Categories
कोल्हापूर हातकणंगले

देशाला बलवान बनविण्यासाठी स्त्री-पुरुष समानता असणे आवश्यक आहे: अॅड.मेघा ठोंबरे

प्रशांत भोसले

रुकडी :- ( दि.४-१-२०२१)
भारतीय राज्यघटनेत स्त्री-पुरुष समानता आहे.
परंतु आर्थिक, राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक
कारणे असमानतेस जबाबदार आहेत. स्त्रीयांमध्ये
समानतेची जाणिव निर्माण करून दिली पाहिजे.
कायद्यानुसार समान हक्क, समान संरक्षण आहे,
परंतु अजूनही स्त्री-पुरुष यामध्ये भेदभाव केला
जातो. देशाला बलवान बनविण्यासाठी स्त्री-पुरुष
समानता असणे आवश्यक आहे. असे मत अॅड.
मेघा ठोंबरे यांनी व्यक्त केले त्या येथील राजर्षी शाहू
कला व वाणिज्य महाविद्यालयातील जेन्डर चम्पिअन
क्लबच्या वतीने आयोजित केलेल्या स्त्री-पुरुष
समानता या विषयावरील व्याख्यानात बोलत होत्या.
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन
राजगे होते. स्वागत व प्रास्ताविक डॉ.शर्मिला
साबळे यांनी केले.

अॅड. मेघा ठोंबरे पुढे म्हणाल्या स्त्रीयांना स्थानिक
स्वराज्य संस्थेत पन्नास टक्के आरक्षण मिळाले, परंतु
कारभार मात्र पतीच पाहतात. स्त्रीयांनी सुद्धा
आपल्याला मिळालेल्या हक्काची जाणिव ठेवून
कारभार पहिला पाहिजे, यासाठी स्त्रीयांमध्ये
जनजागृतीची गरज आहे.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. अर्जुन राजगे म्हणाले
निसर्गतः स्त्री-पुरुष हे समान आहेत, पण स्त्री-पुरुष समानता आली पाहिजे हे सांगणे दुर्दैवी आहे. स्त्री-पुरुष समानतेसाठी शैक्षणिक प्रगतीच्या मार्गाने सामाजिक,आर्थिक व राजकीय अडथळे दूर केले पाहिजेत.त्यासाठी स्त्रीयांनी शैक्षणिक प्रगती करून स्वतः च्या पायावर उभे राहिले पाहिजे. जो पर्यंत त्यांचे आर्थिक परावलंबित्व कमी होत नाही, तो पर्यंत समानता प्रस्तापित होण्यात अडचण येईल असे स्पष्ठ मत डॉ. राजगे यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले मुलगीला तु मुलगी आहेस तु असे वर्तन ठेवले पाहिजे असे वारंवार सांगून एक प्रकारे दबाव आणला जातो , तो नष्ट झाला पाहिजे. म्हणजे समाजात निश्चित स्त्री-पुरुष समानता येईल. ऑनलाईन संपन्न झालेल्या या व्याख्यानात महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक सहभागी झाले होते. आभार डॉ. माधवी सोळांकुरकर यांनी मानले. .

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started