Categories
नांदेड

प्रत्येकाने स्वातंत्र्याच्या मर्यादा ओळखण्याची गरज-प्रमोद शेवाळे

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:दि.6.प्रत्येकाने आपल्या स्वातंत्र्याच्या मर्यादा ओळखून वागण्याची गरज आहे.या मर्यादांचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द पोलीस आणि समाज या दोघांनाही गंभीर दखल घ्यावी लागेल असे प्रतिपादन पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी केले.

आज दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी पत्रकारांचा सन्मान करतांना प्रमोद शेवाळे बोलत होते.याप्रसंगी व्यासपिठावर अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे,निलेश मोरे,पोलीस उपअधिक्षक शहर विभाग विक्रांत गायकवाड आणि इतवारा उपविभागाचे डॉ.सिध्देश्र्वर भोरे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.प्रारंभी सर्व पत्रकारांना पुष्प आणि एक लेखणी देवून पोलीसांनी सर्वांचा सन्मान केला. याप्रसंगी पुढे बोलतांना प्रमोद शेवाळे म्हणाले पोलीसांचे वर्तन जसे आहे तसेच आपल्या शब्दात उल्लेखित करा त्या शब्द रचनेची आम्ही नक्कीच दखल घेवू आणि योग्य काम करू असे त्यांनी सांगितले.भारतीय राज्य घटनेत मुलभूत स्वातंत्र्य दिलेले आहे.

पण त्या मुलभूत स्वातंत्र्याच्या प्रमाणे वागत असतांना स्वातंत्र्याच्या मर्यादा प्रत्येकाला ओळखता आल्या पाहिजे.नाही तर ती समस्या भरपूर पुढे जाते आणि स्वातंत्र्याचा गैर अर्थ होतो. पत्रकारांनी सांगितलेल्या सर्व सुचनांवर आम्ही विचार करू आणि त्यानुसार काम करण्याचा प्रयत्न करू असे प्रमोदकुमार शेवाळे यांनी सांगितले.नांदेड शहर आणि नांदेड जिल्हा याच्या भल्यासाठी काम करतांना आम्ही अत्यंत बारकाईने प्रत्येक गोष्टीचा विचार करू आणि त्या प्रमाणे शहरात आणि जिल्ह्यात उन्नती होईल,शहरात आणि जिल्ह्यात शांतता नांदेल यासाठी प्रयत्न करू असे सांगितले.

याप्रसंगी भोकरचे अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांनी मी नांदेडमधील सर्वच पत्रकारांशी नांदेडमध्ये असतांना पत्रकार म्हणूनच ते कसे वागतात हे पाहिले आहे.नांदेड येथून गेल्यावर हे सर्व माझे मित्र होते. आता मी पुन्हा नांदेडला आलो आहे ते पत्रकार म्हणूनच वागतील याची मला जाणीव आहे. पोलीसांच्या कामावर नियंत्रण करण्याची अपारंपारिक पध्दत म्हणजे प्रसार माध्यमे आहेत. आमच्यावर टिका करा.आम्ही त्याला सकारात्मक घेवून आणि योग्य काम करू असे विजय कबाडे म्हणाले.नांदेडच्या वास्तव्यात झालेल्या अनेक घटनांचा उल्लेख करून त्यावेळी पत्रकारांनी दिलेल्या मदततीबाबत आठवण केली.

याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अनिकेत कुलकर्णी यांनी सांगितले की,मी पत्रकारीता सुरू केली तेंव्हापासून आजपर्यंत मोठे बदल झाले आहेत.या बदलांमध्ये आलेली वेगवेगळी प्रवृत्ती मला आवडली नाही.युवा पत्रकारांनी वाचनावर लक्ष केंद्रीत करावे.सोबतच इंग्रजी भाषेवर प्रबुत्व मिळवावे. जेणे करून पत्रकारिता करतांना आपल्याकडे ज्ञानाचा भंडार असेल.

याकार्यक्रमाचे आभार व्यक्त करतांना अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे म्हणाले मी या जिल्ह्यात परिवेक्षाधिन अधिकारी म्हणून आलो होतो. माझी या जिल्ह्यातील ओळख त्यावेळी छोटीशी होती.पण आज काम करतांना मी या नांदेड जिल्ह्यातील मातीचा पुत्र आहे. असे समजूनच काम करणार आहे.
या कार्यक्रमात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, जनसंपर्क अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक राजू वटाणे यांच्यासह अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started