Categories
मुंबई शैक्षणिक

शाळा सुरू करण्याबाबत संभ्रम… गणेश हिरवे

( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी:लक्ष्मण राजे )

मुंबई,ठाणे,नाशिक,पालघर व अन्य काही जिल्हे वगळता राज्यातील इयता नववी ते बारावीच्या शाळा-कॉलेज सुरू झाले आहेत व आता मुंबईसह सर्वच ठिकाणी शाळा सुरू होण्याबाबत पालक,शिक्षक, संस्थचालक व विधार्थीही आग्रही आहेत,कारण दहावी-बारावीचे महत्वाचे वर्ष असून गेल्या कित्येक महिन्यांपासून हे विधार्थी प्रत्यक्ष शाळेतील शिक्षणापासून वंचित राहिले आहेत.सध्या मुंबईतील कोरोना संख्या कमी होत आहे,पण ब्रिटन व इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आल्यामुळे राज्यात पुन्हा एकदा सर्व प्रशासकीय यंत्रणा सावध झाल्या असून मुंबई व इतर काही ठिकाणी रात्रीची संचारबंदी सुरू करण्यात आली आहे.तेव्हा १ जानेवारी २०२१ पासून मुंबईसह इतर ठिकाणच्या शाळा सुरू करायच्या की नाहीत याबाबत शिक्षण विभागाकडून अजूनपर्यंत कोणतीही स्पष्टता किंवा दिशानिर्देश देण्यात आलेले नसल्याने प्रशासनाने याबाबत लवकरात लवकर स्पष्टता आणून याबाबतचा संभ्रम दूर करावा अशी मागणी मुख्याध्यापक व पालकांकडून होत आहे.

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started