Categories
मायणी

डॉ.श्रीधर सावंत विद्यामंदिर या शाळेच्या संस्था प्रमुखांची चौकशी करून प्रशासक नेमावा.उपसंचालक सत्यवान सोनवणे यांचेकडे संघटनांची

मागणी मिरज ----अशोक मासाळ

कोल्हापूर दि.29- जय भारत शिक्षण संस्थेचे डॉ. डॉक्टर श्रीधर सावंत विद्यामंदिर चे मुख्याध्यापक श्री एस एम पाटील यांना झालेल्या शिवीगाळ धक्काबुक्की बद्दल काल शाहुपुरी पोलिस स्टेशनमध्ये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या कारभाराची चौकशी करून शाळेवर प्रशासक नेमावा अशी मागणी सर्व संघटना कृती समितीच्या वतीने मा शिक्षण उपसंचालकांचेकडे करणेत आली आज सर्व संघटनांच्या वतीने कोल्हापूरचे उपसंचालक सत्यवान सोनवणे साहेब यांना निवेदन देण्यात आले यावेळी कोल्हापुरातील सर्व संघटना उपस्थित होते यावेळी सत्यवान सोनवणे साहेब यांनी घडलेली बाब गंभीर स्वरूपाचीअसून त्याबाबत लवकरच चौकशी समिती नेमून चौकशी करण्याचे आश्वासन दिले.यावेळी बोलताना ते म्हणाले मुख्याध्यापक यांच्यावर घडलेली घटना ही गंभीर स्वरूपाची असून अशा प्रकारचT फौजदारी गुन्हा दाखल झालेल्या संस्था चालकाची व शाळेची चौकशी केली जाईल.,प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शिक्षकांवर अन्याय होत असेल तर अशा शिक्षकांच्या पाठीशी समाज म्हणून तुम्हीथांबला आहातही बाब शिक्षण क्षेत्राला दिलासादायक आहे या शाळेचे पटसंख्या चांगली आहे अशा घटना शिक्षकांच्या बाबतीत प्रकार घडत असेल तर हे चुकीचे असल्याचे नमूद केले. यावेळी सर्व संघटनेच्या वतीने मीटिंग घेण्यात आली त्यावेळी बोलताना शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे शिक्षकांच्या पाठीशी नेहमी संघटना ठामपणे उभी असल्याचे नमूद केले तर महासंघाचे संतोष आयरे यांनी कोल्हापूर मध्ये अशा अनेक शाळा आहेत ज्यामध्ये शिक्षकांना त्रास दिला जातो त्या शिक्षकांनाही या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. पुरोगामी शिक्षक संघटनेचे शहराध्यक्ष विलास पिंगळे यांनी घडलेली घटना गंभीर स्वरूपाचे असून या सर्व संघ शिक्षकांच्या पाठीशी आमची संघटना ठामपणे उभी असल्याचे जाहीर केले. तसेच प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सचिव सुधाकर सावंत यांनी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शिक्षकांना अशाप्रकारे लुटारू संस्थापक मिळत असते तरी ही बाब गंभीर रुपयाचे आहे त्याच्यावर उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी केली. सर्व संघटनांनी या सर्व शिक्षकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचT निर्धार केला तसेच महासंघाचे विभागीय अध्यक्ष राजेंद्र कोरे यांनी या शाळेतील सर्व शिक्षक आहेत संघटितपणे काम करत असल्याचे दिसून आल्याचे नमूद केले.शालेय कामकाज प्रामाणिकपणे करून अनेक शिक्षक आदर्श आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त असल्याचे नमूद केले तर शिक्षक समितीच्या शरद शहराध्यक्ष सविता गिरी यांनी या शाळेतील महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर वाचा फोडणार असल्याचे नमूद केले . त्यावेळी सर्व संघटनेच्या मीटिंग झालेल्या चर्चेनुसार ही लढा तीव्रपणे उभा करण्याचे ठरवले आहे. यावेळी कोल्हापुरातील सर्व संघटनांचे पदाधिकारी यामध्ये आनंदराव हिरुगडे, महादेव डावरे अनिल सरक, राजेश कोंडेकर,कुमार पाटील, अशोक पाटील, शंकर पाटील, अनिल खोत, रंगराव कुसाळे, छाया हिरुगडे, उज्वला जाधव, साक्षी कांबळे, सूर्यकांत बर्गे, संजय पाटील शंकर गुरव, श्रीधर सावंत विद्यामंदिर सर्व शिक्षक शिक्षिका सर्व संघटना पदाधिकारी पतसंस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रति,
माननीय संपादक ,
वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिद्ध करून सहकार्य करावे ही विनंती.

Categories
मायणी सातारा

खटाव माण अँग्रोचे १५ डिसेंबर पर्यंतचे बिल २५०० रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग

मायणी : सातारा खटाव तालुका विशेष प्रतिनिधी तानाजी चव्हाण दि.३०/१२/२०२०

खटाव माण साखर कारखान्याच्या द्वितीय गळीत हंगाम २०२०-२१ चा गळीताचे दि १६ नोव्हेंबर ते दि १५ डिसेंबर २०२० पर्यंतचा पहिल्या बिलाचा दुसरा टप्पा २५०० रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन,माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी दिली.
खटाव माण तालुका अँग्रो प्रो लि पडळ कारखान्याच्या कार्यस्थळी चेअरमन प्रभाकर घार्गे, को-चेअरमन मनोजदादा घोरपडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे व संचालकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत हा निर्णय सर्वानुमते जाहीर करण्यात आला.
यावेळी बोलताना प्रभाकर घार्गे म्हणाले, यंदाच्या हंगामातील आजपर्यंत दोन लाख एकसष्ठ हजार मेट्रिक टनाचे उसाचे विक्रमी गाळप खटाव माण अँग्रो ने केले आहे, चांगल्या पर्जन्यमानामुळे उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर वाढल्याने आज कारखान्याकडून शेतकऱ्यांच्या बिलास वेळेवर प्राधान्य देण्यात येत असल्यामुळे याठिकानची विश्वासहर्ता वाढून “खटाव माण अँग्रो” कडे उसाची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. गतवर्षी ऊस दिलेल्या सर्व शेतकऱ्यांना प्राधान्य देऊन राहिल्या अन्य ऊस पट्ट्यातील ऊसाला तोडणी यंत्रणा देऊन सर्व उसाची आवक कारखान्यात होऊन भागातील शेतकऱ्यांना दिलासा देणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
या वेळी कारखान्याचे को-चेअरमन मनोजदादा घोरपडे म्हणाले, साखरेच्या गुणवत्तेत खटाव माण अँग्रोने महाराष्ट्रात अव्वल दर्जा मिळवला असून कारखान्यातील अन्य उत्पादने ही कारखान्यातून विक्री होत आहेत. त्यामाध्यमातून खटाव माण बरोबर कराड उत्तर मध्ये शेतकऱ्यांत निर्माण झालेल्या विश्वासामुळे त्यांच्या हितासाठी कारखान्याबरोबरच जास्तीतजास्त शेतकऱ्यांना आर्थिक दृष्टया सक्षम बनवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे मत मनोजदादा घोरपडे यांनी व्यक्त केले.

Design a site like this with WordPress.com
Get started