Categories
मिरज सांगली

जय भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष परशुराम जाधव यांच्या चौकशीला सुरुवात


मिरज–अशोक मासाळ
डॉ सावंत विद्यामंदिर कोल्हापूर येथे कार्यरत सर्व शिक्षक यांचे दिनांक 29 12 2020 चे निवेदन व तक्रार अर्जाची छाननी करून शिक्षण उपसंचालक कोल्हापूर यांच्या आदेशानुसार चौकशी समिती नेमून प्रशासन अधिकारी कोल्हापूर महापालिका यांच्या अध्यक्षतेखाली चौकशीला सुरुवात झाली आहे. चौकशी चालू असताना जय भारत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्षा सुमित्रा जाधव, खजिनदार धैर्यशील जाधव हे शिक्षकांना धमकी देत असल्याचे आढळले त्यावेळी प्रशासन अधिकारी शंकर यादव याने त्यांना चांगलेच खडसावले व तेथून निघून जाण्यास भाग पाडले. या चौकशीच्या वेळी काही गंभीर आरोप संस्थाचालक परशुराम जाधव यांच्यावर असल्याचे समोर येत आहेत तसेच ही चौकशी समिती पुढील आठ दिवस सखोल चौकशी करणार असल्याचे प्रशासन अधिकारी शंकर यादव यांनी सांगितले.

Categories
मिरज सांगली Uncategorized

शिक्षक भारती मिरज तालुका कार्यकारणी जाहीर तालुकाध्यक्षपदी चंद्रकांत कांबळे सर यांची निवड

मिरज:- संजय पवार

जिल्हाअध्यक्ष महेश शरनाथे सर,सरचिटणीस कृष्णा पोळ,कोषाध्यक्ष बालम मुल्ला,पार्लमेंटरी बोर्ड उपाध्यक्ष दीपक काळे,जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर माने,मिरज तालुका अध्यक्ष संजयकुमार कवठेकर, यांनी शिक्षक बांधवांची मिरज शिक्षक भारती संघटना पदाधिकारी निवडी केल्या.
शिक्षक भारती संघटनेच्या कामाची महेश शरनाथे यांनी माहिती दिली.आमदार कपिल पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक भारती संघटना राज्यभर कार्यरत आसून प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणूक करत आहे. सरचिटणीस कृष्णा पोळ यांनी शिक्षक भारती संघटनेमध्ये सहभागी होत असलेल्या शिक्षकांचे स्वागत केले.शिक्षकांच्या प्रश्नांसाठी लढत राहू अशी ग्वाही दिली.
मिरज तालुकाध्यक्ष-चंद्रकांत कांबळे,
मिरज तालुका उपाध्यक्ष-श्रीधर सुर्यवंशी,
मिरज तालुका सरचिटणीस-विकास देवके,
शिक्षक भारती सांगली जिल्हा उपाध्यक्ष -अन्वर मुजावर
शिक्षक भारती सांगली जिल्हा कार्यवाहक-विकास वायदंडे
श्रीधर सूर्यवंशी ,सदानंद सवाईराम, प्रकाश कांबळे ,दिलीप ढास ,रमेश वायदंडे ,सिकंदर मुजावर, अनिल भोळे, जितेंद्र बनसोडे ,ज्योती पाटील, सुदर्शना रकटे,राणी सूर्यवंशी या उपस्थित शिक्षक बंधू भगिनीनी शिक्षक भारती संघटनेच्या विचाराने काम करण्याचा निर्णय घेतला.
यावेळी माध्यमिक जिल्हाध्यक्ष सुधाकर माने,संजय पवार,आरिफ गोलंदाज, सुधाकर वसगडे,अन्सारअली जमादार,राजेंद्र दोरकर,हेमंत भाट,दिगंबर सावंत,बाळासाहेब सोलनकर,मलय्या नांदगांव,सहदेव पांढरे,चंद्रकांत भोसले,अविनाश सुतार,एकनाथ जाधव,सुभाष वाघमारे,बाळासाहेब सोलनकर,प्रकाश डुबुले, सुधाकर संग्रामे,नंदकुमार पाटील,दादासो खोत,प्रताप टकले,शहानवाज मणेर,उदयकुमार रकटे,संतोष दरेकर,निलिमा शहा,वनिता बोडके,प्रिती ठाकूर,हे शिक्षक बंधू -भगिनी उपस्थित होते.

Categories
मिरज सांगली

गुंडेवाडी या श्री प्रभू रामचंद्र यांच्या पावन स्पर्शाने पवित्र हनुमानाच्या मंदिरात कपिराज (वानर) उंबर्‍यावर प्राण अर्पण केले

आज विज्ञानयुगात सुद्धा आश्चर्यचकित करणारी घटना गुंडेवाडी गावात घडली

मिरज–अशोक मासाळ

सांगली जिल्ह्यामध्ये मिरज तालुक्यात गुंडेवाडी हे गांव वसले असून गुंडेवाडी या गावास पूर्वीपासूनच पुरातन वारसा लाभला आहे गुंडेवाडी गावचे हनुमान मंदिर हे दक्षिणमुखी असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे श्री प्रभू रामचंद्र यांचे ग्रंथ करून पाहिला असता या ग्रंथामध्ये गुंडेवाडी गावालगत असलेले दंडोबा अरण्याचा उल्लेख बघायला मिळेल त्यामुळे गुंडेवाडी हे गाव त्यामुळे गुंडेवाडी हे गाव श्री प्रभू रामचंद्र यांच्या पावन स्पर्शाने पावन ठरले आहे हनुमानाचे मंदिर हे गुंडेवाडी गावचे ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध आहे. आज शनिवार दिनांक 21 2021 रोजी हनुमान मंदिरात एक कपि राज (वानर) चालत आले.
आज शनिवार असल्याने कोरूना काळाची जाणीव ठेवून भाविक सोशल डिस्टन्स पाळून हनुमंताचे दर्शन घेत होते. त्याच वेळी एक कपिराज मंदिरात प्रवेश करतो व मंदिरात असलेल्या अन्य देवदेवतांचे हात जोडून दर्शन घेतो व मंदिराच्या गाभाऱ्यात असणाऱ्या हनुमंताच्या समोर उंबर्‍यावर दक्षिणेकडे तोंड करून आपला प्राण अर्पण करतो. ही घटना पाहिल्यानंतर असे वाटते की आजच्या विज्ञान युगात सुद्धा आश्चर्यचकित करणारी घटना निश्चितच घडली आहे (अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही) वास्तविकता ही घटना शंभर टक्के सत्य आहे.
यावेळी गुंडेवाडी गावचे सरपंच त्यांचे सर्व सदस्य सर्व गावकरी मंडळी वारकरी मंडळी यांनी भारतीय संस्कृतीच्या व्यक्ती रिवाजानुसार कपिराजचे दपन विधी केली आहे.

Categories
मिरज सांगली

श्री उमेश नवाळे यांनी केलेल्या कामाची चौकशी करून त्यांना बडतर्फ करून त्यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल असे प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी द्वारे निवेदन

मिरज–अशोक मासाळ
श्री उमेश नवाळे हे ग्रामसेवक/ ग्रामविकास अधिकारी म्हणून त्यांनी मिरज तालुक्यामध्ये वड्डी एरंडोली नरवाड टाकळी नांद्रे सध्या माधवनगर व आटपाडी येथे केलेल्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता वगैरे व्यवहार केलेला आहे. श्री नवाळे यांनी कामकाज केलेल्या ग्रामपंचायतीच्या मासिक सभा व ग्रामसभेचे प्रोसिडिंग तपासले असता अनेक गंभीर बाबी निदर्शनास येतील. श्री नवाळे यांनी आत्तापर्यंत केलेल्या कामकाजामध्ये ठेकेदारांनी कामे केलेली नसतानाही व ती केल्याचे भासवून ठेकेदारांना मूल्यांकन न करता लाखो रुपयांची बिले अदा केलेली आहेत तसेच श्री नवाळे यांनी प्रत्येक ठिकाणी शासनाचे नियम व आदेश डावलून बोगस नोंदी घातल्या आहेत व तसेच परस्पर ठराव देणे अशा गंभीर बाबीही श्री नवाळे यांनी केलेले आहेत त्यामुळे श्री नवाळे यांनी केलेल्या कामकाजाचे मस्त अधिकारी नेमून चौकशी करावी तसेच स्थानिक निधी लेखा परिक्षक कार्यालयाकडून विशेष लेखा पथक नेमून फिरलेखाकापरीक्षण केल्यास कोट्यावधी रुपयांचा घोटाळा उघडकीस येईल त्यामुळे येत्या 15 दिवसात या गंभीर बाबी चा सखोल चौकशी करून श्री नवाळे यांना बडतर्फ करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अन्यथा आम्ही पक्षाच्यावतीने मा हसन मुश्रीफ साहेब ग्राम विकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या निवासस्थानासमोर मुदत या आंदोलन करणार आहोत याची आपण दखल घेऊन कारवाई करावी असे निवेदन मा मुख्य कार्यकारी अधिकारी सो जिप सांगली यांना देण्यात आले यावेळी प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख स्वप्निल खांडेकर जिल्हा उपाध्यक्ष गौतम भगत व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Categories
मिरज सांगली

लढवय्या शिक्षक भारतीच्या पाठीशी ठामपणे राहू -आमदार मानसिंगराव नाईक.

मिरज:- संजय पवार
सदगुरु आश्रमशाळा शिराळा येथील सभागृहात पार पडलेल्या वाळवा-शिराळा तालुका सावित्री फातिमा आदर्श शिक्षिका पुरस्कार वितरणात ते बोलत होते.पुढे बोलताना आमदार मानसिंग नाईक बोलताना म्हणाले की विधिमंडळात शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांचे काम निश्चितच प्रभावी आहे. विविध प्रश्न घेऊन सतत शिक्षणमंत्री व इतर मंत्री यांचेकडे पाठपुरावा करण्याचे काम त्यांचे सतत चालूच असते.सांगली जिल्ह्यात आम्ही सर्वजण शिक्षक भारतीच्या पाठीशी ठामपणे राहू.यावेळी वाळवा पंचायत सभापती शुभांगी पाटील,शिराळा पंचायत समिती सभापती वैशाली माने ,श्री प्रकाश पाटील,जिल्हाध्यक्ष महेश शरणाथे,सरचिटणीस कृष्णा पोळ,कोअर कमिटी अध्यक्ष कादर अत्तार,नेते नंदकुमार पाटील,वाळवा अध्यक्ष श्री चंद्रशेखर क्षीरसागर, शिराळा अध्यक्ष दादासाहेब खोत,सरचिटणीस सुधाकर वसगडे,कार्याध्यक्ष महेश चौगुले,कोषाध्यक्ष बालम मुल्ला सरचिटणीस अमोल जाधव,जिल्हा नेते दीपक कांबळे,अन्सारअली जमादार ,संभाजी खोत,महिला सरचिटणीस सुरेखा औताडे,केंद्रप्रमुख तानाजी माने, नजमा पिरजादे, मुख्याध्यापक सर्जेराव टकले, बाजीराव जाधव,दिगंबर सावंत, उदयकुमार रकटे,महेश टकले, नितांत तांबडे,राजू जाधव, संतोष खोत, दिलीपकुमार मोरे, सुनिल पाटील ,पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर,अधिकारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर पुरस्कार 3 जानेवारी 2020 रोजी जाहीर करण्यात आले होते. परंतु कोरोना महामारीमुळे वितरण सोहळा लांबणीवर पडला होता.यानंतर बोलताना वाळवा सभापती सौ. शुभांगी पाटील यांनी शिक्षक भारतीच्या कामाचे कौतुक करत आपल्या मनोगतामध्ये इयत्ता पाचवी व आठवी ऐवजी इयत्ता चौथी व सातवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा असावी व त्यामुळे शिक्षकानाही निश्चित ध्येय मिळेल अशी आशा व्यक्त केली.
शिराळा तालुक्याच्या पंचायत समिती सभापती सौ.वैशाली माने यांनी आपल्या मनोगतातून सावित्री-फातिमा यांच्या कार्याचा आढावा घेतला व शिक्षक भारतीच्या या उपक्रमाचे कौतुक केले.जिल्हाध्यक्ष महेश शरनाथे यांनी शिक्षक भारतीच्या गेल्या पाच वर्षातील कामाचा आढावा घेतला व सावित्री-फातिमा कॅशलेस आरोग्य योजनेविषयी माहिती दिली. शिक्षक भारती शिक्षक बँक निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचे जाहीर केले. जिल्हा सरचिटणीस कृष्णा पोळ यांनी विषय शिक्षकवेतनश्रेणी विषयी असणारी त्रुटी व त्यावरील उपाय यासंदर्भात आपले मत व्यक्त केले.शिराळा तालुका अध्यक्ष दादासाहेब खोत खोत म्हणाले की महिलांचा सन्मान या पुरस्कारद्वारे होत आहे.वाळवा अध्यक्ष श्री. चंद्रशेखर क्षिरसागर आपल्या मनोगतात म्हणाले की,अन्यायाविरुद्ध आवाज उठणारी ही चळवळ असून तालुक्यात व जिल्ह्यात वादळात दिवा लावण्याचे काम आमदार कपिल पाटील यांच्याप्रेरणेने आम्ही करत आहोत व शिक्षकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतच राहू .सत्कारमूर्ती यांच्यावतीने बोलताना केंद्रप्रमुख सुनंदा पाटील म्हनाल्या की शिक्षक भारतीचे इवलेसे रोपटे कमी काळात कामाच्या जीवावर जिल्ह्यात व राज्यात विविध क्षेत्रात भरारी घेत असून लवकरच त्याचे वटवृक्षात रूपांतर होईल.आम्हा सर्वांना पुरस्कार देऊन प्रेरणा मिळाली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.श्रीरंग गायकवाड ,सौ सुवर्णा बच्चे, अनिता कदम व सौ. सुप्रिया घोरपडे यांनी केले.आभार अमोल जाधव यांनी मानले.

Categories
कवठेमहांकाळ मिरज सांगली

खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेचा “दिनदर्शिका 2021” प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला.


दि. २८/१२/२०२०
कवठेमहांकाळ- विद्याधर रास्ते

खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्यावतीने प्रत्येक वर्षी पतसंस्थेच्या सभासद व हितचिंतकांना दिनदर्शिकाचे वाटप करण्यात येते. सन २०२१ च्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा महानगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी मा. श्री हनमंत बिराजदार साहेब तसेच विशेष कार्यक्रम अधिकारी मा. श्री सतीश कांबळे साहेब यांचे शुभहस्ते संपन्न झाला. प्रमुख पाहुणे मा. श्री. हनमंत बिराजदार साहेब यांनी पतसंस्थेच्या कामकाजाची माहिती घेतली व पतसंस्थेचे अनेक उपक्रम पाहून समाधान व्यक्त केले. पुढील काळात ही पतसंस्था वटवृक्ष झाल्याशिवाय राहणार नाही! असा विश्वास त्यांनी व्यक्त केला, शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघ व शिक्षकांच्या आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी पतसंस्था हातात हात घालून काम करीत आहेत. याबद्दल महासंघाच्या पदाधिकार्‍यांना व पतसंस्थेच्या सर्व संचालक मंडळाला धन्यवाद दिले. तसेच संचालक मंडळ सभासदांच्या हिताचा व पारदर्शी कारभार करत आहे. बद्दल संचालक मंडळाचे ही त्यांनी विशेष कौतुक व अभिनंदन केले. तसेच सतीश कांबळे साहेब यांनीही पतसंस्थेच्या कामकाजाविषयी समाधान व्यक्त करून अवघ्या बारा वर्षांमध्ये पतसंस्थेत जवळजवळ पाच कोटीच्या ठेवी आल्या आहेत, यावरून पतसंस्थेवरती लोकांचा विश्वास असल्याचे हे नामवंत उदाहरण आहे, असे सांगितले.
यावेळी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक पतसंस्थेचे चेअरमन श्री मु.न.तांबोळी यांनी केले. पतसंस्थेच्या कामकाजाविषयीची माहिती खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री अरविंद गावडे सर यांनी करून दिली. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री पा.बा. पाटील सर, पतसंस्थेचे चेअरमन श्री मु.न. तांबोळी, व्हाईस चेअरमन श्री सुभाष माने, मानद सचिव श्री उमेश कुलकर्णी, खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष व विद्यमान संचालक श्री अरविंद गावडे, महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री नामदेवराव मदने, श्री डी. बी. कांबळे, महेश सपकाळ, युवराज वायदंडे, गुरुप्रसाद गुरव व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री डी.बी. कांबळे यांनी केले तर आभार श्री उमेश कुलकर्णी यांनी मानले.

Categories
मिरज सांगली

सावित्री-फातिमा कॅशलेस योजना- शुभारभ शिक्षक आमदार कपिल पाटील याच्या हस्ते सपन्न .


मिरज:- संजय पवार दिनांक २७ डिसेंबर रोजी शिक्षक आमदार व शिक्षक भारतीचे संस्थापक कपिल पाटील यांच्या हस्ते सावित्री – फाती मा कॉशलेश योजनेच शुंभार भ कडेगाव येथेशिक्षक भारतीच्या कार्यकर्त्यांची कार्यकत्याचा मेळाव्यात करण्यात आला . यावेळी शिक्षक भारतीचे सांगली जिल्हाध्यक्ष सुधाकर माने यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
यावेळी शिक्षक भारतीच्या वतीने संघटनेच्या सभासद असणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी च्या सावित्री-फातिमा कॅशलेस योजनेचे उदघाटन आमदार कपिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
.कार्यक्रमा प्रसंगी बोलताना आमदार कपिल पाटील म्हणाले की ही कॅशलेस योजना ही शिक्षकाच्या कुटुबाची काळजी घेणारी मेडीकल क्लेम योजना आहे .असे मत नोंदवत चांगला भारतीय नागरिक घडवण्याची जबाबदारी ही आपल्या शिक्षकांची आहे. शिपाई भरती बाबतीत काढलेला शासन निर्णय मागे घेण्यास भाग पाडू व पूर्वी प्रमाणे भरती करून मूळ वेतन अदा करण्यासाठी प्रयत्नशील राहूअसे ही ते म्हणाले. यापुढील काळात शिक्षण क्षेत्रात अन्याय कारक बदल घडवण्याच घाट केंद्र शासनाने घातला आहे .त्यासाठी एकत्र येवून लढा देण्याचे आव्हान आमदार कपिल पाटील यांनी केले.
यावेळी शिक्षक भारती प्राथमिक राज्याध्यक्ष नवनाथ गेंड, राज्याचे माध्यमिकचे कार्यध्यक्ष सुभाष मोरे यांनी सावित्री _ फातिमा कॉशलेश योजने बाबत मार्गदर्शन केले. तर शिक्षक भारती प्राथमिकचे जिल्हाध्यक्ष महेश शरनाथे व महानगर अध्यक्ष आरीफ गोलंदाज यांनी शिक्षकांच्या विविध समस्या मांडले.
याप्रसंगी शिक्षक भारती कडेगाव तालुका अध्यक्ष म्हणून प्रवीण पवार व शरद शिदे यांच्या कार्य चे कौतुक करूण त्याचा गैरव करण्यात आला
पलूस येथील सहाय्यक शिक्षक सलीम सय्यद यांचे गेल्या महिन्यात आकस्मित मृत्यू झाले.सलीम सय्यद सर हे 20 टक्के अनुदान प्राप्त शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते.त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने सांगली जिल्हा उर्दू शिक्षक भारती मार्फत त्यांच्या कुटुंबाला मदत म्हणून दोन लाख सात हजार रुपये आमदार कपिल पाटील यांच्या हस्ते व राज्याध्या उर्दु मुस्ताफ पटेल याच्या वतीनेप्रदान करण्यात आला .
यावेळी शिक्षक भारती प्राथमिक राज्याध्यक्ष नवनाथ गेंड सर, राज्याचे कार्यध्यक्ष सुभाष मोरे,उर्दू शिक्षक भारती राज्याध्यक्ष मुश्ताक पटेल सर, सांगली जिल्हा माध्यमिक जिल्हाध्यक्ष सुधाकर माने,प्राथमिक चे जिल्हाध्यक्ष महेश शरनाथे,महानगरअध्यक्ष आरीफ गोलंदाज,जिल्हाउपाध्यक्ष मोहन पुजारी,जिल्हाकार्याध्यक्ष संजय पवार,जिल्हासचिव आशिष यमगर,प्राथमिक सचिव कृष्णा पोळ,वाळवा तालुका अध्यक्ष देवेंद्र पाटील,शिराळा तालुका अध्यक्ष बाजीराव जाधव,मिरज तालुका उपाध्यक्ष महेश कोळी, संघटक कोरे,उर्दू जिल्हाध्यक्ष अशरफ अशरफ प्रविण पवार अध्यक्ष कडेगाव शरद शिंदे सचिव महादेव खोत मिरज तालुका सधटक नितीन पाटील कुमटे ( तासगाव ) कोरे सर आरग हाय . सुरेश कदम आटपाडी दिगंबर सांवत . जत अध्यक्ष धडस सर पालुस चौगले जिल्हातील सर्व शिक्षक भारतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
याकार्यक्रमाचे सूत्र संचालन आशिष यमगर यांनी केले तर आभार फारूक मोमीन यांनी मांडले.

Categories
मिरज सांगली

जवाहर हायस्कूलचा एक सामाजिक व शैक्षणिक उपक्रमशिक्षक आपल्या दारी

मिरज–अशोक मासाळ
लोकांच्या ध्यानीमनी नसताना शिक्षण क्षेत्रापुढे कोरोनामुळे अनेक आव्हाने उभी राहिली, शाळा बंद झाल्या, मुले व शिक्षकांची एकमेकांपासून ताटातूट झाली. अर्धे आयुष्य शिक्षकांनी मुलांच्या संगतीत घालविली आहेत .निर्माण झालेला मुलांचा विरह शिक्षकांना पेलवेना झाला .बाळाचा विरह आई पेलवू शकत नाही तशी अवस्था शिक्षकांची झाली .मुले लॉकडाउनच्या काळात फोनवरून अभ्यासाची , कौटुंबिक, आर्थिक परिस्थितीची, आरोग्याची चर्चा करायची त्यावेळी अनेक धक्कादायक व मन हेलावणाऱ्या गोष्टी ऐकायला मिळाल्या ,काही मुलांचे नातेवाईक, आप्तस्वकीय हे जग सोडून गेले. मुले भेदरली अशा अवस्थेत त्यांना एकच आधार वाटू लागला तो म्हणजे माझा शिक्षक. अनेक अडचणी आल्या, प्रश्न निर्माण झाले परंतु संवाद साधून,एकमेकांशी चर्चा करून, विचारविनिमय करून त्यातून मार्ग काढायचा व भेदरलेल्या आणि खचलेल्या मुलांना पुन्हा पाठीवरती हात ठेवूनी लढ म्हणायचे हा विश्वास विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण करण्यासाठी जवाहर हायस्कूल चे शिक्षक आता विद्यार्थ्यांच्या घरी निघालेत. तोच विद्यार्थी पुन्हा नव्या उमेदीने घडवण्यासाठी शिक्षक आपल्या दारी!!!
मुख्याध्यापिका
जवाहर हायस्कुल अँड ज्युनिअर कॉलेज मिरज.

Design a site like this with WordPress.com
Get started