आशिष चव्हाण / वाई प्रतिनिधी
दि.६
तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक लागलेली आहे पंचवार्षिक निवडणुकीत जोरदार प्रचार व धुराळा उडण्यास सुरुवात झालेली आहे अनेक वर्षे गावाची सत्ता भोगुनही आजी-माजी सरपंचासह नामधारी गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती जोर-बैठका मारण्यास सुरुवात करीत आहेत काहीही झालं तरी ग्रामपंचायतीमध्ये सत्तेचे वाटेकरी होण्यासाठी एकमेकांच्या विरुद्ध षड्यंत्र चा कार्यक्रम सुरू झाला आहे. गावचा विकास झाला नाही तरी चालेल पण ग्रामपंचायत सत्ता हस्तगत झाली पाहिजे या इर्षेने पेटलेल्या गावा गावातील चांडाळ चौकडी ने ग्रामपंचायत निवडणुकीवर डोळा ठेवलेला आहे. आज हि गावाच्या समस्या जैसे थे आहेत तरीदेखील खोटे आश्वासन देऊन पुन्हा सत्तेत येण्याचा प्रयत्न चालू झाला आहे.वाई तालुक्यातील 99 ग्रामपंचायती पैकी 76 गावांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाले आहे शासनाच्या धोरणामुळे गावच्या विकासासाठी येणारा निधी हा ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा होत आहे तसेच सरपंच व उपसरपंच यांचा निधीदेखील वाढलेला आहे. निवडणूक आली की तेवढ्यापुरतेच नेतेमंडळी जमा होतात. जो तो गावचा विकास करेन असं बोलतो परंतु निवडणूक झाल्यानंतर ते सगळे विसरून जातात. महिलांना 35 टक्के आरक्षण मिळाल्यामुळे राजकीय पटलावर त्यांना संधी मिळाली आहे. परंतु घोटाळे जास्त झाले असल्या कारणामुळे चांगल्या महिला राजकारणातून बाजूला निघून जातात. त्यामुळे महिलांच्या आरक्षण हे फक्त कागदावरच दिसून येते गावातील नेतेमंडळी त्यांच्या पत्नी किंवा जवळील महिला सरपंच किंवा सदस्य पाहायला मिळतात. प्रत्येक गावातील युवती युवक किंवा महिला यांना निवडणूक लढवण्याची तीव्र इच्छा असते परंतु गावटगे यांच्यामुळे कर्तृत्ववान युवक व महिला राजकारणापासून दूर जातात. सतत पाच वर्ष सत्ता भोगून देखील पुन्हा गावाला वेठीस धरण्यासाठी मी नाहीतर माझी बायको असा अट्टाहास करुन गावचा विकासाला खीळ घालण्याचे काम करत असतात असे होऊन देखील गावचे अनेक प्रश्न प्रलंबित राहून गेलेले दिसून येतात याला जबाबदार कोण असा प्रश्न प्रत्येक गावातील ग्रामस्थ करीत असतो.