
नायगाव ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक २०२१-२०२६ साठी ११ जागांसाठी निवडणूक दिनांक १५.०१.२०२१ रोजी होत आहे. श्री काळभैरवनाथ परिवर्तन पॅनेल च्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. अर्ज माघार घेण्याचे दिवशी वॉर्ड क्रमांक ३ मधील पौर्णिमा तुषार चौधरी व वर्षा शेलार यांनी त्यांचे अर्ज माघे घेतल्याने कल्याणी संदिप हगवणे यांची बिनविरोध निवड झाली. उर्वरित १० जागी काळभैरवनाथ परिवर्तन पॅनेल चे सर्व उमेदवार निवडून आणण्याचा मानस पॅनेलच्या वतीने करण्यात आला.