Categories
पाथर्डी

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 ठेकेदार व उपअभियंता यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी मनसेचे ठिय्या आंदोलन…

प्रतिनिधी वजीर शेख

पाथर्डी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ चे सुरू असलेले मेहकरी ते पाथर्डी ( टाकळी फाटा ) काम अतिशय मंद गतीने चालू आहे,या मार्गावर अनेक ठिकाणी रस्ते खोदुन ठेवले असुन डायवर्शन असलेल्या ठिकाणी वाहनधारकांना समजण्यासाठी दिशादर्शक फलक लावले नसुन वाहधारकांच्या सुरक्षेची कुठल्याही प्रकारची काळजी घेण्यात आली नाही,रस्त्यावरील खड्डे चुकवताना व खड्ड्यात अादळुन अातापर्यंत अनेक निष्पाप प्रवासी व वाहधारकांचा बळी गेला,कालही याच महामार्गावर दोन अपघात होऊन चार प्रवाशांचा बळी घेतला गेला,या सर्व मृत्युंस महामार्गाचे ठेकेदार कंपनी मे.ईंगावले कन्स्ट्रक्शन कंपनी व या महामार्गावरील कामाचे देखभालीसाठी नियुक्ती असलेले महामार्ग ऊपअभियंता दि.ना.तारडे यांना जबाबदार ठरवून त्यांचेवर कर्तव्यात कसुर करने व मृत्यूस कारणीभूत होऊन सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांचे दालनात सुमारे तासभर ठिय्या अांदोलन करण्यात आले,
यावेळी बोलताना संतोष जिरेसाळ यांनी सांगितले की या महामार्गाचे सदोष कामावर वाहनधारकांना किमान सुविधा देण्याबाबत ठेकेदार कंपनीने दुर्लक्ष केले आहे,मा.तहसिलदार यांचे दालनात दि. २१ /१२/२० रोजी झालेल्या मिटींग मध्ये ऊपअभियंता दि.ना.तारडे यांनी तातडीने या महामार्गाचे कामात सुधारणा करण्याचे अाश्वासन देऊनही त्यांनी अाश्वासन पाळले नाही.महामार्ग प्रशासन व ठेकेदार यांच्या भ्रष्टाचारी व निर्लज्ज कारभारामुळे या राष्ट्रीय “महामृत्युमार्गाने” अाजपर्यंत सुमारे ३४५ निरापराध बळी घेतले अाहेत,या सर्व बळींचा अाक्रोश ताजा असतानाच काल सकाळी देवराई जवळ खड्डे चुकवताना ट्रॅव्हल्स बस व कार यांचा अपघात होऊन चार प्रवाशांचा करुण अंत झाला आहे.
पाथर्डी शहर,देवराई गाव,व माळी बाभळगाव सह अनेक ठिकाणी तीन महिन्यांपासून रस्ता खोदुन ठेवला असुन या ठिकाणी अतिशय धिम्या गतीने सुरू असलेल्या व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी दिशादर्शक व डायव्हर्शन फलक लावणे संदर्भात कुठल्याही प्रकारची काळजी घेतली गेलेली नाही,अनेक ठिकाणी रस्त्यावर दहा ते बारा फुट रुंद व दोन फुट खोल खड्डे पडुन यात अादळुन अनेक प्रवाशांना मनक्याचे विकार जडले अाहेत,अनेक वाहनांची मोडतोड झाल्यामुळे या महामार्गाचे नामकरण “महामृत्युमार्ग” असे केले जात आहे.
अाजपर्यंत झाले ते झाले अाता मात्र ठेकेदार व ऊपअभियंता यांच्या चुकीमुळे किती सर्व सामान्य नागरिकांनी जीवन संपवायचे अाहे ? असा सवाल करुन या अपघातास संपुर्ण पणे ठेकेदार कंपनी मे.ईंगवले कन्स्ट्रक्शन कंपनी व ऊपअभियंता दि.ना.तारडे यांना जबाबदार धरून त्यांचेवर कर्तव्यात कसुर करने व सदर अपघातात बळी पडलेल्या चार जीवांच्या मृत्युस कारणीभूत ठरवुन त्यांचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी अांदोलकांच्या वतीने यावेळी करण्यात आली.
सामाजिक कार्यकर्ते कौतुक चिंतामणी यांनीही त्यांचे बंधू भुषण चिंतामणी यांच्या करंजी जवळील अपघाती मृत्यूस सर्वस्वी महामार्ग प्रशासनच जबाबदार आहे असे निदर्शनास आणून दिले.
अांदोलकांनी अाक्रमक पवित्रा घेतल्याने मा.तहसीलदार श्याम वाडकर यांनी पोलीस निरीक्षक यांना या संदर्भात चौकशी करुन अपघातास कारणीभूत असल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे अाश्वासन दिल्यानंतर ठिय्या अांदोलन थांबवण्यात अाले. पोलीस निरीक्षक श्री रणजित डेरे यांनाही या संदर्भात स्वतंत्रपणे निवेदन देण्यात आले.
यावेळी मनसेचे तालुकाऊपाध्यक्ष एकनाथ सानप,विभाग अध्यक्ष बाबा सांगळे,शहर सचिव संदिप काकडे,शहर उपाध्यक्ष राजु गिरी,संजय चौनापुरे,सामाजिक कार्यकर्ते कौतुक चिंतामणी अादींनी अांदोलनात सक्रिय सहभाग घेतला.

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started