगलाचे क्षेत्र कमी होऊन पर्यावरणाचे आरोग्य धोक्यात आले आहे. बिघडणाऱ्या पर्यावरणामुळे पृथ्वीवरील जैवविविधता धोक्यात आली आहे. अनेक वनस्पती व प्राण्याच्या प्रजाती नष्ट होत आहेत म्हणून मानवाने पर्यावरणातील नैसर्गिक साधनसंपत्तीच्या वापरावर मर्यादा आणून पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न करावेत व स्वतः सह संपूर्ण सजीव सृष्टीचे संरक्षण करावे. आभार डॉ.खंडेराव शिंदे यांनी मानले. ऑनलाईन संपन्न झालेल्या या व्याख्यानास महाविद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते.

Categories
कोल्हापूर हातकणंगले

पत्रकार भवन येथे युवा पत्रकार शुभम पेडामकर यांना पुरस्कार

पत्रकार भवन येथे युवा पत्रकार शुभम पेडामकर यांना पुरस्कार

कमी वयात कौतुकास्पद कामगिरी

पुण्याच्या पत्रकार भवन येथे आज युवक मित्र परिवार आयोजित राजमाता आई जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती (“राष्ट्रीय युवा दिन” ) निमित्ताने युवा पत्रकार पुरस्काराने मुंबईच्या शुभम रेखा शंकर पेडामकर ह्यांना गौरविण्यात आले. ह्यावेळी त्यांचे मामा-मामी (अस्मिता गणेश दगडू मोरे) त्यांच्यासोबत होते. गेली पाच वर्षे शुभम यांचा पत्रकारिता क्षेत्रातील प्रवास हा अतिशय प्रेरणादायी व उल्लेखनीय आहे. सामाजिक कामासोबत जनतेचे प्रश्न ते त्यांच्या पत्रकारितेतून नेहमी मांडत असतात. या पुरस्काराचे सर्व श्रेय ते त्यांच्या कुटूंबाला व आई- बाबा (रेखा शंकर पेडामकर) व भाऊ (अभिलाष ) यांना देतात.

शुभम ह्यांनी वयाच्या तेविसाव्या वर्षी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक इ. विषयावर ७५० हुन अधिक लेख व बातम्या केल्या आहेत त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या २६ महिलांच्या मुलाखती आणि १५ हून अधिक करिअर मंत्र मुलाखती लिहिल्या आहेत.त्याचबरोबर सध्या ते भारतातील टॉप टेन एन. जी.ओ च्या यादीत असणाऱ्या सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या मीडिया अकादमीत मीडिया प्रशिक्षक असून बी.एम.सी च्या विद्यार्थ्यांना ते मीडियाचे प्रशिक्षण देत आहेत.अनेक सामाजिक उपक्रमात ते नेहमी सक्रिय असतात. आजवर त्यांना औरंगाबादचा चौथा स्तंभ पुरस्कार, आदर्श पत्रकार पुरस्कार इ.पुरस्कार प्राप्त झाले आहेत.त्यांच्या या कामगिरी बद्दल सर्वच स्तरावरून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Categories
कोल्हापूर हातकणंगले

पत्रकार भवन येथे युवा पत्रकार शुभम पेडामकर यांना पुरस्कार

कमी वयात कौतुकास्पद कामगिरी

पुण्याच्या पत्रकार भवन येथे आज युवक मित्र परिवार आयोजित राजमाता आई जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती (“राष्ट्रीय युवा दिन” ) निमित्ताने युवा पत्रकार पुरस्काराने मुंबईच्या शुभम रेखा शंकर पेडामकर ह्यांना गौरविण्यात आले. ह्यावेळी त्यांचे मामा-मामी (अस्मिता गणेश दगडू मोरे) त्यांच्यासोबत होते. गेली पाच वर्षे शुभम यांचा पत्रकारिता क्षेत्रातील प्रवास हा अतिशय प्रेरणादायी व उल्लेखनीय आहे. सामाजिक कामासोबत जनतेचे प्रश्न ते त्यांच्या पत्रकारितेतून नेहमी मांडत असतात. या पुरस्काराचे सर्व श्रेय ते त्यांच्या कुटूंबाला व आई- बाबा (रेखा शंकर पेडामकर) व भाऊ (अभिलाष ) यांना देतात.

शुभम ह्यांनी वयाच्या तेविसाव्या वर्षी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक इ. विषयावर ७५० हुन अधिक लेख व बातम्या केल्या आहेत त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या २६ महिलांच्या मुलाखती आणि १५ हून अधिक करिअर मंत्र मुलाखती लिहिल्या आहेत.त्याचबरोबर सध्या ते भारतातील टॉप टेन एन. जी.ओ च्या यादीत असणाऱ्या सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या मीडिया अकादमीत मीडिया प्रशिक्षक असून बी.एम.सी च्या विद्यार्थ्यांना ते मीडियाचे प्रशिक्षण देत आहेत.अनेक सामाजिक उपक्रमात ते नेहमी सक्रिय असतात. आजवर त्यांना औरंगाबादचा चौथा स्तंभ पुरस्कार, आदर्श पत्रकार पुरस्कार इ.पुरस्कार प्राप्त झाले आहेत.त्यांच्या या कामगिरी बद्दल सर्वच स्तरावरून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Categories
इचलकरंजी

तात्यासाहेब तथा टी. डी. कुडचे यांचे निधन

टी. डी. कुडचे गुरुजी यांचे निधन
इचलकरंजी (हिंदुसम्राट प्रतिनिधी) : –
येथील शिक्षण क्षेत्रातील सेवावृत्ती व्यक्तिमत्व तात्यासाहेब तथा टी. डी. कुडचे यांचे गुरुवारी निधन झाले. ते 91 वर्षांचे होते.
शिक्षक या नात्याने त्यांनी प्रारंभी खडतर प्रवास केला. स्वर्गीय बापूजी साळुंखे यांच्या सहवासात राहून त्यांनी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या प्रगतीसाठी उल्लेखनीय योगदान देत संस्थेच्या अनेक ठिकाणी लोकवर्गणीतून वास्तू आकाराला आणल्या. निवृत्तीनंतर उसंत न घेता डीकेटीई, बाहुबली आदी शिक्षण संस्थांच्या ज्ञान मंदिराला उभारणी दिली. त्यांच्या शैक्षणिक जीवनपटाची दखल घेऊन राज्य शासनाने ‘राज्य आदर्श शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांनी पत्नी वेणूताई यांना विवाहानंतर शिक्षिका बनवले. त्यांनाही राज्य आदर्श शिक्षक पर्यंत पोहोचवले. ज्ञानदान करणारी ही जोडी अनुकरणीय ठरली. मुलांनाही उच्चशिक्षण घेऊन उद्योग, वैद्यकीय, शेती अशा व्यवसायात पारंगत केले. त्यांच्यामागे डॉक्टर अभय, अनंत, लक्ष्मी औद्योगिक वसाहतीचे उपाध्यक्ष अनिल तथा राजू, अविनाश अशी चार मुले आहेत. गुरुवारी पंचगंगा नदी घाटावर गुरुजींच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात आले. पंचगंगा स्मशानभूमीत झालेल्या शोकसभेत विविध मान्यवरांनी कुडचे गुरुजींच्या शैक्षणिक कार्याचा सन्मानपूर्वक उल्लेख केला.

Categories
इंदापूर

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भरणेवाडी ग्रामपंचायत साठी बजावला मतदानाचा हक्क ;

इम्तिहाज मुलाणी :
इंदापूर (प्रतिनिधी):

इंदापूर तालुक्यातील 57 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे दि.15 जानेवारी रोजी प्रत्यक्षात मतदान झाले असून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या गावची भरणेवाडी ग्रामपंचायत देखील या प्रक्रियेत असून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व त्यांचे बंधू मधुकर भरणे यांनी रांगेत उभे राहुन मतदानाचा हक्क बजावला .

पुणे जिल्ह्यातील महत्वाचा तालुका असलेल्या इंदापूर तालुक्यात 60 ग्रामपंचायतीची निवडणूक होती. 60 पैकी 3 ग्रामपंचायत बनविरोध झाल्या असून उर्वरित 57 ग्रामपंचायतीचे दि.15 रोजी प्रत्यक्षात मतदान झाले आहे. 556 जागांसाठी 1352 उमेदवार रिंगणात उतरले असून मतपेठीत त्यांचे भविष्य बंद झाले आहे.

काल सकाळी 7 वा.30 मि.पासून मतदान प्रक्रियेला सुरवात झाली व सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ही प्रक्रिया चालू राहिली. या ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी 18 जानेवारी 2021 रोजी होणार आहे.

Categories
कोल्हापूर क्रीडा ब्रेकिंग न्युज

पै.खाशाबा जाधव यांची जयंती यानिमित्त जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार

प्रशांत भोसले
दिनांक 15 जानेवारी 2021 स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते स्वर्गीय खाशाबा जाधव यांची जयंती यानिमित्त जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने ऑलिम्पिक स्पर्धेच्या निवड चाचणीसाठी पात्र ठरलेल्या व शासनाचे अनुदान मिळालेल्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या सत्काराचा कार्यक्रम भवानी मंडपामध्ये आयोजित करण्यात आला होता. सकाळी साडे आठ वाजता भवानी मंडप परिसरातील किर्तिस्तंभला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली योग प्रशिक्षक श्री रवी भूषण कुमठेकर यांची विद्यार्थिनी कुमारी गार्गी भट हे योगाची प्रात्यक्षिके करून दाखवले.
कार्यक्रमातऑलम्पिक निवडचाचणीसाठी पात्र ठरलेले व खेळाडू श्रीमती तेजस्विनी सांवत,राहि सरनोबत, स्वरुप उन्हाळकर,आंतरराष्ट्रीय खेळाडू ज्याना शासनाकडून अनुदान प्राप्त झाले आहे.उज्वला चव्हाण,अभिषेक जाधव,अफ़्रिद अत्तर,विवेक मोरे,स्वप्निल पाटील,आरती पाटील,वैष्णवी सुतार ,प्रथमेश कापडे,दत्तप्रासद चौगले,खुशबु रिकिबादर,तसेच मान्तेश पाटील,पृथ्वीराज पाटील,सुरज आसवले ,कोमल देसाई इ.खेळाडुंचा सत्कार करण्यात आला.
जिल्हाधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत असताना शालेय क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडूंच्या कामगिरीचा आढावा सांगितला शासनाच्या वतीने खेळाडूंना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा आधुनिक तंत्रज्ञान प्रशिक्षण शिबिराचे आयोजन यातून भविष्यात देखील अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू कोल्हापूर उघवते खेळाडु स्व.खाशाबा जाधव यांच्याकडून प्रेरणा घेऊन कोल्हापूरचे नाव जागतिक स्तरावर पोहोचतील असा मानस व्यक्त केला. अर्जुनअवार्डीआंतरराष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू कुमारी शैलजा साळोखे यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना पूर्वीच्या काळी असणारी सुविधांची कमतरता व त्या प्रतिकूल परिस्थितीत जुन्या काळातील खेळाडू मेहनतीच्या जोरावर आपली कामगिरी अति उच्च स्तरावर नेत असल्याचे सांगितले तसेच याप्रसंगी खाशाबा जाधव यांचे पुतणे यांनी खाशाबा जाधव यांना केंद्रशासनाकडून भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणीही केली केली. राज्य शासनाकडुन खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात यावा अशी मागणीही केली. खाशाबा जाधव यांचे शिक्षण कोल्हापूर मध्ये राजाराम कॉलेज व कुस्तीचा सराव मोतीबाग तालीम येथे झाल्याचे सांगून कोल्हापूरच त्यांची कार्य कर्मभूमी होते, याची आठवण करून दिली. आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी सावंत यांनीही याप्रसंगी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे नावाच्या किट घातल्यानंतर ज्या भावना मनामध्ये येतात तशाच भावना मी कोल्हापूरची असल्याचे सागून जर खेळाडुच्या किट्च्या पाठीवर कोल्हापूरचे नाव असेल तर नक्कीच अभिमान व आनंद होईल असे सांगून जिल्हा क्रीडा अधिकारी यांना त्यांनी पुढील येणाऱ्या स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्याचे खेळाडूंसाठी स्वतंत्र कोल्हापूरची ओळख असेल असे कीट देण्याची विनंती केली. माननीय आमदार श्री चंद्रकांत जाधव यांनीही सत्कारमूर्ती आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे कौतुक करून त्यांना पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या व कोल्हापुरात सुसज्ज दर्जाच्या खेळ सुविधा भविष्यामध्ये निर्माण करण्यात येणार असल्याचे सांगून येणार असल्याचे आश्वासन याप्रसंगी त्यांनी दिली माननीय जिल्हाधिकारी श्री दौलत देसाई यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना कोल्हापूरला क्रीडा परंपरेची असणारी परंपराही किती जुन्या काळापासून आहे याची माहिती दिली , 1920 सालच्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतही कोल्हापूरचा रंगनाथ पाटील यांनी सहभाग घेतल्याचे त्यांनी सांगितले या प्रसंगी कोल्हापूरच्या लोकांमध्ये कुस्तीविषयी असणाऱ्या प्रेमाची आठवण सांगत असताना ते विद्यार्थ्यांची विद्यार्थीदशेत असताना पैलवान युवराज पाटील आणि पैलवान सतपाल यांच्या मध्ये कोण जिंकणार याची घराघरांमध्ये चर्चा रंगत असे अशी आठवणही त्यांनी सांगितली या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर श्रीमती शैलजा साळुंखे टेबल-टेनिस अर्जुन वीर माननीय आमदार चंद्रकांत जाधव माजि महापौर श्रीमती निलोफर आजगेकर, श्रीमती शोभाताई बोंद्रे , हिंदकेसरी दीनानाथ सिंह व जीवनगौरव पुरस्कार ते बिभीषण पाटील तसेच स्व.खाशाबा जाधव यांचे पुतणे शामराव पुतणे व सचिन चव्हाण आंतरराष्ट्रीय क्रीडा नेमबाज सचिन च्व्हाण जिल्हा अधिकारी सर्व कर्मचारी व शिक्षक वृंद उपस्थित होता.क्रीडा कार्यालयाचे क्रीडा अधिकारी माने सर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

Categories
कोल्हापूर हातकणंगले

राजकीय व्यक्तीच्या विरोधात दिले आत्मदहनाचा इशारा

प्रतिनिधी मुबारक शेख राजाराम धारवाट
या राजकीय व्यक्तीने जागा बळकावत असल्यामुळे जागामालक नागेंद्र भीमराव कांबळे यांनी इचलकरंजी पोलीस ठाणे व नगरपालिकेकडे लेखी तक्रारी
देऊनही प्रशासनाने दखल घेतली नसल्यामुळे नागेंद्र कांबळे यांनी जिल्हाधिकार्यालय कोल्हापूर या ठिकाणी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिना दिवशी आत्मदहन करणार असल्याचे लेखी पत्र कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांना दिले.
या लेखी अर्जात
असे म्हटले आहे की राजाराम धारवट या व्यक्तीने आम्ही राहत नसल्याचा गैरफायदा घेऊन माझा सिटी
सर्वे नंबर 12530व12531 या जागेवर अतिक्रमण करीत आहे माझ्या जागेवर अतिक्रमण का केले असे विचारायला गेल्यावर मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याबाबत मी शहर पोलीस ठाणे व इचलकरंजी नगरपालिकेमध्ये लेखी तक्रार देऊनही राजारामट धारवट या राजकीय व्यक्तीचा दबावामुळे प्रशासन कारवाईची दखल घेत नाही. नागेंद्र कांबळे म्हणाले मला न्याय मिळाला नाही तर जिल्हाधिकार्यालय समोर आत्मदहन करणार असल्याचे सांगितले असे पत्र जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख यांना दिलेले आहे.

Categories
कोल्हापूर हातकणंगले

हुपरी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी लालासाहेब देसाई यांची निवड

हुपरी (हिंदुसम्राट प्रतिनिधी) :- हुपरी (ता.हातकणंगले) येथील राष्ट्रीय काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी लालासाहेब शंकरराव देसाई यांची तर उपाध्यक्ष म्हणून बाबासाहेब रावसाहेब गायकवाड यांची निवड करण्यात आली. आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
लालासाहेब देसाई मागील अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय असून युवक काँग्रेसचे पंधरा वर्षापासून शहराध्यक्ष म्हणून कार्यरत होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आमदार राजूबाबा आवळे यांच्या विजयासाठी हुपरी परिसरात नेटके नियोजन केले होते. त्यामुळे माजी खासदार जयवंतराव आवळे यांच्या आदेशानुसार लालासाहेब देसाई यांना अध्यक्षपद देण्यात आले.
हुपरी शहरात दोन वर्षांनी होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कऱणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.
हातकणंगले काँग्रेस कमिटीत आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते व तालुका अध्यक्ष भगवान जाधव यांच्या उपस्थितीत अध्यक्ष देसाई व उपाध्यक्ष गायकवाड यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी हातकणंगले नगराध्यक्ष अरुण जानवेकर, माजी शहराध्यक्ष बाळासाहेब जाधव, किरण पोतदार, तानाजी घोडेस्वार, अरुण पाटील, अनिल धोंगडे, भैरवनाथ पवार, रमेश पाटोळे, राजेश होगाडे, प्रतापसिंह जाधव आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Categories
कोल्हापूर हातकणंगले

मा. खास. श्रीमती निवेदिता माने यांच्या हस्ते सेवानिवृत्ती डॉ.सौ.आशा पाटील यांच्या सत्कार

डाॕ.आशा पाटील यांचा सेवानिवृत्ती सत्कार करताना मा.खास.निवेदिता माने,प्राचार्य डाॕ.अर्जुन राजगे व इतर

रुकडी (दि. ९-१-२०२१) व्यक्ती नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाली तरी पुढील उर्वरित आयुष्यात एखाद्या
समाजोपयोगी क्षेत्रात कार्यरत राहिली तर त्या व्यक्तीच्या ज्ञानाचा समाजाला निश्चितच फायदा होतो, शिवाय एखाद्या कार्यात गुंतुन राहिल्याने आनंदी जीवन जगता येते , असे मत मा. खास. श्रीमती निवेदिता माने यांनी
व्यक्त केले त्या येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयात वाणिज्य विभागाच्या डॉ.सौ.आशा पाटील यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या. स्वागत व प्रास्ताविक डॉ. खंडेराव शिंदे यांनी केले मा.खास. माने पुढे म्हणाल्या सेवेत असताना आपण अनेक विद्यार्थी घडविले आहेत ते आज वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. मा.खा. माने यांच्या हस्ते डॉ.सौ.आशा पाटील व त्यांचे पती श्री.भूपाल पाटील यांचा सत्कार करण्यात आला , तसेच या कार्यक्रमात हिंदी विषयात शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी पदवी मिळविल्याबद्दल डॉ.शंकर दळवी , डॉ.हिंदुराव संकपाळ यांची रोटरी क्लब ऑफ आतिग्रे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच डॉ. माधवी सोळांकुरकर यांना रोटरी क्लब अतिग्रे चा शिक्षक गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. अर्जुन राजगे आपल्या मनोगतात म्हणाले नियत वयोमानानुसार प्रत्येक शिक्षकाला सेवा निवृत्त व्हावे लागते शिक्षक हे व्रत आपण स्वेच्छेने स्वीकारलेले असते,त्यामुळे सेवेत असताना प्रत्येक शिक्षकाने आपले विद्यार्थी भविष्यकाळातील जीवनात सक्षमपणे कसे तयार होतील याचा नेहमीच विचार करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे.

या कार्यक्रमात डॉ.सौ.आशा पाटील, डॉ.शंकर दळवी, डॉ. माधवी सोळांरकुरकर, डॉ.हिंदुराव संकपाळ, डॉ. मुकुंद हळदकर यांनी मनोगत व्यक्त केले सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळून संस्थेतील सर्व शाखांचे प्रमुख, शिक्षक , प्रशासकीय सेवक उपस्थित
होते .आभार डॉ.विजय देसाई यांनी मानले तर सूत्रसंचालन श्री अशोक पाटील यांनी केले

Categories
Uncategorized

समाजातील वाईट व्यवस्थेला धक्का देणारा पत्रकार समाजव्यवस्थेतील मूकनायक :स.पो.नि. दीपक भांडवलकर

करवीर पूर्व : प्रतिनिधी : गजानन रानगे

समाजातील वाईट व्यवस्थेला धक्के देण्याचे काम
पत्रकार करतात.लेखनीचा मार्ग हा सोपा नाही. आणि तो व्यवसायही नाही .पत्रकार हे समाजाचे मूकनायक आहेत.पत्रकारांचा आवाज दाबता येणार नाही पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा अस्तित्वात येतोय. असे प्रतिपादन गांधीनगर पोलीस ठाण्याचे सपोनि दीपक भांडवलकर यांनी केले. संघाच्या वतीने आयोजित पत्रकार दिन व नूतन पदाधिकारी यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गांधीनगर ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच रितू लालवानी होत्या. करवीर पूर्व पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष माने यांनी मनोगतात पत्रकार संघाच्या सकारात्मक पत्रकारितेबरोबरच सामाजिक उपक्रमाचा उहापोह केला.
भांडवलकर म्हणाले, समाज संघटित करण्यात व अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पत्रकार समाजाचे प्रबोधन करत व्यक्तीचे व्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी धडपड करत असतात. समाजाचे आवाज बनण्याचे काम पत्रकार करतात
कार्यक्रमास पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष माने, उपाध्यक्ष राजेंद्र शिंदे,सचिव मोहन सातपुते, खजानिस अनिल निगडे, विश्वास शिंदे,अनिल उपाध्ये, बाबासाहेब नेर्ले, प्रविण जाधव,राजेंद्र सूर्यवंशी, दौलत कांबळे, आनंद गुरव,राहुल मगदूम,संदीप शिंदे,प्रमोद ढेकळे,विशाल फुले,गजानन रानगे,अशोक ठाकूर तसेच सिंधी सेंट्रल पंचायतीचे उपाध्यक्ष अशोक टेहल्यानी, गुड्स ट्रान्सपोर्ट अध्यक्ष चंद्रकांत पाटील,कमलेश मनचुडिया,दिलिप नरसिंघाणी, अशोक चंदवाणी,अमोल एकळ, सचिन मसुटे यांच्यासह या कार्यक्रमास गांधीनगर परिसरातील उद्योजक,व्यापारी, नागरिक व पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते.
प्रास्ताविक प्रा. डॉ . प्रवीण जाधव यांनी केले. सूत्रसंचालन सुरेश मसुटे व आभार बाबासाहेब नेर्ले यांनी मानले.

Categories
कोल्हापूर हातकणंगले

यळगुड गाव तलावातील स्वच्छता व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उत्तम कागले यांच्या मध्यस्थीने मार्गी

यळगुड येथील ऐतिहासिक तलावात जलपर्णी पसरुन तलाव अस्वच्छ होऊन मैदानासारखे स्वरूप आले होते. ग्रामपंचायत आणि मच्छी ठेकेदार यांच्या मध्ये वाद निर्माण झाला होता.तसेच अनिल पाटील यांच्या विहीरीचे पाणी गावात पुरवठा करण्याबाबत हि वाद निर्माण झाला होता तो हि प्रश्न मिटवून अनिल पाटील यांच्या विहीरीचे आणि एम.आय.डी.सी. असे दोन्ही पाणी गावात सुरू झाल्याने पाणी प्रश्न् ही मिटला आहे.
या दोन्ही प्रश्नाची मध्यस्थी दै.हिंदुसम्राट चे संपादक उत्तम कागले यांनी करून हे दोन्ही प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल त्यांचे तसेच अनिल पाटील,हजरत मुल्लाणी, सरपंच, उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे अभिनंदन!

Categories
इंदापूर

बहुजन मुक्ती पार्टी ने पुकारलेल्या इंदापूर बंदला शंभर टक्के प्रतिसाद इंदापूर शहर कडकडीत बंद

पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्यावर कारवाई होणार का ?

इम्तिहाज मुलाणी :
इंदापूर (प्रतिनिधी):

इंदापूर चे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी ठाण्यामध्ये आलेल्या वेगवेगळ्या फिर्यादी आणि तक्रारदार यांना योग्य तो न्याय दिला नाही म्हणून बहुजन मुक्ती पार्टी चे राष्ट्रीय महासचिव अँड.राहुल मखरे यांनी त्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली होती.या कारवाईच्या मागणीसंदर्भात बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आज (दि.९)रोजी इंदापूर शहर बंद पुकारण्यात आले होते.बहुजन मुक्ती पार्टी च्या कार्यकर्त्यांनी इंदापूर शहरातील व्यापारी वर्गाला बंद पाळण्याचे आवाहन केले होते.या बंदला व्यापारी वर्गाने प्रतिसाद देत शंभर टक्के कडकडीत बंद पाळला.

दरम्यान इंदापूरचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या कारभारावर प्रश्न चिन्ह उपस्थित करत त्यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव अँड.राहुल मखरे यांनी इंदापूर पोलीस स्टेशन समोर दि.१९ डिसेंबर रोजी अमरण उपोषण सुरू केले होते. ते आंदोलन चिघळणार त्याचवेळी दि.२० डिसेंबर रोजी राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उपोषण स्थळास भेट देत अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते यांना फोन केला.यावेळेस मोहिते यांनी भीमा कोरेगाव च्या बंदोबस्तामध्ये व्यस्त असल्याने दि.६ जानेवारी पर्यंत आम्ही इंदापूर चे पोलीस निरीक्षक सारंगकर यांच्यावर कारवाई करतो असे आश्वासन दिले होते व सदरील उपोषण मागे घेण्यात आले होते.

मात्र दि.६ जानेवारी पर्यंत पोलीस निरीक्षक सारंगकर यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने आज दि.९ जानेवारी रोजी इंदापूर शहरात बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने बंद चे आव्हान करण्यात आले होते. त्यामुळे इंदापूर शहरातील मुख्य बाजार पेठे सह सर्वच व्यापारी वर्गाबरोबर नागरिकांनी कडकडीत बंद पाळला.या बंद च्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या बंद मधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या होत्या.

सारंगकर यांच्यावर कारवाई न झाल्यास रास्ता रोको व जेलभरो आंदोलन करण्यात येणार असल्याचे अँड.मखरे यांनी सांगितले.

Categories
गुन्हेगारी पुणे

चिनी लोन अँपवर बंदी घाला आणि चिनी अँप साठी वसुलीचे काम करणाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा- माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती


पुणे दिनांक १०- (प्रतिनिधी )
सध्या संपुर्ण भारतात चिनी लोन अँपचा सुळसुळाट झाला आहे.कमी वेळात आणि झटपट कर्जाचे आमिष दाखवून या चिनी कंपन्या अक्षरशः खाजगी सावकारा प्रमाणे लूटमार करत आहे.अशा चिनी लोन अँपवर सरकारने कठोरपणे कारवाई करून त्यांच्यावर बंदी घालावी आणि त्यांच्यासाठी वसुली एजंट म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने सरकारला करण्यात आली आहे.
या चिनी कंपन्याचा कर्जाच्या नावाखाली अक्षरशः नंगानाच सुरू आहे, भरमसाठ व्याज आकारून कर्जदारांना मेटाकुटीला आणत आहेत.यांच्या कर्जवसुलीला कुणाचेही नियंत्रण नाही.प्रोसेसिंग फीच्या नावाखाली अवाच्या सव्वा रक्कम आकारत आहे. यांच्यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने यांचे चांगलेच फावले आहे. या चिनी कंपन्याच्या कर्ज वसुलीसाठी एजंट म्हणून काम करणाऱ्या भारतीय लोकांना जरा सुद्धा आपल्या भारतीय कर्जदाराबद्दल सहानुभूती नाही, हे लोक चिनी कंपनीला कर्जवसुलीला मदत करून एकप्रकारे देशद्रोहाचा गुन्हा करत आहेत. हे वसुली एजंट कर्जदारांना अर्वाच्य भाषा, शिवीगाळ तसेच दमदाटी आणि धमकी देतात तसेच सतत वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरुन नातेवाईकांना फोन करून मानसिक त्रास देतात या वसुली एजंटच्या त्रासामुळे काही लोकांनी आत्महत्या पण केली आहे ,त्यामुळे सरकारने त्वरित या चिनी लोन अँपवर बंदी घालून त्यांच्या वसुली एजंट आणि कॉल सेंटरवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावे अशीही मागणी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीने केली आहे.

Categories
कोल्हापूर हातकणंगले

राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेन्ट्रल यांच्या वतीने घेण्यात आलेल्या कै. संभाजीराव माने स्मृती राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्त्तृत्व स्पर्धेत कु. श्रुती अशोक बोरस्ते प्रथम

वक्त्तृत्व स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राचार्य डाॕ.राजेखान शानेदिवाण व प्राचार्य डाॕ.अर्जुन राजगे यांच्या हस्ते स्वीकारताना नाशिकची कु.श्रुती बोरस्ते

प्रशांत भोसले

रूकडी येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेन्ट्रल यांच्या वतीने घेण्यात आलेल्या कै. संभाजीराव माने स्मृती राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्त्तृत्व स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे प्रथम क्रमांक कु. श्रुती अशोक बोरस्ते , एच. पी. टी. कॉलेज नाशिक व्दितीय श्री. अमोल रामचंद्र गोळे , डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय महाड व तृतीय श्री. शिवम संजय माळकर, सहकारभूषण एस. के. पाटील महाविद्यालय कुरुंदवाड उत्तेजनार्थ प्रथम श्री.अक्षय मारुती ईळके , नाईट कॉलेज इचलकरंजी , व्दितीय श्री. दत्तात्रय नाश्याबा चोरमले, छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा, तृतीय श्री. तेजस दिनकर पाटील , आप्पासाहेब जेधे महाविद्यालय पुणे विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक डॉ. प्रशांत कांबळे यांनी केले, अहवाल वाचन शारीरिक शिक्षण संचालक श्री.भाऊसाहेब वडार यांनी केले. विजेत्या स्पर्धकांचे व गुणी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व शुभेच्छा बाळासाहेब माने एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षा माजी खासदार श्रीमती निवेदिता माने व सचिव खासदार धैर्यशील माने यांनी दिल्या. प्रमुख पाहुणे डॉ.राजेखान शानेदिवाण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले वक्तृत्व स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये विचार करण्याची क्षमता विकसित होते, विचारांची दिशा कशी असावी याचे आकलन होते, विचार प्रक्रियेला चालना या स्पर्धेतून मिळत असते, विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडताना
आपल्या भावना व्यक्त केल्या पाहिजेत, विद्यार्थी हा महाविद्यालयाचा आत्मा आहे तो जसा पुढे जाईल तसा
महाविद्यालयाचा नावलौकिक होत असतो, विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन करणे
आवश्यक आहे.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. अर्जुन राजगे म्हणाले विजेत्या स्पर्धकांबरोबरच सहभागी
स्पर्धक सुद्धा महत्त्वाचे आहेत , आपण स्पर्धेत सहभाग घेतला म्हणून संयोजकांना विजेते ठरविता आले,
स्पर्धेतून आपण बरेच काही शिकत असतो एखाद्या स्पर्धेत आपण जिंकलो नाही म्हणून हार मानू नये, पुन्हा
नव्या जोमाने प्रयत्न करा यश निश्चितच प्राप्त होते. या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल चे
अध्यक्ष रो.संजयसिंह गायकवाड,सचिव रो.विमलकुमार बंब, संस्थेच्या सर्व शाखांचे प्रमुख, शिक्षक व
प्रशासकीय सेवक सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळून उपस्थित होते.आभार डॉ. गिरीश मोरे यांनी मानले तर
सूत्रसंचालन डॉ.माधवी सोळांकुरकर यांनी केले

Categories
कोल्हापूर हातकणंगले

रांगोळी येथील मुख्य रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ :मा.आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या विशेष प्रयत्नातून १० लाखांचा निधी मंजूर

प्रशांत भोसले

रांगोळी गावातील मुख्य रस्ता अत्यंत खराब झालेला होता. सदरच्या रस्त्यासाठी निधी देण्याचे आश्वासन मिणचेकर साहेबांनी दिले होते. त्याअनुषंगाने मा.आमदार डॉ. सुजित मिणचेकर साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून शासनाच्या २५१५ योजनेअंतर्गत दहा लाख रुपयांचा निधी या रस्त्यासाठी दिला. या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ आज मा. आमदार डॉ.सुजित मिणचेकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मिणचेकर साहेबांचे गावच्यावतीने भव्य स्वागत करण्यात आले. तसेच मुख्य रस्त्यासाठी भरीव निधी मंजूर केलेबद्दल आमदार साहेबांचे आभार मानण्यात आले.

यावेळी कार्यक्रमास रांगोळी गावचे सरपंच नारायण भोसले उपसरपंच तानाजी सादळे रमेश पाटील संजय शिंदे सुभाष नरंदे किरण हावलदार बापू मुल्लानी अण्णासो गोंडे सुनील पाटील सौ हेमा भोसले ताई संजय काटकर दीपक मोरे पांडुरंग सोदलगे अमोल देशपांडे संभाजी हांडे किशोर निकम बजरंग पाटील संजय लोहार संदीप सुतार जयवंत सादळे प्रफुल मगदूम बापुसो पाटील बाबुराव सादळे रणजित देवणे अमित सादळे शिवाजी सादळे राजू काटकर व इतर उपस्थीत मान्यवर उपस्थित होते.

Categories
कोल्हापूर हातकणंगले क्रीडा ब्रेकिंग न्युज

फिट इंडीया मुहमेंट अंतर्गत हातकणंगले तालुक्यातील शाळांची नोंदणी संदर्भात मार्गदर्शन बैठक संपन्न

क्रीडा शिक्षकांनी नेहमी विद्यार्थ्यांसमोर आदर्श ठेवून रमाकांत आचरेकर यांच्यासारखे आदर्श गुरुवर्य बनावे: उपशिक्षणाधिकारी मा. श्री. डी .एस पोवार

प्रशांत भोसले

हातकलंगले इयत्ता १ ते १२ वी च्या शाळांनी आपली नोंदणी फिट इंडियाच्या पोर्टलवर नोंदणी करण्यासंदर्भात मार्गदर्शन बैठकीचे आयोजन केले होते. हातकणंगले तालुक्यातील सर्व क्रीडाशिक्षक व शिक्षण विभाग (माध्यमिक) जिल्हा परिषद कोल्हापूर उपशिक्षणाधिकारी मा. श्री. डी .एस पोवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मवीर शैक्षणिक संकुल कुंभोज येथे मार्गदर्शक बैठक संपन्न झाली

कार्यक्रमाची सुरुवात शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील व माऊली लक्ष्मीबाई पाटील यांच्या पवित्र प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. संचालक प्रा. एस .जी. मसुटगे यांनी सर्व मान्यवर पाहुण्यांचे स्वागत केले तसेच रयत शिक्षण संस्थेची प्रतिज्ञा सर्व क्रीडा शिक्षकांनी घेतली . मा. सागर चूडाप्पा खोतवाडी हायस्कूल मुख्याध्यापक यांनी आपल्या प्रस्ताविक मध्ये फिट इंडिया कार्यक्रमांतर्गत शाळांच्या नोंदणी विषयक माहिती सांगितली तसेच कोरोना काळातील परिस्थिती पाहता खेळाचे महत्व अधिक आहे. बौद्धिक विकासाबरोबर शारीरिक विकासाचे महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले.

कोल्हापूर ज़िल्हा शारीरिक शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष ,श्री. राजेंद्र बुवा (रुकडी ) संताजी भोसले सर ( पेठ वडगांव ), भिकाजी माने सर( इचलकरंजी) प्रा. संभाजी पाटील सर ( घुणकी) व शिवाजी पाटील सर (मिणचे ) इत्यादी क्रीडा शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .

या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक उपशिक्षणाधिकारी मा.श्री. डी .एस पोवार यांनी आपल्या शैक्षणिक अनुभवाचे आलेल्या विविध दाखल्यांचे देत सर्व क्रीडा शिक्षकांना बहुमोल असे मार्गदर्शन केले. कोल्हापूर माध्यमिक शिक्षण विभागांतर्गत आजवर जवळजवळ दोन/ अडीच हजार शाळांची तपासणी करीत असताना आलेल्या विविध अनुभवांची त्यांनी आपल्या विशिष्ट शैलीमध्ये सर्व क्रीडा शिक्षकांना ज्ञानाची शिदोरी दिली. ज्या पद्धतीने घराचे वैशिष्ट्ये दारातील रांगोळी वरून लक्षात येते त्याच पद्धतीने शाळेचे वैशिष्ट्य हे शाळेतील क्रीडा शिक्षकांच्या कार्यावरून कळते या तपासणी अंतर्गत सर्वात जास्त भावलेला व्यक्तिमत्त्व म्हणजे क्रीडाशिक्षक होय असे ते म्हणाले. सर्व शिक्षकांनी आपली जबाबदारी व कर्तव्य लक्षात घेऊन कार्य करावे तसेच शैक्षणिक अनुभवातून त्यांनी शिक्षकांचे चार प्रकारांमध्ये वर्गीकरण केले सांगितले यामध्ये त्रस्त, सुस्त, व्यस्त व मस्त अशा गटामध्ये वर्गीकरण केले व आपण मस्त गटांमध्ये सहभागी होणारे क्रीडाशिक्षक घडावेत अशी इच्छा व्यक्त केली तसेच बैलाच्या गळ्यात बांधलेल्या घुंगराची ची गोष्ट सांगत क्रीडा शिक्षकांनी वास्तविक परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शाळेमध्ये अधिकचे काही देण्याची वृत्ती बाळगून कार्य करावे असे त्यांनी सांगितले क्रीडा शिक्षकांनी नेहमी विद्यार्थ्यांसमोर आदर्श ठेवून रमाकांत आचरेकर यांच्यासारखे आदर्श गुरुवर्य बनावे असे त्यांनी सांगितले.

सर्व क्रीडा शिक्षकांनी आपल्या शाळेचे फिट इंडिया अंतर्गत नोंदणी करावी व येणाऱ्या काळामध्ये शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनासंदर्भात शाळांना लाभ घ्यावयाचा असेल तर फिट इंडिया नोंदणीची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले तसेच संचमान्यता संदर्भात देखील या नोंदणीचे महत्त्व असल्याचे निदर्शनास आणून दिले . ३१ मार्च २०२१ अखेर फिट इंडिया पोर्टलवर आधार अपडेट करणे विषयक देखील माहिती सांगितले तसेच क्रीडा शिक्षकांनी क्रीडा माहितीची ज्ञानेश्वरी जतन करणे आवश्यक असलेलेचे त्यांनी सांगितले.तसेच हातकणंगले पंचायत समिती विस्ताराधिकारी एस.बी जमादार सर यांनी आभार मानले.

यावेळी हातकणंगले विस्ताराधिकारी मा.श्री.एस.बी. जमादार, मा. सागर चुड्डाप्पा सर व महात्मा गांधी विद्यालया रुकडीचे प्राचार्य मा.श्री उत्तम शेळके सर तसेच मा. बकरे , उर्दू विभाग प्रमुख हातकणंगले मा.श्री.पटेल सर रयत गुरुकुलचे मा.श्री.सागर माने सर इत्यादी मान्यवर हातकणंगले तालुक्यातील सर्व क्रीडाशिक्षक उपस्थित होते.

Categories
नांदेड

लोकाभिमुख प्रशासनासाठी कार्यालय प्रमुखांची तत्परता आवश्यक..विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:दि. 7. सर्वसामान्य जनतेची कामे प्रशासन स्तरावर त्वरित मार्गी लागण्यासाठी शासकिय यंत्रणेने सदैव तत्पर असले पाहिजे. विशेषत:ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांबाबत अधिक जागरुकता बाळगून त्यांच्याशी निगडित असलेल्या प्रश्नांचा त्वरित निपटारा झाला पाहिजे.अशी अपेक्षा विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी व्यक्त केली.नांदेड जिल्ह्यातील विविध शासकिय योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन आढावा घेतला.या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वर्षा ठाकुर यांनी याबाबत सादरीकरण केले.

अवैध रेतीचे उत्खनन व यात होणारे गैर व्यवहार हे केवळ महसूल विभागापुरते मर्यादित नाहीत तर पर्यावरणाच्यादृष्टिनेही हा प्रश्न अत्यंत कळीचा बनला आहे.चांगल्या पर्यावरणासाठी उपलब्ध असलेली नैसर्गिक संशाधने ही तेवढ्याच काळजीने जपत यात नियमाप्रमाणे ज्याबाबी अंतर्भूत केल्या आहेत त्याचे काटेकोरपणे पालन करुन नांदेड जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेल्या मोहिमेची माहिती जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी दिली.

अवैध रेती वाहतूक रोखण्यासाठी,रेती वाहतूक करता येऊ शकणाऱ्या अथवा तशी क्षमता असणाऱ्या प्रत्येक वाहनांना जीपीएस बसवून व याचबरोबर ज्या-ज्या ठिकाणी रेतीचे घाट आहेत त्या सर्व ठिकाणी जीपीएसचे फेन्सिंग बसवून कसा आळा घालता येऊ शकेल याबाबत जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी सादरीकरण केले.या प्रस्तावावरही बैठकीत चर्चा करण्यात आली.परिवहन विभागाशी समन्वय साधून सदर बाब अनिवार्य कशी होईल याचा पाठपुरावा करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी देवून या मोहिमेबद्दल समाधान व्यक्त केले.

प्लॉस्टिक कॅरिबॅग व इतर अनावश्यक निसर्गाला हानी पोहचविणाऱ्या वस्तुंच्या वापरावर बंदी,स्वच्छ शहर आणि खुले क्रिडांगण ही प्रत्येक शहरासाठी आवश्यक आहे.याचबरोबर आरटीपीसीआर चाचण्या कमी होता कामा नयेत.कोविड-19 चे अजूनही समूळ उच्चाटन झालेले नाही हे कायम लक्षात ठेवून त्याबाबत समाजात अधिकाधिक जनजागृतीवर भर देण्याबाबतही त्यांनी सांगितले.प्रशासनासमवेत जनतेचा सकारात्मक सहभाग घेऊन चांगल्या वातावरण निर्मितीसाठीही प्रशासकिय यंत्रणांनी काम करणे अभिप्रेत असून जिल्हा परिषदेमार्फत विविध उपाययोजना व विकास कामांच्या प्रगतीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.नांदेड जिल्ह्यातील जैवविविधता जपणे व त्याचे संगोपन करणे हे आवश्यक आहे.वन विभागात जनावरांसाठी पानवठे तयार करणे,जंगली जनावरांचे संवर्धन याबाबतही विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी सूचना दिल्या.

Categories
सातारा Uncategorized

कृष्णा हॉस्पिटलतर्फे भव्य मोफत कर्करोग शस्त्रक्रिया शिबीर , डॉ. सुरेश भोसले :- देशभरातील उच्च वैद्यकीय संस्थांमधील कर्करोग तज्ज्ञ शस्त्रक्रिया करणार



मयुर जाधव / कराड प्रतिनिधी-
कृष्णा हॉस्पिटलतर्फे जागतिक कर्करोक दिनानिमित्त (दि. ४ ते ७ फेब्रुवारी) दरम्यान कर्करोग विभागातर्फे भव्य मोफत कर्करोग शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात येणार आहे. या शिबीराला भारतीय कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञांची संघटना आणि गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक (गोकर्मा) या संघटनेनी मान्यता दिली आहे. यामध्ये देशभरातील उच्च वैद्यकीय संस्थांमधील सुमारे २० हून अधिक कर्करोग तज्ज्ञ कृष्णा हॉस्पिटलमध्ये स्वत: उपस्थित राहून मोफत शस्त्रक्रिया करणार
असल्याची माहिती कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी दिली.

डॉ. सुरेश भोसले म्हणाले, आज भारतात मृत्यूचे दुसरे कारण म्हणजे कॅन्सर. दरवर्षी कॅन्सरचे १० लाख नवीन रूग्ण आढळतात आणि त्यामुळे ४ लाख मृत्यू होतात. जगात सर्वाधिक तोंडाच्या व घशाच्या कॅन्सरचे रूग्ण भारतात आहेत. कृष्णा हॉस्पिटलमध्ये गेल्या २५ वर्षापासून कर्करोग विभाग कार्यरत आहे. सन १९९६ मध्ये सातारा जिल्ह्यात प्रथमच व पश्चिम महाराष्ट्रात मिरजनंतर कराड येथे स्वतंत्र कर्करोग विभाग कृष्णा हॉस्पिटलमध्ये सुरू झाला. आज या विभागात दररोज जवळपास १०० रूग्ण उपचार घेतात. मागील २० वर्षात जवळपास ३० हजार हून अधिक रूग्णांनी येथे उपचार घेतलेले आहेत. सर्वाधिक रूग्ण तपासणारे व सर्वाधिक रेडिएशन किमोथेरपी देणारे दक्षिण महाराष्ट्रातील हे एकमेव रूग्णालय आहे. येथे पूर्णवेळ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वैद्यकीय संस्थांमधून प्रशिक्षित कॅन्सर सर्जन, रेडिएशन व किमोथेरपी तज्ज्ञ उपलब्ध आहेत. तसेच स्तन कर्करोगासाठी स्वतंत्र विभाग आहे. पॅलिएटीव्ह केअरसाठी पश्चिम महाराष्ट्रातील ही एकमेव संस्था मान्यताप्राप्त आहे. हा विभाग टाटा हॉस्पिटलच्या नॅशनल कॅन्सर ग्रीड शी संलग्न आहे. येथे महात्मा फुले जीवनदायी योजना, पोलिस आरोग्य कल्याण योजना, मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता निधी इत्यादी योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत दिली जाते.

याशिवाय कृष्णा हॉस्पिटलतर्फे विविध ठिकाणी कर्करोग निदान व उपचार शिबीरे भरविली जातात. तसेच विविध जनजागृती अभियानेही चालविली जातात. याच अनुषंगाने दरवर्षी ४ फेब्रुवारीला कृष्णा हॉस्पिटलतर्फे जागतिक कर्करोक दिनानिमित्त विविध राबविले जातात.

या शिबीरासाठी कर्करोगावरील तज्ज्ञांच्या जागतिक पातळीवरील संघटना असणाऱ्या यु.आय.सी.सी.चे अध्यक्ष तथा मुंबईतील अपोलो हॉस्पिटलचे संचालक व टाटा हॉस्पिटलचे माची संचालक डॉ. अनिल डिक्रुज, भारतीय कॅन्सर शस्त्रक्रिया तज्ज्ञांच्या असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अर्नब गुप्ता (कोलकता), मुंबईतील एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूटचे सहाय्यक संचालक डॉ. धैर्यशील सावंत, ब्रिज कॅन्डी व जसलोक हॉस्पिटलचे कॅन्सर सर्जन डॉ. अमिश दलाल, बेंगलोर येथील मणिपाल हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. सोमशेखर, टाटा हॉस्पिटलमधील कॅन्सर विभागाचे प्रमुख डॉ. प्रथमेश पै, गोवा येथील मणिपाल हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. शेखर साळकर, हुबळी येथील कर्नाटक कॅन्सर थेरपी व रिसर्च इन्स्टिट्यूटचे चेअरमन डॉ. बी. आर. पाटील, रेडॉन कॅन्सर सेंटरचे संचालक डॉ. संजीव कुलगोड, बेंगलोये येथील मेक्झिलोफेसिअल सर्जन डॉ. सत्यजीत दंडगी, शिमोगा येथील कॅन्सर सर्जन डॉ. रमेश हे ख्यातनाम कॅन्सर तज्ज्ञ प्रमुख उपस्थित राहणार आहेत. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील सर्व कॅन्सर सर्जनचाही यात समावेश असणार आहेत. शिबीरातील शस्त्रक्रिया डॉ. शेखर साळकर (गोवा) व डॉ. शरद देसाई (मिरज) यांच्या निर्देशानुसार होणार आहेत.

या शिबीराचा लाभ घेण्यासाठी कॅन्सरग्रस्त रूग्णांनी २५ जानेवारी अखेर कृष्णा हॉस्पिटलमध्ये नोंदणी करणे गरजेचे असून, नोंदणीसाठी येताना रूग्णांनी आपले सर्व जुने रिपोर्टस् घेऊन यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, कॅन्सर विभागप्रमुख डॉ. आनंद गुडूर,
किमोथेरपी तज्ज्ञ डॉ. रश्मी गुडूर, कॅन्सर सर्जन डॉ. दिग्वीजय पाटील आदी उपस्थित होते.

Categories
कला व मनोरंजन मुंबई

एच आर एस कराओके सिंगिंग हबच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांची ” गीत गाता चल ” संगीत मैफल संपन्न

( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी: लक्ष्मण राजे )

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात बरेच दिवस घरात बसलेल्या संगीतप्रेमी रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी आता सर्व थिएटर सुरू झाली आहेत.वसई पश्चिम येथील मनश्री हाॅल मध्ये निर्माते हेतल आशर आणि हितेन आशर यांच्या एच आर एस कराओके सिंगिंग हबच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त “गीत गाता चल” ही सुरेल गाण्यांची संगीत मैफल आयोजित करण्यात आली होती. या संगीत मैफलीला मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेल्या रसिक प्रेक्षकांनी पसंती दिली. “गीत गाता चल” या लोकप्रिय सुरेल हिंदी चित्रपटातील गीतांच्या मनोरंजक कार्यक्रमाची संकल्पना निर्माती आणि गायिका हेतल आशर यांची होती. “गीत गाता चल ” हा हिंदी गीतांचा नजराणा रसिकांना खुप आवडला . हेतल आशर , हितेन आशर , अनिष्का, अरूण, अशोक, गीता, हरीश, जितेंद्र ,माला ममता , माला सावर्डेकर, फातीमा , प्रशांत , राम प्रताप , रिया , सुनिल, संचिता, उदय, जोसेफ, निष्ठा , दिप्ती , रोहीत, सकीना,आणि सीमा या गायकांनी एका पेक्षा एक सरस हिंदी गाणी सादर केली आणि रसिकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन निवेदन हेतन आशर यांनी केले ‌. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत, साहिल, सुकमल, विलीता, रिद्धी यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच सूर म्युझिक ने सहकार्य केले. “गीत गाता चल” या सुरेल संगीत श्रवणीय मैफिलीला रसिकांचा टाळ्यांच्या कडकडाटात प्रचंड प्रतिसाद मिळाला.

Categories
Uncategorized

हिंगोली औंढा मार्गावर दोन तरुण सरकारी वाहनाच्या धडकेने ठार

  • धोंडीराज पाठक हिंदूसम्राट जिल्हा प्रतिनिधी हिंगोली हिंगोली ते औंढा नागनाथ मार्गावर नर्सी टी पॉईंट जवळ भरधाव जीप व दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. शुभम कलकोटी (२५), रोहन शर्मा (२०, दोघे रा. हिंगोली) अशी मयत झालेल्या तरुणांची नांवे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरातील महादेववाडी भागातील शुभम कलकोटी व रोहन शर्मा हे आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुचाकी वाहनावर हिंगोलीकडून औंढा नागनाथ रोडकडे जात होते. त्यांचे दुचाकी वाहन नर्सी टी पॉईंटजवळ आले असतांना समोरील जीपला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्यांनी दुचाकी पुढे नेली, मात्र समोरून अचानक वाहन आल्याने त्यांनी दुचाकीचे ब्रेक लावले. यामुळे पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या जीपने (क्र.एमएच-३८-व्ही.२१२५) त्यांच्या दुचाकीस पाठीमागून धडक दिली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले.

या अपघाताची माहिती मिळताच हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बळीराम बंदखडके पोलीस उपनिरीक्षक तायडे , जमादार रवीकांत हरकाळ, यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन गंभीर जखमी असलेल्या दोघांनाही उपचारासाठी हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात पाठविले. तसेच हिंगोली ते औंढा नागनाथ मार्गावरील वाहतुक सुरळीत केली. दरम्यान, जखमी दोघांनाही शासकिय रुग्णालयात दाखल केले असता दोघांचाही मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी जाहिर केले. या घटनेची माहिती मिळताच रुग्णालयात नागरीकांची एकच गर्दी झाली होती. दरम्यान, अपघातग्रस्त जीप वसमतच्या पंचायत समिती कार्यालयाची असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. निवडणुकीच्या कामासाठी पंचायत समितीचे कर्मचारी हिंगोलीत आले होते. त्यानंतर परत जातांना हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. जीप चालकास ताब्यात घेण्यात आल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बंदखडके यांनी सांगितले. या प्रकरणी गुन्हा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Categories
नांदेड

बरबडा अंतरगाव रुई रस्त्याचे काम चालू करा : विक्रम पाटील बामणीकर

यांची अधीक्षक अभियंत्याकडे मागणी

नायगाव प्रतिनिधी अंकुश कुमार देगावंकर
नायगाव तालुक्यातील अत्यंत वर्दळीचा रस्ता असलेला बरबडा अंतरगाव रुई या रस्त्याच्या कामाची सुरुवात एक वर्षा अगोदर करण्यात आली वर्षभरात फक्त रस्ता सर्वत्र खोदून ठेवून रस्त्याच्या बाजूला गिटीचे ठिका ठिकाणी ढगारे टाकण्यात आले पण रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात न झाल्यामुळे रस्त्यावरून प्रवास करण्यास नागरिकांना अत्यंत अडचणीचा सामना करून आपला जीव मोठी मध्ये धरून या रस्त्यावरून प्रवास करण्याची वेळ या परिसरातील नागरिकांना आली आहे त्यातच आता शाळेला सुरुवात झाल्यामुळे विद्यार्थ्यांना देखील पायी चालणे कठीण झाले आहे कारण रस्त्याच्या बाजूला गिटिचे ढिगारे फोडून ठेवल्यामुळे व संपूर्ण रस्ता खोदून ठेवण्यात आलेला आहे याकडे मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग मंडळ लक्ष देत नसल्यामुळे गुत्तेदाराची मनमानी कारभार चालत असल्याचे दिसून येत आहे त्यासाठी शिवराज्य युवा संघटनेच्या वतीने अधीक्षक अभियंता साहेब सार्वजनिक बांधकाम मंडळ नांदेड यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे बरबडा अंतरगाव रुई या रस्त्याच्या कामाची तात्काळ सुरुवात करण्यात यावी व या रस्त्याचे काम लवकरात पूर्ण करण्यात यावे अन्यथा शिवराज्य युवा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा विक्रम पाटील बामणीकर जिल्हा प्रमुख यांनी दिला आहे अंतरगाव मनुर इज्जतगाव या परिसरातील जनतेला रस्त्या अभावी मरण यातना सोसाव्या लागत आहेत गेल्या पंधरा वर्षापासून बरबडा अंतरगाव रुई हा रस्ता अत्यंत खराब व रस्त्याची दयनीय अवस्था झाली असल्यामुळे प्रत्यक्षात रस्त्याचे काम चालू झाल्यामुळे या परिसरातील जनतेच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद दिसत होता पण गेल्या एक वर्षभरापासून या रस्त्यावर फक्त गिट्टी फोडून ठेवण्यात आली आहे व रस्तादेखील खोदून ठेवण्यात आला आहे पण पुढे काम चालू करण्यात आले नसल्यामुळे या परिसरातील नागरिकांना पुन्हा एकदा रस्त्या अभावी मरण यातना सोसण्याची वेळ आली आहे त्यामुळे या भागातील एकांदा पेशंट जर बीमार असेल तर त्यांना वेळेवर दवाखान्यात देखील पोहोचता येत नाही एवढा खराब रस्ता झाला असल्यामुळे या रस्त्यावरून दोन चाकी वाहन देखील चालवणे म्हणजे तारेवरची कसरत व जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून प्रवास करावे लागत आहे त्यासाठी हा रस्ता तात्काळ व रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात यावी अन्यथा शिवराज्य युवा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे निवेदन अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ नांदेड यांना देण्यात आले आहे दिलेल्या निवेदनावर विक्रम पाटील बामणीकर जिल्हाप्रमुख नांदेड भाऊसाहेब पाटील चव्हाण तालुकाप्रमुख नायगाव यांच्या स्वाक्षर्‍या आहेत

Categories
नांदेड

कृष्णुर एम आयडीसीतिल कंपन्यांच्या दुर्गंधियुक्त पाण्याच्या विरोध्दात न्यायालयात याचिका दाखल करणार :देविदास जेटेवाड

ःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःः
नायगाव प्रतिनिधी ः अंकुश कुमार देगाकर नायगाव तालुक्यातिल कृष्णुर येथिल पंचतारांकित औध्योगिक वसाहतितील कंपन्यामधुन गेल्या आनेक दिवसापासुन सोडल्या जात असलेल्या केमिकल्स व दुर्गंधी युक्त गहाण सांडपाण्यामुळे बरबडा , अंतरगाव ,कृष्णुर ,या गावातिल बर्‍याच शेतकर्‍यांचे जनावरे दुषित पाणी पिउन बिमार पडले आसुन काही शेतकर्‍याची जनावरे दगावली आहेत अश्या परिस्थितीत जनहितार्थ कृष्णुर एम आयडीसीतिल कंपन्यांच्या दुर्गंधियुक्त पाण्याच्या विरोध्दात न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे———– देविदास जेटेवाड यांनी पुण्यनगरीशी कळवले आहे.
या पाण्यामुळे शेतकरी महिला व पुरुषांच्या पायाला जखमा.झाल्या आहेत कारण शेतकर्‍यांना , त्यांच्या महिलांना त्या पाण्यातुन दिवसा तिन चार वेळेस कामानिम्त येजा करावे लागत आहे त्यामुळे ते दुषित पाणी त्यांच्या पायाला जखमा करण्याचे काम करत आहे अगोदरच लंम्पि आजार ,ओला दुष्काळा, कोरोणा या नैर्सगिक संकटात सांपडलेल्या शेतकर्‍यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम किर्ति गोल्ड, ,,मेडिसिन , ईतर बायो कोल , व्हेकेज,सिट्रस,मेडिशन ओरगा, हि जपानचि कंपनि दुषित पाणी सोडुण नदिचे पाणी दुषित करत आहेत या ठिकाणी प्रत्यक्ष पाहाणी केल्यास यामध्ये जपानचि ( orga treatment ) हि कंपनि दुषित पाणी सोडण्यात अग्रेसर आसल्याचे दिसुन येत आहे.
या विषयी प्रदुषण नियंत्रण मंडळ व औध्योगिक विकास माहामंडळ याच्याकडे वारंवार शेतकरी लेखी तक्रारी देउन शेतकरी वैतागले आहेत कारण कंपणीचे मालक व प्रदुषन नियंत्रण मंडळ व औध्योगिक विकास माहामंडळ यांच्यात साठेलोटे आसल्यामुळेच कसलिच ठोस कार्यवाही केलि जात नसल्यामुळे आता बरबडा येथिल शेतकरी देविदास जेटेवाड यांनी न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आसल्याचे निवेदन जिल्हाधिकारी नांदेड , पोलिस अधिक्षक नांदेड ,कार्यकारी अभियंता माहाराष्ट्र औध्योगिक विकास महामंडळ नांदेड , माहाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ नांदेड यांना निवेदन सादर करण्यात आले ज्या शेतकर्‍यांचे जनावरे दगावली आहेत त्या शेतकर्‍यांना नुकासन भरपाई देण्यात यावि व दुषित पाणी सोडणार्‍या कंपन्यावर फोजदारी कार्यवाही, व दुषित पाणी सोडणे लवकरात लवकर बंद करावे अशी मागणी केली आहे नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यावर काय ? कार्यवाही करतिल या कडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे

Categories
लोहा

बुलढाणा अर्बनच्या दिनदर्शिकेचे विमोचन

लोहा, प्रतिनिधी (शिवराज पवार) बुलढाणा अर्बन को. ऑप.क्रेडिट सोसायटी लोहाच्या च्या नुतन वर्ष २०२१ च्या दिनदर्शिकेचे विमोचन लोहा नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी, लोहा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष तथा भाजपा तालुकाध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत थाटात संपन्न झाले. प्रसंगी विमोचन समारंभास नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी, उपनगराध्यक्ष शरद पवार,माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल, गटनेते करीम शेख,नगरसेवक नबी शेख, नगरसेवक नारायण येलरवाड,नगरसेवक बालाजी शेळके,नगरसेवक भास्कर पा.पवार,नगरसेवक अमोल व्यवहारे,दिनेश मोटे,दत्ता शेटे,आबा पाटील चव्हाण, राजु पाटील बोडके,पत्रकार केशव पवार, बाळासाहेब कतुरे,काशीनाथ शेटे, अल्प ठेव बचत प्रतीनिधी बालाजी ईरमंलवार, यांच्या उपस्थितीत करण्यात आले या वेळी शाखा व्यवस्थापक केशवराव शेटे यांनी सर्वांचे स्वागत करुनआभार मानले.या वेळी शाखेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Categories
नांदेड

2020-2021 ची शैक्षणिक फी माफ करा.. निलेश गोधने

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:दि.7.जागतिक महाभयंकर आशा कोरोना कोव्हीड(19) च्या महामारी मुळे विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष थांबलेले शिक्षण,पालकांचे गेलेले रोजगार,नोकर कपात ,वेतन कपातीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक कुचंभना.च्या पेचप्रसंगामुळे पालकांकडून शाळेने शैक्षणिक 2020-21मधील कोणत्याच प्रकारचे शुल्क वसुली करू नका.

उपरोक्त विषयी सविनय सेवेत विनंती करण्यात येते की जागतिक महाभयंकर कोरोना (covid-19 )या महामारी मुळे केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार याचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने मागील वर्षभरापासून (मार्च 2020) सर्वच शाळा पूर्णतः बंद आहेत परिणामी विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष वा थेट अशा सर्व प्रकारचे शिक्षण थांबलेले आहे प्रत्यक्षातील अध्ययन-अध्यापन प्रक्रिया बंदच आहे कोरोना या महामारी मुळे अनेक पालकांचे काम धंदे बुडाले असल्यामुळे उपासमारीची वेळ येऊन गेली आहे.नोकरी कपातीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या,लाँकडाऊन मुळे अनेकांच्या उत्पन्नाची साधने मोडीत निघाली,अनेकांना वेतन कपातिला सामोरे जावे लागत असल्यामुळे अनेकांचा जगण्यासाठीचा संघर्ष निर्माण झाला असून आर्थिक कुचंबणा होत आहे.तेव्हा जगावे की मुलांच्या शिक्षणाची फी भरावी असे मोठे संकट उभे आहे.प्रत्यक्ष शाळा भरत नसल्यामुळे शाळेचा सर्व व्यवस्थापनावरील खर्च निरंक आहे.कोणताही आगाऊ खर्च लागत नाही.महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी कोणत्या प्रकारच्या शुल्काची सक्ती न करण्याचे आदेश दिले आहेत.करिता शाळेने सामाजिक दायित्व म्हणून शैक्षणिक वर्ष 2020-21 ची सर्व प्रकारची फीस वसुली न करता पालकांची आर्थिक ओढाताण थांबवावी ही नम्र विनंती.
या निवेदनावर खालील व्यक्तींच्या सह्या आहेत .
निलेश गोधने,अनिल कदम,राजू राठोड,सुमित वंडकार,सोनल ऊके,उज्वला गौरवले,प्रल्हाद टेहरे शिवप्रसाद जोगदंड, राजकुमार नवलकार,वंदना पुरी, सुनिता कराडे,लोकेश पाईकराव, कैलास पोहरे,गजानन लिंगायत, धीरज आगलावे,सविता मुनेश्वर,मीरा तावडे,दत्ता ढवळे,हिराचंद्र कदम पंचकिरण कंधारे श्रीकांत खाडे यासह शकडो पालकांच्या स्वाक्षऱ्या या निवेदनावर आहेत.

Categories
कोल्हापूर हातकणंगले

पत्रकारीतेने समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे : जेष्ट पत्रकार पोपटराव वाकसे

हातकणंगले / प्रतिनीधी :
   
    पत्रकारीतेने समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे , अन्याया विरूध्द नेहमीच पत्रकारीकेतून आवाज उठवला आहे असे प्रतिपादन जेष्ट पत्रकार पोपटराव वाकसे यांनी केले ते हातकणंगले येथे आयोजीत आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती व पत्रकार दिनाचे औचीत्य साधुन महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने आयोजीत फोटो पूजन व पत्रकार बांधवांच्या सत्कार कार्यक्रमात ते अध्यक्ष स्थानावरून  बोलत होते. यावेळी पुढे बोलताना वाकसे म्हणाले की , सध्या नव्या डिजीटल माध्यमांमुळे सर्व घटना काहि वेळातच सर्वान पर्यत पोहचत आहेत मात्र हे सर्व करण्यासाठी धडपडनारा पत्रकाराला मात्र अनेक समस्यांना तोंड दयावे लागत आहे .
      यावेळी मान्यवरांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच हिंगणगाव येथील राहुल रत्नपारखे यांनी आपल्या वडिलांच्या पुण्यतीथी निमीत्त सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार केला .
           या कार्यक्रमास जिल्हाअध्यक्ष अनिल उपाध्ये , राजकुमार चौगुले , रमेश बोभाटे , राजू मुजावर , विनयकुमार पाटील , बाबूराव जाधव , विनोद शिंगे , सचिन भानुसे , राहुल रत्नपारखे , मधुकर वायदंडे

Categories
पुणे

प्रिया घाडगे यांची पुणे जिल्हा युवती सचिव पदी निवड

दौंड,प्रतिनिधी:-

क्षत्रिय मराठा परिवाराच्या पुणे जिल्हा युवती सचिव पदी प्रिया दत्तात्रय घाडगे यांची निवड करण्यात आली, या नियुक्तीचे पत्र पुणे जिल्हा प्रमुख तसेच प्रदेश संघटक संपर्क प्रमुख वैभव सयाजी पाटील,पुणे जिल्हा युवक प्रमुख दत्तात्रय गोपाळ सपकाळ यांनी दिले आहे,प्रिया घाडगे यांनी युवती संघटन,महिला सबलीकरण,निर्भय कन्या आशा उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन युवती साठी कार्य केले आहे, याही पुढे क्षत्रिय मराठा परिवाराच्या वतीने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पुढे करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले

Categories
शिरसगाव

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या श्रीगोंदा तालुका अध्यक्षपदी अंकुश शिंदे यांची सलग दुसऱ्यांदा फेर निवड


श्रीगोंदा ( हिंदू सम्राट शिरसगाव बोडखा प्रतिनिधी आदेश उबाळे यांच्याकडून )
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या श्रीगोंदा तालुका अध्यक्षपदी अंकुश शिंदे यांची नुकतीच बिनविरोध दुसऱ्यांदा फेर निवड करण्यात आली
निवडीबद्दल चे नियुक्तीपत्र महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष मा . दत्तात्रय पाचपुते यांच्या हस्ते देण्यात आले
पत्रकार अंकुश शिंदे हे गेल्या पंधरा वर्षापासून पत्रकारिता करीत तालुक्यातील भ्रष्टाचाराला वाचा फोडणे धडाडीने आपले कर्तव्य पार पाडणे . निपक्ष , निस्वार्थीपणे पत्रकारिता करणे . तसेच गोरगरिबांचे प्रश्न आपल्या लेखणीच्या माध्यमातून शासन दरबारी प्रश्न मांडणे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या श्रीगोंदा तालुका अध्यक्षपदी बिनविरोध सलग दुसऱ्यांदा फेर निवड करण्यात आली आहे
यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय पाचपुते , सार्वमत चे पत्रकार शिवाजी साळुंखे , पत्रकार सुभाष शिंदे , पत्रकार योगेश चंदन , पीटर रणसिंग पत्रकार प्रमोद आहेर , पत्रकार अनिल तुपे , अंकुश तुपे पंकज गणवीर रामदास कोळपे चंदन घोडके पत्रकार राजू शेख आदि पत्रकार बांधव मान्यवर यावेळी उपस्थित होते
सध्या ते दिव्य मराठी वृत्तपत्राचे श्रीगोंदा तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत
पत्रकार अंकुश शिंदे यांच्या निवडीबद्दल तालुक्यातील राजकीय , सामाजिक , शैक्षणिक आध्यात्मिक , पोलीस कर्मचारी नागरिकांकडून पत्रकारांसह कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .

Categories
Uncategorized

दौंड नगरपरिषद मार्फत माझे वैभव माझी बाग उपक्रम

दिनेश पवार,दौंड,प्रतिनिधी:-

माझी वसुंधरा व स्वच्छ भारत अभियान अंतर्गत दौंड नगरपरिषद दौंड च्या वतीने माझे वैभव माझी बाग या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, याचे परीक्षण नुकतेच पूर्ण झाले या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रियांका रामनाथ पवार, द्वितीय मनोज केशवराव गाजरे, तृतीय अलका सुभाष गुंजाळ यांना अनुक्रमे यश मिळाले आहे,पर्यावरण संवर्धन, वृक्ष लागवड व संवर्धन परिसर स्वच्छता हे तत्व समोर ठेवून तसेच स्वच्छ संवर्धन अभियान अंतर्गत महत्वाच्या उपक्रमास प्राधान्य देण्यात आले,स्पर्धेत छोट्या गटातील भावेश आनंद गुंडेचा, शर्वरी राजेश यादव पाटील यांचा सहभाग कौतुकास्पद ठरला,
तर स्वतः रोपे तयार करणे,औषधी वनस्पती,पाने,फुले,खोड,यांचा उपयोग उपचारासाठी करणारे तसेच मित्र परिवारामध्ये ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वृक्ष भेट देऊन वृक्षारोपण करून घेणारे मनोज केशवराव गाजरे व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा सहभाग उल्लेखनीय ठरला, विजेत्यांना 26 जानेवारी रोजी सन्मानित करण्यात येणार आहे,या संपूर्ण स्पर्धेदरम्यान मुख्याधिकारी निर्मला राशींनकर,नगराध्यक्षा शितलताई कटारिया, उपनगराध्यक्ष विलास शितोळे, गटनेते राजेश गायकवाड, गटनेते बादशहा शेख,तसेच सर्वच नगरसेवक यांचे प्रोत्साहन मिळाले,या स्पर्धेचे परीक्षण सुप्रिया गुरव,तृप्ती साळुंखे, अपर्णा लोमटे,यांनी केले, हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आरोग्य निरीक्षक शाहू पाटील, सारिका परदेशी, प्रमिला पवार, शुभम चौकटे, प्रवीण खुडे,सागर सोनवणे, नितीन तुपसौंदर्य,अमित मिसाळ, रोहन साळवे,यांचे सहकार्य लाभले

Categories
मुंबई

नवी मुंबई महानगर पालिका स्वच्छता अभियानातील स्वच्छ शहरी क्षेत्रातील प्रथम क्रमाकांचा पुरस्कार प्रभाग ९६ ला प्रदान


विरेंद्र म्हात्रे नवी मुंबई प्रतिनिधी : स्वच्छता अभियानामध्ये शहरी विभागात नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात प्रथम क्रमाकांचा पुरस्कार प्रभाग ९६ ला गुरूवारी (दि. ७ जानेवारी) नेरूळ विभाग कार्यालयात प्रदान करण्यात आला. महापालिकेचे सहाय्यक आयुक्त तथा नेरूळ विभाग अधिकारी दत्तात्रेय नागरे यांच्या हस्ते नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांना देण्यात आला. सन्मानपत्र व ट्राफी असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून राबविण्यात येत असलेल्या महापालिका स्तरावरील स्वच्छता प्रभाग स्पर्धेत नवी मुंबईमध्ये प्रभाग ९६ ला काही दिवसापूर्वीच जाहीर झाला होता, तो आज वितरीत करण्यात आला. या कार्यक्रमास पालिका प्रशासनाचे स्वच्छता अधिकारी राजेंद्र इंगळे, स्वच्छता निरीक्षक जयश्री आढळ, उपस्वच्छता निरीक्षक विरेंद्र पवार यांच्यासह जनसेवक गणेश भगत, गोरक्षनाथ गांडाळ, परविन कौर मॅडम, विशाल जाधव, वैभव जाधव, रमेश नार्वेकर, सागर मोहिते, रवींद्र भगत उपस्थित होते.
प्रभाग ९६ मधील गृहनिर्माण सोसायट्यांना दोन वेळा कचऱ्याचे डब्बे वितरीत करण्यात आले, प्रभागात तीन वेळा स्वच्छता अभियान राबविण्यात आले. विभागात प्रथमच गृहनिर्माण सोसायट्यांचे नामफलक उभारण्यात आले. प्रभागातील अंर्तगत रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले. यातील परिसरात यापूर्वी न झालेल्या परिसरातील रस्त्यांचेही प्रथमच डांबरीकरण झाले. डेब्रिजने भरलेली गटारे वेळोवेळी स्वच्छ करण्यात आली. जनसामान्यांमध्ये स्वच्छतेविषयी वेळावेळी जनजागृती करण्यात आली.
प्रभागातील रस्ते, पदपथ व उद्यानासह, रस्त्यांची दुरावस्था यासह प्रभागातील अंर्तगत भागातही रंगरंगोटी व प्रबोधनात्मक सुभाषितांबाबत आग्रही पाठपुरावा गणेश भगत आणि सौ. रुपाली किस्मत भगत यांनी प्रशासन दरबारी केला होता. महापालिका अधिकाऱ्यांना घेवून गणेश भगत आणि सौ. रुपाली किस्मत भगत यांनी वेळोवेळी पाहणी अभियान राबवून समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. महापालिका प्रशासनाकडून स्वच्छता प्रभाग स्पर्धेत जाहिर करण्यात आलेल्या निकालामध्ये प्रभाग ९६चा प्रथम क्रमांक जाहिर झाला आहे. हा पुरस्कार गणेश भगत व माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांच्या पाठपुराव्यामुळे व कार्यामुळे प्राप्त झाला असल्याची प्रभागातील रहीवाशांकडून व्यक्त केली जात आहे.
या पुरस्काराचे खरे श्रेय विभागातील जनतेचे व सफाई कामगारांचे आहे. स्वच्छता अभियानात सहभागी होताना बकालपणा हटविताना परिसरातील जनतेने मनापासून सहकार्य केलेले आहे. सफाई कामगारांनी सफाई करताना कोठेही कुचराई केली नाही. पुरस्कार आम्ही स्विकारला असला तरी खरे मानकरी प्रभागातील जनता व सफाई कामगारच असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
विभाग अधिकारी कार्यालयात पुरस्कार सोहळा संपल्यावर नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत आणि जनसेवक गणेश भगत यांनी तात्काळ परिसरात जावून कार्यरत असणाऱ्या सर्वच सफाई कामगारांचा सत्कार करत कृतज्ञता व्यक्त केली.

Categories
Uncategorized

हदगाव न. प. येथे कायमस्वरूपी मुख्यअधिकारी द्या व प्रभारी मुख्याधिकार्याची जिल्हा बदली करण्यात यावी भाजप शहराध्यक्षची मागणी

-हदगाव ता.प्र. विकास राठोड याज कडून ) हदगाव नगरपरिषद येथे कायमस्वरूपी मुख्याधिकारी देण्यात यावा व येथील कार्यरत असलेले प्रभारी मुख्याधिकारी विजय येरावार आणि तहसिल चे नायब पूरवठा अधिकारि यांची जिल्हा बदली करण्यात येण्याचे येथील बीजेपी शहराध्यक्ष  बालाजी कर्‍हाळे यांनी हदगाव तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून मागणी केली.
शहराध्यक्षा कर्हले  यांनी त्यांच्या निवेदनात विजय येरावार यांच्या कार्यकाळ विरोधात भडिमार केला.निवेदनात पुढे म्हणाले, 
हदगाव तहसील कार्यालयात पुरवठा विभागात कार्यरत असलेले विजय येरावार हे अनेक वर्षापासून नगरपरिषदेचे प्रभारी मुख्य अधिकारी म्हणून काम कार्यरत आहेत.यांच्या कार्यकाळात नगरपरिषद शहरातील विकास कामे हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे.याशिवाय दलीत वस्तीसाठी आलेला निधी रोडवरील नाली कामात वापरण्यात आला.शहरातील विकास कामे निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या नागरिकाच्या  अनेक तक्रारी त्यांच्याकडे आल्या पण येरावार यांनी कोणतीच चौकशी न करता सदरील गुतेदाराचे बिल काढन्यात आले.याबाबत गुतेदार व येरावार  ह्या दोघात धागेबांध असल्याची गावात चर्चा  होत असल्याचेही त्यांनी निवेदनात व्यक्त केले.तसेच  आठवडी बाजारात नगरपरिषद प्रशासनाने बेरोजगारासाठी दुकान गाळे बांधण्यात आले आहेत पण त्या ठिकाणी बेरोजगार नसून मात्र दुकान  गाळ्यामध्ये अनेक अवैध धंदे चालत आहेत असे श हराध्यक्ष यांनी सांगितले.या अवैध धंद्यांविषयीची त्यांना  कित्येकदा माहिती  देण्यात आली पण त्यांनी प्रभारी पदाचा बहाणा सांगून टाळाटाळ केली.याशिवाय शहरातील घाण कचंऱ्याविषयी म्हणाले , घाण कचऱ्यावर नालीवर, लाखो रुपये खर्च करते पण शहरातलं घाण कमी होत नाहि अशा यानिवेदनात म्हटलआहे तरि जिल्हाअधिकारि साहेबानि या बाबिवर लक्ष देतिल का. असे जनतेकडून चर्चा होत आहे. आणि भाजप चे पदाधिकारि असे निवेदनात म्हटले आहे.

Categories
सातारा

मध्य महाराष्ट्रासह कोकणात तीन दिवसांमध्ये राज्यात पावसाची शक्‍यता;पुण्यात उन्हाचा चटका


पाटण हिंदू सम्राट प्रतिनिधी उमेश सुतार यांजकडून
मध्य महाराष्ट्रासह कोकणात पुढील तीन दिवस ढगांच्या गडगडटासह पाऊस पडेल. पुण्यातही आकाश मुख्यतः ढगाळ राहणार असून, पावसाच्या तुरळक सरी पडतील, असा अंदाज बुधवारी हवामान खात्याने वर्तविला.

पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे दक्षिण, मध्य अरबी समुद्रापासून उत्तर, मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे राज्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. दोन दिवसांपासून तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावाही होत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात येत्या गुरुवारपासून काही भागात पाऊस पडेल. विदर्भातही तुरळक ठिकाणी विजांसह हलक्‍या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून सातत्याने बदलणाऱ्या लहरी हवामानाचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. कमी झालेली थंडी, पहाटे पडणारे धुके आणि दुपारी ढगाळ हवामान अशी स्थिती कीड-रोगांसाठी पोषक ठरत आहे. राज्यावर सध्या अवकाळी पावसाचे सावट असून, शनिवारपर्यंत विविध भागांत ढगाळ हवामानासह हलक्‍या पावसाची शक्‍यता आहे.

राज्यात डिसेंबर महिन्यात उत्तर भारतातील थंडीने हातपाय पसरायला सुरुवात केल्यानंतर महाराष्ट्रातही गारठा वाढला. विदर्भ, मराठवाड्यासह राज्याच्या किमान तापमानात घट होऊन थंडीची लाट आली. मात्र, ही थंडी फार काळ टिकली नाही. सध्या ढगाळ हवामानामुळे राज्यातील थंडी गायब झाली आहे.

राज्यातील जवळपास सर्वच भागांत किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील किमान तापमान 15 ते 22 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. येत्या काही दिवस राज्यात थंडी कमी स्वरूपाची राहणार आहे. महाबळेश्‍वर 15.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

या जिल्ह्यात पावसाचा अंदाज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, परभणी, जालना, बीड, लातूर.
शुक्रवार : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ.
शनिवार : सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर.

पुण्यात उन्हाचा चटका
शहरात बुधवारी उन्हाचा चटका लागत होता. गेल्या तीन दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण कमी झाले होते. त्यामुळे उन्हाचा चटका वाढला. कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा 2.1 अंश सेल्सिअसने वाढून 31.1 अंश सेल्सिअस नोंदला जाता. किमान तापमानाचा पारा 17.9 अंश सेल्सिअस नोंदला. सरासरीपेक्षा 7.3 अंश सेल्सिअसने हे तापमान वाढले होते.

Categories
कागल कोल्हापूर

ऊर्जा संवर्धन व ऊर्जा व्यवस्थापन पुरस्काराने संताजी घोरपडे साखर कारखाना सन्मानित


कागल●गोरख कांबळे.
महाराष्ट्र राज्य ऊर्जा विकास अधिकरण, पुणे (महाऊर्जा) अंतर्गत 14 व्या राज्यस्तरीय ऊर्जा संवर्धन व ऊर्जा व्यवस्थापन पुरस्कार वितरण सोहळ्यात सन 2018- 2019 या वर्षीचा ऊर्जा संवर्धन व व्यवस्थापनाचा कार्य अहवाल इलेक्ट्रिकल मॅनेजर बी.ए पाटील यांनी सादर केला होता. सदर अहवालाची दखल घेऊन कारखान्याने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव म्हणून या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दरवर्षी मोठ्या उत्साहात होणारा हा सोहळा यावेळी कोरोना महामारीचा विचार करता हा पुरस्कार कारखान्याच्या कार्यस्थळावर पाठवण्यात आलेला आहे. या पुरस्कारासाठी विशेष मार्गदर्शन कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ, कारखान्याचे चेअरमन नविद मुश्रीफ यांचे लाभले आहे.
या प्रसंगी कारखान्याचे चेअरमन नविद मुश्रीफ कारखान्याचे जनरल मॅनेजर संजय घाटगे, चीफ इंजिनियर हुसेन नदाफ, इलेक्ट्रिकल मॅनेजर बी.ए.पाटील, को- जन मॅनेजर मिलिंद पंडे, लेबर ऑफिसर संतोष मस्ती, अकाउंट विभागाचे विवेक पाटील आदी उपस्थित होते.

Categories
Uncategorized

शिवक्रांती हिंदवी सेना संचालित दुर्गवारी संकल्पनेतून वैराटगड चे संवर्धन चे कार्य सुरू….

आशिष चव्हाण / वाई प्रतिनिधी
दि.७

गेली ५ वर्ष स्वराज्याचे शस्त्रागार किल्ले वैराटगड येथे शिवक्रांती नित्यक्रम वैराटगड संवर्धन कार्य करीत आहे. गतवर्षी गडावरील शिवस्मारक व शिवजन्मोत्सव साठी जो उत्साह होता तोच आजही जाणवला. शिवजन्मोत्सव २०२१ साठी गडावरील माहिती फलक व संवर्धन कार्याची मोहीम दिनांक ३ जानेवारी २०२१ रोजी उत्साहात पार पडली. व्याजवाडी दिशेने प्रस्थान करीत जागोजागी फलक लावण्यात आले.पांडवटाके , शिवपिंड, तळमाची , प्राचीन गुहा , पाण्याचे तलाव, महाद्वार,पिण्याचे पाणी, सरदारांचे वाडे , पहारेकरी देवड्या, चोरवाट,ध्वजस्तंभ, उताणा मारुती , शिवकालीन विहीर,बालसिद्धनाथ मंदिर सारखे नवीन फलक गडावर लावले गेले. लोखंडी पहार, माहिती फलक, सिमेंट ,वाळू अशा वस्तू नेताना मावळ्यांना प्रचंड त्रास झाला पण शेवटी शिवकार्यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या मावळ्यांनी सादर मोहीम फत्ते केलीच..सर्व मावळ्यांचे आवर्जून कौतुक करावे वाटते कि जेवणाची सोय नसताना फक्त बिस्कीट आणि भास्कर सरानी आणलेली भाकरी सर्वानी मिळून घासातील घास खाऊन पूर्ण केलीच .या मोहिमेत आलेल्या सर्व मावळ्यांचे खूप खूप धन्यवाद… संदेश धोत्रे ,अनिकेत धनावडे, आकाश जाधव , प्रताप जगताप,विराज पिसाळ ,देवांग चव्हाण,श्रीजय कदम,भास्कर पवार, प्रविण कदम, स्वप्निल धनावडे, या मावळ्यांनी केलेले कार्य व राखलेली निष्ठा यासाठी शिवक्रांती कडून मनपूर्वक आभार …
शिवक्रांती हिंदवी सेना महाराष्ट्र …

Categories
Uncategorized

कल्याणी संदिप हगवणे यांची बिनविरोध निवड झालीप्रतिनिधी सुनिल ज्ञानदेव भोसले

नायगाव ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक २०२१-२०२६ साठी ११ जागांसाठी निवडणूक दिनांक १५.०१.२०२१ रोजी होत आहे. श्री काळभैरवनाथ परिवर्तन पॅनेल च्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. अर्ज माघार घेण्याचे दिवशी वॉर्ड क्रमांक ३ मधील पौर्णिमा तुषार चौधरी व वर्षा शेलार यांनी त्यांचे अर्ज माघे घेतल्याने कल्याणी संदिप हगवणे यांची बिनविरोध निवड झाली. उर्वरित १० जागी काळभैरवनाथ परिवर्तन पॅनेल चे सर्व उमेदवार निवडून आणण्याचा मानस पॅनेलच्या वतीने करण्यात आला.

Categories
नांदेड

त्या 14 कोटी 50 लाखला आहे विमा सुरक्षा कॅवच विक्रम राजेंनी दिली माहिती

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:दि.7.आयडीबीआय बॅंक आणि शंकर नागरी बॅंक ही दोन्ही प्रतिष्ठाणे 14 कोटी 50 लाख रुपयांच्या हॅकींगबद्दल हात झटकतांना दिसत आहे. आयडीबीआय ही बॅंक वजिराबाद भागात असल्याने वजिराबाद पोलीस ठाण्यात सुध्दा याबद्दल तक्रार देण्यात आली आहे. वजिराबादचे पोलीस निरिक्षक संदीप शिवले यांनी सांगितले की, सायबर तंत्रज्ञ व्यक्ती या प्रकरणाची तपासणी करतील आणि त्यानंतर हा गुन्ह्याचा प्रकार आहे काय याचा निर्णय होईल. दोन्ही बॅंकांनी आपल्या रक्कमांचा विमा केलेला आहे. त्यामुळे या घटनेला कांही वेगळे वळण लागणा काय अशी चर्चा आज सुरू झाली आहे.

शंकर नागरी सहकारी बॅंकेचे व्यवस्थापक विक्रम राजे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार आयडीबीआय बॅंकेत शंकर नागरी बॅंकेचे खाते आहे. 27 डिसेंबर ते 2 जानेवारी या दरम्यान शंकर नागरी सहकारी बॅंकेच्या खात्यातून 14 कोटी 46 लाख 5 हजार 347 रुपये हॅर्कसने आरटीजीएस माध्यमातून गायब केल्याची बाब समोर आल्यनंतर 5 जानेवारी रोजी पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे तक्रार दिली आणि आपल्या 14 कोटी 50 लाख रुपयांची भरपाई करून देण्याची मागणी केली. शिवाजीनगरला दिलेल्या तक्रारीत आयडीबीआय बॅंकेच्या वजिराबाद शाखेतून हा सर्व प्रकार घडल्याचे लिहिले आहे. त्यामुळे दुसरी तक्रार पोलीस ठाणे वजिबाद येथे देण्यात आली.

याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार आयडीबीआय बॅंक सांगते आहे की,शंकर नागरी सहकारी बॅंकेचे संदेश आल्यानंतरच आयडीबीआय बॅंकेने त्यांच्या खात्यातील रक्कम त्यांच्या संदेशाप्रमाणे वळती केलेली आहे.त्यामुळे जबाबदारी कोणाची हा प्रश्न उपस्थित झाला आहे. वजिराबादचे पोलीस निरिक्षक संदीप शिवले यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की,शंकर नागरी बॅंक रिजर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या नियमावलीप्रमाणे आयडीबीआयने आमचे 14 कोटी 50 लाख रुपये द्यावेत असे सांगत आहेत.आयडीबीआय शंकर नागरीच्या संदेशाप्रमाणेच आमच्या बॅंकेतील खात्यातून रक्कमा वळती झाल्या असे सांगते आहे.त्यामुळे या प्रकरणात सर्व्हर तंत्रज्ञ असलेल्या व्यक्तीकडून याबाबतची सर्व माहिती घ्यावी लागेल, कोणाच्या संदेशाने कोणाच्या खात्यात करोडो रुपये वळवले गेले याची महिती घ्यावी लागेल आणि तंत्रज्ञ सांगतील त्याप्रमाणे या बाबीचा निर्णय पुढे होईल.

शंकर नागरी सहकारी बॅंकेचे व्यवस्थापक विक्रम राजे यांनी दुरध्वनी वरून विचारणा केली असता त्यांनी सांगितले की,शंकर नागरी सहकारी बॅंकेच्या ठेवीदारांना यामुळे कांही अडचण येणार नाही. कारण शंकर नागरी सहकारी बॅंकेचे 114 कोटी रुपये आयडीबीआय बॅंकेत जमा आहेत.सोबतच शंकर नागरीच्या आणि आयडीबीआयच्या रक्कमांचा विमा असल्याची माहिती विक्रम राजे यांनी दिली. विमा प्रकरणांमध्ये इतिहासात अनेक घोटाळे झालेले आहेत. त्यामुळे आयडीबीआय आणि शंकर नागरी यांच्यामध्ये विमा संदर्भाने हा घोटाळा झाला असेल काय?अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

Categories
गुन्हेगारी

गुटख्याची चोरटी वाहतूक करणाऱ्या शिवनाकवाडी ता. बत्तीश शिराळा येथील दोन जणांवर गुन्हा दाखल

दोन संशयित आरोपींसह औंध पोलीस पथक

खटाव तालुका प्रतिनिधी (रामदास देशमुख):-विटा ते पुसेसावळी रस्त्यावर गुटख्याची चोरटी वाहतूक करणाऱ्या शिवनाकवाडी ता. बत्तीश शिराळा येथील दोन जणांवर गुन्हा दाखल करून त्यांचेकडून 75गुटख्याची पोती ,इर्टिगा कार असा सुमारे बारा लाख चौतीस हजार रुपयांचा ऐवज औंध पोलीसांनी जप्त केला असून दोघा संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.

याबाबत औंध पोलीस स्टेशनमधून मिळालेली अधिक माहिती अशी, पुसेसावळी ते चोराडे रस्त्यावर गस्त घालत असताना औंधचे सपोनि उत्तम भापकर, पोलीस नाईक संतोष कोळी , प्रशांत पाटील, वळकुंद्रे ,पोळ ,शिंदे होमगार्ड नलवडे,महामुनी ,हुलगे यांच्या पथकाला चारचाकी इर्टिगा गाडी एम एच 08 झेड 2471मध्ये मागील बाजूस 75पोती व चार बाँक्स गुटखा बेकायदेशीर पणे ठेवल्याचे आढळून आले. हा सर्व मुद्देमाल व संशयित स्वप्नील सुरेश शेंडके वय 21व आकाश विजय पवार वय रा.शिवनाकवाडी ता.बत्तीस शिराळा यांना औंध पोलीसांनी ताब्यात घेतले आहे ,सदर घटनेची नोंद औंध पोलीस स्टेशनमध्ये झाली असून पोलीस अधिक्षक बन्सल ,उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि उत्तम भापकर व पोलीस कर्मचारी अधिक तपास करीत आहेत.

Categories
कोपरगाव

श्रीमान गोकुळचंद विद्यालयाच्या वतीने पत्रकारांचा सत्कार


बिपिन गायकवाड तालुका प्रतिनिधी हिंदू सम्राट-
कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी व श्रीमान गोकुळचंदजी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनाच्या निमित्ताने कोपरगाव तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रथम श्रीमान गोकुळचंदजी यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पत्रकार नानासाहेब जवरे व पत्रकार सोमनाथ सोनपसारे यांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांतजी ठोळे हे अध्यक्षस्थानी होते यावेळी बोलताना ठोळे म्हणाले की जगात वर्तमानात मोठे बदल होत असताना भारत देश त्याला अपवाद नाही परिवर्तन हा देशाचा नियम आहे व त्याला आपण सामोरे गेले पाहिजे पत्रकारांनी खरे वास्तव जनतेसमोर आणले पाहिजे तरच खऱ्या गोष्टी समाजापुढे येत असतात पाश्चात्य देशात पत्रकारितेला आजही मोठे स्थान आहे वर्तमानपत्रात एखादी बातमी येणे तेवढे सोपे राहिलेले नाही मात्र कोपरगाव चे पत्रकार अशा बातम्यांना चांगले स्थान देत असून महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या अग्रगण्य अशा महत्त्वाच्या वृत्तपत्रात कोपरगाव ची चांगली बातमी येत असल्यामुळे मनाला वाचताना बरे वाटते तसेच कोपरगाव शहरातील पाण्याचा प्रश्न फार गंभीर असून यामुळे कोपरगाव तालुक्याची प्रतिमा मलिन होत आहे आपल्या शेजारच्या तालुक्यात येवला संगमनेर राहाता श्रीरामपूर या भागात पाण्याची स्थिती अगदी चांगली आहे मात्र या पाण्याच्या प्रश्नावर तोडगा निघणे महत्त्वाचे आहे बाकी क्षेत्रात कोपरगाव तालुक्याने मोठी प्रगती केली तसेच औद्योगिक व सहकार आणि शिक्षण याबाबतीत चांगले लौकिक प्राप्त केली आहे तसेच कोरोना च्या कालावधीत पत्रकारांनी आपली भूमिका चोख पार पाडली त्यांचे कौतुक केले तर आपणा सर्व पत्रकारांची सर्वांच्या सोयीनुसार एक स्वतंत्र बैठक घेऊन सामाजिक प्रश्नाबाबत सखोल चर्चा करण्याचा माझा विचार आहे असे त्यांनी शेवटी सांगितले त्यानंतर उपस्थित पत्रकारांचा गौरव करण्यात आला या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत ठोळे व संस्थेचे सचिव दिलीपजी अजमेरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर यांनी केले तर उपस्थित मान्यवर पत्रकांराचे स्वागत बुचकुले सर दिलीप फुलसौंदर सर रमेश गायकवाड सर लकारे सर बडजाते सर अमृतकर सर यांनी केले तर आभार गोरे सर यांनी मांनले यावेळी शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Categories
मुंबई

खामगांव जालना रेल्वे मार्ग सिंदखेड राजा देऊळगाव राजा या शहरांमधून व्हावा यासाठी स्थानिक रहिवाशाचे प्रयत्न.

खामगांव – जालना रेल्वे मार्गाच्या फिल्ड सर्वेसाठी आलेल्या पथकाशी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची चर्चा*

मुंबई: सिद्धार्थ काळे.

खामगाव – जालना रेल्वेमार्ग होणे आपल्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी किती गरजेचा आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. या रेल्वे मार्गाच्या प्रत्यक्षात येण्यासाठी सर्वेक्षणाच्या कामाला सुरूवात झाली आहे. खामगांव- जालना रेल्वे मार्गाच्या तांत्रिक सर्वेक्षणासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या सेंट्रल रेल्वेची ट्राफिक सर्वे टीम जिल्ह्यात आली आहे. पथक बुधवारी आणि गुरुवारी आपल्या जिल्ह्यात येत आहे. या पथकाचे प्रमुख उपआयुक्त (सर्वेक्षण) श्री. जैन यांच्यासोबत राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे साहेबांनीं चर्चा केली.
चर्चेदरम्यान पालकमंत्री डॉ शिंगणे यांनी या भागातील बाजारपेठेसोबतच औद्योगिक महत्व विषद करीत रेल्वे मार्गाचे महत्व पटवून दिले. ते म्हणाले, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, चिखली, खामगाव या चार तालुक्यांमधून हा रेल्वे मार्ग जात आहे. या भागातील कृषी व व्यापारी बाजारपेठेचे महत्व मोठी आहे. कृषी, व्यापार व औद्योगिक विकासासोबतच या भागातील रेल्वेमार्ग हा रोजगाराची गरज आहे. या भागापासून मुंबई- नागपूर सारखी औद्योगिक शहरे दूर असल्याकारणाने या भागातील उद्योजक, व्यापारी यांना दळणवळण व वाहतूक खर्च जास्त येतो. त्यामुळे निश्चितच या परीसराच्या कृषी, व्यापार व औद्योगिक विकासावर परिणाम होतो. हा मार्ग झाल्यास या परिसरातील वाहतुक खर्च कमी लागून परिणामी जिल्ह्यातील व्यापार वृद्धीसोबतच बेरोजगारी कमी होण्यास मदत मिळणार आहे. वाहतुक सोपी झाल्यास औद्योगिक वसाहतींचा विकास होऊन उद्योगांना चालना मिळणार आहे, असेही पालकमंत्री डॉ शिंगणे यांनी पथकातील अधिकाऱ्यांना सांगितले.
चर्चेदरम्यान पालकमंत्री म्हणाले, या रेल्वे मार्गामुळे केवळ दळण वळणाची सुविधा होणार नसून जिल्ह्यातील पर्यटनीय स्थळांचाही विकास होणार आहे. जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील जिजाऊ जन्मस्थान, लोणार येथील जागतिक किर्तीचे सरोवर तसेच शेगाव येथील संत गजानन महाराज समाधी स्थळ येथील पर्यटनास चालना मिळणार आहे. हा मार्ग विदर्भ व मराठवाड्यातील पर्यटन, उद्योग, कृषी विकासासाठी महत्वाचा दुवा ठरणार आहे. या भागातील औद्योगिक मागासलेपण दूर सारण्यासाठी हा रेल्वे मार्ग होणे काळाची गरज आहे.
या रेल्वे मार्गामुळे जिल्ह्यातील अनेक वर्षातील प्रतिक्षेत असलेल्या विकास कामास नवी चालना मिळुन विकासाचे नवे पर्व सुरु होणार आहे. सेंट्रल रेल्वेची ट्राफिक सर्वे टीम फिल्ड सर्वे साठी आलेल्या अधिकाऱ्यांसोबत पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या चर्चेनंतर हा रेल्वे मार्ग निश्चितच मंजुर होईल व जिल्ह्याच्या विकासाचे विकासपर्वाला गती मिळेल, अशी आशा व्यक्त केली.
तत्पूर्वी पालकमंत्री यांनी सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, चिखली, खामगाव तालुक्यातील तहसीलदार यांच्याशी व जिल्हाधिकारी यांच्याशी यांना पथकातील सर्वे करणाऱ्या अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याच्या सुचनाही दिल्या.

Categories
Uncategorized

गजेंद्र घोलप यांचे निधन


माढा तालुका प्रतिनिधी विवेक कुंभेजकर—- माढा येथील सोसायटी चे सेवानिवृत्त सचिव गजेंद्र घोलप यांचे बुधवारी सकाळी निधन झाले ते पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम करीत होते.
त्यांच्या पाश्चात पत्नी मुलगी दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे माढ्यातील प्रसिद्ध व्यवसायिक शरद घोलप यांचे ते वडिल होत.

Categories
कला व मनोरंजन मुंबई

सुरेल मधुर हिंदी मराठी चित्रपट गीतांची “आओ झुमे गाये ” संगीत मैफल संपन्न

( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी: लक्ष्मण राजे )

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात बरेच दिवस घरात बसलेल्या संगीतप्रेमी रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी आता सर्व आता थिएटर सुरू झाली आहेत. बोरीवली येथील प्रबोधकार ठाकरे मिनी थिएटर मध्ये निर्माती गायिका नीता पवार यांच्या रसिका प्रेझेंट तर्फे “आओ झुमे गाये ” ही सुरेल गाण्यांची संगीत मैफल आयोजित करण्यात आली होती. या संगीत मैफलीला मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेल्या रसिक प्रेक्षकांनी पसंती दिली. “आओ झुमे गाये या लोकप्रिय सुरेल हिंदी मराठी चित्रपटातील गीतांच्या मनोरंजक कार्यक्रमाची संकल्पना निर्माती नीता पवार यांची होती. रसिका प्रेझेंट ” आओ झुमे गाये ” हा मराठी हिंदी गीतांचा नजराणा रसिकांना खुप आवडला . गायिका नीता पवार आणि १६ सहकारी गायकांनी उठ महागणपती , आओ झुमे गाये , हे चिंचेचे झाड ,बदन पे सितारे ,ही चाल तुरुतुरु, ओ मेरी शर्मिली , हसता हुआ नुरानी चेहरा अशी एका पेक्षा एक सरस मराठी हिंदी गाणी सादर केली आणि रसिकांना मंत्रमुग्ध केले. “आओ झुमे गाये” या सुरेल संगीत श्रवणीय मैफिलीला रसिकांचा टाळ्यांच्या कडकडाटात प्रचंड प्रतिसाद मिळाला.

Categories
कोल्हापूर पन्हाळा

कचरा टाकण्याच्या वादातून तरुणाचा खुन

कोल्हापूर :

पन्हाळा प्रतिनिधी प्रदीप सुतार यांजकडून
कचरा टाकण्याच्या कारणातून उद्भवलेल्या वादातून तिघा सख्ख्या भावांनी धारदार शस्त्राने हल्ला करून आकाश आनंदा वांजळे (वय 25, रा. क्रांतिसिंह नाना पाटीलनगर) या तरुणाचा खून केल्याची घटना बुधवारी रात्री एकच्या सुमारास क्रांतिसिंह नाना पाटीलनगर येथे घडली. करवीर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

या प्रकारामुळे क्रांतिसिंह नाना पाटीलनगर येथे तणाव निर्माण झाला आहे.
खून झालेला तरुण आणि संशयित शेजारी राहतात. त्यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू होता. बुधवारी सायंकाळी कचरा टाकण्यावरून त्यांच्यात वाद निर्माण झाला, त्यातून मध्यरात्रीनंतर त्यांच्यात हाणामारी झाली.
त्यातूनच संशयित भारत कचरे, दिलीप कचरे आणि सुरेश कचरे या तिघांनी आकाश वांजळे याच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यास शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर या घटनेची माहिती वांजळे यांच्या नातेवाईकांसह मित्रांना मिळताच त्यांनी शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी गर्दी केली होती. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. या घटनेची माहिती मिळताच करवीर पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळासह रुग्णालयात दाखल झाले होते.

Categories
कला व मनोरंजन

सह्याद्री फिल्म चा “ईस्कुट”मराठी चित्रपटाचा मुहूर्त संपन्न


मिरज–अशोक मासाळ नवीन वर्षाचे औचित्य साधुन‌ स्थानिक कलाकारांना न्याय देण्याकरिता सह्याद्री फिल्म अँड इव्हेंट मँनेजमेंटचे लेखक, दिग्दर्शक, कलाकार तथा संस्थापक अध्यक्ष आयु.गणेश वाईकर यांच्या कुशल नेतृत्वाखाली ,व महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आयु. गौतम प्रज्ञासूर्य यांच्या शुभहस्ते पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्यात ऐतिहासिक मिरज भागात टाकळी या गावशिवारात "ईस्कुट"या मराठी चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला. त्यावेळी बोलताना आयु.गौतम प्रज्ञासूर्य यांनी "कोविड19"काळात कलाकारांची झालेली व्यथा मांडुन सह्याद्री फिल्म च्या माध्यमातून मा.गणेश वाईकरांनी कलाकारांना केलेल्या मदतीची माहिती दिली. आणि 'ईस्कुट'या आगामी मराठी चित्रपटास शुभेच्छा दिल्या. तर मा.गणेश वाईकरांनी. परंपरागत कलेचा वारसा जपत स्थानिक कलाकारांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे जाहीर केले. शेवटी प्रसिद्ध लेखक, नाटककार मा.आशोकरावजी गस्ते सर, व सिनेकलावंत मा.बापू भाजीवाले यांनी मनोगत व्यक्त केले. व चित्रपटास शुभेच्छा दिल्या. प्रसंगी स्थानिक कलाकार डान्सर मा.अजय कांबळे, अभिनेत्री मोरे मँडम,सचिन कांबळे, व टाकळी गावचे ग्रामस्थ हजर होते... लवकरच "ईस्कुट'या मराठी चित्रपटाचे टाकळी गावात शुटिंग सुरू करण्याचे आश्वासित करून मुहूर्त संपन्न झाल्याचे जाहीर करण्यात आले..🌸🌸

Categories
Uncategorized

महामार्गावरील गावात सुरक्षा समित्यांची स्थापना:आपत्कालीन परिस्थितीत तातडीची मदत शक्य

गोकुळ शिरगाव प्रतिनिधी

: महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी व अपघातामुळे होणारे मृत्यू हे प्रमाण कमी करण्यासाठी महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्या अभिनव संकल्पनेतून महामार्गावरील प्रत्येक गावात महामार्ग सुरक्षा समित्या स्थापन केल्या जात असून या समिती मार्फत गावातील तरुण कार्यकर्ते, महामार्गावरील दुकानदार, पानपट्टी चालक, गॅरेज व पंक्चर काढणारे कारागीर, अशा महामार्गावरील सुसंगत व्यवसायीक यांची नेमणूक या समित्यांमध्ये होणार असून या समितीमधील सदस्यांना प्रशासनाच्या वतीने आपात्कालीन परिस्थितीत वाहतूक नियंत्रण, महामार्गावरील वाहनचालकांचे रस्ता सुरक्षा विषयी प्रबोधन ,अपघात घडल्यास प्रथमोपचार व अपघात ग्रस्त हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या तातडीची कार्य यासंबंधी सर्वंकष प्रशिक्षण देण्यात येणार असून यामुळे महामार्गावरील अपघात व अपघातामुळे होणारे मृत्यू कमी होण्यास मदत होणार आहे.यासाठी महामार्ग पोलिसांकडून विशेष मोहीम राबवली जात असून महामार्गावरील गावांमध्ये महामार्ग पोलिस प्रशासनाच्या वतीने समित्या स्थापन करण्यासाठी मार्गदर्शन केले जात आहे सदर समित्या स्थापन करण्याच्या मोहिमेसाठी पोलीस महासंचालक भूषण कुमार उपाध्याय पोलीस अधीक्षक संजय जाधव पुणे विभागाचे पोलिस उपाधीक्षक प्रीतम यावलकर पुणे विभागाचे पोलिस निरीक्षक राजन सस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उजळाईवाडी महामार्ग पोलीस उपकेंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश नलवडे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरगुप्पे यांच्या नियंत्रणाखाली काम सुरू आहे.

उजळाईवाडी येथे महामार्ग पोलिसांकडून वाहक महामार्ग वाहतूक सुरक्षा समितीची स्थापना करण्यात आले असून यावेळी मार्गदर्शन करताना महामार्ग पोलीस हवालदार बी आर कांबळे व इतर (छायाचित्र महादेव वाघमोडे)

Categories
सातारा

देवी-देवतांच्या, ग्रहांच्या नावाने यंत्र-तंत्र, खडे, मणी यांची विक्री करण्याची व प्रसार माध्यमांवर त्यांची जाहिरात दाखविण्यावर बंदी घालण्याचे आदेश

औरंगाबाद खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

.
पाटण हिंदू सम्राट प्रतिनिधी उमेश सुतार यांजकडून
टी. व्ही. चॅनल्स आणि विविध प्रसार माध्यमांवर देवी-देवतांच्या नावाने यंत्र-तंत्र विक्री करण्यावर व जाहिरात दाखविण्यावर बंदी घालण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. एम. जी. शेवलीकर यांनी मंगळवारी (५ जानेवारी) दिले. अशा प्रकारच्या यंत्राची विक्री, उत्पादन, प्रसार व प्रसार करणाऱ्यांवर अघोरी कृत्य आणि काळी जादू कायदा २०१३ (अघोरी प्रॅक्टिस अँड ब्लॅक मॅजिक अक्ट २०१३) नुसार गुन्हे दाखल करण्यात यावेत. केंद्र व राज्याने तीस दिवसांत अशा प्रकारांवर कारवाई करण्यासाठी काय पावले उचलली यासंबंधी औरंगाबाद खंडपीठाला अवगत करावे असेही आदेशात नमूद केले आहे.

विविध प्रसारमाध्यमांवर धर्माच्या नावाने भीती दाखवून हनुमान चालिसा, देवीचे यंत्र, ताईत, खडे, मणी, आदी वस्तू विकण्याच्या जाहिराती मोठ्या प्रमाणावर दाखविल्या जात होत्या. सर्वसामान्य नागरिकांची अशा भोंदूगिरीच्या माध्यमातून लूट केली जाते. राज्यशासनाच्या २०१३ मधील अघोरी कृत्य व काळी जादू कायद्यानुसार या गोष्टींचे प्रसारमाध्यमांवर प्रक्षेपण करता येत नाही. याविरुद्ध २०१५ मध्ये औरंगाबाद येथील राजेंद्र गणपतराव अंभोरे (रा. टाऊनसेंटर, सिडको, औरंगाबाद) यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. समाजात विज्ञाननिष्ठ नागरिक तयार होऊन वैज्ञानिक वातावरणास गती मिळावी, अंधश्रद्धेचे निर्मूलन व्हावे यासाठी संबंधित २०१३ चा कायदा निर्माण केला. प्रत्येक पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षकांच्या समवेत अशा बाबींवर प्रतिबंध घालण्यासाठी एक अधिकारी नियुक्त केलेला आहे. कायद्याच्या माध्यमातून भोंदूगिरीला वेसण घालावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. संबंधित याचिकाकर्ते अंभोरे यांनी याचिका नंतर मागे घेण्याची विनंती खंडपीठास केली होती. खंडपीठाने याचिका समाजासाठी महत्वाची असल्याने पुढे चालू ठेवली. न्यायालयाचे मित्र म्हणून बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ विजयकुमार सपकाळ यांची नियुक्ती केली. राज्य शासनाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील महेंद्र नेर्लीकर यांनी तर केंद्राच्यान वतीने डी. जी. नागोडे यांनी काम पाहिले. यंत्र बनविणाऱ्या प्रतिवादी कंपनीतर्फे सचिन सारडा हजर झाले होते.

Design a site like this with WordPress.com
Get started