Categories
सातारा

गुंडेवाडी (मराठा नगर )ग्रामपंचायत सलग ४५ वर्ष बिनविरोध निवडणूकीचा विक्रम करणार.हिवरवाडीही बिनविरोध कडे, चितळी,कलेढोणसाठी बिनविरोधसाठी बैठका.

मायणी : सातारा खटाव तालुका विशेष प्रतिनिधी तानाजी चव्हाण दि.२६/१२/२०२०

सध्या सर्वत्र ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. काही ठिकाणी अटीतटीच्या लढतीतर काही ठिकाणी बिनविरोध ग्रामपंचायत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मायणी जि.प. गटातील गुंडेवाडी व हिवरवाडी या दोन ग्रामपंचायती निवडणूक बिनविरोध होणार असून आणखी काही ग्रामपंचायती बिनविरोध होण्याची शक्यता आहे. गुंडेवाडी ( मराठानगर ) ता. खटाव या ग्रामपंचायतीने सलग ४५वर्षे बिनविरोध निवडणूक करण्याचा विक्रम केला आहे.यापूर्वी चितळी पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या गुंडेवाडी (मराठानगर ) हे गाव चितळी ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ठ केले होते .सन १९७५ साली चितळी ग्रुप ग्रामपंचायत मधून गुंडेवाडी ग्रामपंचायत स्वतंत्र झाली. त्यावेळेपासून ते आज अखेर या गावानेआपली बिनविरोध ग्रामपंचायतीची परंपरा कायम ठेवून इतर ग्रामपंचायतीने पुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
मायणी पासून सुमारे दहा कि.मीटर अंतरावर असलेल्या हिवरवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक देखील बिनविरोध होणार आहे .खटाव पंचायत समितीचे माजी उपसभापती व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते बाळासाहेब माने यांच्या नेतृत्वाखाली ही ग्रामपंचायत सध्या कार्यरत असून यावेळी देखील बिनविरोध होण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे .

ग्रामपंचायत बिनविरोध झाली तर १ लाखाचे देणार बक्षीस
राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या पाचवड ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी या गावातील रयत शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून नोकरी केलेल्या व सध्या सेवानिवृत्त असलेल्या रामचंद्र विठोबा घाडगे यांनी जर ग्रामपंचायत बिनविरोध झाली तर या गावांमध्ये पाणलोट विकास कामासाठी नाम फाऊंडेशन यांच्या मार्फत दिल्या जाणाऱ्या मशिनच्या डिझेल खर्चासाठी रु.१००००० इतकी मदत देण्याचे जाहीर केले आहे.

गटातील चितळी व कलेढोण ग्रामपंचायतींचे महत्व मोठे
मायणी जि प गटाच्या निवडणुकीत चितळी व कलेढोण या गावांच्या मताचे पारडे नेहमीच वजनदार व निर्णायक ठरते. या गावांवर आवश्यक असणारी छाप व भविष्यातील राजकारणातील आपली वाटचाल भक्कम राहण्यासाठी या गावांची | ग्रामपंचायत आपल्या विचाराची असावी हा कयास व प्रयत्न स्थानिक नेत्यांचा असणार आहे. आज कलेढोण येथे बिनविरोध निवडणुकीचे चाललेले डावपेच ,चितळीतही दिसून येत आहेत . परंतु एकीकडे निवडणूक बिनविरोध करण्याच्या बैठका पार पडत असताना “अर्ज भरण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करा,असा आदेशही स्थानिक नेत्यांनी दिल्याचे समजते आहे.

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started