Categories
गेवराई

सत्यजित तांबे यांच्याकडून गेवराई शहरातील पात्र अतिक्रमणे कायम करण्यासाठी पाठपुरावा

हिंदुसम्राट विशेष प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

गेवराई:दि.२९.गेवराई शहरातील पात्र अतिक्रमण धारकांना PTR मिळावेत यासाठी जिल्हाधिकारी बीड आणि संचालक नगर रचना पुणे यांना महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे यांनी मुंबई येथील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यालयातून तात्काळ कारवाई करण्याचे आदेश आयोजित करण्यात आलेल्या बैठकीनंतर तातडीने दिले आहेत.
आज दिनांक २९ डिसेंबर रोजी मुंबई मधील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे कार्यालयात युवक काँग्रेसचे बीड जिल्हा अध्यक्ष अॅड.श्रीनिवास बेदरे यांनी आणि सामाजिक सुरक्षा समितीचे महाराष्ट्र राज्य समन्वयक तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलाचे राज्य सचिव कडुदास कांबळे , अभय देशमुख,शिवराज मोरे, ब्रिजदत्त, विजय निटोरे, यांनी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे यांना गेवराई शहरातील अतिक्रमण धारकांच्या सरकारी जागेवरील अतिक्रमणे कायम करण्याचा प्रश्न गांभीर्याने लक्षात आणून दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत दि. ०७/०९/२०१७ रोजी निर्देशीत केलेल्या शासन निर्णय दि. १२/०७/२०११ च्या नुसार पुढील कार्यवाही करण्यासाठी दिलेला चुकीचा अभिप्राय रद्द करून योग्य ती कार्यवाही करावी यासाठी जिल्हाधिकारी बीड यांना तर शासन निर्णय दिनांक १७ नोव्हेंबर २०१८ नुसार सरकारी जागेवरील अतिक्रमणे कायम करण्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ३७(१) एक नुसार गेवराई शहरातील संजयनगर सर्वे नंबर १ मधील आरक्षणा खालील क्षेत्र वगळून ते निवासी विभागात समाविष्ट करून नगर परिषद गेवराई यांनी संचालक नगर रचना व मूल्य निर्धारण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांना दाखल करण्यात आलेल्या प्रस्तावास मंजूरी द्यावी यासाठी त्यांनी नगर रचना संचालक यांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

Categories
गेवराई बीड

गेवराई येथे जनतेच्या प्रश्नावर जनसुनवाई घेऊन काँग्रेस स्थापना दिवस साजरा

हिंदुसम्राट विशेष प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

गेवराई:दि.२८.काँग्रेस पक्षाचा १३६ वा स्थापना दिवस गेवराई शहरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या गोरगरीब जनतेच्या प्रश्नावर जनसुनवाई घेऊन यशराज नगर गेवराई येथे साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस सेवा दलाचे राज्य सचिव तथा सामाजिक सुरक्षा समितीचे प्रदेश समन्वयक कडुदास कांबळे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून युवक काँग्रेस बीड जिल्हा अध्यक्ष अॅड. श्रीनिवास बेदरे उपस्थित होते.
या कार्यक्रमास प्रामुख्याने असंघटित कामगार काँग्रेस संघटनेचे राज्य सचिव मधुकर वारे,जिल्हा अध्यक्ष संतोष निकाळजे,महाराष्ट्र सामाजिक सुरक्षा समितीचे बीड जिल्हा अध्यक्ष सोनाजी कारके,गेवराई तालुका अध्यक्ष शेषराव सदाफुले, संगीता हतागळे,शेख मुसा, महादेव रोकडे,काँग्रेस सेवा दलाचे गेवराई तालुका अध्यक्ष तुकाराम खरात,युवक काँग्रेसचे गेवराई तालुका अध्यक्ष किरण आजबकर,बळीराम गिराम, जीजा जगताप,राहुल घेणे, इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन सोनाजी कारके यांनी केले.यावेळी युवक काँग्रेस बीड जिल्हा अध्यक्ष अॅड. श्रीनिवास बेदरे यांनी काँग्रेस स्थापनेचा थोडक्यात ईतिहास सांगत मोदी सरकारचे शेतकरी विरोधी ३ काळे कायदे आम्ही रद्द केल्याशिवाय शांत बसणार नाहीत असे ठणकावून सांगितले. यावेळी उपस्थित सय्यद मन्सूर, राजु पठाण,संगीता हतागळे, वाणी अप्पा,यांनी झोपडपट्टी धारकांचे प्रश्न मांडले.
शेवटी अध्यक्षीय भाषणात कडुदास कांबळे यांनी काँग्रेस पक्ष हा स्वातंत्र्याच्या पुर्वी पासून ते आजपर्यंत सर्व सामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून काम करत आला आहे. त्याप्रमाणे आम्ही आपण मांडलेल्या प्रश्नावर कालबद्ध नियोजन करून गोरगरीबांना न्याय मिळवून देवू असा विश्वास जनतेसमोर व्यक्त केला.
कार्यक्रमासाठी यशराज नगर येथील बहुसंख्य महिला पुरुष उपस्थित होते.शेवटी राष्ट्रगीता नंतर कार्यक्रम संपला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार सामाजिक सुरक्षा समितीचे गेवराई तालुका अध्यक्ष शेषराव सदाफुले यांनी मानले.

Design a site like this with WordPress.com
Get started