Categories
सातारा Uncategorized

कृष्णा हॉस्पिटलतर्फे भव्य मोफत कर्करोग शस्त्रक्रिया शिबीर , डॉ. सुरेश भोसले :- देशभरातील उच्च वैद्यकीय संस्थांमधील कर्करोग तज्ज्ञ शस्त्रक्रिया करणार



मयुर जाधव / कराड प्रतिनिधी-
कृष्णा हॉस्पिटलतर्फे जागतिक कर्करोक दिनानिमित्त (दि. ४ ते ७ फेब्रुवारी) दरम्यान कर्करोग विभागातर्फे भव्य मोफत कर्करोग शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात येणार आहे. या शिबीराला भारतीय कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञांची संघटना आणि गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक (गोकर्मा) या संघटनेनी मान्यता दिली आहे. यामध्ये देशभरातील उच्च वैद्यकीय संस्थांमधील सुमारे २० हून अधिक कर्करोग तज्ज्ञ कृष्णा हॉस्पिटलमध्ये स्वत: उपस्थित राहून मोफत शस्त्रक्रिया करणार
असल्याची माहिती कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी दिली.

डॉ. सुरेश भोसले म्हणाले, आज भारतात मृत्यूचे दुसरे कारण म्हणजे कॅन्सर. दरवर्षी कॅन्सरचे १० लाख नवीन रूग्ण आढळतात आणि त्यामुळे ४ लाख मृत्यू होतात. जगात सर्वाधिक तोंडाच्या व घशाच्या कॅन्सरचे रूग्ण भारतात आहेत. कृष्णा हॉस्पिटलमध्ये गेल्या २५ वर्षापासून कर्करोग विभाग कार्यरत आहे. सन १९९६ मध्ये सातारा जिल्ह्यात प्रथमच व पश्चिम महाराष्ट्रात मिरजनंतर कराड येथे स्वतंत्र कर्करोग विभाग कृष्णा हॉस्पिटलमध्ये सुरू झाला. आज या विभागात दररोज जवळपास १०० रूग्ण उपचार घेतात. मागील २० वर्षात जवळपास ३० हजार हून अधिक रूग्णांनी येथे उपचार घेतलेले आहेत. सर्वाधिक रूग्ण तपासणारे व सर्वाधिक रेडिएशन किमोथेरपी देणारे दक्षिण महाराष्ट्रातील हे एकमेव रूग्णालय आहे. येथे पूर्णवेळ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वैद्यकीय संस्थांमधून प्रशिक्षित कॅन्सर सर्जन, रेडिएशन व किमोथेरपी तज्ज्ञ उपलब्ध आहेत. तसेच स्तन कर्करोगासाठी स्वतंत्र विभाग आहे. पॅलिएटीव्ह केअरसाठी पश्चिम महाराष्ट्रातील ही एकमेव संस्था मान्यताप्राप्त आहे. हा विभाग टाटा हॉस्पिटलच्या नॅशनल कॅन्सर ग्रीड शी संलग्न आहे. येथे महात्मा फुले जीवनदायी योजना, पोलिस आरोग्य कल्याण योजना, मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता निधी इत्यादी योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत दिली जाते.

याशिवाय कृष्णा हॉस्पिटलतर्फे विविध ठिकाणी कर्करोग निदान व उपचार शिबीरे भरविली जातात. तसेच विविध जनजागृती अभियानेही चालविली जातात. याच अनुषंगाने दरवर्षी ४ फेब्रुवारीला कृष्णा हॉस्पिटलतर्फे जागतिक कर्करोक दिनानिमित्त विविध राबविले जातात.

या शिबीरासाठी कर्करोगावरील तज्ज्ञांच्या जागतिक पातळीवरील संघटना असणाऱ्या यु.आय.सी.सी.चे अध्यक्ष तथा मुंबईतील अपोलो हॉस्पिटलचे संचालक व टाटा हॉस्पिटलचे माची संचालक डॉ. अनिल डिक्रुज, भारतीय कॅन्सर शस्त्रक्रिया तज्ज्ञांच्या असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अर्नब गुप्ता (कोलकता), मुंबईतील एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूटचे सहाय्यक संचालक डॉ. धैर्यशील सावंत, ब्रिज कॅन्डी व जसलोक हॉस्पिटलचे कॅन्सर सर्जन डॉ. अमिश दलाल, बेंगलोर येथील मणिपाल हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. सोमशेखर, टाटा हॉस्पिटलमधील कॅन्सर विभागाचे प्रमुख डॉ. प्रथमेश पै, गोवा येथील मणिपाल हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. शेखर साळकर, हुबळी येथील कर्नाटक कॅन्सर थेरपी व रिसर्च इन्स्टिट्यूटचे चेअरमन डॉ. बी. आर. पाटील, रेडॉन कॅन्सर सेंटरचे संचालक डॉ. संजीव कुलगोड, बेंगलोये येथील मेक्झिलोफेसिअल सर्जन डॉ. सत्यजीत दंडगी, शिमोगा येथील कॅन्सर सर्जन डॉ. रमेश हे ख्यातनाम कॅन्सर तज्ज्ञ प्रमुख उपस्थित राहणार आहेत. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील सर्व कॅन्सर सर्जनचाही यात समावेश असणार आहेत. शिबीरातील शस्त्रक्रिया डॉ. शेखर साळकर (गोवा) व डॉ. शरद देसाई (मिरज) यांच्या निर्देशानुसार होणार आहेत.

या शिबीराचा लाभ घेण्यासाठी कॅन्सरग्रस्त रूग्णांनी २५ जानेवारी अखेर कृष्णा हॉस्पिटलमध्ये नोंदणी करणे गरजेचे असून, नोंदणीसाठी येताना रूग्णांनी आपले सर्व जुने रिपोर्टस् घेऊन यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, कॅन्सर विभागप्रमुख डॉ. आनंद गुडूर,
किमोथेरपी तज्ज्ञ डॉ. रश्मी गुडूर, कॅन्सर सर्जन डॉ. दिग्वीजय पाटील आदी उपस्थित होते.

Categories
सातारा

मध्य महाराष्ट्रासह कोकणात तीन दिवसांमध्ये राज्यात पावसाची शक्‍यता;पुण्यात उन्हाचा चटका


पाटण हिंदू सम्राट प्रतिनिधी उमेश सुतार यांजकडून
मध्य महाराष्ट्रासह कोकणात पुढील तीन दिवस ढगांच्या गडगडटासह पाऊस पडेल. पुण्यातही आकाश मुख्यतः ढगाळ राहणार असून, पावसाच्या तुरळक सरी पडतील, असा अंदाज बुधवारी हवामान खात्याने वर्तविला.

पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे दक्षिण, मध्य अरबी समुद्रापासून उत्तर, मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे राज्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. दोन दिवसांपासून तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावाही होत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात येत्या गुरुवारपासून काही भागात पाऊस पडेल. विदर्भातही तुरळक ठिकाणी विजांसह हलक्‍या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून सातत्याने बदलणाऱ्या लहरी हवामानाचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. कमी झालेली थंडी, पहाटे पडणारे धुके आणि दुपारी ढगाळ हवामान अशी स्थिती कीड-रोगांसाठी पोषक ठरत आहे. राज्यावर सध्या अवकाळी पावसाचे सावट असून, शनिवारपर्यंत विविध भागांत ढगाळ हवामानासह हलक्‍या पावसाची शक्‍यता आहे.

राज्यात डिसेंबर महिन्यात उत्तर भारतातील थंडीने हातपाय पसरायला सुरुवात केल्यानंतर महाराष्ट्रातही गारठा वाढला. विदर्भ, मराठवाड्यासह राज्याच्या किमान तापमानात घट होऊन थंडीची लाट आली. मात्र, ही थंडी फार काळ टिकली नाही. सध्या ढगाळ हवामानामुळे राज्यातील थंडी गायब झाली आहे.

राज्यातील जवळपास सर्वच भागांत किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील किमान तापमान 15 ते 22 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. येत्या काही दिवस राज्यात थंडी कमी स्वरूपाची राहणार आहे. महाबळेश्‍वर 15.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

या जिल्ह्यात पावसाचा अंदाज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, परभणी, जालना, बीड, लातूर.
शुक्रवार : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ.
शनिवार : सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर.

पुण्यात उन्हाचा चटका
शहरात बुधवारी उन्हाचा चटका लागत होता. गेल्या तीन दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण कमी झाले होते. त्यामुळे उन्हाचा चटका वाढला. कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा 2.1 अंश सेल्सिअसने वाढून 31.1 अंश सेल्सिअस नोंदला जाता. किमान तापमानाचा पारा 17.9 अंश सेल्सिअस नोंदला. सरासरीपेक्षा 7.3 अंश सेल्सिअसने हे तापमान वाढले होते.

Categories
सातारा

देवी-देवतांच्या, ग्रहांच्या नावाने यंत्र-तंत्र, खडे, मणी यांची विक्री करण्याची व प्रसार माध्यमांवर त्यांची जाहिरात दाखविण्यावर बंदी घालण्याचे आदेश

औरंगाबाद खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

.
पाटण हिंदू सम्राट प्रतिनिधी उमेश सुतार यांजकडून
टी. व्ही. चॅनल्स आणि विविध प्रसार माध्यमांवर देवी-देवतांच्या नावाने यंत्र-तंत्र विक्री करण्यावर व जाहिरात दाखविण्यावर बंदी घालण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. एम. जी. शेवलीकर यांनी मंगळवारी (५ जानेवारी) दिले. अशा प्रकारच्या यंत्राची विक्री, उत्पादन, प्रसार व प्रसार करणाऱ्यांवर अघोरी कृत्य आणि काळी जादू कायदा २०१३ (अघोरी प्रॅक्टिस अँड ब्लॅक मॅजिक अक्ट २०१३) नुसार गुन्हे दाखल करण्यात यावेत. केंद्र व राज्याने तीस दिवसांत अशा प्रकारांवर कारवाई करण्यासाठी काय पावले उचलली यासंबंधी औरंगाबाद खंडपीठाला अवगत करावे असेही आदेशात नमूद केले आहे.

विविध प्रसारमाध्यमांवर धर्माच्या नावाने भीती दाखवून हनुमान चालिसा, देवीचे यंत्र, ताईत, खडे, मणी, आदी वस्तू विकण्याच्या जाहिराती मोठ्या प्रमाणावर दाखविल्या जात होत्या. सर्वसामान्य नागरिकांची अशा भोंदूगिरीच्या माध्यमातून लूट केली जाते. राज्यशासनाच्या २०१३ मधील अघोरी कृत्य व काळी जादू कायद्यानुसार या गोष्टींचे प्रसारमाध्यमांवर प्रक्षेपण करता येत नाही. याविरुद्ध २०१५ मध्ये औरंगाबाद येथील राजेंद्र गणपतराव अंभोरे (रा. टाऊनसेंटर, सिडको, औरंगाबाद) यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. समाजात विज्ञाननिष्ठ नागरिक तयार होऊन वैज्ञानिक वातावरणास गती मिळावी, अंधश्रद्धेचे निर्मूलन व्हावे यासाठी संबंधित २०१३ चा कायदा निर्माण केला. प्रत्येक पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षकांच्या समवेत अशा बाबींवर प्रतिबंध घालण्यासाठी एक अधिकारी नियुक्त केलेला आहे. कायद्याच्या माध्यमातून भोंदूगिरीला वेसण घालावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. संबंधित याचिकाकर्ते अंभोरे यांनी याचिका नंतर मागे घेण्याची विनंती खंडपीठास केली होती. खंडपीठाने याचिका समाजासाठी महत्वाची असल्याने पुढे चालू ठेवली. न्यायालयाचे मित्र म्हणून बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ विजयकुमार सपकाळ यांची नियुक्ती केली. राज्य शासनाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील महेंद्र नेर्लीकर यांनी तर केंद्राच्यान वतीने डी. जी. नागोडे यांनी काम पाहिले. यंत्र बनविणाऱ्या प्रतिवादी कंपनीतर्फे सचिन सारडा हजर झाले होते.

Categories
सातारा

बैलगाड्यांच्या शर्यतीस शासनाची बंदी असतानाही, लोकांच्या मनोरंजनासाठी बेकायदेशीरपणे बैलांचा शर्यतीसाठी वापर

फलटण दि. 6 जानेवारी –
फलटण प्रतिनिधी अभिषेक सरगर
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनकडून मिळालेली माहिती नुसार, रविवार दि. ३ जानेवारी रोजी भाडळी खु. ता. फलटण येथे सकाळी नऊच्या सुमारास चोरमले वस्ती नजीक प्रशांत सोनवलकर यांच्या रानात, बैलगाड्यांच्या शर्यतीस शासनाची बंदी असतानाही, लोकांच्या मनोरंजनासाठी बेकायदेशीरपणे बैलांचा शर्यतीसाठी वापर केला, तसेच शर्यती बघण्यास आलेल्या कोणीही लोकांनी तोंडाला मास्क न लावता व सामाजिक अंतर न राखता एकत्र गर्दी करुन, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा लागु असताना, त्या संदर्भाने जिल्हा अधिकारी सो सातारा यांनी दिलेल्या CRPC 1973 चे कलम 144 अन्वये आदेशाचे उल्लंघन केले प्रकरणी सुभेदार तथा पिंटू जमादार डुबल, अमोल विठ्ठल कोळपे दोघेही रा. भाडळी खु., विकास चांगण रा. सासकल, सचिन गुंजवटे रा. झिरपवाडी, प्रणय नवनाथ भंडलकर तथा गुरव रा. तिरकवाडी ता. फलटण यांच्याविरोधात फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला जमावबंदीचे उल्लंघन, प्राण्यांना निर्दयीपणे व क्रुरपणे वागवणेस प्रतिबंध, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, भारतीय साथ रोग अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत भाडळी खु. चे पोलीस पाटील हणमंत सोनवलकर यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार एस व्ही खाडे करित आहेत.

Categories
सातारा

पुणे-बंगलोर महामार्गावर बिबट्या अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी अवस्थेत .

प्रतिनिधी मयूर जाधव‌ कराड.

मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास पाचवड फाटा येथे पुणे-बंगलोर महामार्गावर बिबट्या बसल्याच्या आढळल्याने आसपासच्या परिसरात खळबळ उडाली पाचवड येथील जेके पेट्रोल पंपासमोर घटना घडली आहे्
सुमारे अर्ध्या तासापेक्षा जास्त काळ त्यांनी रस्त्यावर ठाण मांडला होता त्यामुळे वाहतूक खोळंबली होती. आगाशिव येथील लेण्यातील सुरक्षारक्षक निघाले असता त्यांच्या ची गोष्ट लक्षात आली व त्यांनी लगेच वनविभागाला माहिती दिली . वनविभागाचे अधिकारी तिथे पोहोचेपर्यंत वाढलेली गर्दी व वाहनांच्या आवाजामुळे त्याने बाजूच्या उसात धूम ठोकली. मात्र काही वेळातच तिथे वनविभागाचे कर्मचारी पिंजर्यासह पोहोचले. त्यावेळी वनपाल.मा. ए.पी .सव्वाखंडे. वनरक्षक मा.मंगेश वंजारी. वनरक्षक रमेश जाधव ‌वनरक्षक प्रशांत मोहिते वनरक्षक उत्तम पांढरे. सचिन खंडागळे. धनाजी गावडे व भाऊसाहेब नलवडे उपस्थित होते. त्यांच्यासोबत पर्यावरण अभ्यासक रोहन भाटे हे उपस्थित होते. मंगळवारी रात्रभर पाचवड फाटा. नांदलापुर. महामार्गालगत चा परिसर त्यांनी शोध मोहीम राबवली. उसात गडाच्या कडेला शोध घेण्याचे काम बुधवारी सकाळपर्यंत सुरू होते. त्या ठिकाणी बिबट्याचे ठसे आढळून आले .मात्र दिसला नाही. त्याचप्रमाणे शोधमोहीम चालू आहे.

Categories
सातारा

गावच्या निवडणुकीवर चांडाळ चौकड्या करणाऱ्याची कुरघोडी नजर….

आशिष चव्हाण / वाई प्रतिनिधी
दि.६

तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक लागलेली आहे पंचवार्षिक निवडणुकीत जोरदार प्रचार व धुराळा उडण्यास सुरुवात झालेली आहे अनेक वर्षे गावाची सत्ता भोगुनही आजी-माजी सरपंचासह नामधारी गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती जोर-बैठका मारण्यास सुरुवात करीत आहेत काहीही झालं तरी ग्रामपंचायतीमध्ये सत्तेचे वाटेकरी होण्यासाठी एकमेकांच्या विरुद्ध षड्यंत्र चा कार्यक्रम सुरू झाला आहे. गावचा विकास झाला नाही तरी चालेल पण ग्रामपंचायत सत्ता हस्तगत झाली पाहिजे या इर्षेने पेटलेल्या गावा गावातील चांडाळ चौकडी ने ग्रामपंचायत निवडणुकीवर डोळा ठेवलेला आहे. आज हि गावाच्या समस्या जैसे थे आहेत तरीदेखील खोटे आश्वासन देऊन पुन्हा सत्तेत येण्याचा प्रयत्न चालू झाला आहे.वाई तालुक्‍यातील 99 ग्रामपंचायती पैकी 76 गावांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाले आहे शासनाच्या धोरणामुळे गावच्या विकासासाठी येणारा निधी हा ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा होत आहे तसेच सरपंच व उपसरपंच यांचा निधीदेखील वाढलेला आहे. निवडणूक आली की तेवढ्यापुरतेच नेतेमंडळी जमा होतात. जो तो गावचा विकास करेन असं बोलतो परंतु निवडणूक झाल्यानंतर ते सगळे विसरून जातात. महिलांना 35 टक्के आरक्षण मिळाल्यामुळे राजकीय पटलावर त्यांना संधी मिळाली आहे. परंतु घोटाळे जास्त झाले असल्या कारणामुळे चांगल्या महिला राजकारणातून बाजूला निघून जातात. त्यामुळे महिलांच्या आरक्षण हे फक्त कागदावरच दिसून येते गावातील नेतेमंडळी त्यांच्या पत्नी किंवा जवळील महिला सरपंच किंवा सदस्य पाहायला मिळतात. प्रत्येक गावातील युवती युवक किंवा महिला यांना निवडणूक लढवण्याची तीव्र इच्छा असते परंतु गावटगे यांच्यामुळे कर्तृत्ववान युवक व महिला राजकारणापासून दूर जातात. सतत पाच वर्ष सत्ता भोगून देखील पुन्हा गावाला वेठीस धरण्यासाठी मी नाहीतर माझी बायको असा अट्टाहास करुन गावचा विकासाला खीळ घालण्याचे काम करत असतात असे होऊन देखील गावचे अनेक प्रश्न प्रलंबित राहून गेलेले दिसून येतात याला जबाबदार कोण असा प्रश्न प्रत्येक गावातील ग्रामस्थ करीत असतो.

Categories
सातारा

माजी सहकार मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांचे दुःखद निधन.


प्रतिनिधी मयूर जाधव .

सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून ओळखले जाणारे माजी सहकारमंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांचे सातारा येथे दुःखद निधन झाले त्यांच्या निधनाने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
विलासराव पाटील-उंडाळकर यांनी 1967 साली राजकारणात प्रवेश केला सातारा जिल्हा बँकेचे संचालक म्हणून प्रवेश केल्यानंतर गेली पाच दशके ते जिल्हा बँकेवर संचालक म्हणून कार्यरत होते 1962 आली जिल्हा बँकेत प्रवेश केल्यानंतर जवळ पास तेरा वर्षे सक्रिय राजकारणात ते कार्यरत होते . त्यानंतर त्यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून सलग ३5 वर्ष त्यांनी राष्ट्रीय कॉंग्रेसचे प्रतिनिधित्व केले 1999 साले राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर सातारा जिल्ह्यात कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून विलासराव पाटील-उंडाळकर यांनी अबाधित ठेवला होता.
2014 सली विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विलासराव पाटील-उंडाळकर यांचा पराभव केला होता त्यावेळी अपक्ष निवडणूक लढविणारे विलासराव पाटील उंडाळकर यांनी राष्ट्रीय काँग्रेस चा विचारधारेपासून फारकत न घेता आपली तत्वे विचार आणि निष्ठा कायम ठेवली होती.
तीन महिन्यापूर्वी जिल्ह्यात पुन्हा राष्ट्रीय कॉंग्रेस बळकट करण्यासाठी सर्व मतभेदांना तिलांजली देत विलासराव पाटील-उंडाळकर यांनी आणि माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण हे दोन नेते एकत्र आले होते. ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसचे कार्यकर्ते एकदिलाने निवडणूक लढवत असताना विलासराव पाटील उंडाळकर यांच्या निधनाने राष्ट्रीय काँग्रेसला जबर धक्का बसला.

मागील काही दिवसांपासून विलासराव पाटील-उंडाळकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर सातारा येथे उपचार सुरू होते उपचारादरम्यान त्यांचे दुःखद निधन झाल्याने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे

Categories
सातारा

दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी फॉर्म सतरा भरण्यासाठी २५ जानेवारीपर्यंत मुदत


पाटण हिंदू सम्राट प्रतिनिधी उमेश सुतार यांजकडून
पुणे – दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी खासगीरीत्या म्हणजे फॉर्म नंबर १७ भरून नावनोंदणी करण्यासाठी ११ जानेवारीपासून अर्ज करता येईल. यासाठी २५ जानेवारीपर्यंत मुदत असून, हे अर्ज आणि शुल्क ऑनलाइन भरावे, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आले.

अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन शुल्क भरल्याची पावती तसेच मूळ कागदपत्रे संबंधित शाळेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयात जमा करायचे आहे. यासाठी १२ ते २७ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तसेच शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांचे अर्ज, ऑनलाइन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याच्या पावतीची एक छायाप्रत, मूळ कागदपत्रे आणि यादी विभागीय मंडळाकडे दोन फेब्रुवारीपर्यंत जमा करता येणार आहे, अशी माहिती मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या प्राप्त अर्जातील दुरुस्त्या १० जानेवारीपर्यंत विभागीय मंडळामार्फत करण्यात येणार आहेत.

यासाठी संबंधित विद्यार्थ्यांनी आपली शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत विभागीय मंडळाशी संपर्क साधावा, असे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे. ऑनलाइन अर्ज भरताना कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्रमांक : ०२०-२५७०५२०७/ २५७०५२०८, तसेच इतर बाबींसाठी २५७०५२७१ वर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य मंडळाने केले आहे.

Categories
सातारा

दुर्देवी ! नववर्षाच्या स्वागतासाठी फटाक्यांची आतषबाजी केल्याने रस्त्यावर मरुन पडले शेकडो पक्षी


पाटण हिंदू सम्राट प्रतिनिधी उमेश सुतार यांजकडून

जगभरातील विविध देशांनी नववर्षाचं स्वागत मोठ्या उत्त्साहात केलं. फटाक्यांची आतषबाजी आणि रोषणाई करुन सरत्या वर्षाला निरोप देण्यात आला. इटलीमध्येही नवीन वर्षाच्या स्वागतचा उत्साह पाहायला मिळाला. पण यादरम्यान एक दुर्दैवी घटना घडली.

इटलीची राजधानी रोममध्ये नागरिकांनी रस्त्यावर उतरुन मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी केली. पण यामुळे शेकडो पक्षी मरून पडले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून राजधानी रोमच्या रस्त्यावर अनेक मृत पक्ष्यांचा खच पडल्याचं दिसतंय. इटलीतील प्राणी-पक्षी अधिकार संरक्षण कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून हे एकप्रकारचं ‘हत्याकांड’ असल्याचं म्हटलं आहे.

अचानक इतक्या पक्ष्यांच्या झालेल्या मृत्यूचं नेमकं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. पण आंतरराष्ट्रीय प्राणी संरक्षण संघटनेने, मध्यरात्री अचानक झालेल्या फटाक्यांच्या कर्कश्य आवाजाने पक्षी घाबरले आणि जीव वाचवण्यासाठी उडण्याचा प्रयत्न केला असावा पण अंधारात घरांच्या खिडक्यांना ठोकल्याने किंवा उडताना एकमेकांना धडकल्याने आणि उच्च व्होल्टेज विद्युत केबल्समध्ये अडकल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता वर्तवली आहे. जीव जाण्याच्या भीतीने घाबरल्यामुळे पक्ष्यांचा मृत्यू झालेला असू शकतो, किंवा हृदयविकाराचा झटका आल्यामुळेही पक्ष्यांचा मृत्यू होऊ शकतो, असं संघटनेच्या प्रवक्त्या लोरिडेना डिग्लीओ (Loredana Diglio) यांनी सांगितलं. फटाके फोडल्यामुळे दरवर्षी अनेक वन्य आणि पाळीव प्राणी जखमी होत असतात, असंही डिग्लीओ यांनी नमूद केलं.

विशेष म्हणजे रोममध्ये फटाके फोडण्यावर बंदी आहे, त्यातच करोनामुळे रात्री 10 नंतर बाहेर फिरण्यास नियमावली घातली आहे.

Categories
सातारा

एस पी फायनान्स ॲकॅडमीच्या उद्घाटन प्रसंगी स्वप्निल जोशी व गणेश भाऊ मोहिते

सातारा प्रतिनिधी – केदार जाधव

एस पी फायनान्स अकॅडमीच्या फ्रांसीसी च्या उद्घाटन प्रसंगी मराठीतील प्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी यांच्या हस्ते ओपनिंग करण्यात आले याप्रसंगी उपस्थित मान्यवर एस पी फायनान्स अकॅडमी चे संस्थापक सचिनजी बानगुडे, राजेशजी पारखे, बबनशेठ चौगुले, इंद्रजीत पाटील संदीप सर दळवी व गणेशजी मोहिते मनीषा मोहिते सर्व फॅन्सी सी चे पदाधिकारी व स्मिताताई लोंढे उपस्थित होते एस पी फायनान्स अकॅडमी कन्सल्टन्सी चे प्रोप्रायटर गणेश मोहिते यांनी स्वप्नील जोशी व सचिनजी बानगुडे या सर्वांचे आभार मानले

Categories
सातारा

कृष्णा कॅनॉलमधील जलपर्णीची स्वच्छता न केल्यास कार्यकारी अभियंत्याच्या दालनात जलपर्णी टाकणार बळीराजा शेतकरी संघटनेचा इशारा

सातारा जिल्हा प्रतिनिधी- केदार जाधव कृष्णा कॅनॉल ते गोवारे हद्दीतून जाणारा क्यानल जलपर्णी च्या विळख्यात लवकरात लवकर साफ सफाई केली नाही तर बळीराजा शेतकरी संघटना बैलगाडीत जलपर्णी भरुन कार्यकारी अभियंता रेड्डीयार साहेब टेंभू सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभाग ओगलेवाडी यांच्या कार्यालयात नेऊन टाकणार मागील वर्षी अतिवृष्टीत मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झाले क्रुष्णा क्यानल हा सैदापूर चौंडेश्वरी नगर गोवारे हनुमान नगर या हद्दीमधून जातो पुढे जातो अतिवृष्टी त क्यानल चा बराच भाग खचला खचलेल्या काही भागांमध्ये तातडीचे उपाय म्हणून संरक्षक भिंत बांधली परंतु चौंडेश्वरी नगर लगत मोठ्या प्रमाणात क्यानल खचला आहे परंतू प्रशासनाचे याकडे झाले आहे चौंडेश्वरी नगर गजानन सोसायटी गोवारे हनुमान नगर या ग्रामपंचायत हद्दीतील नागरीक क्यानाल लगतच्या रस्त्याचा वापर दळणवळणा साठी मोठ्या प्रमाणावर करतात विद्यार्थी विद्यार्थिनी ही याच रस्त्यावरून शाळा कॉलेज ला जात असतात ढासळलेल्या क्यानलमुळे एखादा विद्यार्थी दगावला तर याला जबाबदार कार्यकारी अभियंता हेच राहतील क्रुष्णा क्यानल ते गोवारे हद्दीपर्यंत क्यानलमध्ये जलपर्णी या वनस्पतीचा विळखा मोठ्या प्रमाणात पडला आहे त्यामुळे क्यानलला धोका निर्माण झाला आहे तात्काळ कार्यकारी अभियंता यांनी लक्ष घालून क्यानल ची स्वच्छता करून जलपर्णी ची विल्हेवाट लावावी अन्यथा बळीराजा शेतकरी संघटना बैलगाडीत जलपर्णी भरुन कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात नेऊन टाकणार याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील असे बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी सांगितले

Categories
सातारा

पेण मळेघरवाडी प्रकरणी आवश्यक चौकशी प्रक्रिया पूर्ण करून जलद गतीने आरोपपत्र दाखल करणार : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

पीडित बालिकेच्या कुटुंबियांना मनोधैर्य व दक्षता समिती योजनेमधून तात्काळ मदत करण्याचे जिल्हाधिकार्‍यांना दिले निर्देश बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) रायगड जिल्ह्यातील पेण मळेघरवाडी प्रकरणामध्ये आवश्यक ती चौकशी करून, जास्तीत जास्त पुरावे गोळा करून लवकरात लवकर परिपूर्ण आरोपपत्र दाखल केले जाईल, जेणेकरून आरोपीस जास्तीत जास्त कडक शिक्षा होईल, असे प्रतिपादन राज्याचे गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, पणन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज येथे केले. आज सकाळी त्यांनी पेण येथे पीडित बालिकेच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी गृह (ग्रामीण), वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई हे पीडित बालिकेच्या कुटुंबियांच्या घरी आले असता ते बोलत होते.

यावेळी आमदार महेंद्र दळवी, पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार,आदिवासी प्रकल्प अधिकारी श्रीमती अहिरराव,पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव,पेण तहसिलदार अरुणा जाधव उपस्थित होते.
यावेळी गृह (ग्रामीण), वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, पेण मळेघरवाडी येथील घटना ही निश्चितच अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या प्रकरणाचा तपास काटेकाेरपणे पूर्ण करुन लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल करण्यात येईल. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात येणार असून या खटल्यासाठी प्रख्यात ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तर पीडितेच्या कुटुंबियांना या घटनेतून सावरण्यासाठी शासनाच्या मनोधैर्य याेजना व दक्षता समितीच्या माध्यमातून पीडित बालिकेच्या कुटुंबाला तात्काळ मदत करण्याचे त्याचबराेबर पीडित कुटुंबाच्या राहत्या घराची परिस्थिती पाहून ते घर शासनाच्या योजनेतून परिपूर्ण बांधून देण्याची आवश्यक ती कार्यवाही त्वरित करावी, असे त्यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना निर्देश दिले.

Categories
सातारा

सातारा तालुक्यात सर्वाधिक रूग्णवाढ


पाटण हिंदू सम्राट प्रतिनिधी उमेश सुतार यांजकडून
कराडसह आठ तालुक्यात एक अंकी रूग्णवाढ
जावली, पाटण तालुका निरंक
कोरेगांवला 8 तर माणला 7 बाधित
महाबळेश्वरला 3 बाधित
एकाही बाधिताचा मृत्यू नाही

नव्या वर्षाची चाहूल लागली असतानाच सरत्या वर्षात कराड, जावली, वाई, खंडाळा, कोरेगांव तालुक्यात कोरोना वाढीचा वेग मंदावला आहे. सातारा तालुक्यात वाढीचा वेग आणखी कमी होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. दरम्यान जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 75 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असलयाची अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये

सातारा तालुक्यात 28 बाधित
सातारा 10, गुरुवार पेठ 1, शुक्रवार पेठ 4, सदरबझार 3, गडकर आळी 2,लोधावडी 1, पाटखळ 2, जिहे 1, देगाव रोड 1, अतित 1, आसनगाव 1, नुने 1,

कराड तालुक्यात 2 बाधित
विद्यानगर 1, कोयना वसाहत 1,

फलटण तालुक्यात 4 बाधित
ननवरे वस्ती 1, कोळकी 1, चव्हाणवाडी 1, साखरवाडी 1, मुरुम

खटाव तालुक्यात 7 बाधित
आबाचीवाडी 1, वडूज 1, खटाव 2, अंबवडे 2, निमसोड 1,

माण तालुक्यात 7 बाधित
वरकुटे मलवडी 1, म्हसवड 3, मार्डी 1, दहिवडी 1, गोंदवले बु 1,

कोरेगाव तालुक्यात 8 बाधित
कोरेगाव 1,एकसळ 1, वाठार किरोली 2, दुघी 1, रहिमतपूर 1, आदर्की 1, अंबवडे 1,

खंडाळा तालुक्यात 3 बाधित
धावरवाडी 1, शिरवळ 1, सांगवी

  1. वाई तालुक्यात 5 बाधित
    पसरणी 2, व्याहळी 3 महाबळेश्वर तालुक्यात 3 बाधित
    महाबळेश्वर 2, पाचगणी 1

इतर 3
अंधोरी 1, बेलवडे 1, तडवळे 1

बाहेरील जिल्ह्यातील 2
बारामती 2,

गुरूवारपर्यंत जिल्ह्यात
एकूण नमुने -285111
एकूण बाधित -54831
घरी सोडण्यात आलेले -51918
मृत्यू -1795
उपचारार्थ रुग्ण-1118

Categories
सातारा

लोणंदमध्ये श्री भैरवनाथ डोंगर मॉर्निंग वॉक ग्रुपच्या सदस्यांचा कौतुक सोहळा संपन्न

सातारा,खंडाळा तालुका प्रतिनिधी/ मंगेश माने

लोणंद -ता.खंडाळा येथील श्री भैरवनाथ डोंगर ग्रुपच्या वतीने महाराष्ट्राचे एव्हरेस्ट कळसुबाई शिखरावर तिरंग्यातुन महाराष्ट्राचा नकाशा साकारत शहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली होती.तसेच मालवण – तारकर्लीच्या अरबी समुद्रात ३२१ फुट तिरंगा फडकावित विजय दिवस साजरा करण्यात आला होता.या दोन्ही उपक्रमाने लोणंदचे नाव हे चांगले प्रकाशझोतात आलेले आहे.या ग्रुपने ऐतिहासिक अशीच कामगिरी केल्याने ग्रुपवर कौतुकांचा वर्षाव होतो आहे.
यांमध्ये सहभागी झालेल्या भैरवनाथ डॉगर ग्रुपच्या सर्व सदस्यांचा सन्मान व कौतुक सोहळा हा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत असताना यावेळी अ‍ॅड.बाळासाहेब बागवान,माजी समाजकल्याण सभापती आनंदराव शेळके पाटील, मुख्याधिकारी हेमंत ढोकले, सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी,
नगराध्यक्ष सचिन शेळके-पाटील,विरोधी पक्षनेते राजेंद्र डोईफोडे,माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव शेळके-पाटील
नगरसेवक हणमंतराव शेळके पाटील,नगरसेवक विकास केदारी, डॉ.मकरंद डोंबाळे, रमेश अण्णा कर्णवर,
सुरेश जाडकर, भिकू दादा कुरणे, राहुल घाडगे,शामसुंदर डोईफोडे, रवींद्र क्षीरसागर ,विश्वासराव शिरतोडे,
डॉ.नितीन सावंत, विश्वनाथ शानभाग, प्रवीण चांदवडकर
डॉ.देशमुखे, विठ्ठल टेंगळे, लोणंद फौंडेशनचे अध्यक्ष
दयानंद खरात, विनय रावखंडे, मस्कु अण्णा शेळके पाटील, साथ प्रतिष्ठाणचे अध्यक्ष कय्युम मुल्ला,
संतोष जाधव, भगवान घाडगे,भरत बोडके,दीपक बाटे
सुनील शहा आदींसह इतर मान्यवर व डोंगर मॉर्निंग ग्रुपचे सदस्य, लोणंद रनर्स ग्रुप सदस्य तसेच सातारा
सॅटरडे ट्रेकरर्सचे सदस्य उपस्थित होते.

डोंगर ग्रुपच्या उपक्रमाचे विशेष कौतुक करताना सपोनि संतोष चौधरी यांनी भैरवनाथ डोंगर ग्रुपची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.डोंगरावर वृक्ष संवर्धन करण्याचा मानस ग्रुपकडुन चांगल्या प्रकारे जपला जात आहे.डोंगर ग्रुपच्या वतीने डोंगरावर झाडे लावली जात आहेत.परंतु काही विघ्नसंतोषी लोकांकडून चुकीचे प्रकार केले जात आहेत.वणवा लावण्याचे प्रकार थांबले पाहिजेत.अशा प्रतिक्रिया यावेळी देण्यात आल्या.उपक्रमात सहभागी असलेले लहानांपासून ते मोठ्यांपर्यंतच्या तसेच वैयक्तिक रित्या विशेष कामगिरी पार पाडलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.यावेळी काही मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.यावेळी ग्रुप सह ग्रुपचे संस्थापक शशिकांत जाधव आणि ज्यांच्या संकल्पनेतून हे उपक्रम पार पडले ते एव्हरेस्टवीर प्राजित परदेशी यांचे ही विशेष कौतुक करण्यात आले.तसेच शंभूराज भोसले, तानाजीराव धायगुडे, डॉ.अविनाश शेळके,संभव शहा यांनी मोहिमेतील स्वतःचे अनुभव सांगितले.यावेळी सन्मान सोहळ्याचे प्रास्ताविक हेमंत निंबाळकर यांनी केले.सूत्रसंचालन राजेंद्र काकडे आणि हनुमंत बोराटे यांनी केले.तर आभार प्रदर्शन संदीप शेळके यांनी मानले.

Categories
सातारा

नव्या वर्षांत १५० ई-बसची पुणेकरांना भेट

पाटण हिंदू सम्राट प्रतिनिधी उमेश सुतार यांजकडून

केंद्र सरकारच्या फेम-२ योजनेअंतर्गत पीएमपी विजेवर धावणाऱ्या (इलेक्ट्रिकल बस- ई-बस) १५० गाडय़ा भाडेतत्त्वावर घेणार आहे. नव्या वर्षांत या गाडय़ा टप्प्याटप्प्याने पीएमपीच्या ताफ्यात दाखल होणार असून प्रति बस ५५ लाख रुपयांचे अनुदान पीएमपीला केंद्र सरकारकडून मिळणार आहे. नव्याने गाडय़ात प्राप्त होणार असल्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील प्रवाशांना उच्च दर्जाची सुविधा मिळेल, असा दावा पीएमपीकडून करण्यात आला आहे.

केंद्र सरकारकडून फास्टर अ‍ॅडॉप्शन अ‍ॅण्ड मॅन्युफॅ क्चरिंग ऑफ इलेक्ट्रिकल व्हेइकल्स-२ ही योजना हाती घेण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पीएमपीने ६०० ई-बससाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारला दिला होता. केंद्र सरकारने १५० गाडय़ा भाडेकराराने घेण्यास मान्यता दिली आहे. त्याबाबतची माहिती खासदार गिरीश बापट आणि पीएमपीचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र जगताप यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने या वेळी उपस्थित होते.

केंद्र सरकारकडून प्रति बस ५५ लाख रुपये पीएमपीला मिळणार आहेत. त्यामुळे पीएमपीने ई-बस साठीची निविदा प्रक्रिया राबविली होती. मात्र योग्य दर प्राप्त न झाल्यामुळे ही निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली. त्याबाबतची माहिती केंद्र सरकारला दिल्यानंतर केंद्राने ३१ डिसेंबपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यास पीएमपीला मुदतवाढ दिली होती, असे डॉ. राजेंद्र जगताप यांनी सांगितले. शहराची वाढती लोकसंख्या, इंधनवाढ अशा कारणांमुळे पीएमपीचा तोटा वाढत आहे. नागरिकांच्या सोईसाठी ६०० ई-बस खरेदीचे नियोजन आहे. ई-बस मुळे प्रदूषणमुक्त सेवा प्रवाशांना मिळणार असल्याचे खासदार गिरीश बापट यांनी सांगितले.

Categories
मायणी सातारा

खटाव माण अँग्रोचे १५ डिसेंबर पर्यंतचे बिल २५०० रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग

मायणी : सातारा खटाव तालुका विशेष प्रतिनिधी तानाजी चव्हाण दि.३०/१२/२०२०

खटाव माण साखर कारखान्याच्या द्वितीय गळीत हंगाम २०२०-२१ चा गळीताचे दि १६ नोव्हेंबर ते दि १५ डिसेंबर २०२० पर्यंतचा पहिल्या बिलाचा दुसरा टप्पा २५०० रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन,माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी दिली.
खटाव माण तालुका अँग्रो प्रो लि पडळ कारखान्याच्या कार्यस्थळी चेअरमन प्रभाकर घार्गे, को-चेअरमन मनोजदादा घोरपडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे व संचालकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत हा निर्णय सर्वानुमते जाहीर करण्यात आला.
यावेळी बोलताना प्रभाकर घार्गे म्हणाले, यंदाच्या हंगामातील आजपर्यंत दोन लाख एकसष्ठ हजार मेट्रिक टनाचे उसाचे विक्रमी गाळप खटाव माण अँग्रो ने केले आहे, चांगल्या पर्जन्यमानामुळे उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर वाढल्याने आज कारखान्याकडून शेतकऱ्यांच्या बिलास वेळेवर प्राधान्य देण्यात येत असल्यामुळे याठिकानची विश्वासहर्ता वाढून “खटाव माण अँग्रो” कडे उसाची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. गतवर्षी ऊस दिलेल्या सर्व शेतकऱ्यांना प्राधान्य देऊन राहिल्या अन्य ऊस पट्ट्यातील ऊसाला तोडणी यंत्रणा देऊन सर्व उसाची आवक कारखान्यात होऊन भागातील शेतकऱ्यांना दिलासा देणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
या वेळी कारखान्याचे को-चेअरमन मनोजदादा घोरपडे म्हणाले, साखरेच्या गुणवत्तेत खटाव माण अँग्रोने महाराष्ट्रात अव्वल दर्जा मिळवला असून कारखान्यातील अन्य उत्पादने ही कारखान्यातून विक्री होत आहेत. त्यामाध्यमातून खटाव माण बरोबर कराड उत्तर मध्ये शेतकऱ्यांत निर्माण झालेल्या विश्वासामुळे त्यांच्या हितासाठी कारखान्याबरोबरच जास्तीतजास्त शेतकऱ्यांना आर्थिक दृष्टया सक्षम बनवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे मत मनोजदादा घोरपडे यांनी व्यक्त केले.

Categories
कला व मनोरंजन सातारा

ग्रामिण तरुणांनी मराठी सोबतच हिंदी चित्रपटसुष्टीत करीअर करावे – रोहीत काटे


सातारा पाटण तालुका प्रतिनिधी महेश मस्कर
चित्रपट सृष्टी मध्ये करीअर करण्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत . ग्रामिण कलाकारांच्यात टँलेंट असुन शाँर्टफिल्म , वेबसिरीज या माध्यमातुन अनेक ग्रामिण कलाकारांनी आपल्यातील कला दाखवुन दिली आहे . तरीसुद्धा मराठी हिंदी टि.व्ही.सिरीयल व चित्रपटांमध्ये योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने ग्रामिण कलाकारांना अनेक आवाहनांना सामोरे जावे लागते.ग्रामिण कलाकारांनी चित्रपटसृष्टी मध्ये करीअर करावे या साठी मुंबई येथील मराठी व हिंदी चित्रपट क्षेत्रातील प्रोडक्शन मँनेजर रोहीत काटे R. K. लवकरच बारामती मध्ये SHOW TALENT – आर्टस & एन्टरटेनमेंट या नावाने कार्यालय सुरू करत आहेत व त्या माध्यमातुन चित्रपटांची निर्मिती करणार आहेत तसेच आगामी बहुचर्चित 9वी पास या चित्रपटाचे शुटींग सुद्धा याच भागात करणार असुन स्थानिक कलाकारांना प्राधान्य राहील असे यावेळी स्पष्ट केले. तरी स्थानिक कलाकारांनी 7998313236 या नंबर वर संपर्क साधुन अधिक माहीती घेत रहावी अशी विनंती केली.

Categories
सातारा

शिक्षक बँकेच्या विद्यमान चेअरमन यांनीच काढले नियमबाह्य कर्ज…..

कोरेगाव तालुका प्रतिनिधी- अभिजीत लेंभे

शिक्षक समितीच्या संचालकांची जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रार…..
कोरेगाव तालुका प्रतिनिधी अभिजित लेंभे
प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि सातारा ही सातारा जिल्ह्यातील सहकारी बँकात नावलौकिक मिळवलेली एक बँक आहे. या बँकेबाबत समाजातही अजून चांगली प्रतिमा आहे. अनेक शिक्षक सभासदांचे संसार या बँकेच्या अर्थसहाय्यातून उभे राहिले आहेत. परंतु या बँकेच्या मागे लागलेला बोगस कर्ज प्रकरणांचा ससेमिरा अजूनही चालूच आहे.
मागील काही दिवसात कराड शाखेतील नियमबाह्य कर्ज प्रकरणाचा पर्दाफाश शिक्षक समितीच्या संचालकांनी अचानक भेटीवेळी केला होता. त्याबाबतची लेखी तक्रारही मा.जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे केली आहे. तदनंतर सातारा शाखा तपासणीत चक्क विद्यमान चेअरमन यांनीच नियमबाह्य कर्ज प्रकरण केल्याचे लक्षात आले. सातारा शाखेतील कर्जांचे रोखे तपासत असताना विद्यमान चेअरमन यांनी खोटे दस्तऐवज सादर करून बँकेची फसवणूक केल्याचे आढळले. पगाराचे खोटे दाखले सादर करून ६० लाख रुपये कर्जाचा लाभ चेअरमन यांनी घेतलेला आहे. दिनांक ११डिसेंबर २०२० ची सर्व कर्ज प्रकारातील विद्यमान चेअरमन यांची बँकेला येणे रक्कम तब्बल ६३ लाख २५ हजार ३४१ रुपये इतकी प्रचंड प्रमाणात असल्याचे पाहणीत आढळले.
एक महिन्यापूर्वी बँकेची कर्ज मर्यादा ६० लाख रुपये होती. मग यांच्याकडे असणारी ६३ लाख २५ हजार ३४१ रुपये येणे बाकी कोणत्या नियमात बसली? बँकेच्या प्रमुख पदावर काम करणाऱ्या व्यक्तीने सर्व नियम पायदळी तुडवले तरी चालतील असेच याला म्हणावे लागेल. नियम करणारे यांचीच कर्ज मर्यादेचे उल्लंघन केले आहे. सभासदांचा एखादा कागद राहिला असेल तरी त्याला कर्ज मिळत नाही.मग विद्यमान चेअरमन यांनी पदाचा गैरवापर करून कर्मचाऱ्यांच्या वर दबाव आणूनच ही कर्ज प्रकरणे केल्याचे निष्पन्न होत आहे . गत संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये कोणताही विषय आलेला नसताना व कोणालाही विचारात न घेता कर्जमर्यादा ६० लाखावरून ६२ लाख केली. ती केवळ स्वतःसाठीच केली हे आज यावरून स्पष्ट होते.
विद्यमान चेअरमन यांची नेमणूक ७/८/१९९२ असून यावेळी लागलेल्या शिक्षकांचा पगार साधारणपणे ७८ हजार असा आहे. परंतु त्यांनी दिनांक ३०/१२/२०१९ रोजी सादर केलेल्या पगार दाखल्यात ९४,७२०/- रुपये पगार दाखविला आहे. यामध्ये कपाती केवळ २८२० इतक्याच आहेत. गमतीची बाब म्हणजे तदनंतर दिनांक २१/९/२०२० रोजी केलेल्या कर्ज प्रकरणाचा पगार दाखला केवळ ९२,५००/- रुपयांचा आहे. म्हणजेच विद्यमान चेअरमन यांचा पगार पुढील वर्षी वाढण्याऐवजी २,२२० रुपयांनी कमी झाला. केवढी ही पगारातील तफावत व सादर केलेल्या माहितीतील दिशाभूल!
त्यांच्या पगारात ६० लाख रुपये कर्ज कसे बसले हाच मोठा संशोधनाचा विषय आहे. ६० लाख रुपये कर्ज काढण्यासाठी कोणत्याही कर्जदाराचा पगार कमीत कमी एक लाख रुपये तरी असायला हवा असे बँकेतील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.परंतु विद्यमान चेअरमन यांचा पगार ७८ हजार असून बँकेची कपात पगार पत्रकात केवळ ६००/- इतकी आहे.मग पगारातून कपात करून कर्ज हप्ते भरणेचा नियम चेअरमन यांना नाही का?
बँकेच्या प्रमुख पदावर असणाऱ्या व्यक्तीनेच अशी नियमबाह्य खोटे दस्तऐवज सादर करून कर्ज काढले असेल तर बँके चा कारभार कोणत्या थराला जाऊन पोहोचला आहे हे सर्वसामान्य स्वतःला वेगळे सांगायला नको.
“तळे राखील तो पाणी चाखील” अशी एक जुनी म्हण ऐकली होती. परंतु इथे पाणी चाखण्याऐवजी तळेच गिळंकृत करण्याचा प्रकार पुढे आला आहे.
याबाबत मागील बोगस कर्ज प्रकरणे व या बरोबरच विद्यमान चेअरमन यांच्या सर्व कर्ज प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी शिक्षक समितीचे संचालक श्री किरण यादव,श्री शिवाजी शिंदे,श्री चंद्रकांत मोरे,श्री सुभाष शेवाळे यांनी केली आहे.निःपक्षपाती पणे चौकशी न झाल्यास मा सहकार आयुक्त पुणे यांची भेट घेऊन शिक्षक बँकेचे “स्पेशल ऑडिट” करण्याची मागणी करणार असल्याचे यावेळी समितीच्या संचालकांनी सांगितले.

Categories
अहमदनगर ब्रेकिंग न्युज सातारा

माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे जानेवारीत सातारा येथे राज्यस्तरीय अधिवेशन


अहमदनगर- कमलेश शेवाळे


महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांच्या ऑनलाइन गूगल मिटद्वारे बैठकीत निर्णय–दिपक कांबळे.

मनुष्य हा समाजशील प्राणी असून समाजात वावरतांना त्याला अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो. समाजाच्या तळागाळातील लोकांवर होणारा आत्याचार अधिकारी वर्गाची दडपशाही विविध संस्थांमध्ये होत असलेला भ्रष्टाचार आधी सर्वच गोष्टींवर जाणीवपूर्वक लक्ष ठेवून त्यांना न्याय कसा मिळवून देता येईल व संघटनेच्या मजबूत बांधणीसाठी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती चे राज्यस्तरीय अधिवेशन लवकरच सातारा येथे घेण्यात येणार असून पत्रकारांवर होत असलेले हल्ले रोखण्यासाठी व त्यांना शासनाच्या मार्फत संरक्षण मिळावे हे एकमेव उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून राज्यस्तरीय माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती आणि पोलिसमित्र समितीच्या महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी यांची ऑनलाईन गुगल मिट द्वारे बैठक घेण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष दीपक कांबळे यांनी दिली आहे.
यावेळी २४ जानेवारी रोजी सातारा येथील राज्य स्तरावर होणाऱ्या मेळाव्याचे नियोजना संदर्भात महत्वाची व साधक बाधक चर्चा करण्यात आली असून या बैठकीत राष्ट्रीय महासचिव कमलेश शेवाळे यांनी संघटनेचे उद्दिष्ट सांगितले व कामकाज कशाप्रकारे करावे ? याबद्दलचे मार्गदर्शन केले तसेच महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महेश सारणीकर, राष्ट्रीय अध्यक्ष दिपक कांबळे यांनी संघटनेच्या कामात पुढील काळात कोणते बदल केले जातील व आपली संघटना कशाप्रकारे वाढवावी लागेल ? संघटनेची ध्येय धोरणे कशा पद्धतीने अमलात आणता येतील? याबद्दलची सविस्तर माहिती दिली.तसेच महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अमर बेंद्रे व आपल्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक कांबळे यांनी भविष्यात राज्यस्तरीय अधिवेशन घेण्यासंदर्भात माहिती दिली.
या बैठकीत माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती मार्फत महाराष्ट्रामध्ये भव्यदिव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे, तसेच मेळाव्यास अधिकाधिक पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवावी, विभागीय, जिल्हा व तालुका कार्यकारिणी नियुक्त्या.व्हॉटस अप ग्रुप अनावश्यक मेसेज ग्रुप वर टाकण्यास मनाई,मेळाव्याच्या नियोजनासंदर्भात सर्व पदाधिकारी यांच्यामध्ये चर्चा, संघटनेच्या कामकाजा संदर्भात ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणून संघटनेचे मोबाईल ॲप बनवणार आहेत या ॲपचे मेळाव्या दरम्यान ओपनिंग करण्याचे आयोजन तसेच मेळावा संदर्भात अधिक माहिती येत्या दिनांक ६ किंवा ७ जानेवारी दरम्यान “पूर्व नियोजन बैठक” घेऊन संपूर्ण माहिती प्रसारित करण्यात येणार आहे.,हा संघटनेचा मेळावा होत असल्याने संघटनेतील सर्व पदाधिकारी विभागीय अधिकारी जिल्हाधिकारी यांनी मेळाव्यास संदर्भात आपल्या विभागातून किती पदाधिकारी उपस्थित राहणार आहे यासंदर्भात पूर्वसूचना द्यावयाच्या आहेत,या मिटिंग मध्ये संघटनेचे फेसबुक अकाउंट मध्ये जॉईन होण्यास विनंती केली आहे हे अधिकाधिक पदाधिकारी व सर्वसामान्य लोकांपर्यंत या फेसबुक अकाउंट पोचवण्याची जबाबदारी सर्वांनी घ्यावी.
मेळाव्यादरम्यान सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची नियुक्ती पत्र मान्यवरांच्या हस्ते देण्याचे योजले आहे आदी विषयांवर साधक-बाधक चर्चा करण्यात आली.

यावेळी या गुगल मिटद्वारे घेण्यात आलेल्या बैठकीत माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे
दिपक कांबळे(राष्ट्रीय अध्यक्ष), कमलेश शेवाळे(राष्ट्रीय महासचिव),महेश सारणीकर(महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष),
वजीर शेख (पोलीस मित्र समिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष )
अमर बेंद्रे (महाराष्ट्र उपाध्यक्ष),पुष्कर सराफ (महाराष्ट्र उपाध्यक्ष),तुळशीराम जांभूळकर (महाराष्ट्र उपाध्यक्ष),
उमेश काशीकर (महाराष्ट्र उपाध्यक्ष),दिनेश शिंदे (महाराष्ट्र संघटक),सुभाष भोसले (महाराष्ट्र सचिव), चांदभैय्या शेख (महाराष्ट्र समन्वयक ),रामभाऊ आवारे (उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख), सुरेश संकपाळ्, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष,प्रशांत भोसले (पश्चिम महाराष्ट्र कार्याअध्यक्ष),नितीन गुरव (पुणे जिल्हाध्यक्ष),
शेखर बडगे(अमरावती जिल्हाध्यक्ष),सौ श्वेता व्हनमाने
(पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा ),सौ सोनाली पोतदार
(पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा),सौ शिल्पा बनपुरकर
(चंद्रपूर महिला जिल्हाध्यक्षा),महेंद्रकुमार देशमुख
(पोलीस मित्र सोलापूर जिल्हाध्यक्ष),पोपटराव कोळेकर
(पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष),दिलिप जाधव(पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष), विवेक कुंभे जकर पश्चिम महाराष्ट्र सचिव राजु कुलकर्णी(पुणे जिल्हा उपाध्यक्ष) आदींनी बैठकीत सहभाग नोंदवुन अडी अडचणी सोडविण्यासाठी अतिशय खेळीमेळीच्या व आनंदी वातावरणात ही बैठक पार पडली. तर पोलीस मित्र समितीचे प्रदेशाध्यक्ष वजीर शेख यांनी सांगितले की लवकरच पोलीस मित्र समिती ची महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल. सर्व मान्यवरांनी आपली मते, विचार मांडले त्यामुळे संघटनेची माहिती मिळाली अशाप्रकारे महिन्यातून एकदा बैठक बोलावली म्हणजे संघटनेचे कार्य कसे चालले आहे व पुढील कार्य कसे करायचे आहे यांचे मार्गदर्शन होईल .

Categories
गुन्हेगारी सातारा

नवऱ्याला लागते सासू, बायकोला पाहिजे दीर. लेकीकडून आईच्या हत्येची, घटनाच गंभीर..!


पाटण हिंदू सम्राट प्रतिनिधी उमेश सुतार यांजकडून

वासनेची विकृती वाढू लागली, की नातेसंबंधाची राख व्हायला वेळ लागत नाही. व्यभिचाराचा वणवा नात्यातच धुमसू लागतो, तेंव्हा माणुसकीला काळीमा फासणार्‍याच घटना घडतात. सोलापूरातील एका विधवेने प्रियकर शोधला. त्यानंतर जावयालाही मिठीत घेतले. हे मुलीला समजले तेंव्हा आई किंवा नवर्‍याला समजावण्यापेक्षा तिने दीराला जवळ घेणे पसंत केले. मुलगी दीराबरोबर अनैतिक संबंध ठेवते हे समजल्यावर आईला राग आला. ती त्या संबंधांना विरोध करू लागली. ‘तुला प्रियकर, जावई लागतो, मग मी दिराबरोबर का संबंध ठेवायचे नाहीत?’ असा सवाल करत मुलीने आईचा जीव घेतला. केवळ व्यभिचारामुळे आईच्या जीवावर मुलगी उठली, हे अत्यंत धक्कादायक, मन सुन्न करणारेच आहे. मुलांना वळण लावण्याची जबाबदारी आई नाही पार पाडणार तर कोण? आईच चुकीचे वागू लागली तर ती मुलीला सदाचार काय शिकवणार?
सोलालापूरातील कुमठा परिसरात असलेल्या लक्ष्मीनगर परिसरात लक्ष्मीबाई शिवाजी माने ही महिला रहात होती. तिला दोन मुली आणि एक मुलगा अशी तीन अपत्ये होती. प्रज्ञा आणि अनिता या दोन्ही मुलींचे विवाह झाले आहेत, तर मुलगा योगेश अजून शिक्षण घेत आहे. लक्ष्मीबाईच्या पतीचे पाच वर्षापूर्वी निधन झाले. ती एकाकी पडली. मुलींची जबाबदारी नसली, तरी मुलाची जबाबदारी होती. पण अनिताने भावाला आपल्याकडे नेले, त्यामुळे तिची जबाबदारी थोडी कमी झाली. त्यातच प्रज्ञाचे निधन झाले. मुलीच्या निधनाचे दु:ख आईला होणे स्वाभाविकच होते. एकामागोमाग येणारी संकटे, हलाखीची आर्थिक परिस्थिती, त्यामुळे उदरनिर्वाह करतांना होणारी ओढाताण, जीवनात आलेले एकाकीपण अशा अनेक समस्यांनी लक्ष्मीबाई घेरली होती. तिला कोणाचाच आधार उरला नव्हता. आपण कोणावर बोजा होऊ नये, या विचाराने ती काम करून स्वत:चा उदरनिर्वाह करत होती. मुलाच्या भविष्यासाठी काळजी करत होती.

पण एकट्या बाईकडे पहाणार्‍याची, समाजाची नजर अद्याप दुषितच आहे. लक्ष्मीबाई चाळीशीची होती. स्थूल शरीराची, काळी-सावळी पण नेटनेटकी रहाणारी होती. तिच्या मांसल स्थूल शरीराची टणकता उठून दिसत होती. त्या मांसल देहावर काही जणांची वासना जात होती. ती एकटी आहे, विधवा आहे, ती सहजपणे मिळू शकेल अशी भावना अनेकांच्या मनात येत असे. पण तिचे कोणाकडे लक्ष नव्हते. ती आपल्या आयुष्याचा गाडा ओढत होती.

ती काही घरांमध्ये धुण्या-भांड्याची कामे करत असे. कामाला जातांना ती शेअर रिक्षाने जात-येत असे. चाळीशी महिला, कष्टकरी त्यामुळे तिचे वागणे बिनधास्त होते. सर्वांशीच ती चांगले वागत होती, बोलत होती. त्यातूनच तिची रिक्षाचालक विजय परशूराम भोजे याच्याशी ओळख झाली. विजय रिक्षाचालक होता, एकटाच होता. दररोज रिक्षातून येणार्‍या लक्ष्मीबाईकडे तो आकर्षित झाला होता. तिच्यासाठी तो रिक्षा थांबवून ठेवत होता. तिच्या जाण्या-येण्याच्या वेळा त्याला माहित झाल्या होत्या. त्यावेळेत तो नेमका हजर होत असे. तिला रिक्षात घेऊन सेवा देत असे. रोजच्या संपर्काने त्यांच्यात ओळख वाढली. बोलता-बोलता त्याने तिच्याबद्दल सगळी माहिती काढून घेतली. स्वत:बद्दलही तिला सांगितले. दोघात वाढलेली ओळख कोणत्या थरावर जाईल याचा तिला पत्ता नव्हता, तो मात्र बरोबर पावले टाकत होता.

ती शरीराने स्थूल, जाड होती. त्यामुळे तिच्या ङ्खुगलेल्या शरीरात एक वेगळेच आकर्षण होते. मजबूत खांदे, भरलेली पाठ, उरोजांचे मोठे गोळे, फुगलेल्या पोटावर पडणार्‍या मांसल घड्या, जाडजुड मांड्या, मागे मोठे नितंबाचे गोळे पहाणार्‍याला मोहात पाडत होते. रिक्षात बसली की तिच्या छातीवरचा पदर बाजूला सरकायचा. तेंव्हा ब्लाऊजमधून बाहेर आलेले स्तनांचे गोळे पहाणार्‍याला घायाळ करत असत. विजयला तर हा नजारा रोजच पहायला मिळत होता, त्यामुळे तो तिच्यावर टपूनच बसला होता. त्याची नजर तिला कळली, तशी ती सावध झाली. हा रिक्षावाला काही चांगला विचार करत नाही असे म्हणत तिने त्याला टाळण्याचा प्रयत्न केला, पण तो काही तिचा पिच्छा सोडत नव्हता. त्याचे हे वागणे तिच्या मनात उत्तेजना वाढवू लागले. चाळीशीची एकटी बाई हळूहळू शरीरसुखासाठी उतावीळ होऊ लागली. अजून जवानी ओसरली नव्हती, पण पती निधनाने शरीरसुखापासून वंचित रहावे लागत होते.शरीर कोणाकडून तरी रगडून घ्यावे असे वाटत होते, पण तसा विश्‍वासाचा पुरूष नव्हता. आता तो पुरूष विजयमध्ये तिला दिसू लागला, त्यामुळे तिच्याकडून त्याला प्रतिसादाचे संकेत मिळू लागले. तो सुखावला. आता त्याने जास्तच जोर लावण्यास सुरूवात केली. तीही खुशीत आली होती. आग दोन्ही बाजूला लागल्याने आता कशाचाच अडसर नव्हता. तिच्या घरात ती एकटीच असल्याने तिने त्याला घरी बोलवले. तो आला.
तिने हसतमुखाने त्याला घरात घेतले. तो घरात येऊन बसला. त्याच्यासमोर बसून ती गप्पा मारत होती. पदर बाजूला गेला होता. गच्च ब्लाऊजमधून दोन मांसल गोळे अर्ध्याहून अधिक बाहेर आले होते. त्याची नजर त्यावरून हटत नव्हती. ती त्याच्याकडे बघून हसत होती. तिच्या हसण्यातला रोख त्याला कळला. तसा तो तिच्याजवळ सरकला. त्याने तिचा हात धरला. ती म्हणाली, ‘काय?’ ‘तू मला खुप आवडतेस.’ ‘मग काय?’ ‘मग काही नाही. मला तुझ्याबरोबर रहायच आहे.’ ‘फक्त रहायचच आहे की..?’ तिच्या लाडीक प्रश्‍नाने त्याला चेव चढला. त्याने पटकन तिच्या गालावर ओठ टेकले. तिने त्याला जवळ घेऊन ओठावर ओठ लावले. मग पुढच्या खेळाला वेळ लागला नाही. एकाकी लक्ष्मीच्या आयुष्यात सोबती मिळाला. शरीराची भूक भागवू लागला. आता ते घर जणू विजयचेच झाले. तो रात्रभर तिच्याजवळ रहात होता. दोघांतील अनैतिक संबंध सगळ्यांनाच समजले होते, पण कोणी त्यावर आक्षेप घेतला नाही. या वयात तिला कोणाचा आधार मिळाला तर बरेच, असे समजून सगळ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे विजय आणि लक्ष्मी एकमेकाबरोबर वारंवार दिसू लागले होते.

लक्ष्मीची मुलगी अनिताचा विवाह दोन वर्षापूर्वी कर्नाटक राज्यातील तोरवी या गावातील महादेव जाधव या तरूणाशी झाला होता. ती नांदायला गेली, जातांना भावाला घेऊन गेली होती. तिचा नवरा महादेव हा इलेक्ट्रीशियन म्हणून काम करत असे. तो इलेक्ट्रिक फिटींगची कामे घेत असे. ही कामे परगावातील असल्याने तो बहुतेकदा परगावात त्याला जावे लागे, काम संपेपर्यंत त्याला तिकडेच रहावे लागत होते. नवे लग्न झालेले, पण कामासाठी तो घराबाहेर रहात होता. तो कामासाठी सोलापूरातही यायचा. तेंव्हा तो सासू लक्ष्मीबाईकडे येत असे. लक्ष्ङ्कीबाई परपुरूषाबरोबर संबंध ठेवते हे त्याला समजले होते, त्यामुळे आता त्याची नजरही सासूवर पडली होती. खरंतर सासू म्हणजे आईसारखीच असते, पण वासनांधांना कुठे नाती कळतात? परपुरूषाला जवळ करणारी सासू आपल्यालाही चान्स देणार असा नीच विचार करून महादेव सासूभोवती पिंगा घालू लागला. लक्ष्मीबाई शरीरसुखाला चटावली होती. तिलाही जावईच्या मनातला हेतू कळला. तिलाही नात्याचे भान राहिले नाही.

दोघांच्या नात्यातील आदर संपला आणि चेष्टा-मस्करी सुरू झाली. ती त्याला रहाण्याचा, जेवण्याचा आग्रह करू लागली. काम संपवून तो गावी परतत असतांनाही तिने त्याला, ‘रहा आजची रात्र’ असा आग्रह केला. ‘नको आता, काम संपले की’ असे उत्तर त्याने दिले. ‘आता रात्र होईल गावी जाईपर्यंत, रात्री जाऊन काय करणार आहात?’ असे तिने विचारले, तसा तो गालातल्या गालात हसत म्हणाला, ‘रात्रीच काम आहेच की, नाही गेलो तरी तुमची मुलगी रागावेल मला.’ ‘काही नाही रागवत, तुम्हालाच करमत नसेल’ असे म्हणत तिने मुरका मारला. ‘ते आहेच म्हणा, आणि इथं राहिलो तर तुम्हाला त्रासच की.’ भुवई उडवत तिने विचारले, ‘मला कसला त्रास?’ ‘त्रास म्हणजे हेच जेवण-खाण..हेच’ तो सावरत म्हणाला. ती हसली, ‘काही त्रास नाही, जावयाला खुष ठेवायला लागतयच की.’ ‘आता तुम्ही म्हणताय तर थांबतो’ असे म्हणत तो थांबला. तिने झटापट जेवण केले. दोघे जेवणखाण उरकून अंथरूणावर पडले. जावई खाटेवर होता, तर ती खाली अंथरूण टाकून झोपली होती. दोघे बोलत पडले होते. जावई खाटेवरून उठला आणि तिच्याशेजारी येऊन झोपला. तिच्या अंगावर हात टाकून त्याने तिला जवळ घेतले. ‘हे काय करताय, जावईबापू’ असे म्हणत असली तरी तिने विरोध केला नाही. त्याचे हात तिच्या स्तनांना कुस्करू लागले होते. पहाता-पहाता तो तिच्यावर स्वार झाला. तरणाबांड जावई आता लक्ष्मीला सुख देण्यासाठी झटू लागला. ती रात्र सुखात गेली, त्यानंतर इच्छा होईल तेंव्हा तो येत होता, सासूकडून सुख मिळवत होता. लक्ष्मी खुशीत होती.

महादेव सासूबरोबर ऐश करत होता, तर तिकडे त्याची बायको अनिता त्याच्यासाठी झुरत होती. तरूण बायकोपेक्षा वयस्कर सासूवरच महादेव जास्त फिदा झाला होता. त्याचे बायकोकडे जास्त लक्षच नव्हते. अनिता तरूण होती, नवविवाहिता होती. तिलाही शरीरसुखाची लालसा असणे स्वाभाविक होते, पण तिचा पती तिला फार वेळ देत नव्हता. तर दुसरीकडे तिचा दीर शिवानंद मात्र नेहमीच ‘वहिनी, वहिनी’ करत तिच्या मागे-पुढे घोटाळत असे. शिवानंद तरणा होता, अविवाहित होता. त्यालाही स्त्रीसुख हवे होते. तो तरूण वहिनी अनिताकडे आकर्षित झाला होता. तो ती सांगेल ते काम करत होता. तिच्या प्रत्येक हाकेला तोच प्रतिसाद देत असल्याने दोघातील जवळीक वाढली होती. या जवळकीतही शरीरसुखाचा वास येऊ लागला. दोघे तरूण होते, अतृप्त होते, शरीराची भूक दोघांनाही होती. महादेव घरातच नसल्यामुळे त्यांना अडवायला कोणी नव्हते. साहजिकच अनिताने शिवानंदबरोबर संबंध ठेवण्यास मंजूरी दिली. आता शिवानंद दीर नाही तर तिचा नवराच झाला होता. ती त्याच्याबरोबर बाजारात, फिरायला, पै-पाहुण्यांकडे जात होती. रात्रीही दोघे एका एकाच बेडवर मनसोक्त संभोग करत होते. ती कधी-कधी आईकडे सोलापूरला येत असे, तेंव्हाही आई कामावर बाहेर गेली की दीराबरोबर संभोग करत असे. तेंव्हाच शेजारी-पाजारी, नातेवाईकांकडून तिला तिचा नवरा तिच्या आईकडे रात्री थांबतो याची कुणकुण लागली होती. आपल्या आईचे आपल्या नवर्‍याशी संबंध आहेत, हे ऐकून तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती, पण तिला नवर्‍यापेक्षा शिवानंदच जास्त प्रिय असल्याने तिने राग गिळला. नवरा कोठेही जाऊ दे, दीर आपला आहे अशी तिने मनाची सङ्कजूत घातली. तसेच कधी तिच्या नवर्‍याने दीराबरोबर असणार्‍या तिच्या अनैतिक संबंधाला आक्षेप घेतला, तर ती त्याला ‘सासूबरोबर झोपतांना लाज नाही का वाटली?’ असे बोलून गप्प करू शकत होती. त्यामुळे नवर्‍याचे सासूबरोबर तर बायकोचे दीराबरोबरचे संबंध निवांतपणे सुरू होते, पण कोणतेही पाप फार काळ टिकत नाही म्हणतात, तसेच या प्रकरणातही झाले.

नवरा घरी असल्याने अनिताला आणि शिवानंदला शरीरसुख घेता आले नव्हते. त्यातच अनिता माहेरी आईकडे येणार होती, तेंव्हा महादेवने सासूकडे जाणे टाळले. अनिताला सांगितले की तू माझ्या भावाला घेऊन जा. तिला तेच हवे होते. ते दोघे सोलापूरला आले, नेहमीप्रमाणे तिची आई कामावर गेली की मनसोक्त संभोग करायचा हा विचार करतच ते सोलापूरात आले. कधी एकदा लक्ष्मी कामावर जाते असे त्यांना झाले होते. मुलगी आली म्हटल्यावर लक्ष्मी घरातील कामे तिच्यावर सोपवून कामासाठी निघून गेली. ती गेल्यानंतर अनिताने घरातील कामांची आवराआवर सुरू केली. ती कामात असतांनाच शिवानंद तिला चिकटला.‘आता नको नंतर’ त्याला बाजूला सारत ती म्हणाली. ‘नंतर पण करू, आता पण करू’ असे म्हणत त्याने तिला पाठीमागूनच आवळून धरले. तो आता थांबणार नाही हे तिला माहित होते. ‘दार बंद करून या’ असे सांगून ती बेडवर गेली. तो पटकन गेला आणि दार बंद करून आला. दोघे निवांतपणे एकमेकाच्या मिठीत संभोगसुख घेऊ लागले. लक्ष्मी परत येण्यास दुपार होणार हे माहित असल्याने त्या दोघांचा खेळ निवांत सुरू होता, पण वेळ फिरली होती, लक्ष्मी काम कमी असल्याने लवकर घरी आली तर दार बंद. तिने दार ठोठावले, अनिताला हाक मारली. अनिताने ओ दिली, पण दार उघडले नाही. थोड्या वेळाने तिने दार उघडले. आत अनिता आणि शिवानंद दोघे होते, त्यामुळे दार बंद करून ते काय करत असतील हे लक्ष्मीने ओळखले. तिने लेकीला फैलावर घेतले. नवर्‍याचा विश्‍वासघात करून दीराबरोबर घाण संबंध ठेवतेस, लाज वाटत नाही का तुला? असे म्हणत ती अनिताला चांगलेच झापू लागली.

आईने अनैतिक संबंध पकडल्यानंतर कोणतीही मुलगी घाबरली असती, पण अनिता मात्र आईचे बोलणे ऐकून संतापली. ‘तू रिक्षावाला विजयबरोबर संबंध ठेवतेस, माझ्या नवर्‍याबरोबर झोपतेस आणि मला शहाणपणा कशाला शिकवतेस?’ असे तिने आईला उलट उत्तर दिले, पण लक्ष्मी तिचे म्हणणे मानायला तयार नव्हती. ‘मी केले ते वेगळे, माझे आता काय उरले आहे, तुझा संसार आहे, उभं आयुष्य तुझ्यासमोर आहे, तू वाईट वागू नकोस’ असे ती काकुळतीने मुलीला समजावत होती. अनिताला मात्र हे पटत नव्हते. मुळातच सांगणारा कसा आहे, त्यावर ऐकणार्‍यांचे मत बनत असते. स्वत:च व्यभिचार करणारी आई मुलीला सदाचार शिकवत असेल तर ती ऐकेल कशी? ज्या नवर्‍याने विश्‍वासघात केला, त्याचा विश्‍वासघात करण्यात शरम काय? असे विचार अनिताच्या मनात आले. ती आईला जुमानत नव्हती. नवर्‍याची तिला फिकीर नव्हती. ती दीराबरोबरच आनंदात जगू पहात होती. हे तिच्या आईला मान्य नव्हते. या दोन विचारातून माय-लेकीत वादाची ठिणगी पडली होती.
दोघीतील वाद दिवसेंदिवस भडकत चालला होता. लक्ष्मी अनैतिक संबंधात अडसर होत असल्याने अनिता आणि शिवानंद तिच्यावर चिडून होते. तिचा आवाज कायमचा बंद करायचा असा विचार ते करत होते. दिवाळी सण तोंडावर होता. लॉकडाऊन उठल्याने वाहतूक सुरू झाली होती, त्यामुळे अनिता आणि शिवानंद 7 नोव्हेंबर 2020 रोजी सोलापूरला आले. ते दोघे रहाणार असल्याने विजयला लक्ष्मीजवळ थांबता आले नाही. तो त्याच्या घरी निघून गेला. रात्रीचा काळोख वाढला. तसे अनिता आणि शिवानंद एकमेकाबरोबर कामक्रिडा करू लागले. त्यांच्यातील या खेळास लक्ष्मीने विरोध केला, त्यामुळे ते चिडले. त्यांच्यातील वादाला तोंड फुटले. प्रकरण हातघाईवर आले. चिडलेले अनिता आणि शिवानंद लक्ष्मीच्या अंगावर धावून गेले. दोघे अंगावर आल्याने तिनेही त्यांना प्रतिकार केला. तसे त्या दोघांनी तिला ‘आज तुला सोडतच नाही,’ असे म्हणत जमिनीवर आडवे पाडले. अनिता आईच्या उरावर बसली, तर शिवानंदने तिचा गळा आवळण्यास सुरूवात केली. दोघांच्या ताकतीपुढे लक्ष्मीची ताकत कमी पडली. काही वेळातच लक्ष्मी थंडगार पडली. ती ठार झाल्याची खात्री होताच अनिता आणि शिवानंद यांनी तिथून पळ काढला. ते दुचाकीवरून गावी निघून गेले.

दुसर्‍या दिवशी म्हणजे दि. 8 रोजी सकाळी विजय लक्ष्मीकडे आला. दरवाजा फक्त पुढे असल्याने त्याने हाक मारली, कोणीच प्रतिसाद दिला नसल्याने त्याने दार ढकलले. दार लगेचच उघडले म्हणून तो आत गेला. समोरचे दृश्य पाहून त्याची पाचावर धारण बसली. लक्ष्मीबाई उताणी पडली होती, ती मेली होती हे स्पष्टच दिसत होते. तो तसाच घरातून बाहेर पडला आणि धावतच लक्ष्मीबाईच्या नातेवाईकांकडे गेला. त्यांना त्याने लक्ष्मीबाई मृतावस्थेत पडल्याचे सांगितले आणि तो पळून गेला. नातेवाईकांनी घरी जाऊन पाहिले तर लक्ष्मीबाईचा मृतदेह पडला होता. त्यांनी या घटनेची माहिती देण्ङ्मासाठी तातडीने विजापूर नाका पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. एका महिलेचा खून झाल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा वगैरे सोपस्कार पार पाडण्यात आले. लक्ष्मीबाईच्या गळ्यावर असणारे व्रण पहाता तिचा गळा दाबून खून झाल्याचा पोलिसांचा प्रथम कयास होता. त्यानुसार पोलीस तपास करू लागले. या तपासात तिचे रिक्षाचालक विजयबरोबर अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली. त्यानेच तिचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांना सांगितले होते. रात्री तो तिच्याजवळ झोपत असे हेही माहितीत उघड झाले, त्यामुळे पोलिसांचा त्याच्यावर पहिला संशय आला. पोलिसांनी त्याचा शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेतले.

विजयचे लक्ष्मीबाईबरोबर असलेले अनैतिक संबंध कबुल केले, पण खून केला नसल्याचे सांगितले. तिची मुलगी अनिता आणि अनिताचा दीर शिवानंद हे दोघे तिच्याकडे आले होते. ते रात्री रहाण्यास असल्यामुळे मी थांबलो नाही, मी माझ्या घरी गेलो होतो असे विजयने सांगितले. रात्री राहिलेली लेक आणि तिचा दीर सकाळी उजाडण्याआधीच गायब का झाले? रात्री ते कोठे होते? ते येथून कोठे गेले? याची माहिती मिळणे आवश्यक होते, कारण ते दोघेच लक्ष्मीबाईबरोबर अखेरच्या रात्री होतेे. पोलिसांनी तातडीने सुत्रे हलवली आणि कर्नाटकातून अनिता आणि शिवानंद यांना ताब्यात घेतले. सुरूवातीला त्यांनी कानावर हात ठेवले पण ते काही सराईत गुन्हेगार नाहीत. त्यांनी पोलिसांसमोर लगेचच शरणागती पत्करली आणि सगळा घटनाक्रम सांगितला. हे प्रकरण ऐकून पोलीसही चक्रावून गेले. आईचे जावयाबरोबर, लेकीचे दीराबरोबर अनैतिक संबंध आहेत. तर लेकीच्या अनैतिक संबंधाला आई विरोध करते आणि म्हणून लेक आईचा खून करते, हे सगळे मन सुन्न करणारेच होते. समाजाचे अध:पतन दर्शवणार्‍या या घटनेने खळबळ माजवली आहे.

अनैतिक संबंधास विरोध केल्याच्या कारणातून लक्ष्मीबाई शिवाजी माने (वय 40) हिचा खून केल्याप्रकरणी तिची मुलगी अनिता महादेव जाधव आणि अनिताचा दीर शिवानंद भिमाप्पा जाधव या दोघांविरोधात जुना विजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. त्या दोघांनाही अटक करण्यात आली असून अधिक तपास पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त वैशाली कडूकर, सहाय्ङ्मक पोलीस आयुक्त प्रिती टिपरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील, सहाय्ङ्मक पोलीस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ, हेडकॉन्स्टेबल सचिन सुरवसे, रमेश सोनटक्के, तोलनूरे आदी करत आहेत.

Categories
सातारा

जगद्गुरू जनार्दन स्वामी यांच्या ३१ व्या पुण्यतिथीनिमित्त १०८ कुंडात्मक विश्वशांती यज्ञ सोहळ्याचे आयोजन

पाटण हिंदू सम्राट प्रतिनिधी उमेश सुतार यांजकडून

ओझर येथे कोरोना महामारी निवारणार्थ १०८ कुंडात्मक विश्वशांती यज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने बाबाजी परिवाराकडून सनातन विद्या फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजयजी रत्नाकर तसेच सरचिटणीस भूषणजी रत्नाकर यांचे विशेष सत्कार करण्यात आला याप्रसंगी विश्वशांती सोहळ्याचे प्रधान आचार्य विलासजी कुलकर्णी उपस्थित होते. विशेष म्हणजे याप्रसंगी जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी स्वामी १००८ महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांचे प्रत्यक्ष भेट व आशिर्वाद घेण्याचा योग आला. बाबाजी परिवाराचे मनःपूर्वक आभार.

Categories
सातारा

जनतेच्या सहभागातूनच उभे राहणार श्रीराम जन्मभूमी मंदिर, संक्रांतीपासून निधी संकलन सुरू

पाटण हिंदू सम्राट प्रतिनिधी उमेश सुतार यांजकडून

अयोध्येतील नियोजित श्रीरामजन्मभूमी मंदिर हे पूर्णपणे जनतेच्या आर्थिक सहभागातूनच उभे राहणार असून संक्रांतीपासून त्याचे निधी संकलन सुरू होणार असल्याची माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव, तसेच विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष श्री चंपतराय यांनी दिली. श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण व निधी संकलन याबाबत अधिक माहिती देण्याकरिता यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

ते म्हणाले की, अयोध्येची लढाई प्रभू श्रीरामांची जन्मभूमी पुन्हा प्राप्त करण्यासाठी होती. समाज त्या जागेस प्रभू श्रीरामांचे जन्मस्थान मानतो. तिथे पूर्वी मंदिर होते. परकीय आक्रमकांनी मंदिर तोडले हा राष्ट्राचा अपमान होता. हा अपमान संपवण्यासाठी आम्ही हे स्थान परत मिळवले. हे आंदोलन देशाच्या सन्मानाच्या रक्षणार्थ होते. यासाठी समाजाने ५०० वर्षे संघर्ष केला. अखेर समाजाच्या भावना सर्वांनी समजून घेतल्या. श्रीरामजन्मभूमी मंदिराशी निगडित तथ्ये सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आणि भारत सरकारला राम जन्मभूमीसाठी ट्रस्टची घोषणा करण्याचे निर्देश दिले. सरकारने या सूचनांचे पालन करत श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र नावाने ट्रस्टची घोषणा केली. मंदिराचे प्रारूप थोडे वाढविण्यात आले असून त्यानुसार सर्व तयाऱ्या करण्यात आल्या आहेत. पंतप्रधानांनी ५ ऑगस्ट रोजी अयोध्येत पूजन करत मंदिराच्या निर्मिती प्रक्रियेस वेग प्रदान केला. सध्या मंदिराच्या निर्मितीची तयारी सुरू आहे. मृदा परीक्षण करण्यात आले. गर्भगृहाच्या पश्चिमेस शरयूचा जलप्रवाह आणि जमिनीखाली भूरभूरित वाळू अशी येथील भौगोलिक स्थिती आहे.

मान. अशोक सिंहल यांनी मुंबईस येऊन लार्सन अँड टुब्रोच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. त्यानुसार लार्सन अँड टुब्रो कंपनी या मंदिराचे बांधकाम करत आहे. या कंपनीस सल्ला देण्यासाठी टाटा कन्सल्टंट इंजीनिअर्सची निवड करण्यात आली आहे. सर्व प्रकारची प्रबंध झाले असून मंदिराच्या वास्तूची जबाबदारी अहमदाबादच्या चंद्रकांत सोमपुरा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. ते १९८६पासूनच या प्रकल्पाशी संलग्न आहेत. सोमपुरा यांच्या आजोबांनी सोमनाथ मंदिर बांधले होते. स्वामी नारायण परंपरेची अनेक मंदिरे त्यांनी बांधली आहेत. दगडांपासून मंदिरे बांधणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. सध्या अयोध्येच्या वालुकामय जमिनीवर मजबूत पायाच्या दगडी मंदिरांचे बांधकाम कसे करावे यावर विचार सुरू आहे. पुढील तीन वर्षांत हे मंदिर उभे राहील अशी आशा ही त्यांनी व्यक्त केली.

मंदिराच्या प्रारूपाबद्दल ते म्हणाले की, संपूर्ण मंदिर दगडी बांधण्यात येणार असून प्रत्येक मजल्याची उंची २० फूट, मंदिराची लांबी ३६० फूट आणि रुंदी २३५ फूट आहे. जमिनीपासून १६.५ फूट उंचीवर मंदिराचा फरसबंदी पृष्ठभाग असेल. आयआयटी मुंबई, आयआयटी चेन्नई, आयआयटी गुवाहाटी. सीबीआरआय रुरकी, लार्सन अँड टूब्रो आणि टाटाचे इंजीनिअर पायाच्या रेखाटनावर परस्परांत चर्चा करीत आहेत. लवकरच पायाचे प्रारूपाची माहिती सर्वांना मिळेल.

भारताच्या वर्तमान पिढीस मंदिराच्या ऐतिहासिक तथ्यांची माहिती देण्याचीही योजना तयार करण्यात आली आहे. देशातील अर्ध्या लोकसंख्येस श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या ऐतिहासिक सत्याची जाणीव करून देण्याचा विचार करण्यात आला आहे. घराघरात संपर्क केला जाईल, देशाचा कोनाकोपरा यातून सुटणार नाही, अरुणाचल प्रदेश, नागालँड-अंदमान निकोबार, कच्छपासून पर्वतीय क्षेत्रांपर्यंत सर्वत्र जाऊन समाजास राम जन्मभूमीबाबत वाचनीय साहित्य पुरवले जाईल. प्रभू श्रीरामाच्या जन्मभूमीवर मंदिर उभे राहावे ही संपूर्ण देशाची मनःपूर्वक इच्छा आहे.

जन्मभूमी परत मिळवण्यास लाखो भक्तांनी हाल सोसले, मदत केली. त्याच पद्धतीने कोट्यवधींच्या स्वैच्छिक सहयोगाने हे मंदिर उभे राहावे अशी आमची इच्छा आहे. जेव्हा जनसंपर्क केला जाईल तेव्हा लाखो कार्यकर्ते गाव, वस्त्यांमध्ये जातील तेव्हा समाज स्वाभाविकच काही ना काही मदत नक्कीच करेल. देवाचे कार्य आहे, मंदिर देवाचे घर आहे, देवाच्या कार्यामध्ये पैसा ही अडचण ठरू शकत नाही. समाजाचे समर्पण कार्यकर्ते स्वीकारतील. आर्थिक विषयात पारदर्शकता अत्यंत आवश्यक आहे. पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी आम्ही दहा रुपये, शंभर रुपये, एक हजार रुपये अशी कूपन आणि पावत्या छापल्या आहेत. समाज जशी मदत करेल त्याला अनुसरून कार्यकर्ते पारदर्शकतेसाठी कूपन किंवा पावत्या त्यांना देतील. कोट्यवधी घरांमध्ये मंदिराचे चित्र पोहोचेल. जनसंपर्काचे हे कार्य मकरसंक्रांतीस सुरू होईल व माघ पौर्णिमेस पूर्ण होईल.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मार्चमध्ये ट्रस्टचे बँक खाते तयार करण्यात आले. या खात्यात या पूर्वीच लोकांनी आपला आर्थिक सहयोग देण्यास सुरुवात केली आहे. दररोज १००० ते १२०० बँक ट्रान्झॅक्शन होत आहेत. याच पद्धतीने कुपनांच्या माध्यमातूनही नागरिक आपला खारीचा वाटा नक्की उचलतील, असा विश्वासही चंपतराय यांनी व्यक्त केला.

Categories
सातारा

गुंडेवाडी (मराठा नगर )ग्रामपंचायत सलग ४५ वर्ष बिनविरोध निवडणूकीचा विक्रम करणार.हिवरवाडीही बिनविरोध कडे, चितळी,कलेढोणसाठी बिनविरोधसाठी बैठका.

मायणी : सातारा खटाव तालुका विशेष प्रतिनिधी तानाजी चव्हाण दि.२६/१२/२०२०

सध्या सर्वत्र ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. काही ठिकाणी अटीतटीच्या लढतीतर काही ठिकाणी बिनविरोध ग्रामपंचायत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मायणी जि.प. गटातील गुंडेवाडी व हिवरवाडी या दोन ग्रामपंचायती निवडणूक बिनविरोध होणार असून आणखी काही ग्रामपंचायती बिनविरोध होण्याची शक्यता आहे. गुंडेवाडी ( मराठानगर ) ता. खटाव या ग्रामपंचायतीने सलग ४५वर्षे बिनविरोध निवडणूक करण्याचा विक्रम केला आहे.यापूर्वी चितळी पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या गुंडेवाडी (मराठानगर ) हे गाव चितळी ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ठ केले होते .सन १९७५ साली चितळी ग्रुप ग्रामपंचायत मधून गुंडेवाडी ग्रामपंचायत स्वतंत्र झाली. त्यावेळेपासून ते आज अखेर या गावानेआपली बिनविरोध ग्रामपंचायतीची परंपरा कायम ठेवून इतर ग्रामपंचायतीने पुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
मायणी पासून सुमारे दहा कि.मीटर अंतरावर असलेल्या हिवरवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक देखील बिनविरोध होणार आहे .खटाव पंचायत समितीचे माजी उपसभापती व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते बाळासाहेब माने यांच्या नेतृत्वाखाली ही ग्रामपंचायत सध्या कार्यरत असून यावेळी देखील बिनविरोध होण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे .

ग्रामपंचायत बिनविरोध झाली तर १ लाखाचे देणार बक्षीस
राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या पाचवड ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी या गावातील रयत शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून नोकरी केलेल्या व सध्या सेवानिवृत्त असलेल्या रामचंद्र विठोबा घाडगे यांनी जर ग्रामपंचायत बिनविरोध झाली तर या गावांमध्ये पाणलोट विकास कामासाठी नाम फाऊंडेशन यांच्या मार्फत दिल्या जाणाऱ्या मशिनच्या डिझेल खर्चासाठी रु.१००००० इतकी मदत देण्याचे जाहीर केले आहे.

गटातील चितळी व कलेढोण ग्रामपंचायतींचे महत्व मोठे
मायणी जि प गटाच्या निवडणुकीत चितळी व कलेढोण या गावांच्या मताचे पारडे नेहमीच वजनदार व निर्णायक ठरते. या गावांवर आवश्यक असणारी छाप व भविष्यातील राजकारणातील आपली वाटचाल भक्कम राहण्यासाठी या गावांची | ग्रामपंचायत आपल्या विचाराची असावी हा कयास व प्रयत्न स्थानिक नेत्यांचा असणार आहे. आज कलेढोण येथे बिनविरोध निवडणुकीचे चाललेले डावपेच ,चितळीतही दिसून येत आहेत . परंतु एकीकडे निवडणूक बिनविरोध करण्याच्या बैठका पार पडत असताना “अर्ज भरण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करा,असा आदेशही स्थानिक नेत्यांनी दिल्याचे समजते आहे.

Categories
सातारा

सलग सुट्ट्यांमुळे कोकणाकडे पर्यटकांचा ओढा, हॉटेल्स, रेस्टॉरंट फुल्ल

पाटण हिंदू सम्राट प्रतिनिधी उमेश सुतार यांजकडून

सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे कोकणाकडे पर्यटकांचा ओढा वाढला आहे. महापालिका क्षेत्रात निर्बंध असल्यानं सध्या मोठ्या संख्येनं पर्यटन कोकणात दाखल होत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, सातारासह इतर भागांमधून पर्यटक कोकणात येत आहेत.

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची वाढती संख्या पाहता सध्या याठिकाणची हॉटेल्स, रेस्टॉरंटसह होम स्टे देखील फुल्ल झाल्याचं दिसून येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातील प्रसिद्ध पर्यटनस्थळांवर पर्यटकांची संख्या वाढली आहे.

या ठिकाणी कोणतेही कडक निर्बंध नसले तरी पर्यटकांनी कोरोनाकाळातील नियम पाळावेत असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.

Categories
मुंबई सातारा

सातारा येथील कुंभार कारागिरांचा सेंट्रल व्हिलेज पॉटरी इन्स्टिट्यूटचा महत्वपूर्ण अभ्यास दौरा

( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी:लक्ष्मण राजे )

अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. मोहनराव जगदाळे साहेब व प्रदेशाध्यक्ष मा. श्यामशेठ राजेसाहेब यांच्या उपस्थितीत सातारा शाखेच्या वतीने एक दिवसीय व्यावसायिक – शिक्षण सहलीचे आयोजन सेंट्रल व्हिलेज पॉटरी इन्स्टिट्यूट खानापूर (कर्नाटक) या ठिकाणी करण्यात आले. सातारा येथील कुंभार समाजाचे 100 तरुण कारागीर एकत्र येऊन राज्य परिवहन महामंडळाच्या दोन एस टी बस करून कर्नाटक राज्यातील, बेळगाव मधील, खानापूर या ठिकाणी असणारे खादी ग्रामोद्योग संचलित सेंट्रल व्हिलेज पॉटरी इन्स्टिट्यूटला भेट देऊन त्या ठिकाणी आधुनिक यंत्रसामग्रीद्वारे चालणाऱ्या मातीकामाचा अभ्यास केला. यामध्ये इन्स्टिट्यूटचे उपप्राचार्य मा. गोवर्धन साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार तेथील सर्व प्राध्यापकांनी 100 कारागिरांचे प्रत्येकी 10-10 चे गट तयार करून दुपारी 12:00 ते सायंकाळी 5:30 पर्यंत संपूर्ण माती कामाचे आधुनिक स्वरूप, त्यासाठी वापरली जाणारी आधुनिक मशनरी व प्रात्यक्षिक समजावून सांगितले. यामध्ये मातीचे एखादे विशिष्ट उपकरण बनवण्यासाठी कोणत्या प्रकारची माती किती प्रमाणात घ्यावी, त्यामध्ये विविध मातींचे मिश्रण कसे तयार करावे, माती चाळून – भिजवून त्यावर पगमिल व ब्लंजर मधून परिपूर्ण मातीचा गोळा कसा तयार करावा, विविध विद्युत उपकरणावर त्या मातीला कसा आकार द्यावा, त्यामधून शोभेच्या वस्तू, स्वयंपाक घरातील भांडी, बागेतील वस्तू , अन्नधान्य साठवणुकीच्या वस्तू कमीत कमी वेळात जास्तीत जास्त उच्च दर्जाच्या कशा बनवाव्यात हे प्रात्यक्षिकाने दाखविले. पूर्ण झालेल्या वस्तूंवर रंगकाम करून ते कसे सुशोभित करावे याचे मार्गदर्शनही ही खूप छान पद्धतीने केले. बरीच उपकरणे तरुण कारागिरांनी विविध मशीनवर तयार करूनही पाहिली. या मार्गदर्शनामध्ये इन्स्टिट्यूटचे प्राचार्य मा. प्रभाकर साहेब यांनी शेवटी समारोपाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. इन्स्टिट्यूटमध्ये चालणारे विविध अभ्यासक्रम, उपलब्ध असणाऱ्या सर्व सोयीसुविधा, केंद्र सरकारच्या असणाऱ्या विविध योजना यांचीही सखोल माहिती दिली. अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. मोहनरावजी जगदाळे साहेब यांनी आपल्या भाषणात कुंभार कलेचा समावेश विद्यापीठामध्ये व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमासाठी करावा, त्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे आणि याकडे आपण लक्ष देणार असल्याचे सांगितले. अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेचे राज्य प्रदेशाध्यक्ष मा. श्यामशेठ राजेसाहेब यांनी खादीच्या माध्यमातून, अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेच्या प्रयत्नाने कुंभार समाजा साठी महाराष्ट्रात विविध ठिकाणी 2700 विद्युत चाकांचे केलेले वितरण व राज्यातील तीन ठिकाणी अत्याधुनिक क्लस्टरची उभारणी केल्याची माहिती दिली. कुंभार समाजातील कारागिरांचे उत्पन्न पाचपट वाढविण्यासाठी उभ्या केलेल्या अभियानाची माहितीही मा. श्याम शेठ राजे साहेब यांनी दिली. विकास संस्थेचे कार्यकारिणीतील सदस्य श्री प्रकाश कुंभार बारामती यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते आपल्या भाषणामध्ये श्री प्रकाश कुंभार यांनी कुंभार समाजातील तरुण कारागिरांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी विविध योजनांची माहिती दिली. तसेच विकास संस्थेच्या सातारा कार्यकारिणीतील कार्याध्यक्ष मा.बळवंतराव कुंभार यांनी कारागिरांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. विकास संस्थेचे तालुका अध्यक्ष मा. नितीन राजे साहेब यांनी कार्यक्रमाचे आभार मानताना जिल्ह्यातील सर्व कुंभार कारागिरांना सक्षम बनविण्यासाठी साताऱ्या मध्येही क्लस्टरची योजना राबवणार असल्याची माहिती दिली. संपूर्ण अभ्यास दौऱ्याचे नियोजन मा.नितीन राजे व मा.दिनकर कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या अभ्यास दौऱ्यामध्ये सातारा येथील कार्यकारिणीतील , मारुती कुंडलिक कुंभार, दत्तात्रय जगन्नाथ कुंभार, नितीन नरहरी कुंभार, रवींद्र बाळकृष्‍ण कुंभार, धनंजय दत्तात्रय कुंभार, रामदास हरी कुंभार , संपत कुंभार,चंद्रकांत शंकर कुंभार यांनी खूप मोलाचे सहकार्य केले.

Categories
कोल्हापूर सातारा

रणजित देशमुख यांची कोल्हापूर महानगरपालिका निवडणूकीसाठी निरीक्षक पदी निवड


खटाव तालुका प्रतिनिधी:-(रामदास देशमुख)
काँग्रेस पक्ष राज्यात पक्ष मजबूत करण्यासाठी ताकदीने उतरला आहे.येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीसाठी उत्कृष्ट नियोजन केले आहे.

येणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निरीक्षक म्हणून सातारा जिल्ह्यातील माण खटाव तालुक्याचे काँग्रेस नेते मा.रणजीत देशमुख यांची निवड केली आहे.तसेच त्यांच्या सोबत पुणे शहरातील काँग्रेस नेते मा.अभय छाजेड यांची पण निवड केली आहे.

रणजित देशमुख यांना काँग्रेस राज्यस्तरीय निवडणूक कमिटी मध्ये पण पक्षाने स्थान दिले आहे.रणजित देशमुख माध्यमांशी बोलताना म्हणाले काँग्रेस मध्ये प्रवेश केल्यानंतर माझ्यावर शिक्षक आणि पदवीधर निवडणूकीची जबाबदारी दिली होती ती मी यशस्वी पध्दतीने पार पाडली. नंतर मला राज्यस्तरीय काँग्रेस निवडणूक कमिटी मध्ये स्थान दिले. आणि येणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिका निवडणूकीसाठी निरीक्षक पदी निवड केली.

मी पक्षाने दिलेले जबाबदारी यशस्वी पध्दतीने पार पाडण्यासाठी प्रयत्न करेल आणि कोल्हापूर निवडणूक मध्ये जास्तीत जास्त काँग्रेस नगरसेवक कसे निवडणून येथील आणि पक्ष कसा मजबूत होईल यावर भर देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

तसेच त्यांनी कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक याचा प्राथमिक आढावा घेतला आहे.सध्या त्यांच्या तालुक्यात १५० ग्रामपंचायत निवडणूक आहेत त्यामुळे ते तालुक्यात ग्रामीण भागात पक्ष वाढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. असे आमच्या माध्यमांशी बोलताना सांगितले.

Categories
सातारा

आर्यन पाटील यांची राज्यस्तरीय स्विमिंग चॅम्पियनशीप साठी जोरात तयारी

सातारा जिल्हा प्रतिनिधी- केदार जाधव

सातारा जिल्ह्यातील, पाटण तालुक्यातील, विहे या गावात पोहायला सुरुवात करून आर्यन पाटील यांनी वयाच्या 14 व्या वर्षी पुणे जिल्हा अंडर फोर्टीन चॅम्पियनशीप मध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकवून विजेते झाले. आर्यन पाटील यांची कोरोनाच्या काळात लॉकडाऊन मध्ये सुद्धा स्विमिंग ची तयारी प्रॅक्टिस पूर्णपणे मन लावून चालू आहे. 2021 मध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आर्यन पाटील भाग घेणार असून त्यांची चिकाटीने प्रॅक्टिस चालू आहे. स्विमिंग करताना पूर्ण मार्गदर्शन प्रमोद पाटील, दिपक जाधव, अमोल पाटील करत आहेत. आर्यन पाटील यांनी हिंदूसम्राट न्यूज बरोबर बोलताना सांगितले की ह्या वेळी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे विजेतेपद पटकवनारच. दररोज तीन किलोमीटर पाण्यात पोहण्याचे प्रॅक्टिस आर्यन पाटील करत आहेत. गावातील सर्व ग्रामस्थांकडून आर्यन पाटील यांना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत.

Categories
सातारा

शांतिकाका सराफ दुकानात खरेदीस आलेल्या जोडप्याकडून चाेरी

फलटण प्रतिनीधि अभिषेक सरगर फलटण-दहिवडी रस्त्यावरील पृथ्वी चौक, फलटण या अत्यंत गजबजलेल्या व रहदारीच्या चौकातील शांतीकाका सराफ नावाचे दुकानातून खरेदीच्या बहाण्याने आलेल्या अज्ञात जोडप्याने सुमारे दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे गंठन हातचलाखीने चोरुन नेल्याच्या आरोपाचा गुन्हा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गुरुवार दि. २४ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास शांतीकाका सराफ नावाचे वरील दुकानात अंदाजे 30 वर्षीय अनोळखी स्त्री व 35 वर्षीय अनोळखी पुरुष अशा दोघांनी सोन्याचे गंठन खरेदी करण्यासाठी आल्याचे सांगितले. सदर जोडप्याने गंठण पहात असताना फिर्यादी व दुकानातील अन्य व्यक्तींची नजर चुकवून हात चलाखीने सुमारे दीड लाख रुपये किमतीचे ३१ ग्रॅम ७१० मिली ग्रॅम वजनाचे पूर्ण सोन्याची पट्टी असलेले सोन्याचे गंठण घेऊन पोबारा केल्याचे फिर्यादीत नमूद असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघा अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार वीरकर अधिक तपास करीत आहेत.

Categories
सातारा

अंधारल्या वाटेवर, उजेड थोडा पेरूया…

सातारा खंडाळा तालुका प्रतिनिधी/मंगेश माने

लोणंद
” कचर्‍यातून भंगार गोळा करून उदरनिर्वाह करणार्‍या महिलेस साथ प्रतिष्ठाण च्या मदतीने मिळाली दृष्टि व स्वाभिमानाने जगण्याचा आधार…”

लोणंद मधील कचर्‍यातून भंगार गोळा करित उदरनिर्वाह करीत असलेल्या श्रीमती.शालन सुभाष जाधव वय 50 वर्षे यांना सुमारे एक वर्षांपासून दिसने बंद झाले होते यातच लोखंडी तारेने डोळ्यांना दुखापत झाली होती, त्यांना एक मुलगा आहे कु. संतोष जाधव हा किरकोळ आचारी काम करतो, श्रीमंत सईबाई सोसायटी जवळच कृषि उत्पन्न बाजार समितीचे गेट लगत सरकारी जागेवर एक पत्र्याचे शेड मध्ये हे छोटे कुटुंब राहते.
लोणंद शहरातील बसस्थानक परिसरात कचर्‍यातून भंगार गोळा करताना काही शालेय विद्यार्थी व युवक त्यांना चिडवुन द्यायचे तेव्हा अक्षरशः दगड घेऊन विद्यार्थी व युवकांचे पाठीमागे त्या धावायच्या यामुळे लोणंद च्या नागरिकांना माहिती /परिचित आहेत.

अंदाजे एक वर्षांचे आसपास श्रीमती शालन जाधव यांना भंगार गोळा करताना हळूहळू दिसायचे कमी होत गेले अत्यंत हालाकीची परिस्थिती असल्याने उदरनिर्वाह करणे जिकिरीचे होत असताना डोळ्यांवर औषधोपचार करने अवघडच असल्याने ते घरातच बसून राहायला लागल्या .
यातच कोरोना व्हायरस आटोक्यात आणण्यासाठी लाॅकडाऊन परिस्थिती समोर उभी राहिली यातुन आर्थिक संकटाला सामोरे जात असताना पुन्हा कधीच आपली लोकं व मुलगा दिसणार नाही व दैनंदिन जीवनातील घडामोडी हालाकित काढायला लागणार अशी परिस्थिती निर्माण झाली असताना याबाबतची माहिती साथ प्रतिष्ठाण चे अध्यक्ष कय्युम मुल्ला यांना समजली त्यांनी सुलोचना नेत्रालय लोणंद डॉ. देवदत्त राऊत सर यांचेशी संपर्क साधला व श्रीमती शालन जाधव यांच्या डोळ्यांची तपासणी केली, बाहेरून काही चाचण्या करायला सांगितल्या सदर पुर्वचाचण्या करण्यात आल्या त्या प्रमाणे आलेल्या रिपोर्ट नुसार सदर ऑपरेशन करणे गरजेचे होते व ते खुपच कठीण व खर्चिक होते, साथ प्रतिष्ठाणचे अध्यक्ष कय्युम मुल्ला व श्रीयुत नागराज चव्हाण यांनी डॉ. देवदत्त राऊत यांना समक्ष भेटीद्वारे सदर ऑपरेशन दरात सवलत मिळावी अशी विनंती केली त्याप्रमाणे विनंतीचा मान ठेवून त्यांनी ती मान्य केली व काही रक्कम द्यावी लागेल असे सांगितले ती संपुर्ण रक्कम साथ प्रतिष्ठाण वतीने लगेच आदा करण्यात आली व सदर ऑपरेशन तातडीने होऊन यशस्वी झाले, काही वेळाने डोळ्यांची पट्ट्या काढण्यात आल्या तेव्हा त्यांना विचारले गेले समोर कोण आहे तेव्हा साथ प्रतिष्ठाण चे अध्यक्ष कय्युम मुल्ला यांकडे पाहत माझा भैय्या आहे तसेच शेजारी मुलगा आहे असं सांगताच केलेल्या कार्याचे समाधान वाटले, श्रीमती शालन जाधव यांना डोळ्यांनी दिसु लागलेने चेहर्‍यावर मोठा आनंद दिसुन येत होता त्यांस जगण्याची उमेद मिळाली होती.

याकामी सुलोचना नेत्रालय लोणंद डॉ. देवदत्त राऊत, श्रीयुत नागराज चव्हाण, जावेद पटेल यांचे सहकार्य लाभले, साथ प्रतिष्ठाण चे अध्यक्ष कय्युम मुल्ला, सचिव मंगेश माने, उपाध्यक्ष दिपक बाटे, खजिनदार सचिन चव्हाण, दिपक जाधव,प्रतिक क्षीरसागर, सुनील जगताप आदींनी परिश्रम घेतले.

Design a site like this with WordPress.com
Get started