
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड:विद्यापीठाची चोराला सोडून संन्याशाला फाशी अशी भूमिका- प्रा सूरज दामरे सिनेट सदस्य
नुकत्याच झालेल्या पीएचडी कोर्स वर्क मध्ये लातूर येथील दयानंद विज्ञान महाविद्यालय हे केंद्र होते सदर केंद्रावर एकूण 112 विद्यार्थी परीक्षेस पात्र होते पण सदर 112 पैकी 36 विद्यार्थी यांनी गैरप्रकार केला असे निदर्शनास आले . 36 विद्यार्थ्यांनी व्हाट्स अप ग्रुप तयार करून परीक्षेतील उत्तरे एकमेकांना या ग्रुपद्वारे सांगितले.सदर गैरप्रकार निदर्शनास येताच विद्यापीठाने चौकशी समिती नेमून सदर विद्यार्थ्यांची चौकशी केली आणि त्या केंद्रावरील सर्वच विद्यार्थ्यांची पुनः परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला.जो की अत्यंत चुकीचा आहे. ज्या विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केला त्यांना दोषी ठरवून त्यांच्यावर कारवाही करायचे सोडून विद्यापीठाने त्या केंद्रावरील सर्वांची पुनः परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देणे असाच काहीसा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे .तरी विद्यापीठाने आपला निर्णय मागे घेऊन खालील पैकी एक निर्णय घ्यावा जो विद्यार्थी हिताचा आहे.
1) 36 विद्यार्थी जे दोषी आहेत त्यांचीच फक्त पुनः परीक्षा घेण्यात यावी बाकीचे जे विद्यार्थी आहेत त्यांचे निकाल जाहीर करावे
2) पुनः परीक्षा घ्यायचीच असेल तर संपूर्ण विद्यापीठातील विद्यार्थ्यांची घ्यावी
सदर बाबीचा आपण गांभीर्याने विचार करावा ही विनंती अन्यथा विद्यार्थी हितासाठी रस्त्यावर उतरू याची नोंद घ्यावी.
असे प्रा सुरज दामरे,
सिनेट सदस्य,नांदेड विद्यापीठ यांनी सांगितले आहे.