कोल्हापूर- सुभाष भोसले
२४ डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन या निमित्ताने ग्राहक पंचायत महाराष्ट्र करवीर तालुक्याच्या वतीने वरणगे पाडळी येथे सदर कार्यक्रमाचे नियोजन करवीर तालुका अध्यक्ष श्री यशवंतराव शेळके व सदस्य जनार्दन पाटील यांनी केले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून करवीर पुरवठा अधिकारी श्री. दत्तात्रय पाडळकर साहेब उपस्थित होते. यावेळी ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले….!
प्रथम पाहुण्यांचे स्वागत सरपंच अनिता पाटील यांनी केले….!
यानंतर प्रमुख पाहुणे मां.दत्तात्रय पाडळकर साहेब यांनी ग्राहक पंचायतचे काम उत्कृष्ट पध्दतीने सूरू असून गावो गावी ग्राहक जाग्रुती व प्रबोधन करणेचे काम ग्राहक पंचायत करत आहे. अनेक संघटना काम करत असतात पण हि संघटना शासनाशी संलग्न राहून लोकांचे प्रश्न सोडवते खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यांच्या मार्फत आम्ही बर्याच लोकांचे प्रश्न सोडवण्यास सहकार्य केले आहे व ईथून पुढे ही असेच सहकार्य राहिल अशी ग्वाही त्यांनी दिली. यानंतर जिल्हाध्यक्ष बी.जे.पाटील यांनी ग्राहक पंचायतच्या कामाचा आढावा सांगताना खते, बि बियाने घेताना शेतकर्याची होणारी फसवणूक, विज वितरणाच्या तक्रारी, बॅका,पत संस्था,बचत गट मधील फसवणूक, गॅस सिलिंडर व पेट्रोल मध्ये होणारी फसवणूक व ग्राहकांनी घ्यावयाची काळजी या विषयी सविस्तर माहिती सांगितली. यानंतर उपाध्यक्ष जगदीश पाटील यांनी गेली तिन चार वर्षे ग्राहक पंचायत मार्फत शेतकऱ्या पासुन उदयोजगापर्यंत अनेक तक्रारी सोडवणेत आल्या या विषयावर उदाहरणासह केलेल्या कामाची माहिती सांगितली. यानंतर महानगर अध्यक्ष अशोक पोतनीस यांनी ग्राहक पंचायतची स्थापना व ग्राहक पंचायतचे कार्य या विषयावर आपल्या विनोदी शैलीत आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर करवीर तालुका अध्यक्ष श्री यशवंतराव शेळके यांनी करवीर तालुक्यातील ग्राहकांचे सोडवलेले प्रश्न, ग्राहक जाग्रुती व भविष्यातील नियोजन या विषयावर मार्गदर्शन केले. सरपंच अनिता पाटील यांनी ग्राहक पंचायतचे काम निश्चितच वाखानन्याजोगे असुन लवकरच गावातील ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी गावपातळीवर शाखा काढणेसाठी प्रयत्न करणार असे सांगितले. यानंतर पोलीस पाटील सौ.कांबळे यांनी ग्राहक पंचायत मार्फत गावातील ग्राहकांच्या तक्रारींचे निरसन करावे अशी सुचना करत आपले मनोगत व्यक्त केले….!
यानंतर ग्राहकांच्या तक्रारी ऐकुन घेऊन अनेक लोकांच्या तक्रारी सोडवणेत आल्या….!
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा संघटक सुरेश माने यांनी केले व आभार शाहू सेवा सोसायटी चेअरमन संदिप पाटील यांनी मानले.
यावेळी गावातील अनेक मांन्यवर, शेतकरी, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते…
Categories
ग्राहक पंचायत महाराष्ट्र जिल्हा कोल्हापूर व करवीर तहसील कार्यालय यांच्यावतीने राष्ट्रीय ग्राहक दिन वरणगे पाडळी येथे उत्साहात साजरा