Categories
भोकर

ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचांनी नामधारी न बनता कारभारी बनावेवंचित आघाडीचे नामदेव आयलवाड यांचे आव्हान

तालुका प्रतिनिधी भोकर दत्ता बोईनवाड
ता.भोकर ग्रामपंचायतीच्या निवडणुका चुरशीच्या होत आहेत.परंतू प्रस्थापित पँनाल प्रमुख श्रीमंतीच्या जोरावर आपल्या मर्जीतल्या गुलामा प्रमाणे वागणाऱ्या नागरिकांना निवडणूकीत उभे करून मताची खरेदी करून निवडणूक जिंकल्यानंतर कारभार मात्र स्वतःचालवतो तेव्हा निवडून आलेल्या सरपंच,उपसरपंचानी कुणाचे बाहुले न बनता स्वतः कारभारी बनन्याचे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे नेते नामदेव आयलवाड यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
ओबीसी नेते नामदेव आयलवाड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात असे म्हटले आहे की पूर्वी राजा रूढीपंरमपरे नुसार घराणेशाहीतूंन जन्माला येत असे परंतु आता भारतीय संविधानाने दिलेल्या मताचा अधिकारामुळे व लोकशाही स्वातंत्र्यामुळे तमाम वंचित घटकांना आपला राजा निवडण्याचा अधिकार आहे.म्हणून तमाम ओबीसी एससी एसटी भटक्या समाजाचे लोकप्रतिनिधी सतेत निवडून जात असतांना प्रस्थापित मंडळी ग्रामपंचायतचा कारभार आपल्याच हातात रहावा म्हणून श्रीमंतीच्या जोरावर गरीब बहुजन समाजातील मागासवर्गीय सरपंच, उपसरपंच यांचा अधिकार हिरावून स्वताच कारभार चालवतात आणि आपल्या मर्जीप्रमाणे वापर करून त्यांना सह्याजीरावा पुरते बैलोबा सारखा वागणूक देत ग्रामपंचायतीचा कारभार आपणच चालवत असतात हे कुठेतरी थांबले पाहिजे निवडूण आलेल्या सर्व वंचित बहुजन घटकातील सरपंच उपसरपंचानी कुणाच्या हातचे बाहुले न रहाता आपल्या अधिकाराचा वापर स्वतः संविधानाने दिलेल्या अधिकारानूसार चालवून गावच्या विकासासाठी काम करावे सत्तेतून पैसा पैशातून सत्ता मिळवू पहाणाऱ्या भ्रष्टाचाऱ्या पासून सावध रहावून स्वाभिमानाने गावचा कारभार चालवण्याचे आवाहन आयलवाड यांनी केले आहे.

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started