

मिरज–अशोक मासाळ
लोकांच्या ध्यानीमनी नसताना शिक्षण क्षेत्रापुढे कोरोनामुळे अनेक आव्हाने उभी राहिली, शाळा बंद झाल्या, मुले व शिक्षकांची एकमेकांपासून ताटातूट झाली. अर्धे आयुष्य शिक्षकांनी मुलांच्या संगतीत घालविली आहेत .निर्माण झालेला मुलांचा विरह शिक्षकांना पेलवेना झाला .बाळाचा विरह आई पेलवू शकत नाही तशी अवस्था शिक्षकांची झाली .मुले लॉकडाउनच्या काळात फोनवरून अभ्यासाची , कौटुंबिक, आर्थिक परिस्थितीची, आरोग्याची चर्चा करायची त्यावेळी अनेक धक्कादायक व मन हेलावणाऱ्या गोष्टी ऐकायला मिळाल्या ,काही मुलांचे नातेवाईक, आप्तस्वकीय हे जग सोडून गेले. मुले भेदरली अशा अवस्थेत त्यांना एकच आधार वाटू लागला तो म्हणजे माझा शिक्षक. अनेक अडचणी आल्या, प्रश्न निर्माण झाले परंतु संवाद साधून,एकमेकांशी चर्चा करून, विचारविनिमय करून त्यातून मार्ग काढायचा व भेदरलेल्या आणि खचलेल्या मुलांना पुन्हा पाठीवरती हात ठेवूनी लढ म्हणायचे हा विश्वास विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण करण्यासाठी जवाहर हायस्कूल चे शिक्षक आता विद्यार्थ्यांच्या घरी निघालेत. तोच विद्यार्थी पुन्हा नव्या उमेदीने घडवण्यासाठी शिक्षक आपल्या दारी!!!
मुख्याध्यापिका
जवाहर हायस्कुल अँड ज्युनिअर कॉलेज मिरज.
