
कणकवली-सामाजिक,कला,क्रीडा,सांस्कृतिक,शैक्षणिक,सामाजिक अशा विविध क्षेत्रात कार्यरत असण-या’जनजागृती सेवा समिती,महाराष्ट्र या सामाजिक संस्थेची बैठक तेली आळी,कणकवली येथे गुरुनाथ तिरपणकर यांच्या निवासस्थानी विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी संपन्न झाली. जनजागृतीने कोकणातही समाजकार्य करण्यास सुरुवात केलेली आहे. त्याच अनुषंगाने कणकवली तालुक्यातील करंजे गावातील राजश्री छत्रपती शाहु महाराज मतिमंद निवासी विद्यालयात जीवनावश्यक वस्तुंचे वाटपकरण्यात आले होते, या कार्यक्रमासाठी महनिय व्यक्तींचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले होते,त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.याप्रसंगी जनजागृतीच्या उपक्रमास सहकार्य केल्याबद्दल जनजागृती सेवा समितीचे जेष्ठ सल्लागार बाळासाहेब सावंत यांच्या हस्ते सन्माननीय चंद्रशेखर उपरकर,सौ.अक्षता कांबळी,रविकिरण शिवलकर,राजन दाभोळकर,करंजे गावचे सरपंच मंगेश तळगांवकर,संतोष सावंत,भरत तोरसकर यांना “आभार पत्र “देऊन कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी लावण्य सिंधु चित्रपट संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर उपरकर यांनी शैक्षणिक,मत्सव्यवसाय,शासकीय अनुभव,सांस्कृतिक,सामाजिक अशा विविध विषयांवर आपले सकारात्मक व उदभोदक असे विचार मांडले. तसेच अभिनेत्री सौ अक्षता कांबळी यांनी चित्रपट,सांस्कृतिक,अभिनय क्षेत्रातील आपले अनुभव उपस्थितीतांसमोर मांडले. करंजे गावचे सरपंच मंगेश तळगांवकर यांनीही आपले विचार व्यक्त केले. शेवटी अनुभव संपन्न व्यक्तिमत्व तसेच जनजागृती सेवा समितीची जेष्ठ सल्लागार बाळासाहेब सावंत यांनी महिला बचत गट,सहकार चळवळ,सामाजिक दायितत्व,गृहनिर्माण महासंघ,शासकीय करप्रणाली,कणकवलीची सुबत्ता-शहरीकरण अशा विविध विषयांवर उदाहरणादाखल मौलिक मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन सामाजिक कार्यकर्ते भरत तोरसकर यांनी केले. बैठक खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात संपन्न झाली.