Categories
कोपरगाव

श्रीमान गोकुळचंद विद्यालयाच्या वतीने पत्रकारांचा सत्कार


बिपिन गायकवाड तालुका प्रतिनिधी हिंदू सम्राट-
कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी व श्रीमान गोकुळचंदजी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनाच्या निमित्ताने कोपरगाव तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रथम श्रीमान गोकुळचंदजी यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पत्रकार नानासाहेब जवरे व पत्रकार सोमनाथ सोनपसारे यांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांतजी ठोळे हे अध्यक्षस्थानी होते यावेळी बोलताना ठोळे म्हणाले की जगात वर्तमानात मोठे बदल होत असताना भारत देश त्याला अपवाद नाही परिवर्तन हा देशाचा नियम आहे व त्याला आपण सामोरे गेले पाहिजे पत्रकारांनी खरे वास्तव जनतेसमोर आणले पाहिजे तरच खऱ्या गोष्टी समाजापुढे येत असतात पाश्चात्य देशात पत्रकारितेला आजही मोठे स्थान आहे वर्तमानपत्रात एखादी बातमी येणे तेवढे सोपे राहिलेले नाही मात्र कोपरगाव चे पत्रकार अशा बातम्यांना चांगले स्थान देत असून महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या अग्रगण्य अशा महत्त्वाच्या वृत्तपत्रात कोपरगाव ची चांगली बातमी येत असल्यामुळे मनाला वाचताना बरे वाटते तसेच कोपरगाव शहरातील पाण्याचा प्रश्न फार गंभीर असून यामुळे कोपरगाव तालुक्याची प्रतिमा मलिन होत आहे आपल्या शेजारच्या तालुक्यात येवला संगमनेर राहाता श्रीरामपूर या भागात पाण्याची स्थिती अगदी चांगली आहे मात्र या पाण्याच्या प्रश्नावर तोडगा निघणे महत्त्वाचे आहे बाकी क्षेत्रात कोपरगाव तालुक्याने मोठी प्रगती केली तसेच औद्योगिक व सहकार आणि शिक्षण याबाबतीत चांगले लौकिक प्राप्त केली आहे तसेच कोरोना च्या कालावधीत पत्रकारांनी आपली भूमिका चोख पार पाडली त्यांचे कौतुक केले तर आपणा सर्व पत्रकारांची सर्वांच्या सोयीनुसार एक स्वतंत्र बैठक घेऊन सामाजिक प्रश्नाबाबत सखोल चर्चा करण्याचा माझा विचार आहे असे त्यांनी शेवटी सांगितले त्यानंतर उपस्थित पत्रकारांचा गौरव करण्यात आला या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत ठोळे व संस्थेचे सचिव दिलीपजी अजमेरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर यांनी केले तर उपस्थित मान्यवर पत्रकांराचे स्वागत बुचकुले सर दिलीप फुलसौंदर सर रमेश गायकवाड सर लकारे सर बडजाते सर अमृतकर सर यांनी केले तर आभार गोरे सर यांनी मांनले यावेळी शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Categories
कोपरगाव

माझी वसुंधरा अभियानातर्गत गोदावरी नदी पात्राची स्वच्छता

कोपरगाव बिपिन गायकवाड हिंदू सम्राट तालुका प्रतिनिधी-

कोपरगाव नगरपरिषदेकडून माझीवसुंधराअभियानाअंतर्गत जलस्त्रोत स्वच्छता मोहिमेतून गोदावरी नदी पात्राची स्वच्छता करण्यात आली महाराष्ट्राची दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी कोपरगाव शहरा शेजारुण वाहते पूर्वी बाराही महिने वाहणारी नदी आता वाढत्या प्रदूषणामुळे पावसाचे प्रमाण कमी झाल्याने वाहताना दिसत नाही गणेशोत्सव शारदा उत्सव व धार्मिक कार्यक्रमांमध्ये नदीच्या पात्रात निर्माल्य विसर्जन मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे नदीपात्रामध्ये घाण पसरलेली आहे तसेच या ठिकाणी नियमित होत असणारे अस्थी विसर्जन विधी या कारणाने नदीपात्रातील पाणी प्रदूषित व अस्वच्छ होत आहे कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने माझी वसुंधरा अभियानातील जल घटकांतर्गत शहर व शहराच्या परिसरातील जल स्तोत्राची स्वच्छता अभियानांतर्गत राबविण्यात बाबतची कार्यवाही नुकतीच गोदावरी नदीचे पात्र स्वच्छ करुन करण्यात आले कचेश्वर शुकलेश्वर घाट येथे स्वच्छता मोहीम राबवून नदीपात्रातील व परिसरातील साफसफाई करण्यात आली या स्वच्छता मोहिमेमध्ये नदीपात्रातील तीन ट्रॅक्टर कचरा गोळा करून सदर कचरा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाकडे पाठवण्यात आला सदर स्वच्छता मोहीम यशस्वी करणे कामी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यधिकारी सुनील गोरडे सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी स्वच्छता विभागाचे कर्मचारी याच्यासह गोदामाई प्रतिष्ठान यांनी सक्रिय सहभागाने यशस्वी पणे राबवण्यात आली यावेळी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे नगराध्यक्ष विजय वहाडणे नगरसेवक जनार्दन कदम नगरसेवक शिवाजी खांडेकर नगरसेवक सत्यजित मुदंडा सामाजिक कार्यकर्ते आदिनाथ ढाकणे यांच्यासह कोपरगाव नगर परिषदेचे सर्व विभागांचे अधिकारी कर्मचारी व गोदामाई प्रतिष्ठान चे सर्व सदस्य यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाणी हे जीवन आहे पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत स्वच्छ राहणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे जल जमीन जंगल हवा नैसर्गिक पर्यावरणाचे स्त्रोत आहेत निरोगी जीवनासाठी प्रत्येक नागरिकांनी स्वच्छता बाळगली पाहिजे व नैसर्गिक स्त्रोत प्रदूषित होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे स्वच्छता अभियान व माझी वसुंधरा अभियान यामध्ये सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा व पर्यावरण संवर्धनात सहकार्य करावे असे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे

Categories
कोपरगाव

पत्रकार दिनी पत्रकारांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचा स्तुत्य उपक्रम


कोपरगाव हिंदूसम्राट तालुका प्रतिनिधी बिपिन गायकवाड –
जग कोरोना सारख्या महामारीतून मार्ग काढत असतांना शासनाच्या सर्व शासकीय विभागाचे अधिकारी कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून कोरोना महामारी सोबत दोन हात करत असतानाच त्यांचा सोबतीला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्या कडे पाहिले जाते असा पत्रकार देखील गेल्या वर्षभरापासून लढतांना दिसून येत आहे.
त्याचेच एक ऋण म्हणून दि ६ जानेवारी २०२१ रोजी ओम साई ग्रामीण शिक्षण संस्था कोपरगाव च्या वतीने तालुक्यातील विविध वृत्तपत्र व इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या प्रतिनिधींना पत्रकार दिनी माजी जिल्हा पोलिस अधीक्षक के पी रोकडे यांच्या शुभहस्ते व संस्थाप्रमुख परशराम साबळे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना योद्धा-२०२० असे सन्मानपत्र शाल गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी संस्थेच्या सचिव सुचित्रा साबळे, साई शक्ती इंग्लिश मीडियम स्कूल चे प्राचार्य विजय जाधव, विलास चव्हाण, सोनाली कापसे, निलेश देवकर, रेखा दिवे आदी उपस्थित होते.
या वेळी दैनिक लोकमंथन चे गणेश दाणे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे मनीष जाधव, तसेच विजय कापसे, शंकर दुपारगुडे,दिपक जाधव, रोहित टेके, फकिरराव टेके, जनार्धन जगताप, रविंद्र साबळे, अक्षय काळे, विनोद जवरे,मधुकर वक्ते,अनिल दीक्षित, हाफिज शेख,स्वप्नील कोपरे, सिद्धार्थ मेहेरखांब, युसूफ रंगरेज,बिपिन गायकवाड,पंडित भारुड आदींचा गौरव करण्यात आला.
या वेळी रोकडे यांनी बोलतांना सांगितले की पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असुन कोरोना सारख्या महामारीत देखील हा स्तंभ न डगमगता देशासाठी अहोरात्र आपल्या माध्यमातून कार्य करत आहे.त्याचा संपूर्ण देशवासियांना अभिमान आहे.आपले कार्य या पुढे ही असेच सुरू ठेवत उत्तरोत्तर आपली अशीच प्रगती होत जावो अशा शुभेच्छा दिल्या.


घटनेने पत्रकारांना लोकशाही मध्ये महत्वाचे स्थान दिले असल्यानेच आपल्या भारत देशाची लोकशाही ही मजबूत आहे.त्यामुळे प्रत्येकाने सर्वधर्म समभाव साधत काम करत राहावे.

परशराम साबळे
संस्थाप्रमुख ओम साई ग्रामिण शिक्षण संस्था

Categories
कोपरगाव

अ.भा.महात्मा फुले समता परिषदेची नविन कार्यकारणीचा सत्कार


कोपरगाव बिपिन गायकवाड हिंदूसम्राट तालुका प्रतिनिधी –
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद कोपरगाव नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार संपन्न
नुकताच आठरा पगड जाती धर्मातील सर्वांना सामावून एकत्र घेऊन अ.भा.महात्मा फुलें समता परिषदे च्या नूतन पदाधिकाऱ्यांची नुकतीच निवड करण्यात आली. या वेळी कोपरगाव नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष श्री.मंगेश पाटील,हिंदूवाडा मंडळाचे संस्थापक श्री.बाळासाहेब रुईकर,व माजी नगरसेवक कृष्णा आढाव यांच्या हस्ते गळ्यातील थंडीची उलनची मफलर व गुलाब पुष्प देऊन आगळा वेगळा सत्कार करण्यात आला व सर्व पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात
या वेळी तालुका पदाधिकाऱ्यांच्या निवड करण्यात आली
ती पुढीलप्रमाणे
कोपरगाव तालुका अध्यक्ष श्री. संतोष ( बापू ) वढणे,
श्री.रमेश टिक्कल तालुका उपाध्यक्ष,श्री. संदीप अनर्थे तालुका उपाध्यक्ष, श्री. विशाल निकम तालुका संघटक , श्री.संतोष जाधव तालुका प्रसिद्धी प्रमुख,श्री.मयूर बोरावके तालुका सहसचिव,श्री.किरण थोरात शहर उपाध्यक्ष,श्री.रवींद्र राऊत शहर सहसचिव,श्री.गिरीश हिवाळे शहर संघटक,श्री.सतीश भुजबळ शहर कार्यकारणी सदस्य,श्री.विशाल निकम,श्री.बाळकृष्ण जाधव या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला..

Categories
कोपरगाव

कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायती साठी ९९६ अर्ज दाखल- तहसिलदार योगेश चंद्रे


कोपरगाव बिपिन गायकवाड हिंदूसम्राट प्रतिनिधी –

कोपरगांव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीच्या उमेदवार अर्ज भरणे प्रक्रीयेच्या शेवटच्या दिवशी ५४० उमेदवारी अर्ज दाखल झाले असून एकुण ९९६ अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोग नियुक्त प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार योगेश चंद्रे यांनी दिली आहे.
२३ डिसेंबर – राज्‍य निवडणूक आयोगाचे आदेशानुसार ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्‍यात आलेला असुन कोपरगाव विधानसभा मतदार संघातील उक्कडगाव ३८ ( पुरुष-२०,स्री-१८ ), तिळवणी २१ ( पुरुष-०८ ,स्री-१३ ), अंजनापुर २८ ( पुरुष-११,स्री-१७ ), घारी ३४ ( पुरुष-१७,स्री-१७ ), मनेगाव २५ ( पुरुष-१२ ,स्री-१३ ), मळेगाव थडी ३६ ( पुरुष-१५,स्री-२१ ), सांगवी भुसार ३२ ( पुरुष-१५ ,स्री-१७ ), वेळापूर ३२ ( पुरुष-१७ ,स्री-१५ ), जेऊर पाटोदा ३४ ( पुरुष-१६ ,स्री-१९ ), काकडी म.३६ ( पुरुष-२०,स्री-१६ ),नाटेगांव २१ ( पुरुष-१०,स्री-११ ), कासली २५ ( पुरुष-०९ ,स्री-१६ ), ओगदी २२ ( पुरुष-०९ ,स्री-१३ ), अंचलगाव २३ ( पुरुष-१०,स्री-१३ ), कोळगाव थडी ५८ ( पुरुष-३१,स्री-२७ ), मायगाव देवी २७ ( पुरुष-१४,स्री-१३ ), हिंगणी २७ ( पुरुष-१२,स्री-१५ ), रवंदे २७ ( पुरुष-१३,स्री-१४ ), संवत्सर ११७ ( पुरुष-६३,स्री-५४ ), देर्डे चांदवड २० ( पुरुष-१०,स्री-१० ), मढी खुर्द ३० ( पुरुष-१४,स्री-१६ ), मढी बुद्रुक ३३ ( पुरुष-१५,स्री-१८ ), धोंडेवाडी ३१ ( पुरुष-०९,स्री-२२ ), सोनारी २१ ( पुरुष-०९ ,स्री-१२ ), आपेगाव ३४ ( पुरुष-१६,स्री-१८ ), येसगाव ३६ ( पुरुष-१३,स्री-२३ ), टाकळी ३५ ( पुरुष-२१,स्री-१४ ), कोकमठाण ५८ ( पुरुष-२९,स्री-२९ ), जेऊर कुंभारी ३५ ( पुरुष-१५, स्री-२० ) याप्रमाणे एकूण ९९६ अर्ज दाखल झाले आहे.
२९ ग्रामपंचायतीत दाखल झालेल्या अर्जाची छाननी दि.३१ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ११:०० वाजता होत असून या प्रक्रिये करिता निवडणूक निरीक्षक तथा उपविभागीय अधिकारी डॉ.अर्चना पठारे उपस्थित राहणार आहे.
तसेच सोमवारी ४ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११ वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत देण्यात आली आहे. ४ जानेवारी २०२१ रोजी दुपारी ३ वाजेनंतर चिन्ह वाटप व अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल. मतदान शुक्रवारी १५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ०७:३० ते सायंकाळी ०५:३० वाजेपर्यंत राहणार आहे मतमोजणी सोमवारी १८ जानेवारी २०२१ रोजी तहसील कार्यालय कोपरगाव येथे सकाळी १०:०० वाजेपासून सुरू होईल. अशी माहिती कोपरगाव तहसीलदार तथा निवडणुक निर्णय अधिकारी योगेश चंद्रे यांनी दिली आहे.सदर निवडणूक प्रक्रिया कामी निवडणूक शाखा अधिकारी अरुण रणनवरे यांचे सह विविध खातेनिहाय कर्मचारी सहाय्य करीत आहेत .

Categories
कोपरगाव

तुम्ही फलक फाडु शकता, परंतु आमदारआशुतोषदादा काळे यांचे ध्येय धोरण, संकल्प आणि विकास गंगेला आडवु शकत नाही.


कोपरगाव बिपिन गायकवाड हिंदूसम्राट प्रतिनिधी –
कोपरगाव तालुक्याचं ऐतिहासिक व्यासपीठ म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान. या मैदानावर आजपर्यंत अनेक सामाजिक सांस्कृतिक राजकीय असे एक ना अनेक कार्यक्रम पार पडले, नगरपालिका असेल, विधानसभा अथवा लोकसभा असेल प्रत्येक राजकीय घडामोडीचे बिगुल याच मैदानावर वाजवलं जातं, निवडणुका येतात जातात परंतु एकदा निवडणुका संपल्या की सर्वांना या ऐतिहासिक मैदानाचा विसर पडायचा मैदानाच्या झालेल्या दुर्दशेवर कोणाचं चुकून लक्ष जात नव्हते ही देखील एक शोकांकिका म्हणावी लागेल पावसाळ्यात या मैदानाला डबक्याचे स्वरूप येऊन हे मोकाट जनावरांच माहेरघर असल्या सारखं वाटत असे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान हे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्या कारणाने हे शहराच्या वैभवात भर टाकणार आहे. याची दुर्दशा होता कामा नये या मैदानाची अवस्था बदलली पाहिजे ही संकल्पना मनाशी बाळगुन कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोषदादा काळे यांनी या मैदानावर कॉंक्रीटीकरण व्हायला हवे या मैदानाची दशा बदलायला हवी हा संकल्प पूर्ण करत पाठपुरावा केला आणि या कामाचा शुभारंभ कालच पार पाडला, परंतु काही जळाऊ वृत्तीच्या हरामखोरांनी रात्रीच्या पडद्याआड ह्या शुभारंभाचा फलक फाडला. मी या जळाऊ वृत्तीना सांगु इच्छितो तुम्ही फलका वरील अक्षर पुसु शकता, फलक फाडु शकता, परंतु आमचे सुसंस्कृत आणि संयमी नेते आदरणीय आशुतोषदादा काळे यांचे ध्येय धोरण संकल्प आणि विकास गंगेला आडवु शकत नाहीत.
तुम्ही फलक फाडून तुमच्या वाईट आणि जळाऊ वृत्तीची ओळख करून दिली. या वृत्तीचा मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो नवाज कुरेशी
शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोपरगांव

Categories
कोपरगाव

भूमिपूजन फलक फाडल्याने कोपरगाव शहरात तणावाचे वातावरण


कोपरगाव बिपिन गायकवाड हिंदूसम्राट तालुका प्रतिनिधी

कोपरगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या पाठीमागे असलेल्या मैदानाचे कॉंक्रिटीकरणाचा शुभारंभ दि.२९ डिसेंबर २०२० रोजी सकाळी कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष दादा काळे व प्रथम नगराध्यक्ष विजयराव वहाडणे व स्थानिक नगरसेवक व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे भूमिपूजनाचा फलक याठिकाणी लावण्यात आला होता मात्र काही तासांच्या आतच कोणीतरी अज्ञात समाजकंटका कडून सदरचा भूमिपूजनाचा फलक पाडण्यात आला याची माहिती स्थानिक पदाधिकारी संदीप वर्पे सुनील गंगुले नगरसेवक मंदार पहाडे राजेंद्र वाघचौरे संदीप पगारे यांच्यासह नगर परिषदेचे अभियंता वाघ आदी त्या ठिकाणी येऊन बोर्डाची पाहणी करण्यात आली यावेळी सदर घटनेची खबर कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना देतात ते आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले व सदर घटनेचा पंचनामा केला व पालिकेच्या अधिकाऱ्यांना फिर्याद दाखल करण्याच्या सूचना केल्या व जमलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्याकडे मागणी केली की अज्ञात समाजकंटकांचा छडा लावून कडक कारवाई करावी अशी मागणी सर्व पदाधिकार्‍यांच्या वतीने करण्यात आली.

Categories
कोपरगाव

कोरोनाच्या महामारीत आणि निवडणुकीच्या रणधुमाळीत कोपरगावकर हरवणार कोणाला

कोपरगाव बिपिन गायकवाड हिंदूसम्राट तालुका प्रतिनिधी-
कोरोना कोविड 19 या महा मारीची दुसरी लाट येणार असल्याची भीती ही सर्वसामान्य जनतेच्या मनात असताना त्यावर मात करण्यासाठी सर्वत्र उपाययोजना राबविण्यात येत असताना कोपरगाव तालुक्यातील एकूण 29 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असताना कोपरगाव तहसील कार्यालयात होत असलेल्या गर्दीमुळे कोपरगावकर हे कोरोना वर मात करतात की आपल्या प्रतिस्पर्ध्यावर अशी संतप्त प्रतिक्रिया सुज्ञ नागरिक व्यक्त करीत आहेत कोपरगाव तालुक्यातील 29 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची बिगुल वाजले असताना यामध्ये दिनांक 29 डिसेंबर रोजी तालुक्यातील ग्रामपंचायत मधून एकाच दिवसात 195 पुरुषांनी व 205 महिलांचे असे एकूण 400 अर्ज एकाच दिवसात दाखल झाले शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी तसेच भाजप व बळीराजा पार्टी व अपक्ष यांच्यासह सर्वच प्रमुख पक्षांनी ग्रामपंचायत निवडणुकांच्या रिंगणात उडी घेतली आहे त्यामुळे गाव पातळीवरील निवडणुका रंगतदार होणार आहे मात्र सरपंचाचे आरक्षण नंतर जाहीर होणार असल्यामुळे स्थानिक पातळीवर थोडी गळचेपी झालेली दिसून येत आहे निवडणुकीसाठी प्रत्येक जण एक दुसर्‍याकडे बघत असून स्थानिक ग्रामपंचायतीचा हा खेळ मोठ्या सम्राटांना नवीन तर अजिबात नाही त्यामुळे यावेळेस तालुक्यात फार काही आपल्याला मिळेल असे एकंदरीत वाटत नाही आज सातव्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यास इच्छुकांनी सकाळी 9 वाजेपासूनच कोपरगाव तहसील कार्यालयात मोठ्या प्रमाणात आपआपल्या पक्षाच्या आदेशा प्रमाणे कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती यामध्ये आज दि. 29 रोजी तालुक्यातील ग्रामपंचायती पैकी उकडगाव 20 तिळवणी 20 घारी 01 मनेगाव 05 मळेगाव थडी 15 वेळापूर 11 जेऊर पाटोदा 12 कासली03 ओगदी 07 अंचलगाव 13 कोळगाव थडी 22 मायगाव देवी 6 हिंगणी 18 रवंदे 26 सवंत्सर 68 देर्डे चांदवड 18 मढी खुर्द 12 मढी बुद्रुक 18 धोंडेवाडी 03 आपेगाव 14 येसगाव 15 टाकळी 13 कोकमठाण 47 जेऊर कुंभारी 13 असे एकूण 195 पुरुष व 205 महिलांनी मिळून चारशे जणांनी अर्ज दाखल केले आहे आता दिवसागणिक या निवडणुकीत रंग भरला जाणार असून कोपरगाव तालुक्यात ग्रामपंचायती बिनविरोध होण्याची शक्यता मावळत चाललेली दिसत असून आता सत्ताधारी व विरोधक यांनी आजपर्यंत कुठेही हस्तक्षेप होताना दिसला नसून उद्या दि. 30 डिसेंबर हा शेवटचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होण्याची शक्यता असून उद्याच्या निर्णयाकडे सत्ताधारी व विरोधक शेवटच्या दिवशी काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून आहे सदरच्या अर्जाची छाननी 31 डिसेंबर रोजी होणार आहे तर दि. 4 जानेवारी 2021 पर्यंत अर्ज मागे घेण्याची शेवटची वेळ असून तर त्याच दिवशी दुपारनंतर निवडणूक चिन्ह वाटप करण्यात येणार असून मतदान दि.15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 07:30 ते सायंकाळी 05:30 पर्यंत होणार आहे तर मतमोजणी दि.18 जानेवारी 2021 रोजी सकाळ पासून सुरू होणार आहे यासाठी तालुक्यातील मोठे सम्राट आपल्याकडे जास्तीत जास्त ग्रामपंचायती आपल्या ताब्यात असाव्यात यासाठी सगळेजण मोर्चेबांधणी करत आहेत तर ग्रामपंचायतीवर आपणच विराजमान व्हावे यासाठी प्रतिस्पर्ध्याला हरवण्यासाठी एक एकर जमीन विकावी लागली तरी बेहतर या इरषेत प्रत्येक उमेदवार हे आपले निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र सादर करण्यासाठी कोपरगाव तहसील कार्यालयात तुडुंब गर्दी करत आहेत दरम्यान कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी सर्वत्र सोशल डिस्टंसिंग ठेवण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन हे विशेष मोहीम हाती राबवून नागरिकांन मध्ये जनजागृती करताना दिसत नसून कोपरगाव तहसील कार्यालय परिसरात व कार्यालयत जातांना नियमांची पायमल्ली होत असल्याने कोपरगावकर कोरोनावर मात करतात की निवडणुकीतील आपल्या प्रतिस्पर्ध्यावर अशी खंत तालुक्यातील सर्व सामान्य नागरिकांकडून व्यक्त होतांना दिसत दिसून येत आहे

Categories
कोपरगाव

शहर आपले आहे याचे भान ठेवा- नगराध्यक्ष विजय वहाडणे


कोपरगाव बिपिन गायकवाड हिंदू सम्राट तालुका प्रतिनिधी

कोपरगाव शहरातील अनेक प्रभागांमधील सार्वजनिक शौचालय स्वच्छतागृह (मुताऱ्या) यांची तोडफोड केल्याचे आढळून आले आहे काही शौचालया चे दरवाजे, शौचालयाचे भांडे, पाण्याचे नळ इलेक्ट्रिकचे ट्यूबलाईट याचे नुकसान काही अज्ञात व्यक्ती करत असून वारंवार नगरपरिषदेने दुरुस्ती करूनही वारंवार असे प्रकार घडत आहे तसेच शौचालयात दारूच्या बाटल्या विटकरीचे तुकडे गुटख्याच्या पुड्या टाकल्याने गटारी तुबंतात तर डुकरे पाळणारे जाणीवपूर्वक ड्रेनेज फोडतात स्वच्छतेसाठी आरोग्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी सातत्याने प्रयत्न करत असतात तरीही असे गैरप्रकार घडत आहेत नागरिकांसाठी सुख सुविधा उपलब्ध करूनही असे कृत्य करणे योग्य नाही अनेक प्रभागात स्त्री व पुरुष यांच्या सोयीसाठी स्वच्छतागृहे उभारायची आहेत पण त्यासाठी जागा मिळत नाही स्वच्छता गृह हवे पण आमच्या घराजवळ घराच्या समोर किंवा शेजारी नको असे अनेकांच्या तक्रार पण आहे स्वच्छतागृह बनवता येत नाही हेही सर्वांनी लक्षात घ्यावे हे शहर आपले आहे संपूर्ण शहराचे आरोग्य सुरक्षित ठेवायचे असेल तर सर्वांनी जबाबदारीने सहकार्य करणे आवश्यक आहे घंटागाड्या असूनही कचरा कुठेही फेकणारे व शहराचे आरोग्य धोक्यात आणत आहेत तरी नागरिकांनी ओला कचरा व सुका कचरा वेगळा करूनच घंटागाड्या मध्ये टाकावा असे आवाहन नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी शहरवासीयांना केले आहे.

Categories
कोपरगाव

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी खांबेकर कुटुंबीयांचे केले सांत्वन


प्रतिनिधी बिपिन गायकवाड कोपरगाव-
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी संध्याकाळी खांबेकर कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले यावेळी खांबेकर यांच्या पत्नी जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीस मीनल खांबेकर यांच्यासह दोन मुलं व दोन मुली यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थितांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की
स्व. अशोक खांबेकर यांच्या जीवनातील अनेक पैलू उलगडले खांबेकर यांनी श्री साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त व अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व ज्येष्ठ पत्रकार म्हणून जिल्ह्यासह त्यांचा परिचय होता तसेच पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी नावलौकिक मिळविला होता समाजासह अनेक क्षेत्रात पूर्ण यश मिळवले होते त्यांच्या जाण्याने कोपरगाव तालुक्या सह संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात उत्तम पत्रकार तसेच राजकीय अभ्यासक हरपला अशोक खांबेकर यांचे अहमदनगर जिल्ह्यातील पत्रकारितेत मोठे योगदान आहे पीटीआय चे पत्रकार म्हणून देखील अनेक वर्षे त्यांनी काम केले आहे ते श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त पदी असताना त्यांनी अनेक गोरगरिबांना मदत केली काही ना मोफत उपचार देऊन तर काहींना नोकरी लावून दिल्या राज्यासह देशभरातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील मोठ्या व्यक्ती सोबत त्यांचे रोजचे भ्रमणध्वनीवर बोलणे असायचे शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते म्हणून जीवन जगले.
यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले की अशोक खांबेकर आमचे काँग्रेसचे निष्ठावंत व कोपरगाव तालुक्याचे नेते होते सातत्याने त्यांनी आयुष्यभर काँग्रेसच्या विचारांची सेवा केली आहे एक उत्साही आनंदी व सर्वांना बरोबर घेऊन जाणारे विकासाचा नेहमीच विचार करणारे व संघटनात्मक विचार करणारे अशा प्रकारचे त्यांचे नेतृत्व होतं त्यांच्या जाण्याने कोपरगाव तालुक्यात काँग्रेसमध्ये व समाजामध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे असे थोरात शेवटी म्हणाले या प्रसंगी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तुषार पोटे तालुका काँग्रेसचे विष्णुपंत पाडेकर महिला काँग्रेस उपाध्यक्ष अॕड.शितल देशमुख महिला शहराध्यक्ष रेखाताई जगताप तालुका शहर चिटणीस ज्ञानेश्वर भगत उपशहर अध्यक्ष काँग्रेसचे अक्षय अंग्रे तालुका कार्याध्यक्ष सागर बारहाते राजूभाई पठाण निरंजन कुडेकर जय कदम अश्फाक सैय्यद दादा आवारे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Categories
कोपरगाव

मराठा उद्योजक जिल्हा कार्यकारणी जाहीर


कोपरगाव बिपिन गायकवाड हिंदूसम्राट तालुका प्रतिनिधी–

कोपरगाव मराठा उद्योजक लॉबीचे संस्थापक अध्यक्ष विनोदराव बडे यांच्या मार्गदर्शनाखाली व मराठवाडा संपर्क प्रमुख राजेंद्र औताडे यांच्या उपस्थितीत शिर्डी येथील कार्यक्रमात अहमदनगर जिल्हा मराठा उद्योजक कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे यावेळी अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी कोपरगाव येथील संतोष कुठे पाटील यांची निवड करण्यात आली तसेच जिल्हा संपर्क प्रमुख पदी कोपरगाव येथील राहुल आढाव पाटील यांची तर डॉ.आदित्य पाटील यांची जिल्हा आरोग्य सचिव कुमारी राविजा पिंगळे यांची अहमदनगर महिला जिल्हा सहसंपर्कप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे मराठा समाजातील तरुण आणि तरुणींना नवीन उद्योग सुरू करण्यासाठी शेती उत्पादनावर प्रक्रिया कर्ज तसेच सर्व प्रकारचे मार्गदर्शन सहकार्य हेही या संघटनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे यावेळी नूतन अहमदनगर जिल्हाध्यक्ष संतोष कुठे पाटील व जिल्हा संपर्कप्रमुख राहुल आढाव पाटील यांचा सत्कार कोपरगाव चे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी केला सदर प्रसंगी संदीप आहेर यांच्यासह अनेक उद्योजक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Categories
कोपरगाव

सरपंच कसा असावा हे एकदा वाचा नंतरच आपला निर्णय घ्या

कोपरगाव हिंदूसम्राट तालुका प्रतिनिधी बिपिन गायकवाड –

कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीच्या निवडणूका लागल्या असून ग्रामपंचायतीच्या सार्वगिण विकासासाठी लोकप्रतिनिधी योग्य गरजेचे आहेत सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य प्रमुख हा लोकाभिमुख असेन असे गरजेचे आहे लोकप्रतिनिधी गावांमधील लोकांमध्ये भांडण लावून स्वतःची पोळी भाजणारा नसावा गावाचा होणारा सरपंच गावात राहणारा असावा जेव्हा गावाला अडचण असेल तेव्हा वेळेवर मदत करणार असावा जर गावामध्ये भीषण दुष्काळ पडला असताना शासनाकडून लोकांना पाण्याची ची व्यवस्था करणार असावा गावाच्या विकासासाठी आलेल्या 14 वा वित्त आयोग निधी पेस निधी लोकहितासाठी वापरणारा असावा शासनाच्या योजना लाभार्थीनां फसवून पैसे उकळून पुन्हा वाटून खाणारा नसावा एम आर जी एस मधून मिळालेल्या विहिरीच्या लाभार्थी कडून कमिशन घेणार नसावा ग्रामपंचायत सदस्य आपल्या वार्डातील समस्याची जाणीव असणारा आणी लोकांचे प्रश्न सोडवणारा असावा गावात मंजूर झालेल्या विविध सरकारी योजनेची काम अर्धवट करुन पूर्ण बिल उचलणारा आणी शाळेतील मुख्याध्यापकाला सोबत घेऊन धाब्यावर जाणारा नसावा गावातील सर्व पदे आपल्याच घरात ठेवणारा नसावा गावातील सर्व लोकांना सोबत घेऊन काम करणारा असावा सरपंच आणि प्रशासन एखादा सामान्य नागरिक ग्रामपंचायत कार्यालय कामानिमित्त गेल्यावर त्यांच्या बरोबर विनम्रपणे बोलणारा असावा त्याच्या समस्या काय आहे ते जाणून घेणारा असावा गावातील घनकचरा गटारी रस्ते याचे नियोजन करून स्वच्छ ठेवणारा आणि प्रशासनावर वचक ठेवणारा असावा कायम वरवर गोड गोड गप्पा मारुन हात हलवून फसवणारा तर अजिबात नसावा जवळच्या व्यक्तिची कामे करणारा नसावा सर्व समाजातील लोकांची कामे करणारा असावा सरपंच झाल्यावर फक्त आपल्याच पॅनलच्या लोकांची कामे करायची आणि विरोधी पॕनलच्या लोकांची कामे करायची नाही असा सरपंच नसावा सरपंच झाल्यावर फक्त आपल्या पॅनलच्या लोकांची कामे करायची आणि विरोधी त्यांच्या लोकांची कामे करायची नाही असा सरपंच नसावा सरपंच झाल्यावर कोणत्याही प्रकारचे राजकारण नकरता समाजातील सर्व घटकांना बरोबर घेवुन काम करणारा असावा गावातील काही रिकाम टेकडे गुंड प्रवृत्तीचे लोकांना सोबत घेवुन आपल्या विरोधाकांविरोधित गावातील आपल्या पेक्षा सभ्य चांगल्या वरचड व्यक्ति विरुध्द षडयंत्र रचणारा नसावा तु यांच्यात राहातो त्यांच्या सोबत फिरतो तुला बघुन घेईन मी तुला मदत केली होती अशी उपकाराची धमकीची भाषा करणारा नसावा दारु पाजुन तरुणांनांना बिघडवणारा व फक्त मतदाना साठी वापर करणारा नसावा ग्रामपंचायत मधुन कमवलेल्या पैशातुन लोकांना मटन दारु पाटर्या देणारा नसावा गावात लंग्न सोहळा , अंत्यविधी व धार्मीक सोहळ्यास सहभागी असताना चमचेगिरी करुन श्रेय लाटणारा नसावा गावातील आरोग्य केंद्राकडुन पैशाची मागणी करणारा नसावा गावासाठी खरेदी केलेल्या एल.ई.डी बल्ब खरेदीत कमिशन खाणारा नसावा गावाला मिळालेल्या तंटा मुक्त गावाचे बक्षिस भ्रष्टाचार करुन खाणारा नसावा गावात निवडुण येण्यासाठी लोकांना पैशे वाटुन पाटर्या देऊन निवडुन येणारा नसावा गावात पहिल्यांदा निवडुन आल्या नंतर लबाडीने सरपंच झाल्यावर पुढे जाऊन जिल्हापरीषद सदस्य बघण्याचे स्वप्न पाहणारा तर अजिबात नसावा.

Design a site like this with WordPress.com
Get started