मिरज–अशोक मासाळ
डॉ सावंत विद्यामंदिर कोल्हापूर येथे कार्यरत सर्व शिक्षक यांचे दिनांक 29 12 2020 चे निवेदन व तक्रार अर्जाची छाननी करून शिक्षण उपसंचालक कोल्हापूर यांच्या आदेशानुसार चौकशी समिती नेमून प्रशासन अधिकारी कोल्हापूर महापालिका यांच्या अध्यक्षतेखाली चौकशीला सुरुवात झाली आहे. चौकशी चालू असताना जय भारत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्षा सुमित्रा जाधव, खजिनदार धैर्यशील जाधव हे शिक्षकांना धमकी देत असल्याचे आढळले त्यावेळी प्रशासन अधिकारी शंकर यादव याने त्यांना चांगलेच खडसावले व तेथून निघून जाण्यास भाग पाडले. या चौकशीच्या वेळी काही गंभीर आरोप संस्थाचालक परशुराम जाधव यांच्यावर असल्याचे समोर येत आहेत तसेच ही चौकशी समिती पुढील आठ दिवस सखोल चौकशी करणार असल्याचे प्रशासन अधिकारी शंकर यादव यांनी सांगितले.