
कागल/प्रतिनिधी◆गोरख कांबळे.
भारती कांबळे यांनी विध्यार्थी केंद्रबिंदू मानून ज्ञानदानाचे काम प्रामाणिकपणे केल्याचे प्रतिपादन एस.एस.सी बोर्डाच्या सहसचिव सुवर्णा सावंत यांनी केले.त्याव्हन्नूर (ता.कागल)येथील श्री. दौलतराव निकम माध्यमिक विद्यालयातील सहाय्यक शिक्षिका सौ.भारती कांबळे यांच्या सेवानिवृत्ती प्रसंगी बोलत होत्या.अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्षा श्रीमती.सुनंदा निकम होत्या.सौ.सावंत पुढे म्हणाल्या, प्रतिकूल परिस्थितीमध्ये भारती कांबळे यांनी आपल्या प्रभावी व उत्कृष्ट अध्यापनाद्वारे आदर्श विद्यार्थी निर्माण केले.
कागल तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस.टी.चौगुले म्हणाले,भारती कांबळे यांनी महिलाशिक्षकांसाठी आदर्शवत काम करून समूहगीत व गीतगायन प्रकारात प्रशंसनीय काम केले आहे.
यावेळी मनोज जिरगे,कांबळे सर,माजी विद्यार्थीनी रोहिणी पाटील,कृष्णाबाई पाटोळे, समृद्धी पाटील तर प्रशालेच्या विद्यार्थिनी समृद्धी निकम,अमृता पोवार यांनी आपली मनोगते व्यक्त केली.प्रशालेच्या वतीने सौ.कांबळे यांना मानपत्र देण्यात आले.
यावेळी गावातील विविध संस्था,ग्रामपंचायत,माजी विद्यार्थी,नातेवाईक, यांच्याकडून त्यांचा सत्कार करण्यात आला व कांबळे यांनी ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी दौलतराव निकम यांचा आदर्श मानून आपण काम करत असल्याचे सांगून शेवटच्या श्वासापर्यंत या शाळेच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील राहू असे सांगितले.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक व्ही.जी.पोवार यांनी केले.सूत्रसंचालन एम.जी.मोरे यांनी केले तर आभार बी.बी खाडे यांनी मानले.