दिनेश पवार,दौंड,प्रतिनिधी:-
माझी वसुंधरा व स्वच्छ भारत अभियान अंतर्गत दौंड नगरपरिषद दौंड च्या वतीने माझे वैभव माझी बाग या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, याचे परीक्षण नुकतेच पूर्ण झाले या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रियांका रामनाथ पवार, द्वितीय मनोज केशवराव गाजरे, तृतीय अलका सुभाष गुंजाळ यांना अनुक्रमे यश मिळाले आहे,पर्यावरण संवर्धन, वृक्ष लागवड व संवर्धन परिसर स्वच्छता हे तत्व समोर ठेवून तसेच स्वच्छ संवर्धन अभियान अंतर्गत महत्वाच्या उपक्रमास प्राधान्य देण्यात आले,स्पर्धेत छोट्या गटातील भावेश आनंद गुंडेचा, शर्वरी राजेश यादव पाटील यांचा सहभाग कौतुकास्पद ठरला,
तर स्वतः रोपे तयार करणे,औषधी वनस्पती,पाने,फुले,खोड,यांचा उपयोग उपचारासाठी करणारे तसेच मित्र परिवारामध्ये ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वृक्ष भेट देऊन वृक्षारोपण करून घेणारे मनोज केशवराव गाजरे व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा सहभाग उल्लेखनीय ठरला, विजेत्यांना 26 जानेवारी रोजी सन्मानित करण्यात येणार आहे,या संपूर्ण स्पर्धेदरम्यान मुख्याधिकारी निर्मला राशींनकर,नगराध्यक्षा शितलताई कटारिया, उपनगराध्यक्ष विलास शितोळे, गटनेते राजेश गायकवाड, गटनेते बादशहा शेख,तसेच सर्वच नगरसेवक यांचे प्रोत्साहन मिळाले,या स्पर्धेचे परीक्षण सुप्रिया गुरव,तृप्ती साळुंखे, अपर्णा लोमटे,यांनी केले, हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आरोग्य निरीक्षक शाहू पाटील, सारिका परदेशी, प्रमिला पवार, शुभम चौकटे, प्रवीण खुडे,सागर सोनवणे, नितीन तुपसौंदर्य,अमित मिसाळ, रोहन साळवे,यांचे सहकार्य लाभले